Chhoti Aai (छोटी आई)
अनाथाश्रमातून प्रमिलाताई लग्न करून आप्पांच्या घरी येतात. प्रताप व गौरीची आई आजारपणात अर्ध्यावर संसार सोडून जाते, याचे दु:ख सर्व घरावर पसरलेले असते. आपल्या प्रेमळ, संस्कारी, कर्तव्यदक्ष वागण्याने प्रमिलाताई सर्वांना आपलसं करतात;पण प्रतापच्या मनात अढी असल्याने त्यांचं मन उदास असे. पण तरीही चुकीच्या वर्तनाबद्दल त्यांनी प्रतापची कधीच गय केलेली नसते. कायम त्या मुलांच्या भविष्याचा, आजींचा, आप्पांचा विचार करतात. स्वार्थी, घरफोड्यावृत्तीच्या मामांपासून प्रमिलाताई आपल्या घराला वाचवतात. पण शेवटी मामा आजींचे दागिने लाटाळतातच. आजींना हा कावा फार उशिरा कळतो. त्या यात्रेला निघून जाणार असतात; पण प्रमिलाताई त्यांना नमस्कार करून प्रताप आजारी असल्याचं सांगतात व प्रतापकडे दवाखान्यात आणतात. प्रताप ‘छोटी आई’ची चातकासारखी वाट पाहतो. आपल्या प्रेमळ ‘छोटी आई’ ला त्याने ओळखलेलं असतं. सावत्र आई इतका जीव लावणारी असते, हे प्रतापला कळून चुकते. आप्पांनाही व्यवसायात छोटी आई मदत करते. गौरी तर ‘छोटी आई’ची लाडकीच असते. स्वत:ला मूल होऊ न देता ही ‘छोटी आई’ आप्पांचा विस्कटलेला संसार सावरते.