-
Chitarangi Re (चितरंगी रे)
`चितरंगी ' किंवा `चित्रंगी' ही गोव्यात आणि कोकणात आढळणारी एक वेल. महराष्ट्रात त्या वेलीला `गणेश वेल' म्हणतात. मला ही वेल अतिशय आवडते कारण ती कुठेही रुजते. कशावरही वाढते. ह्या वेलीची हळदी - कुंकवाच्या ठीप्क्यांसारखी वाटणारी इवली फुलं येणाऱ्या - जाणाऱ्या वात्सारुंचे डोळे तृप्त करत जातात. लाल - पिवळा हे दोन्ही रंग भारताचे, इथल्या माणसांचे खास लाडके. म्हणूनच ह्या पुस्तकाचे नाव `चितरंगी रे' असं ठेवलंय. इतक्या वर्षांत जगभर फिरताना मला आवडलेले, लक्षात राहिलेले, काही काही वेळा खटकलेले माणसांचे, स्वभावांचे, जागांचे, देशांचे अनेक रंग ह्या पुस्तकातून तुमच्या भेटीला येत आहेत. माझ्या शब्दांच्या चितरंगीची फुलं तुमच्या मनाचा एखादा जरी कोपरा रंगांनी उजळून टाकू शकली तरी तेवढे मला खूप आहे!
-
Nitya Nutan Hindave (नित्य नूतन हिंडावे)
लहानपणी कुंकळ्ळीला अनवट वाटांवरून भटकताना मला सतत वाटायचं की, ह्या डोंगरांपलीकडे, ह्या गावापलीकडे, ह्या राज्यापलीकडे काय आहे ते जाऊन बघितलंच पाहिजे. सुदैवाने पुढे मला खूप ठिकाणी फिरायची संधी मिळाली आणि त्या संधीचं मी पुरेपूर चीजही केलं. अनेक देश फिरल्यानंतर जाणवलं ते एकच, माणसं वरून जितकी वेगळी वाटतात, तितकीच ती आतून एक सारखीच असतात. 'नित्य नूतन हिंडावे' या पुस्तकातून तुम्हाला कधी मला भेटलेली माणसं भेटतील, तर कधी आलेले आंबट- गोड अनुभव, क्वचित कधी जाणवलेला जीवनाचा एखादा कुरूप अंधारा कोपरा, तर कधी अनुभवलेला तन - मन उजळून टाकणारा एखादा सुंदर दीप्तीमान क्षण. चला तर मग माझ्याबरोबर भटकंतीला!
-
Eka janardani (एका जनार्दनीं)
संत एकनाथांच्या आयुष्याची सारी वाटचाल इतर पूर्वसूरींच्यापेक्षा वेगळ्या वळणाची आहे. तीच या कादंबरीत आली आहे.
-
Ghas Ghei Panduranga (घास घेई पांडुरंगा)
ज्ञानदेव व त्यांच्या भावंडांची तसेच समकालीन संतांची अभंगरुपी चरित्रे लिहिणारे नामदेव आद्य चरित्रकर समजले जातात. पांडुरंगासमोर चोखोबांची संधी बांधणारे नामदेव आद्य अस्पृश्योधारक आहेत, तर परधर्मीयांचा प्रभाव जाणवणाऱ्या सीमेवरील पंजाब प्रांतात राहून तेथे भागवत धर्माचे व्यासपीठ उभे करणारे व उत्तरेकडील भाषेत अभंग रचना करणारे नामदेव आद्य समाजकारणी व भारतीय एकात्मतेचे उद्गाते आहेत. जनाईला संतपदी नेणारे नामदेव स्त्रीमुक्तीचे आद्य प्रचारक आहेत. नामदेवांचे हे आगळेपण रवींद्र भात यांनी 'घास घेई पांडुरंगा' या नामदेवांवरील कादंबरीत व्यक्त केले आहे. नैवद्याचा घास घेण्यासाठी घेण्यासाठी पांडुरंगाला साकडे घालण्याऱ्या बाल नामदेवांच्या लीलांपासून पूर्ण ज्ञानाची आस व गुरुकृपेची ओढ लागलेल्या आणि ज्ञानदेव - निवृत्तीनाथ, मुक्ताई यांच्या मेळ्यात रंगणाऱ्या संत नामदेवांचेचरित्र यात रेखाटले आहे. नामदेव, जनाबाई यांची काव्यरचना, राजाईच्या निवडक अभंगाचा कादंबरीत उपयोग केलेला आहे. पंजाबमधील घुमान गावात नागदेवांनी भागवत धर्माचा प्रसार केला. तेथील त्यांच्या कार्याची महती व त्यांनी हिंदीत केलेल्या रचना यात आहेत. माणूसधर्माचा विचार कृतीत उतरवून नंतर तो लोकांमध्ये रुजविणाऱ्या संत नामदेवांचे विचर आजच्या समाजासाठी आदर्श आहेत.
-
Bhedile Suryamadala (भेदिलें सूर्यसमंडळl)
आदर्श लोकनेतृत्व, नि:स्वार्थ समाजकारण आणि प्रपंचाभिमुख परमार्थ ही समर्थ रामदासांच्या विचारधारेची मूळ त्रिसूत्री. ती जाणून घेणे व जाणवून देणे ह्या विचाराने लिहिली गेलेली ही समर्थ रामदासस्वामींच्या जीवनावरील कादंबरी.
-
Hrishikesh Mukherjee : Bemisal Chitrapatanchi Khub
हृषिकेश मुखर्जी... हिंदी सिनेमात लोकप्रियता आणि दर्जा यांची सांगड घालणाऱ्या मध्यममार्गी दिग्दर्शकांमधला एक अढळ तारा. ‘मुसाफिर’पासून ‘झूठ बोले कौवा काटे’पर्यंतच्या प्रदीर्घ कारकिर्दीत हृषिदांनी कधी खळखळून हसवलं, तर कधी ढसढसा रडवलं. जय अर्जुन सिंग यांनी लिहिलेल्या या पुस्तकातून संकलक-दिग्दर्शक हृषिदांच्या चित्रकारकिर्दीचा समग्र आढावा घेताना ते आल्हाददायी चित्रपटच डोळ्यांसमोरून तरळून जातात.