-
Nivdak AbhidhaNantar (निवडक अभिधानंतर)
अभिधा सुरू असताना ग्लोबलायझेशनची प्रक्रिया सुरू झाली होती. आमच्या काही कविता आणि याच दरम्यान स्वतःला आलेलं जगण्याचं नवं भान, ग्लोबलायझेशनमुळे बदललेला भोवताल आणि या सर्वांमुळे उमजलेले लिहिण्याचंही नवीन भान ह्या ‘अभिधा’मधून आम्ही दिलेल्या किंवा आम्ही मिळविलेल्या काही गोष्टी. १९९९ मध्ये अभिधानंतर सुरू केलं तेव्हा ग्लोबलायझेशनचा परिणाम असलेले साहित्य आम्ही प्रसिद्ध करू असे धोरण होते आणि २०१४ साली अभिधानंतर बंद करेपर्यंत आम्ही ते लावून धरले. ग्लोबलायझेशननंतर जीवनाप्रमाणे साहित्यही बदलत होतं. हा बदल पकडण्याचा, डॉक्युमेण्ट करण्याचा, नवीन साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश होता. हा अवकाश ग्लोबलायझेशन 'नंतर' चा आणि एका अर्थाने 'अभिधा' 'नंतरचा' अवकाश होता. या पुस्तकातून अभिधानानंतरमध्ये प्रकाशित झालेल्या निवडक कविता, लेख, मुलाखती आणि संपादकीय देत आहोत. या सर्व लिखाणांमधून ग्लोबलायझेशन आणि डिजिटालायझेशननंतर निरंतर बदलत असलेली भाषा, संस्कृती,आणि जगणं अधोरेखित होतं. मराठीत सध्या लिहिणाऱ्या, वाचणाऱ्या, विचार करणाऱ्या, भाषेची आणि संस्कृतीची चिंता करणाऱ्या आणि भाषेसाठी झगडणाऱ्या लोकांसाठी हे पुस्तक खूप महत्त्वाचा दस्तऐवज ठरू शकेल याची खात्री आहे.
-
Mi Boltoy (मी बोलतोय)
डॉ. सुनील शशीकांत काळे यांनी या पुस्तकातून स्वतःचा आणि पर्यायाने मानवाचा शोध घेतला आहे. भक्ति, श्रद्धा आणि समर्पणाच्या मार्गावर चालत द्वैतातून अद्वैताचा प्रवास करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. ते म्हणतात, परब्रम्हालाच बहु व्हावे असे वाटले आणी त्याने सृष्टि निर्माण केली. परब्रह्म स्वतःच ईश्वररूपात सर्व प्राणीमात्रांच्या अंतरंगात स्थिरावले. या रूपाचा त्यांनी शोध घेतला आहे. विश्वाच्या, अनंताच्या प्रवासाकडे, नराच्या नारायणाकडे झालेल्या प्रवासाकडे त्रयस्थपणे पाहण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. धर्म, सत्य, सत्कृत्ये, ईश्वर, जीवन यांचाही हा शोध आहे. पुस्तकाच्या अखेरीस काही कवितांचा समावेश केला आहे.
-
Schizophrenia Ek Navi Janeev (स्चीझोफ्रेनिया एक नव
स्किझोफ्रेनिया एक नवी जाणीव : मनाच्या रथाला इंद्रियांचे घोडे असतात. ते लगाम खेचून नीट चालविले तर ठीक नाहीतर किंवा घोडेच उधळले तर मन आणि त्याचा सारथी माणूस, सगळेच कोलमडून जातील. विचार इकडे, भावना तिकडे, वर्तन आणखी कुणीकडे अशा व्यक्तिमत्त्वभंग अथवा छिन्नमनस्कता यालाच स्किझोफ्रेनिया म्हणतात.
-
Belbhasha (बेलभाषा)
सुमन बेलवलकर यांना परभाषिकांना मराठी शिकवताना जे स्वभाषेचे आणि महाराष्ट्राच्या संस्कॄतीचे दर्शन झाले ते त्यांनी मोठया खेळकरपणाने छोटया छोटया लेखातून टिपले आहे.
-
Brahmashrichi Smaran Yatra (ब्रह्मर्षीची स्मरण यात
समाधीमध्ये मंगळ, गुरु, शनि या ग्रहांवर विज्ञानमय कोषाने जाऊन तेथील स्थिती अगोदर प्रसिध्द केली व ती अवकाश यानांनी मानल्यामुळे जागतिक कीर्ति लाभलेले, दिव्य दृष्टी असलेले साक्षात्कारी संत. प्राचीन भारतीय विद्यांचे संशोधक म्हणून भारतात मान्यता पावलेले. "स्वयंभू" ग्रंथाने धूर्त, मुत्सद्दी भीम व महाभारताची ऎतिहासिकता सिध्द करणारे व ज्योतिर्गणिताने तारखा ठरविणारे. "वास्तव रामायण" ग्रंथात पंधरा सहस्त्र वर्षांचा इतिहास मांडून रामाच्या जीवनातील तारखा ज्योतिर्गणिताने सिध्द करणारे. उपनिषदे, पातंजल योग व गीता यावरील विज्ञाननिष्ठ निरुपणे प्रकाशून अध्यात्मिक अधिकार सिध्द करणारे. "पुनर्जन्म"- या ग्रंथातून त्या सिध्दान्ताची वैज्ञानिक मांडणी करणारे. ख्रिस्ताचे हिंदुत्व, प्रतापसूर्य थोरले बाजीराव पेशवे, ‘स्वा. सावरकर - मूर्तिमंत गीता, पहिले नि एकमेव’, ‘दास मारूती ? नव्हे; वीर हनुमान !’ वैदिक विज्ञान व वेदकालनिर्णय, संगीत दमयंती परित्याग, युगपुरूष श्रीकृष्ण, तेजस्विनी द्रौपदी अशी सुरस १६ पुस्तके लिहून जगापुढे सत्य मांडणारे. पुण्यातील प्रथितयश सर्जन डॉ. प. वि. वर्तक यांच्या सिध्दहस्त लेखणीतून ५२ वर्षांच्या अध्यात्मसाधनेचे अनुभव अक्षरबध्द झालेले आत्मचरित्र ‘ब्रम्हर्षीची स्मरणयात्रा’.