-
Narmada Parikrama Ek Antarmukh Yatra (नर्मदा परिक्
असं म्हणतात कि पूर्वजांची पुण्याई उदयास येते तेव्हा नर्मदा परिक्रमा घडते. गुरूंच्या आदेशाने आणि घरातील लहान थोर मंडळींच्या अनुमती नंतरच परिक्रमा उचलावी. संकल्प सोडताना सगळा भर नर्मदा माई वर टाकला आणि माईने आपल्या लेकराचा हात धरून चालवलं. तहानलेल्या वेळी पाणी पाजलं. भुकेच्या वेळी खाऊ घातलं आणि झोप आल्यावर मांडीवर घेऊन झोपवल. ज्यांना परिक्रमा करायची आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांनी केली आहे त्यांच्यासाठी देखील उपयुक्त पुस्तक.
-
Anandibai Raghunathrao (आनंदीबाई रघुनाथराव)
ध चा मा केला म्हणून इतिहासाने जिला कलंक दिला, त्या आनंदीबाईची आणि अटकेपार झेंडा फडकावून मराठी साम्राज्य भारतभर पसरविणाऱ्या रघुनाथराव पेशव्यांची कहाणी.
-
Corporate Aani Itar Katha (कॉर्पोरेट आणि इतर कथा)
मराठी साहित्यात ताज्या दमाचे आणि स्वतःची स्वतंत्र अभिव्यक्ती असणारे अनेक प्रतिभावंत पुढे येत आहेत. असे लेखन करणाऱ्यांत आता सुनील गोडसे हे नाव समाविष्ट करावे लागेल. हा लेखक मानवी मनाच्या विविध विभ्रमावस्थांचा काव्यात्म तरलतेनं हळुवार वेध घेत आपल्या कथांमधील पात्रांच्या मनात शिरून त्यांच्या व्यथा-वेदना आणि भाव-भावनांमध्ये वाचकाला स्वत:सोबत अलगद फिरवून आणतो. त्यातून एक जिवंत, रसरशीत अनुभव घेतल्याचा आनंद अवर्णनीय आहे. आजच्या जबाबदार लेखकांच्या पिढीच्या संवेदना अभिव्यक्त करणारा प्रतिनिधी म्हणून त्याची स्वतंत्र कथात्म शैली व जातकुळी वाचकांना भिडल्याशिवाय राहणार नाही!
-
Krutrim Paus(कृत्रिम पाऊस)
कृत्रिम पाऊस पाडण्याची शास्त्रीय प्रक्रिया, त्या प्रक्रियेचा मनोरंजक इतिहास, पर्यावरणविषयक संदर्भ, पूर्वापर पावसासंदर्भातील आपल्या अंधश्रद्धा, इत्यादी गोष्टींचा शास्त्रीय मागोवा घेणारे असे पुस्तक आजतागायत तरी मराठीत उपलब्ध नाही. विशेष म्हणजे विषय पूर्णपणे तांत्रिक स्वरूपाचा असूनही कुठेही वाचताना कंटाळा येत नाही. याचे कारण हेच आहे. कि श्री. चंद्रसेन टिळेकर हे शिक्षणाने इंजिनियर असले तरी मराठीतले शैलीदार लेखक आहेत. मराठीतील संगणकावरची पहिली दोन पुस्तके त्यांच्याच नावावर आहेत. भूगोलाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थांना व शिक्षकांना हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल ! - कॅप्टन सुनील मुळे
-
Hari Hari Vitthal Vitthal (हरी हरी विठ्ठल विठ्ठल)
अवती-भवती घडणाऱ्या कौटुंबिक, सामाजिक, राजकीय घटनांचा परिणाम इतरांवर होतो तसा माझ्यावरही होतो. या घटनांवर मला काही बोलल्याशिवाय राहवत नाही. मी लेखनातून बोलतो. उदाहरणार्थ- 'लिव्ह इन रिलेशनशिप' म्हणजे तरुण- तरुणींनी लग्नाशिवाय कंत्राटी पद्धतीने एका छपराखाली राहणे. श्रीमंतांची किंवा राजकीय वरदहस्त असलेली तरुण पोरे दारू पिऊन, बेफाम वेगाने कार चालवून फुटपाथवरची माणसे चिरडतात, राजकीय लागेबांधे असलेले सावकार कुळांना नाडतात व त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आणतात. लग्नाची वचने देऊन पुरुष स्त्रीला फसवतात, शिकली-सवरलेली माणसे बुवाबाजीला बळी पडतात, कौटुंबिक वाद व गैरसमज यामुळे भांडणे धुमसतात व आत्महत्येपर्यंत पोहोचतात, चांगल्या घरातील मुले अपघाताने गुन्हेगारी विश्वात ओढली जातात, ऑफिसातील स्त्रियांची लैंगिक छळवणूक, स्त्री-भ्रूणहत्या, डॉक्टरांकडून होणारी सहकारी गृहसंस्थांची पिळवणूक अशा विषयांवरच्या बातम्या मी वाचतो, पाहतो व ऐकतो. हे विषय न संपणारे आहेत. १९९२ साली, नोकरीतून निवृत्त झाल्यावर साठाव्या वर्षापासून, या चिरंजीव विषयांवर, २०२३ या चालू वर्षापर्यंत म्हणजे वयाच्या ९१ वर्षांपर्यंत मी कथा लिहितो आहे. माझ्या कथा कालबाह्य होत नाहीत. कारण गैरप्रकार वेष पालटून पुन्हा पुन्हा जन्म घेतात. माझ्या कथांची अखेर मी आनंददायी करतोच करतो. मला रडवणाऱ्या कथा लिहिताच येत नाहीत. ही माझी लेखनमर्यादा मला मान्य केलीच पाहिजे!
-
Vegali Manse (वेगळी माणसे)
आपल्या आजूबाजूला किंवा इतिहासात अनेक अशी माणसं दडलेली असतात की ज्यांचं काम पुढील पिढीत अत्यंत प्रेरणादायी ठरतं पण ही माणसं प्रसिद्धी पासून लांब रहातात. त्यांची उपेक्षाही होते. या साऱ्यांचा परिचय नवीन पिढीसाठी करून दिला आहे
-
Sakshep (साक्षेप)
डॉ. रवींद्र शोभणे यांचे समीक्षालेखन म्हणजे सगळ्यातून सर्जनशील लेखनाचा शोध घेण्याचा प्रयत्न होय. या सर्जनाच्या पाठीमागे काही घटक असतात. काही स्रोत असतात. अशा घटकांचा, स्रोतांचा शोध घेणे हे खरे तर सर्जनशील समीक्षकांचे काम असते. आणि समीक्षक हा जर मुळात सर्जनशील लेखक असेल तर तो त्या अंगाने समोर असलेल्या कलाकृतीचा असा शोध घेत असतो. अर्थात हा शोध म्हणजे अंतिम सत्य नसते, पण त्या सत्याच्या वाटेवरून जाण्याचा तो एक मार्ग ठरतो. हा मार्ग, हा प्रवास सर्जनशील समीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. या भूमिकेतून डॉ. रवींद्र शोभणे यांनी केलेल्या या समीक्षालेखनच्या) निमित्ताने वाचकांना पुन्हा नव्याने त्या त्या कलाकृतीकडे, लेखकांकडे जाता येईल. वाचकांना मिळणाऱ्या या पुनः प्रत्ययाच्या आनंदातच या लेखनाचे यश आहे.
-
Pravah (प्रवाह)
प्रवाह' ही कादंबरी वाचकाला जगण्याच्या प्रवाहाशी जोडून घेते. ह्यावं मुख्य कारण ह्या प्रवाहातल्या लाटा, भारती-ओहटी, भोवरे, बादळं, श्वास कोंडणं, किनारा दिसणं, निसटणं, कधी आनंददायी डुंबणं, तर कधी स्वतःच्याच मस्तीत स्वार होणं, कधी खोल गर्तेत जाणं... अशा अनेक भावावस्था प्रत्येकाला आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर एका वेगळ्या अर्थाने अनुभवायला वा पाहायला मिळतात. कादंबरी हा रूपबंध मानवी आयुष्याचा विशाल पट वाचकांसमोर उलगडत असतो. 'प्रवाह' कादंबरीचा हा पटफ्राईडच्या 'जगण्याच्या धडपडीकरिता कामवासनेचं सर्वव्यापी असणं, या सिद्धांताचा धागा आणि त्याचे अनेक रंग वाचकांसमोर आणतो. तारा ही व्यक्तिरेखा ह्या कादंबरीचा केंद्रबिंदू आहे. तिच्या भावविश्वातले, तिचे आणि तिच्या आयुष्यातल्या इतरांचे, अनेक क्षणांचे घटितार्थ एक टोकदार, जळजळीत वास्तव उमं करतात. ताराच्या आणि इतर व्यक्तिरेखांच्या भावजीवनातले कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक आणि मानसिक अशा सर्व पातळ्यांवरचे प्रश्न दुर्देवाने अनुत्तरीतच राहतात. तथाकथित सांकेतिक, संयमित, सुसंस्कृत प्रतीकांचं आशयाला अवगुंठन न देता मानवी मनातल्या उल्या पालथींना ही कादंबरी अस्सल स्वरूपात व्यक्त करते. माणसाच्या जगण्याच्या प्रवाहात भूक आणि कामवासना ह्या आदिम प्रेरणा अपरिहार्य असल्याचं ती स्पष्टपणे सुचवते. जीवनाचं हे बिरूप दर्शन सुद्धा बाचकांना निश्चितच अंतर्मुख आणि अस्वस्थ करणारं आहे.
-
Hidden Measurement (हिडन मेजरमेंट)
'हिडन मेजरमेंट' या कादंबरीत धरणाच्या निर्मितीची, धरणग्रस्तांची आणि धरणाच्या निर्मितीनंतर आकाराला आलेल्या नव्या समाजव्यवस्थेची कथा आहे. आर्थिक सुबत्तेची, त्या सुबत्तेमुळे आलेल्या नैतिक अधःपतनाची मांडणी गोविंद काळे करतात. तसेच धरणग्रस्ताच्या घरातील तरुणाने उभारलेल्या संसाराची कथा या कादंबरीत आलेली आहे. या कादंबरीतील अनुभवविश्व नवे, अनोखे आहे आणि गोविंद काळे त्या अनुभवाला साध्या, सोप्या ग्रामीण भाषेचा साज चढवून आकर्षक रूप देतात. त्यामुळे ही कादंबरी वाचनीय झाली आहे. इतकेच नाही, तर मराठी कादंबरीच्या प्रांतात या कादंबरीने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.
-
Arjunacha Putra Abhimanyu (अर्जुनाचा पुत्र अभिमन्य
अभिमन्यू, अर्जुनाचा जीव की प्राण आणि भारतातील ऐतिहासिक पौराणिक कथांमधले सगळ्यात प्रभावी आणि मनात रेंगाळणारे व्यक्तिमत्त्व! पाप-पुण्य, योग्य-अयोग्याचे वेगवेगळे निकष लावून अनेक कुकर्मे जिथे घडली ते कुरुक्षेत्र म्हणजे अभिमन्यूला सद्गती प्राप्त करून देणारी बीरभूमी! अभिमन्यू हा अद्वितीय आणि अतुलनीय पराक्रमाचे द्योतक होता. त्याची कथा सगळ्यांनाच माहीत आहे पण किती जण या उत्तमातील उत्तम अशा तरुणाला अंतरबाह्य जाणतात? 'अर्जुन' या प्रचंड लोकप्रिय पुस्तकाच्या लेखिका अनुजा चंद्रमौली अतिशय घडाडीने लोकांच्या कल्पनाशक्तीला जागवत या तेजस्वी राजकुमाराला शब्दातून साकार करतात. एक तेजस्वी धूमकेतू ज्याच्यात त्रिभुवनाला उजळवून टाकण्याची ताकद होती परंतु नशीबाने शापित असल्याने अल्पावधीतच तो अस्तंगत झाला! माहित असलेली कथा, लेखिका अतिशय सृजनात्मक पद्धतीने खुलवतात आणि ताज्या दमाने सादर करतात. अतिशय सहृदय तीव्रतेने घेतलेला अभिमन्यूच्या व्यक्तिमत्वाचा वेध अशा अनेक गोष्टी उलगडून दाखवतो ज्या काळाच्या ओघात हरवल्याने या व्यक्तिमत्वाचे काही पैलू कधी प्रकाशात आलेच नव्हते. ही कथा वाचकाला खिळवून ठेवते आणि महाभारतातल्या या तेजस्वी नायकाच्या दुर्दैवी अंताने मन पिळवटून टाकते
-
Hurda (हुरडा)
ही जी घटना घडली तिला कोण जबाबदार? ज्यांनी कोवळ्या मुलींवर अत्याचार केला, बलात्कार व खून केला, ते ? की त्यांचे आई - वडील? ज्यांनी त्यांना वेळेत आवरले नाही, पाठीशी घातले ते? हा दोष कोणाचा? ज्या न्यायदेवतेकडून न्यायाच्या अपेक्षा असूनही न्याय मिळाला नाही ती? त्यांना न्यायालयाकडून न्याय मिळाला नाही म्हणून जनतेने कायदा हातात घेऊन जनतेच्या दरबारात त्यांनी न्याय दिला ते दोषी ? ते बरोबर की, हे याचा फैसला कोण करणार? याचा फैसला काळच करणार. कारण पुढील काळात असा गुन्हा करणारे दहा वेळा या घटनेचा विचार करतील. संपूर्ण महाराष्ट्रात ही घटना बातमीच्या रूपाने पसरली. लोकांना वाईट वाटले नाही. जनतेने शेवटी न्याय केला. जनतेच्या दरबारात जे काय होते ते नेहमी लोकांनी स्वीकारले आहे.
-
Tumcha Aamcha Sanju (तुमचा आमचा संजू)
"संजू, आजच्या पराभवाला उद्याच्या जिंकण्यात बदलायचं. एकदा मनाशी जिद्द बाळगली की ते अवघड नाही. आपल्या मर्यादा आणि आपलं बलस्थान ओळखण्यासाठी या परीक्षा असतात. मर्यादांना अधिक सक्षम करायचं आणि त्या स्वीकारायच्याही प्रत्येक व्यक्तीला काही मर्यादा असतात. म्हणूनच मला खूप ज्ञान आहे असं म्हणणारा अज्ञानी असतो. जगातले अनेक विषय आपल्या माहिती पलीकडचे असतात. मात्र जगातल्या सगळ्या भावना सगळीकडे सारख्या असतात. प्रेम, दया, करुणा. त्यात आपण मागे राहता कामा नये." सरांनी संजूच्या पाठीवरून हात फिरवत म्हटलं.
-
Tyana Udu Dya (त्यांना उडू द्या)
संजीवनी बोकील या सिद्धहस्त लेखिका, संवेदनशील कवयित्री, विद्यार्थिप्रिय शिक्षिका. मराठी साहित्यक्षेत्रातलं प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्व. 'त्यांना उडू द्या...' या कुमारकथासंग्रहासाठी ही पाठराखण नव्हे, अंतर्मनातून आलेलं कौतुक, मनस्वी आनंदाची प्रचीती आहे. त्या मुळात विद्यार्थ्यांशी सकारात्मक नातं जपणाऱ्या शिक्षिका असल्यानं बालभावविश्वाचा नेमका वेध त्यांच्या कुमारकथेतून जाणवतो. 'त्यांना उडू द्या...' हे सूचक शीर्षक असलेल्या या संग्रहात मोठ्यांना छोट्या छोट्या वाटणाऱ्या कुमार भावविश्वातल्या बाबी संजीवनीताईंनी हळुवारपणे टिपल्या आहेत. प्रत्येक कथा ही संवेदनशील कुमारवयीन मनाचं तरल प्रतिबिंब आहे. या कुमारकथा कुमारांचं मन प्रगल्भ करणाऱ्या आहेत. प्रेम, त्याग, समंजसपणा, परोपकार, कष्टाचं महत्त्व, उदारता या सर्व सामाजिक मूल्यांचा सहज संस्कार म्हणजे 'त्यांना उडू द्या...' या कुमारकथा होत. संजीवनी बोकील यांच्याकडून असंच उत्तमोत्तम बालसाहित्यलेखन घडो, ही शुभेच्छा!
-
Jhad Ek Mandir (झाड एक मंदिर)
'झाड एक मंदिर' एक वेगळे आणि उत्सुकता वाढवणारे शीर्षक असणारी स्वाती कान्हेगांवकरांची किशोर कादंबरी संवेदनशील बोधप्रद आणि किशोरांना खिळवून ठेवणारी आहे. कादंबरीतील हेमाआजी स्वत:च्या परदेशी असणाऱ्या नातवंडांच्या प्रेमासाठी व्याकुळ होते; पण आपले प्रेम, माया, वात्सल्य आजूबाजूच्या किशोरवयीन मुलांना भरभरून देऊन त्याच मुलांना आपली नातवंडे मानते. त्या मुलांना रसाळ गोष्टींतून संस्काराची शिदोरी देते आणि मुले संस्कारित होतात. आजीने दिलेली शिकवण मुलांमध्ये परिवर्तन घडवते याचा परिणाम, गोष्टीतील नाना-तात्या आजोबांचा वारसा पुढे चालवण्याचा निर्धार मुले करतात तेव्हा वाचकांचेही डोळे पाणावतात. आजी आणि नातवंडांचे प्रेम पाहून खरंच कधी-कधी रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती दाट आणि जवळची होतात याची प्रचिती येते. झाडाचे रक्षण-संवर्धन, मुक्या प्राणिमात्रांवर प्रेम करा, भूतदया दाखवा, चराचर सृष्टीत ईश्वराचे रूप पहा, एकमेकांना सहकार्य करा अशा अनेक मूल्यांची रुजवण करणारी ही कादंबरी किशोरांच्या मनात एक नवज्योत प्रज्वलित करते. 'पुढे काय'च्या शोधात कादंबरी पूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवावी वाटत नाही यातच लेखिकेचे यश आहे. कादंबरी वाचताना लेखिकेची संवेदनशीलता पानोपानी दिसते. अनेक मूल्यांना सहजतेने लेखिकेने किशोरवयीन मुलांवर बिंबवण्याचा केलेला प्रयत्न अधोरेखित करण्यासारखा आहे. लेखिका स्वाती कान्हेगांवकर यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! -डॉ. अलका सुरेंद्र पोतदार
-
Jagala Pokharanari Davi Valavi (जगाला पोखरणारी डाव
बंदुकीच्या नळीतून येणारी रक्तरंजित क्रांती अशक्य आहे हे ओळखून डाव्या शक्तींनी जागतिक वर्चस्वाचं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक नवी घातक रणनीती आखली, जिचं उद्दिष्ट होतं पाश्चात्य जगताची कुटुंबव्यवस्था, धर्मसंस्था, देशप्रेम यासारखी शक्तिस्थान॔ आतून पोखरून टाकत त्यांचा विध्वंस करणं. यासाठी त्यांनी अतिरेकी व्यक्तिवाद, विकृत स्वरूपातील स्त्रीवाद, लैंगिक स्वैराचार, समलैंगिकतेचा प्रसार, इतिहासाचं विकृतीकरण, धर्म आणि संस्कृतीची कुचेष्टा, अनिर्बंध स्थलांतराला प्रोत्साहन… यांचा आधार घेत कुटुंब, समाज, राष्ट्र यांना स्वयंविध्वंसाच्या टोकावर आणून उभं केलं. मार्क्सवादातील श्रीमंत वि. गरीब हा मूळ आर्थिक संघर्ष दूर ठेऊन वंश, लिंग, धर्म या सांस्कृतिक आधारांवर विविध गटांमध्ये सतत संघर्ष भडकत राहील अशी योजना राबवली. विशेष म्हणजे आपला विध्वंसक अजेंडा राबवण्यासाठी सामाजिक न्याय, पर्यावरणवाद, स्त्रीमुक्ती, सर्वसमावेशकता हे आकर्षक मुखवटे धारण केल्यामुळे त्यांना विरोध करणंच अशक्य ठरू लागलं. या नवमार्क्सवादाने म्हणजेच वोकिझमने आता भारताकडे लक्ष वळवलं आहे. मूळ मार्क्सवादाच्या समोर दिसणार्या बंदुकीशी लढणं शक्य होतं पण आपल्याच लोकांचा बुद्धिभेद करून आतून पोखरणाऱ्या या वाळवीला आवरणं फारच कठीण आहे. म्हणून इतरांच्या अनुभवावरून आजच जागं व्हायला हवं. आकर्षक मुखवट्यांमागचा हा भेसूर, विध्वंसक चेहरा वेळीच ओळखायला हवा.
-
Vishnumay Jag (विष्णुमय जग)
निवड केलेले अभंग अत्यंत भावपूर्ण आहेत. लेखक प्रा. मधुकर डो यांनी उपयोजलेली भाषा अभिव्यक्ती ही खूप सुबोध आणि लाघवी असून निरूपण केलेल्या भाषेला सर्वसामान्यांच्या हृदयाचा ठाव घेण्याचं मूल्य प्राप्त झालेलं आहे. लेखकाने निवडलेला शब्दसंग्रह आणि त्यातून अभंगगाथेतील काही शब्दांचा दिलेला अर्थसुद्धा उपयुक्त आहे. प्रत्येक अभंगाचे निरूपण करताना त्यांनी पहिल्यांदा स्वतःची दृष्टी त्या अभंगाबद्दलची व्यक्त केलेली आहे. नंतर अभंगाचे चरण दिलेले आहे. त्यानंतर अभंगाचा अर्थविस्तार केलेला आहे. परत एकदा शेवटी स्वतःचे मत मांडून त्याला वास्तवतेच्या स्वरूपामध्ये काय महत्त्व आहे हे स्पष्टीकरणासह मांडलेलं आहे. यामुळे वाचकांना या ग्रंथाचे वाचन करताना एक अद्वैत अनुभूती प्राप्त होईल. त्यातून संत तुकारामांच्या अभंगाचा अर्थबोध तर होईलच परंतु एका अभ्यासकाने मांडलेला बोधात्मक अर्थसुद्धा या ठिकाणी व्यक्त झालेला आपल्याला पाहायला मिळतो. - प्रा. डॉ. हरिदास आखरे ( मराठी विभाग )
-
So I (सो आय)
सो आय...' ही रहस्यमय कादंबरी एका धनाढ्य व्यापाऱ्याच्या अत्यंत नियोजित खुनाच्या तपासात वाचकाला गुंगवून ठेवते. तपासाची सुई वेगवेगळ्या पण संबंधित व्यक्तींकडे वळते, तेव्हा सामान्यपणे संशय त्याच व्यक्तीबाबत बळावतो. तीच व्यक्ती हा खून करू शकते अशी खात्री पटू लागते, नव्हे पटते. कादंबरी जेव्हा अंतिम वळणावर येते तेव्हा तपासाचा वेग वाढतो. वाचकाच्या काळजाचे ठोकेही वाढतात, कथेतला गुंताही वाढतो... आणि जेव्हा उकल होते तेव्हा..... रहस्यमय कादंबरी मराठी साहित्यात अभावाने वाचायला मिळते. बाबा कदम, सुहास शिरवळकर या दिग्गजांच्या पिढीनंतर श्री. मकरंद विनायक सापटणेकर यांची या पद्धतीची साहित्यकृती हाताळण्याची हातोटी खरोखर वाखाणण्याजोगी आहे. त्यांनी पदार्पणातच जर या क्षमतेची रहस्यमय कादंबरी लिहिली आहे तर त्यांच्या भविष्यातल्या लेखनाबद्दल खूप अपेक्षा ठेवण्याची मराठी वाचकाची मानसिकता होते यात काहीही नवल नाही. श्री. सापटणेकर यांच्या भविष्यातल्या प्रत्येकच साहित्यनिर्मितीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा! त्यांच्या साहित्यनिर्मितीस मराठी वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळेल आणि त्यांनाही वाचकांचे प्रेम लाभेल यात शंका नाही. - संतोष हुदलीकर
-
Amrutahuni God (अमृताहुनि गोड)
संत नामदेव महाराज यांचे संपूर्ण चरित्र कादंबरी स्वरुपात
-
Raobahadur Dattatray Balwant Parasnis Charitra V K
आपण इतिहास वाचतो कारण इतिहासापासून शिकण्यासारखे बरेच असते. त्यापासून आपल्याला स्फूर्ती मिळते. इतिहासातील चुकांपासून आपल्याला काही शिकवण मिळते. दीडशे वर्षांपूर्वीच्या त्या काळात माणसाच्या गरजा मुळात कमी होत्या. सोयी कमी होत्या. फक्त माणसाच्या स्वप्ने पाहण्याला जशी मर्यादा नसते तशी त्या काळातही माणसे मोठी स्वप्ने पाहत असत. नुसती पाहत नसत तर ती पूर्ण करण्यासाठी झटत असत. पारसनीस याला अपवाद नव्हते. अगणित वस्तू आणि हजारो कागदपत्रे, जुनी चित्रे, नाणी याचा संग्रह असलेले भारतातील पहिले बहिले ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय. त्यांची अफाट जिद्द, असीम इच्छाशक्ती, आत्मविश्वास याच्या बळावर ते हे पूर्ण करू शकले. शिक्षण अपुरे होते म्हणून ते हातपाय गाळून बसले नाहीत. त्यांची इच्छाशक्ती मजबूत होती. तिला त्यांनी प्रयत्नांची साथ दिली. शिक्षण म्हणजे सर्वस्व नव्हे, हे त्यांनी जगाला दाखवून दिले. जे स्वप्न त्यांनी पाहिले होते, ते पूर्ण झालेले पाहिले. आलेल्या प्रत्येक संधीचे त्यांनी सोने केले. त्यांनी आपली कुवत जाणली होती त्याचबरोबर आपली ताकद ही पूर्णपणे जोखली होती. त्यांच्या ध्येयाच्या वाटेवर कोणकोणती आव्हाने आहेत? कोणते धोके पत्करावे लागतील? हे ते ओळखून होते. शिक्षणाची संधी जरी हुकली तरी, त्यांनी त्यांच्या इतिहासाच्या छंदाला मुरड घातली नाही. तो उत्तरोत्तर वाढतच गेला. संकटाचे संधीत रूपांतर करणे आणि आपली प्रगती करणे, ही शिकवण आजच्या युवा पिढीला त्यांच्या चरित्रातून घेता येण्यासारखी आहे.
-
Chiranjiv (चिरंजीव)
मी दिग्विजय कर्ण, आज अखेरच्या क्षणापर्यंत मी माझ्या मनाशी लढतो आहे. तुम्ही मला कित्येक हजार वर्षांपासून ओळखता आणि मीही तुम्हाला जाणतो! माझ्या जीवनाचे वेगवेगळ्या रूपातले तुम्ही साक्षीदार आहात. तुमचे जन्म बदलले, तरीही माझ्याशी असलेली एकरूपता तीच आहे. हा कर्ण तुम्हा साऱ्यात आजही जगतो आहे. तुम्हाला ओळखीचा वाटणारा हा कर्ण तुम्ही रणभूमीवर पाहिलात परंतु आज मी माझ्या मनोभूमीवर अखंड तेवत ठेवलेले युद्ध तुम्हास सांगणार आहे. शेवटी रणांगण तेच आणि योध्येही!
-
O Henrychya Laghukatha (ओ हेन्रीच्या लघुकथा)
आनंद, कारुण्य, प्रेम, चौर्य, उन्माद, उत्कंठा, क्षमा, क्षालन, अशा अनंत भावभावनांच नितांतसुंदर मिनिएचर म्हणजे ओ हेन्री च्या लघुकथा साहित्याच्या उंबरठ्यावर पाश्चात्य आणि पौर्वात्य सीमांना जोडणारे पुस्तक. रसिकहो तुमच्यासाठी...