-
Khagolshastratil Nobel Paritoshike (खगोलशास्त्रातील नोबेल पारितोषिके)
आतापर्यंत ११ वर्षे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक खगोलशास्त्रज्ञांना दिले गेले आहे. नवीनतम तंत्रे व उपकरणे वापरून विषयाच्या आघाडीवर केलेले त्यांचे शोधकार्य, हायस्कूल पास केलेल्या विद्यार्थ्यांनाही समजेल अशा प्रकारे अतिशय सोप्या भाषेत या पुस्तकात समजावून सांगितले आहे. असे करताना प्रत्येक परितोषिकाच्या विषयाची संपूर्ण पार्श्वभूमी आधी विशद केली आहे. यामुळे या पुस्तकात संपूर्ण खगोलशास्त्राचा आढावा आलेला आहे. शोधकार्य समजण्यासाठी गरजेच्या असलेल्या भौतिकशास्त्रातील संकल्पना अधिक तपशिलाबरोबर चौकटीत दिल्या आहेत. अनेक किस्से समाविष्ट केल्याने वाचकांची गोडी शेवटपर्यंत कायम राहते. विद्यार्थी तसेच खगोलशास्त्रात रुची असलेल्या सर्वांसाठी, खगोलशास्त्रातील नवीनतम घडामोडी जाणून व समजून घेण्यासाठी हे पुस्तक नक्कीच उपयोगी पडेल.
-
Iranchya Gupt Nondi (इराणच्या गुप्त नोंदी)
इराणच्या गुप्त नोंदी' हे एका पत्रकाराचे स्वानुभवावर आधारित पुस्तक आहे, ज्याने अमेरिका-इराण यांच्यातील ताणलेल्या संबंधांच्या काळात, एका सामान्य पर्यटकाच्या वेशात इराणची भ्रमंती केली. सध्या इराणला अमेरिकेसोबत पूर्ण युद्धाची शक्यता भेडसावत असताना, हे पुस्तक इराणच्या जागतिक पटलावरील सद्यस्थितीचे गहन भूराजकीय विश्लेषण करते. वाचकाला इराणच्या विस्तृत प्रदेशाची रोमांचक सफर घडवते, जिथे इराणमधील प्रसिद्ध ठिकाणे स्थानिकांच्या भावविश्वाचे आणि त्यांच्या उलथापालथींनी भरलेल्या जीवनाचे स्तर अलगद उलगडून सांगतात. या कथनाला तेहरान, शिराज, इस्फहान, पर्सेपोलिस, बंदर अब्बास आणि इतर अनेक ठिकाणी काढलेल्या खास छायाचित्रांची जोड आहे. पुस्तकात तेलविषयक राजकारणाचे विश्लेषण, युद्धाविषयी सखोल चर्चा, संवेदनशील सामाजिक मुद्यांचा बारकाईने अभ्यास आणि जागतिक ख्यातीचे भूराजकीय लेखक आणि इराणबाबतचे तज्ज्ञ भाष्यकार, विजय प्रशाद, तसेच प्रसिद्ध हिजाब विरोधी इराणी कार्यकर्त्या आणि लेखिका मसीह अलीनेजाद यांच्या प्रेरणादायी मुलाखतींचा समावेश आहे.
-
Anagatachya Talashi (अनागताच्या तळाशी)
सजगपणे मराठी इंग्रजी साहित्य वाचणाऱ्यांना श्री. श्रीनिवास शारंगपाणी हे नाव सुपरिचित आहे. कथा, कादंबरी, नाटक, कविता इत्यादी साहित्य प्रकारांमध्ये त्यांनी आपली लेखणी समर्थपणे चालवली आहे. त्यातील विषय वैचित्र्यामुळे त्यांची सर्वच पुस्तके वेधक ठरली आहेत. अनागताच्या तळाशी हा त्यांचा प्रस्तुत कथासंग्रह नावापासूनच वाचकांची उत्सुकता प्रचंड वाढवणारा आहे. या कथा भयकथा, चातुर्यकथा, विज्ञानकथा की आणखी काही अशी लेबले त्यांना लावण्याची गरज मला वाटत नाही. यातील प्रत्येक कथेला आपला स्वतंत्र जीव, स्वतंत्र भावविश्व आणि स्वतंत्र कालौघातील माहोल आहे. प्रत्येक कथा अनोख्या विश्वातील अनोख्या विषयावरची आणि अनोख्या शैलीतून प्रगटली आहे. या कल्पक (फॅन्टसी) कथा असल्या तरी त्यांना विज्ञानाचा आणि मानसशास्त्राचा भक्कम आधार आहे, त्यामुळे त्या आपल्याला दूरस्थ वाटत नाहीत. आपण त्यांच्या कथनाबरोबर पटकन एकरूप होऊन वाहत जातो. व्यवसायाने अभियंता असले तरी यांत्रिक जगाने त्यांच्या सर्जनशीलतेवर मात केलेली नाही, उलट त्यांच्या प्रतिभाशक्तीला अनेक आयाम प्राप्त करून दिले आहेत. केवळ मनोरंजन आणि वाचनीयता या पातळीवर न राहता या कथा आपल्याला विचार करायला लावतात, आपल्या मनात रेंगाळत राहतात हीच या कथांच्या यशस्वितेची पावती आहे.
-
Kavitetalya Shantabai (कवितेतल्या शांताबाई)
शान्ताबाई शेळके यांच्या कविता आणि गीतांच्या सोबतीने केलेली शोधयात्रा आठ दशके वाचकांवर-रसिक मनांवर गारुड करणारे हे नाव ! लोकप्रियता व साहित्य विश्वातील सर्वोच्च सन्मान शान्ताबाई शेळके यांना मिळाले. परंतु कवीचा सर्वात मोठा सन्मान म्हणजे त्याच्या कवितेतून त्याला नव्याने जाणून घेणे. उत्कट जिज्ञासेने कवितेच्या अंतहृदयापर्यंत जाणे. त्याच आदराने कवितेतील शान्ताबाईंच्या व्यक्तिमत्त्वाला जाणून घेण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. शान्ताबाई शेळके यांची बहुआयामी कविता समजून घेणे हाही एक सृजनशील प्रवास आहे. शिणवणारा व समृद्ध करणाराही ! आनंद देणारा नि आर्त करणाराही !
-
Kshitijgami (क्षितिजगामी)
ही कहाणी आहे एका स्त्रीची, जिने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली. तिचा प्रवास केवळ खेळाचा नव्हता, तर समाजाच्या चौकटी, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि स्वतःच्या मर्यादांवर मात करण्याचा होता. क्रिकेटच्या मैदानापासून पॉवरलिफ्टिंगच्या स्पर्धापर्यंत आणि स्विमिंगच्या जलविश्वापर्यंत तिच्या जिद्दीची चुणूक सर्वत्र दिसली. खेळ तिच्यासाठी केवळ एक आवड नव्हती, तर ती तिच्या अस्तित्वाची ओळख होती. या प्रवासात तिला अनेक अडथळे आले- कधी निवडीतील अपयश, कधी आर्थिक अडचणी, तर कधी मानसिक संघर्ष. समाजाच्या चौकटींमध्ये अडकलेल्या मानसिकतेला छेद देत, तिने स्वतःचा मार्ग स्वतःच तयार केला. अनेकदा परिस्थिती प्रतिकूल होती, संधी मर्यादित होत्या, पण तिच्या जिद्दीने तिला पुढे जाण्याची ताकद दिली. अपयशाच्या छायेत हरवण्याऐवजी, तिने त्यालाच आपल्या विजयाचं पाऊल बनवलं. 'क्षितिजगामी : एक प्रवास अपराजित जिद्दीचा' हे पुस्तक केवळ आत्मकथन नाही, तर एक प्रेरणादायी प्रवास आहे.
-
Chhotya Anuchi Mothi Gosht (छोट्या अणूची मोठी गोष्ट)
मानवाच्या प्रगतीमध्ये अणूविषयक ज्ञानाचा विधायक वापर -पाणी, शेती, वैद्यक इत्यादी महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये अणूमुळे झालेल्या क्रांतिकारक बदलाचा एक लहानसा आढावा या पुस्तकात घेतला गेला आहे. वेगवान प्रगती की वेगवान विध्वंस हे शेवटी माणसाच्या सद्-असद् वृत्तीवर अवलंबून आहे. विज्ञान हे शाप की वरदान? अशा चर्चा पूर्वी पुष्कळ चालत. विज्ञानाने मानवजातीवर खूपच उपकार केले आहेत आणि जगण्याचा स्तर सर्व दिशांनी उंचावला आहे. चुकांमधूनच माणूस शिकत जातो हे मानवाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. त्याला अनुसरून अणुशक्तीचा वापर माणसाच्या कल्याणासाठी होईल अशी आशा करू या. छोट्या अणूची मोठी गोष्ट आपल्याला बुऱ्यावर मात करून भल्याची वाट दाखवणारी आहे.
-
Prarabdhachi vat (प्रारब्धाची वाट)
ईश्वराने हातात लेखणी घेऊन आयुष्यात चढ उतार लिहावेत आणि एखाद्या चित्रपटात घडत असणाऱ्या घटना प्रत्यक्षात कुणाच्या आयुष्यात घडत असतील तर याचाच अनुभव प्रारब्धाची वाट ह्या कादंबरी मध्ये वाचकांना येईल.गिरीश आणि अमृता दोघेही संस्कारी आणि सुशिक्षित पण नियतीने त्यांच्या माथी घटस्फोटित असा शिक्का मारला आणि दोघेही खचून गेले.संसार आणि लग्न ह्या शब्दांवरील देखील विश्वास उडून गेलेले हे दोघे पुन्हा आयुष्याकडे छान नजरेने पाहतील का ??वेगवेगळ्या वाटेवरून चालणाऱ्या ह्या दोघांच्या प्रारब्धाची वाट एक होईल का ??एकदा वाईट अनुभव आल्याने त्यांनी मनाशी केलेला ठाम निश्चय तसाच राहील की त्यांचे मतपरिवर्तन होईल ??दोघेही पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडकून जातील की फक्त एक मित्र म्हणून आपले दुःख वाटून आपले मन एकमेकांच्या जवळ हलके करून आपापल्या वाटेने निघून जातील.?या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी ही कादंबरी तुम्हाला वाचायला हवी ,वाचन करत असताना तुम्ही त्यात गुंग होऊन जाल हे नक्की. ✍️ श्री.आनंद पिंपळकर ( सुप्रसिध्द वास्तूतज्ञ ज्योतिर्विद विद्या वाचस्पती )
-
Aadikal Ek Itihas : Part 2 (आदिकाल एक इतिहास : उत्तरार्ध)
आदिकाल : एक इतिहास' हे पुस्तक प्राचीन भारताच्या इतिहासाच्या अभ्यासासाठी एक महत्त्वपूर्ण स्रोत आहे. हे पुस्तक वाचकांना भारताच्या समृद्ध भूतकाळात घेऊन जातं आणि प्राचीन भारताच्या विविध पैलूंची माहिती देतं. केवळ पौराणिक कथा नाही तर त्यामागील शास्त्र, इतिहास इत्यादी गोष्टी व्यापक दृष्टीने हे पुस्तक समजावून सांगतं. श्री. वझलवार यांनी यात सोप्या भाषेत आणि कथारुपात, आकर्षक पद्धतीने अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे. भारताची सांस्कृतिक आणि सामाजिक ओळख जपणारं हे पुस्तक एक अमूल्य ठेव आहे. आपल्या समृद्ध भूतकाळाची ओळख करून देत आपल्या संस्कृतीचा वारसा जतन करणारं हे पुस्तक नक्कीच संग्रही हवं.
-
Bharat Satya Satva Swatva (भारत सत्य सत्व स्वत्व)
श्री. अभिजित जोग लिखित ‘भारत : सत्य, सत्व, स्वत्व’ हा ग्रंथ म्हणजे हजारो वर्षांपूर्वी भारतीयांनी केलेल्या ज्ञानोपासनेचा व भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंचा धावता आढावाच होय. ‘ज्ञान विज्ञान योग’ असे प्रस्तुत ग्रंथाचे वर्णन करता येईल. यात तत्वज्ञान, अध्यात्म, भाषा ( संस्कृत ), वैद्यक, खगोलशास्त्र, गणित, धातुशास्त्र या ज्ञान-विज्ञानाच्या सर्व आयामांचा भारतातच उदय झाल्याचे सप्रमाण विवेचन केलेले आढळते. सखोल चिंतन, ‘ना मूलं लिख्यते किंचित’ हे असे धोरण, भारत म्हणजे जगातला पहिला ज्ञानाधिष्ठित समाजाचा देश, वेदोपनिषदे व सभ्यतेची मानवी मूल्ये भारतात निर्माण झाली तेंव्हा इतर देशात अज्ञानांधःकारच होता हे ठासून सांगणारा हा ग्रंथ होय. ही अशी एकमेवाद्वितीय ज्ञानपरंपरा आठवून भारतीयांना ‘उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत’ असे सुचविणारा हा मौलिक ग्रंथ होय. गो. बं. देगलूरकर नामवंत विद्वान आणि भारतीय कला व स्थापत्यशास्त्राचे सर्वमान्य अभ्यासक विषयाचा आवाका आणि मांडणी याबाबतीत हे पुस्तक ज्ञानकोषीय पातळीवर जाते. इतका मोठा विषय हाताळताना बारीक-सारीक तपशीलही सुटणार नाही याची काळजी घेण्यात लेखक अभिजित जोग पुन्हा एकदा यशस्वी ठरले आहेत. तरीही, प्रवाही भाषेमुळे हे पुस्तक अत्यंत वाचनीय झाले आहे. भारतवर्षाची खरी ओळख पुनर्स्थापित करणारे हे दर्जेदार पुस्तक सर्व प्रकारच्या वाचकांना आवडेल असा मला विश्वास वाटतो. नीलेश ओक विद्वान संशोधक आणि लेखक
-
The Legend Of Bahirji Naik Part 2 (द लिजंड ऑफ बहिर्जी नाईक भाग २)
मराठा स्वराज्य १६६५ : प्रचंड मोठ्या मुघल फौजेने पुरंदरला वेढा घातला आहे अफगाणी सरदार दिलेरखान आणि मोठा नावलौकिक असलेले राजपूत सरदार मिझोराजे जयसिंग त्यांचे नेतृत्व करत आहेत. नुकतेच पंख फुटू लागलेल्या मराठा साम्राज्याला सगळ काही संपल्यासारखे वाटत होते. शिवाजी राजे सगळ्या बाजूंनी वेढले गेले होते, यातून चतुराईने कसा मार्ग काढता येईल याबद्दल राजे आपल्या सल्लागारांशी चर्चा करत आहेत. पण इतिहासाची पुनरावृत्ती होणारच. मुघल आणि आदिलशाही फौजांनी, गुलाम-सरदार असलेल्या सिद्धी जौहरच्या नेतृत्वाखाली आधीच स्वराज्याला वेढा घातला होता. आणि खुद राजे पन्हाळगडावर अडकले होते. आणीबाणीच्या वेळी धाडसी उपाययोजना करणे आवश्यक असते. रात्रीच्या अंधाराआड, थेट शत्रूच्या नाकासमोरून त्यांची सुटका करण्यासाठी एक अत्यंत धोकादायक योजना आखली गेली. तिथून निसटून ते विशाळ गडावर कसे पोहोचले याची चित्तथरारक कथा आणि त्या अनुषंगाने येणारी, मुघल फौजेला नेस्तनाबूत करून टाकणाऱ्या उंबरखिंडीच्या लढाईची कथा. शिवाजी राजांचे प्रसिद्ध गुप्तहेर किंवा गुप्तहेर खाते असलेल्या बहिर्जी नाईक यांच्या नजरेतून ही कथा उलगडत जाते. जे काही घडले ते, जगाने कधीच न पाहिलेल्या गनिमी काव्याचे एक सर्वात मोठे उदाहरण बनून गेले.