-
Kashmirchya Lokakatha (काश्मीरच्या लोककथा)
रेव्हरंड जे. हिंटन नोल्स (Knowles) है पंजाबमध्ये काम करणारे एकोणिसाव्या शतकातले अतिशय प्रसिद्ध असे ब्रिटिश मिशनरी होते. जिथे काम करायचे, आपले धर्मतत्त्व लोकांना पटवून द्यायचे, त्या लोकांची भाषा, चालीरीती वगैरेचे ज्ञान धर्मप्रचारकाला आवश्यक असते. ही गोष्ट नोल्स यांना चांगलीच माहीत होती. संस्कृतीचे ते जाणकार होते. लोकसाहित्य हे संस्कृतीच्या अभ्यासाचे प्रमुख अंग आहे याची जाण त्यांना होती. काश्मिरी म्हणींचा कोश त्यांनी प्रथम तयार केला. 1886 च्या सुमारास A Dictionary of Kashmiri Proverbs and Saying या नावाने तो प्रसिद्ध आहे. दूरुबनर आणि कंपनीने तो लंडनला प्रकाशित केला. लोकसाहित्याचे जाणकार म्हणून या कोशामुळे ते प्रसिद्धीला आले. रे. नोल्स यांचा Folks-Tales of Kashmir हा दुसरा ग्रंथ 1888 साली टूरुबनर आणि कंपनीनेच प्रकाशित केला. त्याचेच भाषांतर मी केले आहे.;Indian Antiquary या अतिशय पांडित्यपूर्ण आणि जगभर आदरास पात्र झालेल्या मासिकात यातल्या काही गोष्टी आलेल्या आहेत. माझे लक्ष प्रथम त्यांनीच वेधून घेतले. मेरी फ्रियर नंतर जे पाच-सात लोककथा-संग्राहक पाश्चात्त्य लोकसाहित्याच्या अभ्यास प्रथेत भारतीय लोककथाकारांचे अग्रदूत म्हणून गणले जातात त्यापैकी नोल्स हे एक आहेत. भारतीय लोककथांचा सर्वकष अभ्यास अद्याप झालेला नाही. भारतीय लोककथांचे संग्रह, त्यातल्या त्यात आता दुर्मिळ झालेले संग्रह भारतीय भाषांत अनुवाद होऊन पुढे आले तरच हा अभ्यास आता शक्य आहे. या हेतूने मी हा अनुवाद केला आहे.
-
Samrat Ashokcharitra (सम्राट अशोकचरित्र)
सुमारे अडीचहजार वर्षापूर्वी या भारतभूमीवर आपले अधिपत्य निर्माण करणारा इतिहासात अतिउद्य स्थान असलेला असा 'सम्राट अशोक' नावाचा राजा होऊन गेला. त्याने केवळ सर्व भारतखंडावर राज्य केले नाही तर येथील जनतेला धर्मज्ञान, सदाचार व भूतदया याची शिकवण दिली, प्रजेने त्याप्रमाणे वागावे अशी अपेक्षा धरून तसा प्रयत्न आयुष्यभर केला. अशा महान प्रियदर्शी राजाच्या चरित्रासंबंधी फारसे संदर्भ उपलब्ध होत नाहीत. शंभर वर्षापूर्वी तसे प्रयत्न झाले. काळाच्या ओघात संशोधनात अनेक संदर्भ मिळत गेले व ते आजही मिळत आहेत. कदाचित यापुढेही मिळतील. व संशोधनास नवीन विषय मिळत राहील यात शंका नाही. 'सम्राट अशोकाचे' चरित्र त्याने लिहिलेल्या स्तंभ- लेखाद्वारेच मिळते. श्री. वागो. आपटे यांनी मराठीतून चरित्र लिहून ७५ वर्ष लोटली. त्यानंतर असे मराठीत चरित्र प्रकाशित झाले नाही. मधल्या काळात झालेल्या संशोधनाचा आधार घेऊन श्री.प्र.रा. आहिरराव यांनी हे चरित्र परिपूर्ण (विकसित) केले आहे. अनेक नवीन संदर्भ, विचार व विषय घेतले आहेत, ते उपलब्ध झालेली छायाचित्रे व अशोकाच्या शिल्पांचे परिश्रमपूर्वक संपादन करून या चरित्रात दिले आहे. या महान सम्राटाचे पुनस्मरण करण्यास हातभार लावला आहे. मराठी वाङ्ममयातील एक उणीव या ग्रंथरूपाने भरून काढली आहे.
-
Aamchya Aayushyateel Kahee Aathwanee (आमच्या आयु
'रमाबाई रानडे' म्हणजेच न्यायमूर्ती रानडे यांच्या ज्या फक्त पत्नीच नव्हत्या तर ज्या त्यांच्या छाया होत्या, अशा एका महाराष्ट्रीय स्त्रीने स्वतंत्रपणे लिहिलेलं पहिलेच असं आत्मचरित्र म्हणजेच 'आमच्या आयुष्यातील काही आठवणी'. रमाबाई रानडे ह्यांचे व्यक्तिमत्व किती प्रभावी होते ते हे आत्मचरित्र वाचताना लक्षात येते. वेळोवेळी घडलेल्या गोष्टी व झालेली संभाषणे काही सहज तर, काही विशेष कारणांनी ध्यानात राहिली ती आठवली तशी सध्याचे स्थितीत अंतःकरणाचे सांत्वन करण्यासाठी व जो श्रेष्ठतम सहवास जो आता प्रत्यक्ष राहिला नाही; त्याचा मानसिक रीतीने अनुभव घेण्यासाठी वहिनीबाईंनी कागदावर मांडली व आता ती वाचकांस सादर केली आहेत. अनुपमेय भक्ती व निस्सीम प्रेम या भावांनी या 'आठवणी' लिहिल्या आहेत त्या सहानुभूतीपूर्ण अंतःकरणांनी वाचक वाचतील हि आशा आहे. सध्याची सुप्रसिद्ध टी.व्ही. मालिका "उंच माझा झोका... " जशी प्रेक्षकांना आवडली तसेच प्रत्येक वाचकाला हे आत्मचरित्र नक्कीच आवडेल.