-
Karmayogini Nivedita
अठराव्या व एकोणीसाव्या शतकाच्या संधीपर्वात जगावर दूरगामी परिणाम करणारया दोन घटना घडल्या. अठरावे शतक संपायच्या एक दशकआधी, शिकागो सर्व धर्म परिषेदेपासून स्वामी विवेकनंदांनी अध्यात्मिक ज्ञानाचा सुवर्णध्वज जगात फडकवला. जे शाश्वत, सनातन, अद्वैत, तत्वज्ञान, आद्यशंकर चर्यांनी भारतात रूजविले त्याचे एकप्रकारे जागतिकीकरण स्वामी विवेकनंदानी सारया विश्वात करून टाकले. असेच एक समप्रित व्यक्तीमत्व, वंशाने आयरिश, रंगाने गोरया असूनही भारताच्या पारतंत्राच्या काळात भारतातील गोरगरीब, अशिक्षीत आणि पिडीत लोकांसाठी आपले सर्वस्व अर्पण करून वयाच्या ४४ वर्षी भारतात सेवा करत असताना आपला देहसुद्धा या मात्तीत अर्पण करण्यारया भगिनी निवेदिता (मार्गरेट नोबल); ज्यांनी स्वामी विवेक नंदांचे शिष्यत्व पत्करले व एन तारुण्यात आपला प्रगत देश सोडून भारताच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी लेखन करून, व्याख्याने देऊन, स्त्रियांसाठी शाळा काढून, एवढच नव्हे तर भारताला राष्ट्रध्वजाची संकलल्पना दिली. त्याच भगिनी निवेदितांचे हे प्रेरणा दायी चरित्र.
-
Sarvansathi Pranayam
नाडीशुद्धी प्राणायामास प्राणयमांचा राजा म्हटले जाते. संपूर्ण लक्ष श्वसनाकडे, श्वसनाच्या प्रमाणाचे पालन केल्याने, प्राणधारणा झाल्याने बाहेरील वातावरणातून येणारया संवेदेनांकडे लक्ष जात नाही. मन आत वळून एकाग्र झाले की शरीराच्या आतील भागाकडून येणारया संवेदना जाणवू लागतात . अशावेळी बौद्धिक विश्लेषणाचे काम अहंकाराशी संबंधित असणारे विचार प्रवाह संपतात. मन शांत शिथिल होते, स्थिर होत जाते. मनातील खळबळ, चिंता, अस्वस्थता कमी झाल्याने भावनांचा प्रकोप व ताण नाहीसा होतो. व्यक्तिमत्व विकसित होऊन पुर्णत्वाकडची वाटचाल विकसित होऊ लागते. ध्यानासारख्या प्रगत तंत्राची पूर्वतयारी म्हणून या अभ्यासाचा उपयोग होईल.