-
Rasha (राशा)
रशियामधील असाधारण वातावरणामुळे बिघडत गेलेल्या आणि अस्थिर परिस्थितीमुळे ढवळत गेलेल्या सामाजिक जीवनातील बारकावे टिपणारे, तसेच प्रत्यक्ष अनुभवलेल्या, पाहिलेल्या आणि ऐकलेल्या घटनांवर आधारित असे ओघवत्या शैलीत केलेले झंझावाती चित्रण.
-
Chittapavan (चित्तपावन)
गेंड्याच्या कातडीचा तात्या जमकर डोईवरची तिरकी टोपी हातात घेत दात काढून फक्त हसला. तात्या जमकर गावातल्या समाजवादी पक्षाचा म्होरक्या होता."वर्षातून एखादं शिबीर घेतलं,एकदोन मिरवणूक-मोर्चे काढले आणि पक्षाच्या तोंडावर हजार-पाच हजार रुपये फेकले कि समाजवादी म्हणून नाना धंदे करायला तू मोकळा." अशा भाषेत बंडूनाना त्याला उडवून लावीत असत. त्याचा रागाने तो म्हणाला,"बंडूनाना, तुम्हाला समाजवादाची कावीळ झाली आहे." आणि शिष्टपणाने विचारू लागला,"बंडूनाना, एव्हड्या पुढच्या गोष्टी करायला आपण टिळक आहोत कि सावरकर?" "अरे त्यांची नावसुद्धा तोंडात धरण्याची तुमची लायकी नाही आणि हे बघ तात्या-" तात्याचा चेहेरा समोर धरून त्याच्या डोळ्यात नजर घुसवीत बंडूनाना म्हणाले,"माझं म्हणशील ना? तर मी नखाएव्हडा का होईना,पण टिळक आहे आणि केसाएवढा असेन,पण सावरकर सुद्धा आहे!"
-
Rani Abbakdevi (राणी अब्बकदेवी)
पराक्रम,स्वाभिमान,क्षात्रतेजाची मूर्ती,कर्नाटकभुषिनी,जनहितकारिणी,दर्यासारंगिनी,अन्यायी शत्रूविध्वंसिनी,रणरागिणी,तेजस्विनी,तुळूनाड प्रदेशातील राणी अब्बकदेवी,जिने पन्नास वर्षे जुलुमी पोर्तुगीजांशी अखंड अविरत झुंज दिली तिची हि अमर कहाणी.
-
Mavaltichi Unhe (मावळतीची उन्हे)
जयश्री थत्ते-भट ह्या पाश्चात्य देशात – कॅनडात स्थायिक झाल्या आहेत. तेथील समाजात भावनांपेक्षा विचारांना महत्त्व अधिक. साहजिकच लेखिकेच्या लेखणीची बैठक वैचारिक आहे. परिणामी कथांमध्ये भावविवशता कमी आहे. त्याचबरोबर पाश्चात्य व पौवार्त्य समाजातील वैचारिक आणि सांस्कृतिक तफावत दिग्दर्शित करण्याची, त्यावर मार्मिक प्रहार करण्याची आणि हंसक्षीरन्यायाने त्यातील भलेपणा टिपण्याची अचूक हातोटी लेखिकेने हस्तगत केली आहे. सारांश, भारतीय व पाश्चात्य समाजाच्या सीमारेषा उकलून सांगणार्या या सर्व कथा नावीन्यपूर्ण असल्याने त्या स्वागतार्ह आहेत.
-
Dr.Aanandibai Joshi-Kaal Ani Kartutva (डॉ.आनंदीबाई
‘ डॉ. आनंदीबाई जोशी काळ आणि कर्तृत्व’ हे डॉ. अंजली कीर्तने लिखित चरित्र म्हणजे आनंदीबाईंच्या जीवनाचा नवा अन्वयार्थ आहे. एकोणिसाव्या शतकातील भारतीय समाज आणि जागतिक स्त्री-लढा यांच्या पार्श्वभूमीवर याचं लेखन केलं गेलं आहे. आनंदीबाई आणि त्यांच्या जीवनातील अन्य व्यक्ती यांच्या नातेसंबंधीचा सखोल शोध, वादग्रस्त प्रकरणांचा उलगडा, त्यांच्या कॉलेज-जीवनासंबंधीची नवी माहिती आणि आनंदीबाईंना वलयांकित विभूती न करता, गुणदोषयुक्त व्यक्ती म्हणून केलेलं त्यांच्या मनोधर्माचं विश्लेषण ही या ग्रंथाची काही ठळक वैशिष्ट्यं. आनंदीबाईंमधील पारंपरिक आर्य स्त्री आणि बंडखोर तरुणी यांतील अंतर्गत द्वंद्व, त्यातील सूक्ष्मतरल छटांसह चित्रित केलं आहे. या चरित्राद्वारे प्रथमच, आनंदीबाईंनी एम्. डी. च्या पदवीसाठी लिहिलेला प्रबंध, काही दुर्मिळ पत्रं, छायाचित्रं, आनंदीबाईंच्या अमेरिकेतील समाधीचा अंजली कीर्तने यांना कसा शोध लागला याचा वृत्तांत आणि आनंदीबाईंच्या ‘कार्पेंटर मावशी’ची एकमेव वारसदार पणती नॅन्सी कॉब-स्टोन यांच्या भेटीची उत्कट कहाणी प्रकाशात येत आहे. याच विषयावर अंजली कीर्तने यांनी एक लघुपटही तयार केला असून त्या लघुपटाला 1992-93चा सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणून राज्यशासनाचा पुरस्कारही मिळालेला आहे.
-
Falnichya Deshat (फाळणीच्या देशात)
दक्षिण आफ्रिकेतला वर्णद्वेष. पूर्व आणि पश्चिम जर्मनीला विभागणारी बर्लिन भिंत आणि भारताची फाळणी या सर्व घटना म्हणजे इतिहासाचा अविभाज्य काळा भाग. कालांतराने तो वर्णद्वेष विरघळतोय. भिंत तुटतेय... वारे वाहू लागलेयत. हा नवा इतिहास घडताना, तुटलेली मनंजुळत असलेली पाहताना एका संवेदनाक्षम पत्रकाराच्या मनात उठलेल्या स्पंदनांचं हे एक शब्दरूप...