-
Brahmarshi Vivekananda Te Rajarshi Narendra Modi (
आज भारतवर्षाची विविध क्षेत्रांत होत असलेली वाटचाल, धोरणांतील स्पष्टता आणि कणखर नेतृत्व पाहता जगद्गुरू भारताची लक्षणेठळक होताना दिसत आहेत. अगदी किशोर वयापासून ज्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनीआपले जीवन घडवले, ती व्यक्ती आज नेतृत्वस्थानी आहे. नव्याभारताची पायाभरणी सुरू आहे. अशावेळी जगद्गुरू भारत (विवेकानंद) आणि नवा भारत (मोदी) या संकल्पनांची सजग चर्चा व्हावी, या दृष्टीने एक प्रयत्न म्हणून या ग्रंथाची योजना आहे. या ग्रंथात अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्याती असणारे विद्वान लेखकांनी लेखन केले आहे. त्यामुळे या ग्रंथाला सामूहिक चिंतनाचे रूप आले आहे.