-
Te Pandhara Divas (ते पंधरा दिवस)
ऑगस्ट १९४७ हा काळ भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरला. एक ते १५ ऑगस्ट या स्थित्यंतराच्या काळातील आणि भारताचे भवितव्य ठरविणाऱ्या १५ दिवसांची गाथा प्रशांत पोळ यांनी ‘ते पंधरा दिवस’मधून कथन केली आहे. याची सुरुवात होते ती एक ऑगस्ट १९४७ रोजी महात्मा गांधी यांचा काश्मीर दौरा आणि गिलगीटच्या हस्तांतराच्या घटनांनी. त्यानंतर दोन ऑगस्टला ब्रिटिशांकडून होणाऱ्या हस्तांतराची सुरू झालेली धावपळ, पं. नेहरू, सरदार पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे काम, पुणे, श्रीनगर, तत्कालीन मद्रास या भागातील घडामोडी, तीन ऑगस्ट रोजी गांधीजींच्या काश्मीर दौऱ्याचे फलित, बाबासाहेब आंबेडकर यांना कायदेमंत्री म्हणून नियुक्त केल्याचे नेहरूंचे पत्र, चार ऑगस्ट रोजी व्हॉइसरॉय माउंटबॅटन यांच्या बैठकी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक गुरुजी यांचा सिंध दौरा, अशा दररोजच्या घटनांचे चित्रण यात आहे. १५ ऑगस्टला भारतात स्वातंत्र्याची पाहत उगवली. त्या दिवसाचे वर्णन, विविध ठिकाणची परिस्थिती, नेत्यांची अवस्था याचा मागोवा घेतला आहे.
-
Khajinyachi Shodhyatra (खजिन्याची शोधयात्रा)
खजिन्याची शोधयात्रा साधारण आठशे/नऊशे वर्षांपूर्वीपर्यंत आपला देश हा जगातला सर्वात समृद्ध, संपन्न आणि ज्ञानवान देश होता. जगातला एक तृतीयांश पेक्षा जास्त व्यापार फक्त आपण करायचो. हे सर्व करत असताना आपण अनेक नवनवीन शोध लावले. मानवी मनाला थक्क करणारी अनेक मंदिरं, अनेक वास्तू, अनेक राजप्रासाद उभारले. समरस समाजासाठी, न्याय पद्धतीसकट, अनेक उन्नत आणि प्रगल्भ व्यवस्था निर्माण केल्या. गणितातल्या गमती केल्या. अनेक उत्तमोत्तम खेळ शोधून काढले. कलेच्या क्षेत्रात भरारी घेतली. असं बरंच काही ... दुर्दैवानं भारतीय ज्ञानाचा हा खजिना आमच्यापर्यंत फारसा कोणी आणलाच नाही. या खजिन्याचा शोध आणि वेध घेण्याचा हा मनस्वी प्रवास ..! 'खजिन्याची शोधयात्रा' हे श्री. प्रशांत पोळ या उद्योजकाचे पुस्तक वाचायला घेतले तेव्हा एक समृद्ध आणि अक्षय खजिनाच गवसला असे वाटले! -डॉ. गो. बं. देगलूरकर