Saitanachi Khushi (सैतानाची खुशी)
राकेश भडंगची कविता विचारपरिप्लुत आहे; पण विचारजड नाही. तो सार्या जगाचे प्रश्न, भावभावना समजावून घेऊ शकतो आणि थेट मानवी अस्तित्वाच्या मुद्यालाच भिडतो. बिकट तत्त्वज्ञान वाटावे अशी ही गुंतागुंत तो कवितेच्या रेषांमधून सरळ मांडत जातो. त्यामध्ये हसण्याखेळण्याची कविता आहे, स्त्रीमुक्तीची कविता आहे, इसापाचीही कविता आहे... राकेश भडंगच्या कवितांचा हा पसारा वाचून त्याच्या आधुनिक दृष्टीचा प्रत्यय येईल आणि वाचकाची समजूत प्रगल्भ होईल...