Ek Aatpat Nadi Hoti (एक आटपाट नदी होती)
नदीचे सर्व सजीवांमध्ये असलेले महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. त्यातही मानवी जीवनात असलेले स्थान हे कधीही पुसता न येण्यासारखे आहे. तिने मानवासाठी दिलेले योगदान हे मोठे आहे. पण गेल्या काही वर्षात या नद्यांना नजर लागली. नागरीकरण आणि औद्योगिकरण यात या नद्यांचे अपरिमित नुकसान झाले. त्यामुळे एकेकाळी नितळ, स्वच्छ वाहणारी आता गटारगंगा म्हणून वाहू लागली. पण आता नदीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यासाठी तुमच्या सारख्या लहानग्यांची साथ या पुढील काळात लागणार आहे. 'नदी वाचवा' हि हाक आता पुढच्या काळात अधिक तीव्रतेने तुम्हाला ऐकू येईल. नदी हि आपल्या पर्यावरणाचा एक अविभाज्य भाग आहे हे आपल्या लक्षात अजूनही आलेले नाही. या नद्यांचे वास्तव आणि त्यांचे संवर्धन हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण नद्या वाचवू शकत नाही. त्यामुळेच उद्याचे नागरिक म्हणून तुमची जबाबदारी हि जास्त आहे. हाच सांगावा घेऊन नदी सांगत्येय तिची कहाणी.