-
Alfred Hitchcock-The Man Who Knew Too Much (आल्फ्र
आल्फ्रेड हिचकॉक म्हणजे संदेहपटांच्या क्षेत्राचा अनभिषिक्त सम्राट. अर्थात संदेहाशिवाय चित्रपटांतील इतरही अनेक तंत्रमंत्रांचाही तो ’मास्टर’ होता. त्याच्या सर्वच्या सर्व चित्रपटांचा आढावा घेत असताना त्या चित्रमहर्षीच्या बहुमिती प्रतिभेचा आस्वादक वेध घेणारे हे पुस्तक वाचले म्हणजे हिचकॉक हा खर्या अर्थाने चित्रपटसृष्टीतील अजोड असा ’द मॅन हू न्यू टू मच’ होता, याचा थक्क करणारा प्रत्यय येतो.
-
Nisargamitra ( निसर्गमित्र )
"ही सारी सृष्टि केवळ माणसासाठी निर्माण झाली आहे, असं मानंण वेडगळपणाचं ठरेल. माणुस नसेल, तर हे विश्व जेवढे अपूर्ण आहे , तेवढेच एखादा कीटक नसेल, तरीही अपूर्ण आहे. या विश्वाची रचना इश्वरांन सर्वांसाठी केली आहे. तुम्ही जगा आणि इतरांनाही जगू दया, अशीच या विश्वाची धारणा आहे... आपल्या या अफाट देशात अनेक ठिकाणी घनदाट जंगल आहेत, त-हेत-हेचे पशुपक्षी आहेत, डोंगरदऱ्यां आणि कोसळते धबधबे यांनी आपला निसर्ग संपन्न आहे. परमेश्वरनं आपल्याला दिलेली ही निसर्गसंपत्ती पुढच्या पिढ्यांसाठी नीट जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे...." असं समजावून सांगणार्या एका अमेरिकन निसर्गमित्राची ही चरित्रकथा... पर्यावरणप्रेमी वाचकांना विचारप्रवृत्त करणारी आणि कार्याची प्रेरणा देणारी ...
-
Kharicha Vata (खारीचा वाटा)
एक निसर्गरम्य खेड. तिथ वाढणारा एक किशोरवयीन मुलगा. त्यानी पाळलेली खार. सम्रुध्द निसर्ग, पिकपाणी, रानमेवा, जानवर, करामाती मित्र यांत रमलेला, गुंगलेला मुलगा. एके दिवशी गावाच्या नदीवर धरण बांधनारे मशिनारिची घरघर , थोड्याच दिवसात अख्खा गावगाडा हलतो. नांदत्या वस्त्या उठतात. मुलगा कुटुंबासह गाव सोडतो. ती खार मात्र तिथेच राहते. उमलत्या हळव्या वयातल्या उलथापालथीची सहजपणे सांगितलेली खरी गोष्ट.
-
3 Zakia Mention ( ३ झाकिया मॅन्शन)
भारतातील प्रत्येक राज्याची संस्कृती, बोली भिन्न आहे. तरी भारतीय म्हणून सर्व जातीधर्माचे लोक एकोप्याने राहतात. या विविधतेतील एकतेचा धागा अनेक लेखकांनी कादंबरीत गुंफला आहे. भारतीय लेखकांनी आपल्या देशातील संस्कृती इंग्रजी भाषेतील पुस्तकातून जगासमोर आणली. गौरी डांगे यांनी ‘३, झाकिया मॅन्शन’ या कादंबरीत अशीच कथा फुलविली आहे. यात करीम अली कुटुंब आणि मानस खरे यांची कथा वाचताना एक वेगळे विश्व आपल्यापुढे येते. याचा मराठी अनुवाद अनघा लेले यांनी केला आहे.
-
Mandela (मंडेला)
नेल्सन मंडेला म्हणजे दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदाचा शेवट. नेल्सन मंडेला म्हणजे प्रदीर्घ कारावासानंतरही सतेज राहिलेली दुर्दम्य ध्येयनिष्ठा. नेल्सन मंडेला म्हणजे सा-या मानवजातीसाठी, सा-या जगासाठी प्रकाशा[...]
-
Soodakadoon Karunekade (सूडाकडून करुणेकडे)
यासर आराफातच्या निवडक तुकडीतीला नेमबाज जवान. पॅलेस्टाइनच्या मुक्तिसाठी शिर तळहातावर घेउन लढणारा. मानसं टिपण हत्या करणं चकमकी लढईची धुमश्चक्री हेच त्यांच आयुष्य बनलेल आहे अचानक एक दिवस त्यांच्या कानी पडली येशुची मानवतावादी शिकवण आणि मानत रुजल करुनेच रोपट . रक्तपाताच्या रस्त्याने चालणारी पावल आता सलोखाच्या, शांततेच्या , मैत्रीच्या अन सम्न्व्यच्या वाटेने चालू लागली. आयुष्याचा अर्थच बदलणार्या या अवघड प्रवासाची सत्यकथा
-
Majhi Kahani (माझी कहाणी)
सामान्यातल्या असामान्य 'स्त्री'चं हे आत्मकथन ! पार्वतीबाई आठवले! १८७० मध्ये जन्मलेली, कोकणच्या खेडयात लहानाची मोठी झालेली एक निरक्षर स्त्री... वैधव्यानंतर केशवपन, परावलंबन हे दैवाचे भोग मानून जगणारी! पण मुलाच्या काळजीनं पुण्यात बहीण बाया कर्वे यांच्याकडे म्हणजेच मेहुणे धोंडो केशव कर्वे यांच्या घरी आली आणि तिचं सारं जगच बदललं. या सामान्य स्त्रीतले असामान्य गुण प्रकटले. कर्वे यांचा 'अनाथ बालिकाश्रम' हे तिचं जीवनकार्य झालं. या संस्थेला मदत मिळवण्यासाठी अनेक हालअपेष्टा सोसत ती भारतभर फिरली, इंग्लंड-अमेरिकेतही जाऊन आली. तिनं केलेलं हे आत्मकथन.
-
Tadev Lagnam (तदेव लग्नम्)
लग्न करताय ? स्वत :च ? दुसर्याचं ? धार्मिक ? रजिस्टर ? संस्कार म्हणुन ? इव्हेंट म्हणून ? साधंसं ? जंगी ? कसही करा, पण अर्थ घेउन करा या पुस्तकाच्या मदतीनं नियोजन करा मग तुम्ही उस्फुर्त पाने म्हणाल, तदेव लग्नम
-
Snehyatra (स्नेहयात्रा)
भारत आणि फ़्रांस हे दोन देश तसे लांबलांबचे... ते जवळ यावेत, परस्परांचे मित्र व्हावेत , एकमेकांची संस्कृति समजुन घेण्यासाठी दोन्ही देशांच्या नागरिकांनी याव जाव, भेटीगाठी तुन सहकार्य- सामंजस्य वाढत जाव. यासाठी पुण्यात स्थापन झाल फ़्रांस मित्र मंडळ त्या मंडळांची प्रतिनिधि म्हणून सुमारे चाळीस वर्षापूर्वी निर्मला पुरंदरे नावाची एक तरुण कार्यकर्त्ता वर्षभरासाठी फ्रांसला जाऊन राहून आली. देशाची अनाधिकृत राजदूत म्हणून तिकडे वावरली प्रदेशप्रवासताले नाविन्य ओसरले नव्हते, अशा वेळी त्या वास्तवात तिन घेतलेल्या अनुभवांच आणि केलेल्या निरिक्षनाचं हे प्रांजळ कथनं ...
-
Bramhand (ब्रम्हांड)
विश्व ही एक भव्य दिव्या कलाकृति आहे. ते एक अलौकिक पण अमानवी नाटक आहे. आशय या नेत्रदीपक नाट्यचा सूत्रधार कोनबरे असेल? विश्व नावाच्या कलाकृतीचा कर्ता कोण? विज्ञानाला या प्रश्नाची उत्तर माहित नाहित. पण विश्वाची ओझरत दर्शन मात्र विज्ञानाला झाल आहे. विश्व नावाच्या अदभुत कोड्याचा उलगडा हळूहळू हॉट आहेत. महास्फोटातुन आपल हे अफाट विश्व जन्माला आलं आणि आतिप्रचंड वेगान ते विस्तारु लागलं . चार बलांचा आणि मुल्कानांचा अगम्य खेल म्हणजे हे अमर्याद विश्व हे विज्ञानाला उमगल . विश्वाचे एकेक गूढ़ महतप्रयासंन उलगडून लागलं . विश्व सपाट आहे वक्र आहे? ते बंद आहे की खुल आहे. ? बिंदुवत स्तिथिने विश्वाचे अंत होइल? की निरंतर विश्व विरून जाइल? विश्वमधिल मानावंच आगमन ही नैसर्गिक घटना आहे. ? की मानव निर्मितीसाठी विश्वाचे उपक्रम आहे? प्रश्नाची ही निरंतर हॉट आहेत. अजुन काय काय समजायचे बाकी आहे.? खरं म्हणजे विश्वाचे कोड मानवाला उलगडले काय? या सार्या प्रश्नाचा धावता आढावा हांच ' ब्रम्हांड , उत्पति , स्तिथि आणि विनाश ' या ग्रंथाच्या उपक्रमाची मूलप्रेरणा आहे.