-
Buddhimatehun Adhik Mahatvachi Bhavnik Buddhimatta (बुद्धिमतेहून अधिक महत्वाची भावनिक बुद्धिमत्ता)
भावना जाणण्याची, मूल्यांकन करण्याची, व्यक्त करण्याची आणि नियंत्रित करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता (इक्यू). केवळ बौद्धिक क्षमता (आयक्यू) आयुष्यात यश मिळवण्यासाठी पुरेशी नाही. आयक्यू आणि इक्यू एकमेकांना पूरक ठरतात, तेव्हाच ते प्रभावी असतात. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे, भावनांना प्रभावीपणे समजून घेण्याची आणि त्यांचं व्यवस्थापन करण्याची क्षमता. कामाच्या ठिकाणी भावनिक बुद्धिमत्ता महत्त्वपूर्ण फायदे मिळवून देऊ शकते आणि अधिक चांगले संबंध निर्माण करण्यासाठी, तसंच सकारात्मक वातावरण-निर्मितीसाठी मदत करू शकते. भावनिक बुद्धिमत्ता महत्त्वाची आहे, कारण ती वैयक्तिक आणि व्यावसायिक असे दोन्ही प्रकारचे संबंध सुधारण्यासाठी मदत करू करते. सामाजिक गुंतागुंतीतून मार्ग काढण्यासाठी, नेतृत्व करण्यासाठी, करिअरमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी उच्च भावनिक बुद्धिमत्ता मदत करू शकते. सदर पुस्तकात लेखकाने मेंदूचं कार्य आणि त्यामागची भावनिक आणि तार्किक प्रक्रिया सोप्या शब्दांत मांडलेली आहे. तसंच भावनिक बुद्धिमत्तेचं संगोपन कसं करता येऊ शकतं आणि ती कशी वृद्धिगंत करता येऊ शकते, हे दाखवून दिलं आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात हमखास यश मिळवण्यासाठी सदर पुस्तक वाचकांना निश्चितच उपयुक्त ठरेल.
-
Manus Navacha Sundar Shilpa (माणूस नावाचं सुंदर शिल्प)
एक मानव जन्माला येतो. जसजशी त्याच्या शरीराची वाढ होते, तसतशी त्याच्या मनाची, बुद्धीची, भावनांची खोली आणि रुंदी वाढत जाते. त्याच्या वाढीला दिशा, रूप-रंग येत राहातात. पण त्या बुद्धी-भावनांच्या खोलीला, रुंदीला, रंगारूपाला, आणि त्याच्या कर्तृत्त्वाला सार्थकी लावण्यासाठी त्या मानवाला योग्य दिशेनं घडवण्याची आवश्यकता असते. तरच तो मानव या जगासाठी आणि स्वतःसाठी उपयुक्त होऊ शकतो. ही घडवण्याची क्रिया म्हणजे एखाद्या शिल्पकारानं घडवलेल्या एका सुंदर शिल्पाची प्रक्रियाच असते. आणि, मानवाच्या घडणीचे शिल्पकार म्हणजे त्याचे जन्मदाते आईवडील, शिक्षक (गुरू), समाज आणि तो मानव स्वतः. एक नवजात बालक कच्च्या मातीच्या खंडाप्रमाणे असतो, ज्यावर अनेक कलाकार वेगवेगळ्या प्रक्रिया करत असतात. त्या प्रक्रिया अखंड चालू असतात. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. ते मानवी शिल्प किती सुंदर घडतंय, यावर त्या मानवी जीवाचं सार्थक ठरतं. या घडणावळीचे पैलू अत्यंत गुंतागुंतीचे असतात. कधी एकमेकांना पूरक तर कधी परस्परविरोधी. या सगळ्या पैलूंचं विश्लेषण करणं गरजेचं आहे. तरच आपला समाज, मानवी क्षमता, संस्कृती आणि हे विश्व संतुलित राहू शकतील. हाच या पुस्तकाचा गाभा आहे.
-
Bhartiy Samaj Va Sanskruti (भारतीय समाज आणि संस्कृती)
भारतीय समाज आणि संस्कृती या ग्रंथात भारतीय समाजातील विविधता लक्षात घेऊन अनेक मुलभूत मुद्यांचा समावेश केला आहे. या ग्रंथात भारतीय समाजव्यवस्था व त्यातील विविध मुलभूत तत्वे, भारतीय संस्कृती, चार आश्रमव्यवस्था, पुरूषार्थ, कर्म सिद्धांत, जातीय संरचना व जातीच्या उत्पतीचे सिद्धांत, विवाहसंस्था व कुटुंबसंस्था या विश्लेषनाबरोबर भारतीय स्त्रिया आणि भारतीय सामाजिक जीवनावर इस्लाम आणि पाश्चात्य संस्कृतीचा पडलेल्या प्रभावाची विश्लेषनात्मक मांडणी करण्यात आली आहे. या ग्रंथात भारतीय समाजाचे सर्वागिंण दर्शन होईल. भारतीय समाजातील अनेक मुद्याचा समावेश करून विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक अशा सर्वाना उपयोगी सिद्ध होणारा हा महत्वपूर्ण ग्रंथ होय. समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थ्यांना हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल असा आम्हाला विश्वास वाटतो.
-
Bhartiy Lokshahi Arth Aani Vyavahar (भारतीय लोकशाही अर्थ आणि व्यवहार)
भारताने १९५० मध्ये लोकशाही संविधान स्वीकारले. मात्र भारताच्या एकूण राजकीय विचारविश्वात अजूनही एक शासनप्रकार म्हणून आणि राजकारण करण्याचा मार्ग म्हणून लोकशाहीविषयीचे वाद अस्तित्वात आहेतच. या वादांमधूनच लोकशाहीबद्दल विविध दावे-प्रतिदावे उभे राहिलेले दिसतात. या वादांचा आढावा घेणारा हा लेखसंग्रह आहे. इतर अनेक देशांमध्ये ज्या आव्हानांमुळे लोकशाही व्यवस्था कोलमडल्या त्याच आव्हानांना तोंड देत भारतात लोकशाही टिकून राहिली. हे कसे शक्य झाले याचा आढावा या लेखसंग्रहातील लेख घेतात. लोकशाही व्यवस्था लादली जाण्यापेक्षा संथपणे उत्क्रांत झाल्यामुळे काय फायदा होतो ते भारताच्या उदाहरणावरून दिसून येते. मात्र, काळाच्या ओघात टिकून राहतानाच, भारतीय लोकशाही आशयघन स्वरूप प्राप्त करू शकली का हा प्रश्न उरतोच. या प्रश्नांची चिकित्सा या पुस्तकात केलेली आहे. १९८० च्या दशकापासून सुरू झालेले आर्थिक बदल जनविरोधी आहेत, अशी टीका केली जाते. जातीयवाद, जमातवाद, भ्रष्टाचार, गुंडगिरी यांचा लोकशाही व्यवहारांवर दुष्परिणाम; परद्वेषावर आधारित जनसंघटनंामुळे लोकशाहीला नव-फॅसिस्ट स्वरूप येते, या सर्वांवर लक्ष वेधलेले आहे; आणि या सर्वांमुळे लोकशाही आशयघन बनवून खरोखर प्रातिनिधिक व सहभागप्रधान बनवण्याचे उद्दिष्ट दूर जाते असे म्हटले जाते. या पार्श्वभूमीवर या पुस्तकात राज्यशास्त्राचे भारतातील आघाडीचे अभ्यासक हे या संदर्भातल्या प्रश्नांकडे कसे पाहता येईल याविषयी मांडणी करतात. पहिल्या भागातील निबंध लोकशाहीच्या बहुविध अर्थांच्या संदर्भात ही चिकित्सा करतात तर दुसर्या भागात धर्मनिरपेक्षता, मागास जातींचे राजकारण, पक्षीय राजकारणातील अस्थिरता आणि सामाजिक चळवळींचा र्हास या चार संदर्भांत लोकशाही व्यवहारांची चिकित्सा केली आहे. सैद्धान्तिक मांडणी आणि अनुभवनिष्ठ संशोधने एकत्र आणून हा ग्रंथ भारतीय राजकारणाच्या अभ्यासकांना अभ्यासाची पुढील दिशा ठरविण्यासाठी साहाय्य करतो. तसेच विद्यार्थी, पत्रकार, कार्यकर्ते यांना भारतीय लोकशाहीचे अर्थ व व्यवहार यांच्याविषयी चिकित्सक परिचय करून देतो.
-
Manvantar. (मन्वंतर)
एकीकडे विज्ञानकथांचा बहर ओसरल्याचा सूर कानावर पडतोय,पण त्याचवेळी आजच्या तंत्र विज्ञानाच्या युगाचं प्रतिनिधित्व करणारे अनेक युवा लेखक जोमानं,अगदी झपाटून विज्ञानकथांच लेखन करतानाही दिसतायेत. त्यांच्या कथांमधून मग कधी,तंत्राशास्त्राच्या प्रगतीनं वेठीला धरलेलं. मानवी जग डोकावतं, तर कधी दृश्य जगापल्याडच्या अव्यक्त दुनियेची तीव्र असोशी अभिव्यक्त होत राहते. अनेकदा कालगतीच्या संदर्भात केलेलं घटित-अघटीताच सूक्ष्म अन्वेषण तर वाचकाला पुरतं चक्रावून सोडतं. एकंदरच ज्ञान-विज्ञानातील गृहीत-कल्पित परीमाणांना साकारणाऱ्या या विज्ञानकथा वाचकाच्या मनाचा नेमका ठाव घेतात.