-
Gappangan. (गप्पांगण)
प्रत्येक माणसाला अन्न पाणी वस्त्र निवारा या मूलभूत गरजांच्या पाठोपाठ गरज असते ती संवादाची. ( अर्थात शक्यतोवर सुसंवादाची ) बाळाच्या जन्मानंतर काही काळातच आई आणि इतरजणही 'अडगुळं मडगुळं' पासून 'येरे येरे चांदोबा' पर्यंत बाळाशी एक प्रकारे वरवर पाहता निरर्थक पण संवेदनांच्या संदर्भात सार्थ शब्दात संवाद साधू लागते. संवादाची नंतर नंतर गरज, सवय, आवड आणि निकड भासू लागते. गप्पा मारणे (थापा नव्हेत) हा विरंगुळा हवासा वाटतो. अशा गप्पांतून कितीतरी विषयांना, व्यक्तींना, गावांना, देशांना, आठवणींना स्पर्श होतो. वेदनेला उद्गार आणि हर्षाला उल्हास मिळतो. निंदकाचे घर शेजारी पाजारी नसेल तर कौतुकाची थाप मिळते. एकूणच जीवन व्यवहार सुखदायी होतो. वाचलेले,ऐकलेले, पाहिलेले,अनुभवलेले असे काही थोडे-फार गप्पांच्या माध्यमातून संक्रमित होते. गावाकडचा पिंपळाचा पार ते ऑर्कुट पर्यंतचा प्रवास या गप्पांच्या साक्षीतच झाला आहे. सगळं खरं आहे! पण या गतिमान युगात (ऑर्कुटचा अपवाद)गप्पांना वेळ देणं घेणं जरा अवघडच झालंय. मग अशात कोणी संवेदनशीलपणे अक्षरगप्पा करायला लेखणी हाती धरली तर ? लेखिका माधवी कुंटे यांनी अशाच विविध विषयावरच्या अक्षरगप्पा केल्या आहेत. सरळ मनाने आणि सरळ शब्दात, उपदेशाच्या अभिनिवेश नाही. सरळ सरळ मोकळ्या गप्पा. या गप्पांगणात गप्पांचा अड्डा जमवूयात आपण सारेजण. गप्पांगणात तुमचे मनः पूर्वक स्वागत!
-
Chakravyuh Bhed ( चक्रव्युह भेद)
एक म्हातारा त्याच्या नातीसह हॉटेल रंभामध्ये एक आठव्द्याकरिता उत्तरला.वीस वयाच्या त्या सुंदर, देखण्या नातीचा तो साठीतील म्हातारा होता. दोघं अगदी मौज माजात राहत होते. म्हातारा रंगीन शौकीन वागत होता. इष्क, मोहबत्तीची गाणी गुणगुणायचा, भरघोस सेंट मारून हॉटेलभर फिरायचा, भडक चित्रांची मासिकं बकोटीला मारून हिंडायचा. एकंदरीत त्याचं ते वागणं पाहून हॉटेलवाल्यांना काही वेगळाच संशय येत राहिला. तिसरया मध्यरात्री हॉटेलवर पोलिसांची रेड पडली आणि दोघं पोलीस म्हातारयाच्या दारावर जोरजोरात दंडूका आपटू लागले. हॉटेलमधील दिवेही मालविण्यात आले. म्हतारयाने दार उघडले आणि तो चार बोटी हात दरवाज्याच्या फटीतून त्यानं पाहिला. "ए म्हातारया, या वयात हे धंदे?" सोबतचा हवालदार म्हणाला. "आम्हाला सगळी खबर असते." "याला समोरच्या खोलीत डांबून ठेव. मी बघतो या धंदेवालीकडे!" त्या तरुणीकडे आशाळभूतपणे पाहत तो गॉगलधारी म्हणाला . "इन्स्पेक्टर पाटणकर, तुझा खेळ संपलाय." ताठ उठून उभा राहात म्हातारयाच्या वेषातला मियां म्हणाला. "नाही!" पाठीमागून राजहंसचा अवाज घुमला." हा इन्स्पेक्टर पाटणकर नाही. हा त्याचा तोतया. इन्स्पेक्टर रानडे गिरफ्तार करा याला."
-
Har Har Mahadev (हर हर महादेव)
भारतात फार मोठया प्रमाणात घातपात घडवून आणायची पाकिस्तानची जी योजनेची ही सुरुवात होती. सुरुवात तर झाली होती. पण पुढं काय हा प्रश्न अनुत्तरित होता. अर्थात काळाकडं याचं उत्तर होतं. इतिहास याची साक्ष होता. महाराष्ट्रात शिवछत्रपतीनी निर्मिलेल्या या हिंदवी स्वराज्यात जेव्हा जेव्हा असली पाशवी कृत्ये घडली आहेत तेव्हा एकच आवाज आला आहे. "हर हर महादेव ….!"
-
Savtya (सावटया)
त्या रात्री मी खोलीत एकटाच होतो. दाराला बाहेरून कुलूप होतं. दाराला एक लहान खिडकी होती. खिडकीला तारांची काच होती. त्या काचेच्या चौकोनावर माझं लक्ष होतं. डॉक्टर त्यांच्या रात्रीच्या राउंडवर येण्याची मी वाट पहात होतो. त्याचवेळी माझ्या डोक्यात अगदी मागे एक कलकल सुरु झाली. एखाद्या भुंग्याने लाकूड पोखरावं, तसं काहीतरी माझा मेंदू पोखरत होतं. एखादं गिरमिट फिरावं तसं ते गरगरत होतं, लांब जात होतं, परत जवळ येत होतं… आधी मला वाटलं हा त्या 'सावटया' चाच खेळ आहे..