-
Tutaleli Taar (तुटलेली तार)
मानवी मनाचा थांगपत्ता लागणं म्हणजे महाकर्मकठीण. दोन जीव विवाह बंधनात अडकल्यावर त्यांचातील नातेसंबंधांचे तरल धागेदोरे उलगडणं जवळजवळ अशक्य. शुभमय आणि त्याची पत्नी ऋती. शुभमय जिल्ह्याच्या न्यायालयाचा जज्ज.पराकोटीचा आदर्शवादी आणि नितीनिष्ठ. ऋती कवयित्री आणि मनस्वी जीवन जगणारी. त्यांची एकुलती एक मुलगी मुनिया. तिच्या वियोगानंतर उभयंताच्या नातेसंबंधात निर्माण झाले अगणित तणाव. ते कोणते आणि पुढे काय घडलं, हे समजण्यासाठी आवर्जून वाचायला हवी सुचित्रा भट्टाचार्य यांनी सूक्ष्म विश्लेषणात्मक अंगानं लिहिलेली बंगाली कादंबरी - 'तुटलेली तर' उत्कंठावर्धक आणि शेवटच्या पानापर्यंत वाचकांना श्वास रोखून धरायला लावणारी.
-
Pratishodh (प्रतिशोध)
शोले पेक्षाही खतरनाक गुन्हेगारांचा प्रतिशोध घेणा-या डॉ. बी. जी. शेखर आयपीएस यांच्या सत्य घटनांवर आधारित पुस्तक... पोलिसांचे ख-या पराक्रमाचे प्रतिक मानले जाते... "प्रतिशोध"
-
Aawas (आवस)
माझी आवस, माझी आई तिचे जीवनरुपी विश्व या कादंबरीत उलगडताना आणि तू पूर्ण झाल्यावर मनावरचे एक ओझे उतरल्यासारखे झाले आहे. तिच्या जीवनाचे सत्यचित्र रेखाटताना मनाची खूप घालमेल झाली होती. जसेच्या तसे वास्तववादी चित्रण करणे आवश्यक होते. तिने भोगलेल्या अनंत यातनांचे चित्र समाजातील ख-या मातृप्रेमीना समजणे आवश्यक होते. मला हे माहीत आहे, जगातील सर्वच माणसांना आपली आई देवताच वाटवते व पुढे आयुष्यभर त्या आपल्या मुलासाठी नि:स्वार्थीपणाने झटते, ती प्रत्येक आई मुलाची पहिली गुरु असते. आपल्या मुलाच्या सुखासाठी काळीज काढून देणारी माता असते. प्रत्येक मुलाच्या आयुष्यात पुढे अनेक स्त्रिया येतात पण आई आईच असते. देवाच्या पुढचे उच्चस्थान तिथे असते. ज्या घरात आई असते ते देऊळ असते.
-
Shivgandh (शिवगंध)
मी फार काही न बोलता माझ्या मेक अप रूमकडे गेलो. जिरेटोप काढला. त्याला कपाळी लावला, समोरच्या मेजावर ठेवला, गळ्यातली कवड्यांची माळ काढली. तिला प्रणिपात केला आणि माझ्या नकळत डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या. पंधरा एक मिनिटे मी ढसाढसा रडत होतो. माझ्या मेक अप रूममधून रायगडाच्या प्रवेशद्वारावरचा भगवा ध्वज फडकताना दिसत होता. मावळत्या सूर्याची किरणं त्यावर पडत असल्यानं निळ्याभोर आकाशाच्या पार्श्वभूमीवर तो खुलून दिसत होता. डोळ्यांतून ओघळणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यामुळे काहीसं धूसर दिसत होतं. मला जाणवलं, माझ्यातून काही तरी निघतं आहे आणि ते त्या भगव्यामध्ये मिसळून जातं आहे. मी रिता होत होतो आणि मन समाधानानं भरून जात होतं.