-
Dhor (ढोर)
आधुनिक सुखसोयींमुळे ढोर समाजाचा धंदा पूर्ण बसला व ढोर समाज उद्ध्वस्त झाला. याच ढोर समाजातील एक गट शिकला आणि स्थिर झाला. अशाच एका तरुणाची ही प्रातिनिधिक कहाणी.
-
Shikhandi Aani Na Sangitalya Janarya Katha (शिखंडी आणि न सांगितल्या जाणाऱ्या कथा)
पितृसत्ताक व्यवस्था म्हणते कि पुरुष हे स्त्रियांपेक्षा श्रेष्ठ आहेत. स्त्रीवाद स्पष्ट करतो की स्त्री आणि पुरुष सामान आहेत. भिन्नत्व विचारते की पुरुषत्व म्हणजे काय आणि स्त्रीत्व म्हणजे काय. भारतीय पुराणशास्त्राचे अभ्यासक देवदत्त पटनायक म्हणतात, भिन्नत्त्व हे फक्त आधुनिक, पाश्चात्य किंवा लैंगिकच असते असं नाही. हिंदू धर्मातील लेखी आणि मौखिक परंपरांचं नीट निरीक्षण करा, त्यातील काही परंपरा तर दोन हजार वर्षांपूर्वीच्या आहेत. त्यांत ' शिखंडी' सारख्या काही दुर्लक्षित कथा दिसतील. पत्नीला तृप्त करण्यासाठी शिखंडी पुरुष बनली होती. महादेवांन भक्तिणीच्या लेकीची प्रसूती करण्यासाठी स्त्रीरूप घेतलं होतं. पाटील ज्ञान मिळावं म्हणून चूडाला पुरुष बनली होती. सामवान आपल्या मित्राची पत्नी बनला होता. अशा बऱ्याच कथा तुम्हाला आढळून येतील. खेळकर आणि हृदयस्पर्शी असलेल्या आणि कधीकधी अस्वस्थही करणाऱ्या या कहाण्यांची तुलना त्यांच्या समकालीन मेसापोटेमियन, ग्रीक, चिनी आणि बायबली कहाण्यांशी आपण करतो तेव्हा ह्या वेगळेपणाचा अर्थ लावण्याचा खास भारतीय दृष्टिकोन आपल्यासमोर उघड होतो.
-
Sanskrutik Punarjagranache Ardhvayu Kanhaiyyalal Munshi (सांस्कृतिक पुनर्जागरणाचे अध्वर्यू कन्हैय्यालाल मुन्शी)
सांस्कृतिक पुनर्जागरणाचे अध्वर्यू कन्हैय्यालाल मुन्शी लेखक: प्रसाद फाटक लेखक प्रसाद फाटक यांना भाविसातर्फे दिल्या गेलेल्या अभ्यासवृत्तीद्वारे कन्हैयालाल मुन्शींचा पत्रव्यवहार आणि वैयक्तिक नोंदी, त्यांनी संपादित केलेली नियतकालिके, अभिलेखागारातील कागदपत्रे, मुन्शींवर लिहिले गेलेले तसेच मुन्शींचे स्वत:चे साहित्य या सर्वांच्या अभ्यासामधून प्रस्तुत पुस्तक साकारले आहे. मुन्शींचा स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग, ‘भारतीय विद्या भवन’च्या स्थापनेमागची भूमिका, संविधान सभेच्या कार्यातले योगदान, सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणामध्ये बजावलेली भूमिका, हैदराबाद संस्थानामध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराला सरकारदरबारी फोडलेली वाचा, विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेमधला सहभाग अशा अनेक घटनांचा आणि त्या मागच्या कार्यकारणभावाचा मराठी साहित्यामध्ये प्रथमच विस्ताराने वेध घेतला जात आहे. या पुस्तकाच्या माध्यामतून एका निस्सीम लोकशाहीवादी आणि पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन व्यापक हिंदुहिताची भूमिका घेणाऱ्या बहुआयामी व्यक्तिमत्वाची जवळून ओळख वाचकांना होईल.
-
Peshavai Maharashtrachya Itihasatil Ek Suvarnpan ( पेशवाई महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपान)
महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सोनेरी पान असलेल्या पेशवाईचा प्रवास कौस्तुभ कस्तुरे यांनी या पुस्तकात मांडला आहे. 'पेशवाईतले अत्यंत गौरवाचे, अभिमानाचे आणि राष्ट्राला अत्यंत उपयोगी असे घडले, ते अभ्यासपूर्ण पद्धतीने इतिहासपंडितांनी सविस्तर सांगयला हवे,' अशी गरज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली आहे. हाच धागा कस्तुरे यांच्या या पुस्तकात दिसतो. पेशवाईतील पराक्रम, मुत्सद्देगिरी त्यातून दिसते. पेशव्यांच्या लढाया, व्यूहरचना अद्वितीय अश्या होत्या. त्याचे वर्णन पुस्तकात आले आहे. बाळाजी विश्वनाथ भट यांच्यापासून सूरु झालेला हा प्रवास पेशवाईच्या अस्तापर्यंत येऊन पोहोचतो. या पुस्तकामुळे पेशवाईसंबंधात पसरलेले अनेक गैरसमज दूर होण्यास मदत होते. पुस्तकात मोडी लिपीत उपलब्ध कागदपत्रे, छत्रपती व पेशवे यांच्या मुद्रा आदींचाही समावेश आहे.
-
Saiyyad Haidar Raza Eka Pratibhavant Chitrakaracha Pravas (सैय्यद हैदर रझा एका प्रतिभावंत चित्रकाराचा प्रवास)
आधुनिक चित्रकलेला आपल्या 'बिंदू'तून एक नवा आयाम देणारे आणि त्याद्वारे कलाविचारांमधली स्वतःची स्वाभाविक आणि उपजत भारतीयता आंतरराष्ट्रीय स्तरावर साकार करणारे ज्येष्ठ चित्रकार सय्यद हैदर रझा यांचे यशोधरा डालमिया यांनी इंग्रजीतून चरित्रलेखन केले. दीपक घारे यांनी रझा यांच्या या चरित्राचा मराठी अनुवाद केला असून तो पॉप्युलर प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे.
-
Aambedkari Aai (आंबेडकरी आई)
'आंबेडकरी आई' या संपादित ग्रंथातून आंबेडकरी विचार व आचार याचा उद्बोधक सांधा जोडण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या मुलींना व मुलांना शिकविण्यासाठी केलेला संघर्ष व त्याग याचा लेखाजोखा या ग्रंथात रेखाटला आहे. आंबेडकरी विचारात सर्वच आयांना प्रेरित करण्याचे वैचारिक व नैतिक सामर्थ्य आहे हे दिग्दर्शित केले आहे. डॉ. गोपाळ गुरू निसर्गाला देव मानणाऱ्या लोकसंस्कृतीला, स्त्रीला सन्मान देणाऱ्या मातृसत्ताक सिंधुसंस्कृतीला गाडून या देशात देव-दैवाला केंद्रीभूत मानणारी विषमतावादी पितृसत्ताक धर्मसंस्कृती रुजवली गेली, त्याला पहिला विरोध तथागत गौतम बुद्धानी केला आणि सांस्कृतिक परिवर्तनाचा पाया रचला. त्यानंतर ही देवकेंद्री नवससंस्कृती नाकारणारी एक परंपराच या देशात हजारो वर्षांपासून सुरू राहिली. बुद्ध-कबीर-शाहू-फुले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत ही परंपरा सांगता येते. म्हणूनच या संपूर्ण परंपरेला घेऊन उभ्या राहिलेल्या समतावादी-विज्ञानवादी तत्त्वज्ञानाची 'आंबेडकरी तत्त्वज्ञान' या नावाने ओळख देता येते. तर या अर्थाने हे तत्त्वज्ञान स्वीकारणारी आणि आपल्या मुलांना त्या मार्गावरून चालण्याची शिकवण देणारी आई ही 'आंबेडकरी आई' होय. ही आई कुठल्याही जाती-धर्माच्या समूहातील असू शकते. पहिल्या पिढीत हे आंबेडकरी तत्त्वज्ञान स्वीकारणारी पूर्वाश्रमीच्या महार सोडून इतर कुठल्याही जातीतील स्त्री सहसा दिसत नव्हती, तरी दुसऱ्या तिसऱ्या आणि आताच्या चौथ्या पिढीत हे तत्त्वज्ञान स्वीकारणाऱ्या इतर जाती-धर्मातील अनेक स्त्रिया दिसताहेत. याही ग्रंथामध्ये बौद्ध समुदायाबरोबरच चर्मकार, मराठा आणि ओबीसी समूहातील स्त्रिया आहेत, ज्यांना आईने किंवा आईसमान सासूने आंबेडकरी संस्कार देऊन घडविलेले आहे. - प्रा. आशालता कांबळे पूर्वश्रमीच्या अस्पृश्य मानल्या गेलेल्या स्त्रीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धम्मदीक्षेनंतर, हजारो शतकांच्या वेदनेतून मुक्त होत देव-देव्हारे, रूढी-परंपरा या साऱ्याला नकार देवून बुद्धांचा मार्ग निष्ठेने स्वीकारला आणि ती संविधानसंस्कृतीची पांथःस्थ झाली. डॉ. बाबासाहेबानी दिलेल्या 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' या मूलमंत्राला काळजाशी घट्ट धरत तिने प्रचंड दारिद्र्यात आणि कष्टातही आपल्या लेकरांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. हीच बहुसंख्य आंबेडकरी स्त्री सभा, संमेलने, मोर्चे, आंदोलने आणि उपोषणात गर्दीचा चेहरा होऊन चळवळीच्या समष्टीत पार मिसळून गेली होती. या आंबेडकरी चळवळीच्या पायाभरणीशी उभ्या असलेल्या, पण पडद्यामागे राहिलेल्या ४२ आयांच्या लेकींनी लिहिलेला हा सामाजिक-सांस्कृतिक-चरित्रात्मक दस्तावेज म्हणजेच 'आंबेडकरी आई' हे संपादन होय. डॉ. श्यामल गरुड
-
Sakha Nagjhira (सखा नागझिरा)
सखा नागझिरा हे एक प्रकारे किरण पुरंदरे यांचं जंगलात घालवलेल्या ४०० दिवसाचं आत्मचरित्रच आहे पण त्यात निसर्गातील सगळेच पात्र आहेत. एक निसर्गप्रेमी म्हणून प्रत्येकाने हे पुस्तक वाचायला हवे. हे आपल्याला निसर्गातील चालीरीती आणि एक प्रकारे आपण कोणत्याही जंगलात गेल्यावर कशा प्रकारचं आचरण केलं पाहिजे याचा बोध नक्की आपल्याला होतो.तसेच जंगलात आणि सभोवताली राहणाऱ्या लोकांचं आयुष्य कस असत याची सुद्धा मांडणी खूप चांगल्या प्रकारे लेखकाने या पुस्तकात केली आहे. पुस्तक वाचताना आपण त्या जंगलात फिरत असल्याचा भास आपल्याला होतो आणि एखादा शिकारी पक्षी किंवा शिकारी प्राणी बघितल्यावर त्यांना जेवढा आनंद होतो तेवढाच आपल्यालाही होतो.पुस्तकाबद्दल लिहायला खूप आहे पण पुरंदरेंनी पुस्तकात आपल्या काही भावना व्यक्त केल्या आहेत त्या प्रत्येक निसर्गप्रेमींच्या असतात किंवा असायला पाहिजे.
-
Marathi Rajyatale Marathiche Vartman (मराठी राज्यातले मराठीचे वर्तमान)
मराठी राज्यातले मराठीचे वर्तमान
-
Chatrapati Shivaji Maharaj - Smrutigranth (छत्रपती शिवाजीमहाराज - स्मृतिग्रंथ)
छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या बद्दल समग्र माहिती