-
Guptaher Bahirji Naik (गुप्तहेर बहिर्जी नाईक)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख 'बहिर्जी नाईक' हे एक अनोखे व्यक्तीमत्व होते. स्वतः बहिर्जी नाईक हे फकीर, वासुदेव, कोळी, भिकारी, संत असे वेगवेगळे सोंग घेऊन शत्रूच्या गोटात शिरुन आवश्यक ती माहिती काढून आणत असे.त्यानंतर शिवराय आपल्या मोहिमेचे एकूण नियोजन करत असे.हेरगिरी करणे ही साधी गोष्ट नव्हती. एक चूक आणि मरणाची गाठ अशी स्थिती असूनही अनेक अवघड मोहिमेंवर बहिर्जी यांनी यश मिळवले होते.विजापूरचा आदिलशाह असो अथवा क्रुरकर्मा औरंगजेबसारखा संशयी मुघल बादशहा,सर्वांना अनेकवेळा बहिर्जींनी हुलकावणी दिली होती .यातून बहिर्जी यांची बुद्धिमत्ता , चातुर्य व साहस याचे दर्शन घडून येते. सदर पुस्तकात स्वराज्याच्या स्थापनेपासून जालना लूटीपर्यंत बहिर्जी नाईकांच्या कामगिरीचा थोडक्यात आढावा घेतला आहे.शिवकालीन इतिहासात बहिर्जी नाईक यांचे कार्य अविश्वसनीय, थरारक व मन थक्क करणारे आहे.असे बहिर्जी नाईक पुन्हा होणे नाही.
-
Baji Pasalkar Prataprav Gujar Ramaji Pangera (बाजी पासलकर प्रतापराव गुजर रामजी पांगेरा)
बाजी पासलकर हे मोसे खोर्यातील भारदस्त व्यक्तिमत्त्व होते. जुलमी सुलतानी राजवट संपवून न्यायाचे हिंदवी स्वराज्य निर्माण करणार्या शिवरायांच्या महान यज्ञातील पहिली समिधा म्हणजे बाजी पासलकर होय! हिंदवी स्वराज्याचे तिसरे सरसेनापती प्रतापराव गुजर एक धाडसी वीर होते. त्यांचे मूळ नाव कुडतोजी होते. त्यांच्या पराक्रमाने प्रेरित होऊन शिवरायांनी त्यांना 'प्रतापराव' हा किताब दिला अन् पुढे हेच नाव रूढ झाले. साल्हेर येथे खुल्या मैदानात त्यांनी मुघलांचा पराभव केला. रामजी पांगेरा यांच्या पराक्रमामुळे त्यांचे वर्णन शिवभारतात परमानंदानी 'अग्नीप्रमाणे वीर' असे केले आहे. कण्हेरगडावर रामजी पांगेरा यांच्या अवघ्या सातशे सैनिकांनी मुघल सरदार दिलेरखानाच्या हजारोंच्या सैन्याच्या तोंडचे पाणी पळवले.शेवटी दिलेरखानाला माघार घ्यावी लागली!
-
Swapnashilp (स्वप्नशिल्प)
कामिनी मंदिर संपूर्ण जगात प्रसिद्धीस पावले. जगभरातील शिल्पकारांनी आणि रसिकांनी आचार्य अश्विनीकुमारांच्या कलेची प्रशंसा केली. मात्र कामिनीशिल्प वस्त्राच्छादित होते, त्यामुळे अनेकांची निराशा झाली. कामिनी कुरूप होती, असाही एक समज पसरला. अनेक शिल्पकारांनी कामिनी शिल्पाचे काम पूर्ण करण्याची तयारी दर्शवली, पण कुणालाही ते पूर्ण करणे जमले नाही. अनेकांनी तसा प्रयत्न केला असता त्यांची त्वचा भाजून निघाली. त्या शिल्पाची प्रसिद्धी झाली, ती याच कारणास्तव ! जवळपास दोन तपे निघून गेली. महाराज विक्रमादित्य द्वितीय आता वृद्धत्वाकडे झुकू लागले. त्यांना अजूनही त्या शिल्पकाराची प्रतीक्षा होती, जो कामिनीला पूर्णरूप देणार होता. कोण होती ही कामिनी ? काय होती कामिनी मंदिरामागची कथा ? काय आहे कामिनीशिल्पाचे रहस्य ?
-
Genius Gem.Dr Gem (जीनियस जेम डॉ. जीएम)
सूक्ष्मजीवशास्त्र त्याचबरोबर उद्योजकीय कौशल्य आणि औद्योगिक क्षेत्रातील योगदान अशा विविध व्यापक स्तरांवर डॉ. जी. एम. वारके यांचे कार्यचरित्र महत्त्वाचे आहे. साइटोफागा जिवाणूंच्या विविध प्रजातींची ओळख तसेच त्यांचे विलगीकरण यामधील त्यांच्या मूलभूत संशोधनाने सूक्ष्मजीवशास्त्राच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. या जिवाणूंच्या प्रजार्तीच्या लक्षणांचे तपशीलवार वर्णन आणि त्यांच्या विलगीकरणासाठी आवश्यक विशेष मीडिया निर्मितीद्वारे त्यांच्यातील वैज्ञानिकाने आपल्या समर्पित वृत्तीचेच दर्शन घडवले. इतकेच नव्हे तर, त्यांच्या या पायाभूत संशोधनाने भविष्यातील संशोधनाचा आणि औद्योगिक क्षेत्रातील उपयोजनांचा मार्गच प्रशस्त केला. डॉ. वारके यांच्या या कार्यामुळे औद्योगिक क्षेत्रातच नव्हे तर विज्ञानाच्या व्यावहारिक उपयोजनाच्या क्षेत्रातदेखील नव्या संधींची दालने खुली झाली आहेत. त्यांच्या सर्वस्वी नव्या दृष्टिकोनामुळे अनेक औद्योगिक उत्पादनांच्या निर्मितीमध्ये सुलभता आल्याने त्याचा आर्थिकदृष्ट्या व्यापक परिणाम दिसून आला आहे. त्यांचे औद्योगिक संशोधन आणि त्याद्वारे निर्मिती झालेले उत्पादन तंत्रज्ञान आजही उद्योजक तसेच उद्योगांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. त्यांचे हे चरित्र त्यांच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक यशाचे गमक सांगतानाच भावी पिढ्यांना प्रेरणा देण्याचेही काम करते. सूक्ष्मजीवशास्त्र आणि उद्योगविश्वात त्यांनी निर्माण केलेल्या समृद्ध वारशाचा फायदा जागतिक आरोग्य, विज्ञान आणि उद्योग क्षेत्राला झाला असून त्याबद्दल सर्वत्र त्यांच्याविषयी आदराची भावना व्यक्त केली जाते. देशाला, समाजाला आपले अमूल्य योगदान देणाऱ्या डॉ. जी. एम. वारके यांचे चरित्र तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अवश्य वाचावे. त्यातून प्रेरणा घेत नवनिर्मिती करत देशाच्या समृद्धीला आपलाही हातभार लावावा, असे यानिमित्ताने मी सुचवू इच्छितो.
-
Udyog Yashogatha (उद्योग यशोगाथा)
एखादी कल्पना उद्योगात रूपांतरित करायला एक वेगळी जिद्द, अर्थशास्त्राची थोडी जाणीव वगैरे अनेक गोष्टी लागतात. त्या अनुभवाने शिकता येतात, पण त्याला अनेक वेळा कालमर्यादा मोठी लागते. यातून या नव्या उद्योजकाची दमछाक होते. अनेकदा कल्पना चांगली असूनही तो अयशस्वी ठरतो. यामुळे सरदेशमुखांनी अगदी लहानांपासून मध्यमवर्गीयांमधील काही व्यक्ती आंतरराष्ट्रीय दर्जावर कशा पोहोचू शकल्या, अशी अनेक वेगवेगळी उदाहरणे संवादात्मक शैलीत समजावून सांगितलेली आहेत. यामुळे नवीन उद्योजकांना प्रेरणा मिळायला निश्चित मदत होईल. आपण आपापल्या परीने जमेल तशी हळूहळू व्यवसायवृद्धी करत राहावी, असाही संदेश या पुस्तकातून मिळतो. भविष्यकाळामध्ये हे आवश्यक आहे, असाही संदेश यातून मिळतो