-
Artificial Intelligence (आर्टिफिशियल इंटेलिजन्स)
कृत्रिम बुद्धिमत्ता हा मानवी बुद्धिमत्तेने निर्माण केलेला चमत्कार आहे ! या तंत्रज्ञानामुळे अनेक अद्भुत गोष्टी साध्य होऊ शकतात !! या तंत्रज्ञानाच्या विकासाचा वेग विलक्षण आहे. येत्या काळात ते आपल्याही कळत-नकळत आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनणार आहे. जगामध्ये एआय वापरणाऱ्यांची टक्केवारी पाहता एआयचा सर्वात जास्त उपयोग भारतीयच करत असल्याचं दिसून येत आहे. त्याचबरोबर, सर्वांनाच आर्टिफिशियल इंटेलिजन्सविषयी कुतूहल आहे. त्यासाठीच हे पुस्तक लिहिलं गेलं आहे. • 'एआय'बद्दल असणाऱ्या शंका आणि त्यांचं निरसन • अल्गोरिदम म्हणजे काय आणि तो कसा काम करतो • संगणकाला प्रशिक्षण कसं दिलं जातं • कृत्रिम बुद्धिमत्तेची कार्यपद्धती • जनरेटिव्ह 'एआय'ची वैशिष्ट्ये • 'एआय' टूल्स आणि त्यांचे उपयोग • यंत्रमानवाचा सहभाग • कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे समोर उभी राहिलेली आव्हाने • डीपफेक (फसवा) व्हिडिओ ओळखण्याच्या पद्धती • नोकरी-व्यवसायावर 'एआय'चे परिणाम • 'एआय'चे फायदे-तोटे • भारतात 'एआय'चा विस्तार
-
Collector Sahiba - 2 (कलेक्टर साहिबा - २)
प्रचंड खपाच्या 'कलेक्टर साहिबा' या हिंदी कादंबरीचा, मराठी अनुवाद कलेक्टर साहिबा ही कादंबरी काल्पनिक असली तरी, देशपातळीवर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं, याचं वास्तव चित्रण करते. आयएएस होण्याचा प्रवास दीर्घकाळ चालू राहणारा असतो. कसोटी पाहणारा हा प्रवास केवळ उत्कृष्ट शिक्षण किंवा सरकारी नोकरी मिळवणं यापुरताच मर्यादित राहत नाही. तर आयएएसची परीक्षा देणाऱ्या मुलामुलींनी त्यासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावलेलं असतं. मोठी स्वप्नं पाहणाऱ्या आणि समाज व मित्रपरिवाराचे टोमणे ऐकून घेऊनसुद्धा आपल्या ध्येयाप्रति एकनिष्ठ राहणाऱ्या प्रत्येक नवयुवकाला ही कथा आपलीशी वाटेल. लेखक कैलाश मांजू बिश्नोई यांची ॲमेझॉन बेस्टसेलर ठरलेली मूळ हिंदीतली ही कादंबरी ध्येय, कर्तव्य आणि भावना यात ताळमेळ साधणाऱ्या एंजल आणि गिरीशची प्रेमकथा आहे. प्रशासकीय भ्रष्टाचार, लालफीतीचा कारभार अशा सध्याच्या सामाजिक परिस्थितीवरही ही कादंबरी भाष्य करते. अष्टपैलू प्रतिभा असणारे लेखक कैलाश मांजू बिश्नोई यांना लहानपणापासूनच शिक्षण आणि खेळाची अत्यंत आवड होती. सरळ, सहज आणि बोलीभाषेतल्या लेखनशैलीमुळे देशातल्या अग्रगण्य वृत्तपत्र 'दैनिक जागरण'मध्ये त्यांचे 'ऊर्जा' आणि 'आजकल' हे स्तंभ छापून येऊ लागले. या स्तंभांमधील त्यांचे आजच्या काळाला साजेसे आणि प्रेरणादायी लेखन वाचकांमध्ये लोकप्रिय झाले. आजपर्यंत दैनिक जागरण, दैनिक भास्कर, स्वदेश दैनिक नवज्योति, जनसत्ता, बिजनेस स्टैंडर्ड, नवभारत टाइम्स, राष्ट्रीय सहारा यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील वर्तमानपत्रांतून त्यांचे ५०० पेक्षाही जास्त संपादकीय लेख प्रसिद्ध झाले आहेत. कादंबरीचा पुढील भाग पहिल्या भागात गिरीश आणि एंजल यांचं उत्तुंग प्रेम दिसतं, तर हा दुसरा भाग एंजल आयएएस झाल्यानंतर करियर आणि प्रेम यांच्यामध्ये तिची कशी दोलायमान अवस्था होते, ते सांगतो. तिच्यावर मनापासून प्रेम करणारा गिरीश आत्मसन्मान आणि प्रेमभावना यांच्या द्वंद्वात अडकतो. एंजल आपल्या स्वप्नांसाठी आपल्या प्रेमाला, गिरीशला सोडून देईल की मग त्यांचं प्रेम काळाच्या या कसोटीचा सामना करेल? हे जाणून घ्यायचं असेल, तर कलेक्टर साहिबा या कादंबरीचा हा दुसरा भाग वाचायलाच हवा. कलेक्टर साहिबा २ मध्ये एंजल आणि गिरीश यांच्या विभिन्न दृष्टिकोनांमधून उभा राहणारा नात्यांमधला पेच आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षांमुळे उभा राहणारा संघर्ष आपल्याला वाचायला मिळतो. ही कादंबरी प्रेम, करियर आणि आत्मसन्मान यांच्यातील नाट्य अत्यंत सुंदरतेने विणते. त्याचबरोबर वाचकांना हा विचार करायला भाग पाडते की, प्रेम आणि करियर यांना एकाचवेळी न्याय देणं शक्य आहे का की, मग यापैकी एका गोष्टीचा त्याग करणं गरजेचं असतं.
-
Collector Sahiba - 1 (कलेक्टर साहिबा - 1)
प्रचंड खपाच्या 'कलेक्टर साहिबा' या हिंदी कादंबरीचा, मराठी अनुवाद कलेक्टर साहिबा ही कादंबरी काल्पनिक असली तरी, देशपातळीवर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं, याचं वास्तव चित्रण करते. आयएएस होण्याचा प्रवास दीर्घकाळ चालू राहणारा असतो. कसोटी पाहणारा हा प्रवास केवळ उत्कृष्ट शिक्षण किंवा सरकारी नोकरी मिळवणं यापुरताच मर्यादित राहत नाही. तर आयएएसची परीक्षा देणाऱ्या मुलामुलींनी त्यासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावलेलं असतं. मोठी स्वप्नं पाहणाऱ्या आणि समाज व मित्रपरिवाराचे टोमणे ऐकून घेऊनसुद्धा आपल्या ध्येयाप्रति एकनिष्ठ राहणाऱ्या प्रत्येक नवयुवकाला ही कथा आपलीशी वाटेल. लेखक कैलाश मांजू बिश्नोई यांची ॲमेझॉन बेस्टसेलर ठरलेली मूळ हिंदीतली ही कादंबरी ध्येय, कर्तव्य आणि भावना यात ताळमेळ साधणाऱ्या एंजल आणि गिरीशची प्रेमकथा आहे. प्रशासकीय भ्रष्टाचार, लालफीतीचा कारभार अशा सध्याच्या सामाजिक परिस्थितीवरही ही कादंबरी भाष्य करते. अष्टपैलू प्रतिभा असणारे लेखक कैलाश मांजू बिश्नोई यांना लहानपणापासूनच शिक्षण आणि खेळाची अत्यंत आवड होती. सरळ, सहज आणि बोलीभाषेतल्या लेखनशैलीमुळे देशातल्या अग्रगण्य वृत्तपत्र 'दैनिक जागरण'मध्ये त्यांचे 'ऊर्जा' आणि 'आजकल' हे स्तंभ छापून येऊ लागले. या स्तंभांमधील त्यांचे आजच्या काळाला साजेसे आणि प्रेरणादायी लेखन वाचकांमध्ये लोकप्रिय झाले. आजपर्यंत दैनिक जागरण, दैनिक भास्कर, स्वदेश दैनिक नवज्योति, जनसत्ता, बिजनेस स्टैंडर्ड, नवभारत टाइम्स, राष्ट्रीय सहारा यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील वर्तमानपत्रांतून त्यांचे ५०० पेक्षाही जास्त संपादकीय लेख प्रसिद्ध झाले आहेत. कादंबरीचा पुढील भाग पहिल्या भागात गिरीश आणि एंजल यांचं उत्तुंग प्रेम दिसतं, तर हा दुसरा भाग एंजल आयएएस झाल्यानंतर करियर आणि प्रेम यांच्यामध्ये तिची कशी दोलायमान अवस्था होते, ते सांगतो. तिच्यावर मनापासून प्रेम करणारा गिरीश आत्मसन्मान आणि प्रेमभावना यांच्या द्वंद्वात अडकतो. एंजल आपल्या स्वप्नांसाठी आपल्या प्रेमाला, गिरीशला सोडून देईल की मग त्यांचं प्रेम काळाच्या या कसोटीचा सामना करेल? हे जाणून घ्यायचं असेल, तर कलेक्टर साहिबा या कादंबरीचा हा दुसरा भाग वाचायलाच हवा. कलेक्टर साहिबा २ मध्ये एंजल आणि गिरीश यांच्या विभिन्न दृष्टिकोनांमधून उभा राहणारा नात्यांमधला पेच आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षांमुळे उभा राहणारा संघर्ष आपल्याला वाचायला मिळतो. ही कादंबरी प्रेम, करियर आणि आत्मसन्मान यांच्यातील नाट्य अत्यंत सुंदरतेने विणते. त्याचबरोबर वाचकांना हा विचार करायला भाग पाडते की, प्रेम आणि करियर यांना एकाचवेळी न्याय देणं शक्य आहे का की, मग यापैकी एका गोष्टीचा त्याग करणं गरजेचं असतं.
-
Mala Udhvasta Vhayachay (मला उद्ध्वस्त व्हायचंय )
स्वतःच्या आयुष्याला सामोरं जाणं यापेक्षा चारचौघांसमक्ष त्याचं निखळ नग्न रूप पाहणं जास्त कठीण आणि दाहक असतं. आत्मचरित्र आजवर कित्येकांनी लिहिलंय... प्रसिद्ध पावलेल्या यशस्वी, कर्तबगार पुरुषांची चरित्रं... पण आत्मचरित्र लिहिलं, म्हणजे खरंच माणूस मांडून होतो का? आयुष्याला सर्वस्वी मांडणं हे ते भोगण्याहून कठीण वाटावं... न् तरीही कुठलीही महत्त्वाची व्यक्ती नसलेली मी केवळ स्त्री म्हणून माझ्या आयुष्याच्या सगळ्या खिडक्या दारं उघडायचं ठरवलं, हे एक मूर्ख धाडस म्हणा किंवा काही म्हणा... शेवटी लिहिणं-सांगणं... या गोष्टी काही वेळा इतक्या अपरिहार्य अटळपणे घडत जात असतात की, समोर प्रेक्षक- वाचकवर्ग असला काय, नसला काय, त्या आपल्या बोलत असतात. मला एक स्त्री म्हणून या पुरुषप्रधान संस्कृतीकडे न्याय मागायचाय. माझ्यापुढे माझी भूमिका स्पष्ट आहे. माझ्या व्यक्तिगत आयुष्याची चामडी सोलून काढली पूर्णतः न् काही जण त्याला वातड म्हणाले, तरीही हरकत नाही. एक वेगळं अनुभवविश्व जगलेलं माझं आयुष्य या घडीला समोर येणं आवश्यक वाटतं मला - माझ्या दृष्टीनं, इथल्या साऱ्या कुंठित झालेल्या साऱ्या स्त्रियांच्या दृष्टीनं... बाई जोपर्यंत लज्जा, संकोच न् त्यागाची सहनशील वस्त्रं उतरवत नाही, तोवर तिचं भोगणं, तिचं दुःख हे दुर्लक्षित किंवा गृहीत धरलं जातं...न् स्त्रीचं दुःख गृहीत धरलं जाणं हे ज्या समाजाला मान्य असतं, तो समाज तिला कौतुक, सहानुभूती किंवा वाटोळं या तीन गोष्टींशिवाय दुसरं काहीही देऊ शकत नाही. समाजाला ते बळी जाणं अंगवळणी पडतं; सवयीचं होतं.
-
Cancer Grastha, Tarihi Swastha (कॅन्सरग्रस्त, तरीही स्वस्थ)
“गेलेले आयुष्य सुंदरच होते, पण त्या आठवणीत बुडायचे नाही. जुने राग लोभ त्यांच्या जागी, त्यांचा आता काही संबंध नाही. काही, काही ठरवायचे नाही. उद्याचा तर विचारही नाही. आजचा दिवस नक्की आपला, तो सुंदर करणे आपल्याच हातात!!!” गेली अडीच-तीन वर्षे मी हे प्रयत्नपूर्वक पाळते आहे. म्हणूनच माझा आजार थोडातरी आटोक्यात ठेवू शकले असावे. हा आठ पायांचा विंचू कधीही, कुठेही आपल्याला घट्ट करकचवून टाकू शकेल ह्या भानासह ह्या काळातल्या जाणीवा, अनुभव शब्दात पकडण्याचा हा प्रयत्न! माया धर्माधिकारी ◆ कॅन्सरग्रस्त असूनही शक्यतो स्वस्थ राहू बघणारी ही लेखिका माझी सख्खी धाकटी बहीण आहे. उपचारादरम्यान व नंतर मनात होणारी भावनिक आंदोलनं, भेटलेली माणसं, जाणवलेल्या वृत्ती प्रवृत्ती, झालेले साक्षात्कार ह्यांचं तिच्याकडून झालेलं वर्णन थेट वाचणंच योग्य ठरेल... त्यातून अनेक व्यक्तीगत, सामाजिक विचारांना चालना मिळू शकेल.