-
Apurvarang 4 (अपुर्वरंग 4)
‘अपूर्वरंग’ या मालिकेतील या शेवटच्या पुष्पात मीनाताई आपल्याला जपान दाखवतात.
-
Apurvarang 3 (अपुर्वरंग 3)
अपूर्वरंग ३ या पुस्तकात केलेली प्रवासवर्णने. १. सिंगापूर, २. इंडोनेशिया, ३. फिलिपीन्स, ४. ताइवान, ५. कोरिया
-
Apurvarang 2 (अपुर्वरंग 2)
अपूर्वरंग २ या पुस्तकात केलेली प्रवासवर्णने. १. अंदमान, २. म्यानमार, ३. व्हिएटनाम, ४. कंबोडिया, ५. थायलंड, ६. मलेशिया
-
Four Seasons (फोर सीझन्स)
कामायनी ही व्यक्तिरेखाच आपल्या आयुष्याचा पट आपल्यासमोर उलगडत आहे. निर्णय एकटीनं घेऊन तो परिणामांसकट जबाबदारीनं निभावण्याची हिंमत तिच्यात यावी ही तिच्या बाबाची अपेक्षा तिनं कधीच पूर्ण केली नाही. तिच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर आलेल्या पुरुषांनी त्यांच्या विचारांच्या प्रभावाखाली तिचे निर्णय झाकोळून टाकले. आणि मग त्यांचे टेकू घेतले म्हणूनच तिचं आयुष्य आQस्थर राहिलं. आपलं आयुष्य आपल्या स्वतःच्या विचारांच्या पायावरच भक्कम आणि ठाम स्थिरावू शकतं, हे शिकायला तिला माळरानावरच्या या कणखर कातळावर यावं लागलं. इथल्या चार ऋतूंमध्ये ती जे शिकली ते आजवर मिळालेल्या धड्यांपेक्षा कितीतरी अधिक, जास्त सकारात्मक आहे. सगळं संपल्यानंतरही नव्याने जीवन सुरू करण्याची उमेद, जीवनचक्रातली लय, ठामपणा, चिवटपणा.. आयुष्याने जे दान दिलं ते स्वीकारून, अन्यायाने कुढत न बसता नव्या वाटा शोधत पुढे जाण्याची जीवनेच्छा, विस्थापनानंतरचं स्थलांतर, नवजीवन.. या कातळावर, इथल्या ओसाडीत तिच्यात बरंच काही नव्यानं रुजलं. निसर्गाचं- ऋतूंचं एक जीवनचक्र माळरानानं आश्वासकतेनं पूर्ण करून दिलं, अशीच भावना घेऊन ती या माळरानावरून पुढच्या प्रवासाकरता निघते.
-
Chanaksha (चाणाक्ष)
अनासक्ती, अफाट व्यासंग, चाणाक्ष बुद्धिमत्ता, धोरणी राजकारण, इतक्या सर्व सद्गुणांचा समुच्चय एका चाणक्य नावाच्या व्यक्तीत झाला आहे. धूर्त व यशस्वी राजकारणी असून देखील चाणक्याला राजपदाचा मोह नव्हता. राजसत्तेच्या वैभवाला निर्मोही वैराग्याची जोड असणे, हा आदर्श आर्य संस्कृतीचा विचार चाणक्यामुळे दृढ झाला. वर्तमान जगताला आजदेखील या परंपरेची नितांत आवश्यकता भासते आहे, हे अमान्य करून चालणार नाही. सामान्यत: फारसा परिचित नसलेला हा एका महानायकाचा इतिहास कथास्वरूपात या कादंबरीत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
-
The Greater Goal (द ग्रेटर गोल)
कंपनीचा अध्यक्ष म्हणून नव्यानेच सूत्रे हाती घेतलेल्या अॅलेक्स बेकले नावाच्या एका तरुणाची ही कथा आहे. कंपनीचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी पेलताना अॅलेक्सला आपल्या व्यावसायिक व कौटुंबिक जीवनातील अयशस्विता प्रकर्षाने जाणवत असते. अशातच त्याला जीवघेणा अपघात होतो. अपघातातून वाचलेल्या अॅलेक्सला कंपन्यांसाठी सल्लागार व विशेष तज्ज्ञ सल्लागार म्हणून काम करणारा क्विन मॅक्डगॉल मार्गदर्शक म्हणून भेटतो. तो अॅलनला पाच महत्त्वाच्या आचरण पद्धती सांगतो. त्या आचरण पद्धतींचा सखोल अभ्यास आणि अवलंब करून अॅलनचं व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवन कसं बहरतं, याची मनोवेधक आणि मार्गदर्शक कहाणी आहे ‘द ग्रेटर गोल.’
-
Anitala Jamin Milto (अनिताला जामीन मिळतो)
कायदेमंडळे आणि सरकार म्हणजे लोकशाहीचे दोन आधारस्तंभ. पण या व्यवस्थांमधला गलथान कारभार अनेकदा नागरिकांच्या मूलभूत हक्कांचीच पायमल्ली करतो. याचा अनुभव खुद्द माजी मंत्री असलेल्या अरुण शौरी यांनी घेतला. त्यांनी अनुभवलेल्या या मनस्तापजनक घटनेची कारणमीमांसा करत शौरी यांनी भारतीय न्यायव्यवस्थेच्या कारभारावरच या पुस्तकात प्रकाश टाकला आहे.
-
Shivputra Rajaram (शिवपुत्र राजाराम)
मराठ्यांच्या राष्ट्रजीवनातील अत्यंत कठीण अशा काळात अकरा वर्षं नेतृत्व करणाऱ्या छत्रपती राजारामांची चरितकहाणी आहे ‘शिवपुत्र राजाराम.’ मराठी सरदार आणि मुत्सद्दी यांना एकत्र आणून बलाढ्य अशा मोगल साम्राज्याला टक्कर देण्यासाठी प्रेरित करणाऱ्या, त्यांच्या शौर्याला, आक्रमक वृत्तीला पूर्ण स्वातंत्र्य देणाऱ्या, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत मराठी वीरांनी उभारलेल्या प्रखर स्वातंत्र्यलढ्याचं नेतृत्व करणाऱ्या राजाराम महाराजांची तेजस्वी जीवनगाथा.
-
Adnyat. (अज्ञात )
बऱ्या-वाईट अनुभवांचं आणि व्यक्तींचं व्यामिश्र चित्रण करणाऱ्या कथांचा संग्रह आहे ‘अज्ञात.’ माणसाची नियतीशरणता अधोरेखित करते ‘अज्ञात’ ही कथा... तर एका वृद्धाच्या मनातील भावकल्लोळ व्यक्त होतो ‘पत्र आलंय’ या कथेतून... शेतमजुराची व्यथा सांगते ‘मोकळं आकाश’ही कथा... तर एका कुष्ठरोग्याचं आक्रंदन टिपते ‘वास्तव’ ही कथा...एका वृद्ध आईच्या चिंतनरूपी भावना प्रकटतात ‘सावलीचा दाह’मधून. सूक्ष्म भावनांचं अस्वस्थ करणारं कथाविश्व.
-
Kaya (काया)
आयुष्याच्या उमेदीच्या काळातच मृत्युशी झुंजणारी वरेण्या...स्त्री-पुरुष संबंधांकडे धारदार नजरेने पाहणारी खैरून बीबी...आत्महत्तेच्या दोलायमान मनस्थितीत गुंतलेला विनोद... मानवी देह आणि त्यातील मनोवस्थांच्या सखोल चिंतनातून ‘काया’ कथासंग्रहातील प्रत्येक कथा आकार घेते. बलात्कारासारख्या विषयांना डॉ. प्रतिभा राय सत्र-मनाच्या उद्रेकी विचारांनी वाचा फोडतात. तर किशोरवयीन मुलांच्या मनातील घालमेल, व्यवसायानिमित्त दूरदेशी राहणाऱ्या माणसाला आपल्या जन्मभूमीविषयी वाटणारी ओढ अशा मनाला स्पर्शून जाणाऱ्या विविध भाव-भावनांचा वेधही त्या घेतात.
-
Raktagulab (रक्तगुलाब)
फुलाफळांनी बहरलेलं रम्य काश्मीर. पण तेथे धार्मिक, आर्थिक, शासकीय, राजकीय गुंतागुंतीचं जाळं. या पार्श्वभूमीवर चित्रित झालेली ही काश्मिरी पंडितांच्या कुटुंबाची कहाणी – ही पितापुत्रांची, जिवलग मित्रांची, उत्कट प्रीतीचीही कहाणी – संपादक अभय प्रताप जिवाच्या भीतीने अनंतनागमधून कुटुंबासह बाहेर पडतात. जम्मूत बेघर पंडितांसाठी उभारलेल्या तंबूंच्या छावणीत हे कुटुंब दाखल होतं… पुढे काय घडतं?
-
Hillary Clington (हिलरी क्लिंटन)
`हिलरी क्लिंटन` ही आहे हिलरीची संघर्षगाथा, तिच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनाची. माजी राष्ट्रपती बिल क्लिंटनची पत्नी... सिनेटर पद आणि परराष्ट्र मंत्री पदासह विविध पदे भूषवलेली... विविध पुरस्कार लाभलेली... दोनदा राष्ट्रपती पदाची उमेदवार ठरलेली... मुलगी, पत्नी, आई आणि प्रसारमाध्यमांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून स्वत:ला सिद्ध करू पाहणारी एक स्त्री ही प्रत्येक भूमिका मनापासून जगणाNया हिलरीचा प्रेरणादायक जीवनप्रवास.
-
Smart Trust (स्मार्ट ट्रस्ट)
स्टीफन एम. आर. कोव्ही आणि त्यांचे जुने व्यावसायिक भागीदार ग्रेग लिंक ‘स्मार्ट ट्रस्ट’ या पुस्तकाद्वारे विश्वासाचा एक नवीन पैलू आपल्यासमोर ठेवतात, तो म्हणजे डोळस विश्वास. अशा अनेक लोकांचे, संस्थांचे दाखले ते देतात, ज्यांना या उच्च विश्वासपूर्ण नातेसंबंधातून केवळ समृद्धीच प्राप्त झाली नाही, तर त्यांना त्यातून अत्युच्च आनंद आणि ऊर्जेचाही लाभ झाला. विश्वासामुळे नेत्यांच्या, संस्थांच्या अगदी राष्ट्रांची कार्यक्षमता कशी अनेक पटींनी वाढते, याचं प्रत्यंतर हे पुस्तक वाचताना येतं.
-
Swargakanya (स्वर्गकन्या )
सनसनाटी चिनी इतिहासातील एकमेव स्त्री सम्राटाची, उ छाव्ची नाट्यमय सत्यकथा. वयाच्या १३व्या वर्षी उ छाव् सम्राटाचं अंगवस्त्र बनली. आपल्या सौंदर्य आणि हुशारीचा कौशल्यपूर्ण वापर तिने केला. कारस्थाने रचली. सम्राटाला अंकित करून प्राचीन चीनमधल्या सर्वांत मोठ्या साम्राज्याच्या सिंहासनावर कबजा मिळवला. आपल्या शत्रूंचा तिने निर्दयपणे खातमा केला. तिचा शृंगारातील तरबेजपणा, तिचे रक्तरंजित बंड ते तिने स्वतःला देव म्हणून घोषित करण्यापर्यंतचा सनसनाटी प्रवास.
-
Vyavasthapan Kala (व्यवस्थापन कला)
व्यवस्थापन हे एक कौशल्य आहे. ‘व्यवस्थापन कला’ या पुस्तकात व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केलं आहे. चांगल्या प्रकारे व्यवस्थापन कसं करावं, व्यवस्थापनाची तंत्रे कोणती, हेतू स्पष्ट करणं कसं महत्त्वाचं आहे, विचारवंत व भावनाप्रधान व्यवस्थापकांमधील फरक इ. व्यवस्थापनाशी संबंधित मुद्द्यांची सोदाहरण चर्चा या पुस्तकात केली आहे आणि ही उदाहरणं प्रत्यक्ष जीवनातील आहेत. कुशल व्यवस्थापनासाठी उपयुक्त असं हे पुस्तक आहे.
-
Ithe Kuni Nahi (इथे कुणी नाही )
सुलेमान-सकीनाची मुलगी भवानीचं यासीनशी लग्न ठरलंय...लग्नानंतर नाव बदलण्याला तिचा विरोध...ती दत्तक असल्याचं तिला समजतं आणि ती खNया आई-वडिलांचा शोध घेते... तिची आई असते आता एक संपन्न, प्रतिष्ठित स्त्री...तर वडील यशस्वी, प्रसिद्ध अॅडव्होकेट...जन्मदात्यांना भेटून भवानी आपल्या दत्तक माता-पित्याकडे परतते...नियतीच्या अगम्यतेची जाणीव झालेल्या भवानीचा नाव न बदलण्याचा हट्ट संपलाय...पण तोपर्यंत यासीनचं लग्न झालंय...अर्थपूर्ण कादंबरी