-
Janmashtami ( जन्माष्टमी )
जन्माष्टमी – आठव्या मुलाच्या अभ्दुत लीला या पुस्तकाद्वारे कृष्णाशी असणारा आपल्या सर्वांचा प्रेमळ बंध अधिक दृढ होण्यासाठी , आपल्या मनात उदात्त भावना निर्माण होण्याच्या दृष्टीने केलेला हा प्रयत्न आहे. या पुस्तकामध्ये अशा सूक्ष्म तात्विक दृष्टिकोना द्वारे कृष्णाच्या बालपणीच्या लीलांचादेखील वर्णन आकर्षकरीत्या करण्यात आले आहे.
-
Nishkriyatela Bahane Hajaar! ( निष्क्रियतेला बहाणे
आयुष्यात आपल्या ध्येयप्राप्तीच्या दिशेने प्रवास करत असताना त्यामध्ये उद्भवणार्या निष्क्रियतेच्या अडचणींमध्ये न अडकता प्रयत्न सुरू ठेवण्याचं महत्त्व विशद करणारं हे पुस्तक आहे. अनेक उदाहरणांसहित खुमासदार शैलीत लिहिलेलं हे पुस्तक विचारप्रवृत्त करणारं आहे. निष्क्रियतेच्या साखळीतून बाहेर पडून आपणास क्रियाशील राहण्यासाठी उद्युक्त करणारे असे मौलिक विचार पुस्तकात उद्धृत झाले आहेत. उत्कट, मानवी चैतन्याचे प्रशंसक, आपल्या क्षमतांवर विश्वास असणारे आणि त्यादृष्टीने पूर्ण वेळ शिष्यत्व पत्करणारे… या सर्वांसाठी हे पुस्तक आहे. कृती आणि प्रेरणा यांवर ठाम विश्वास असणार्या सर्वांसाठी हे पुस्तक आहे.
-
Nava Vijaypath ( नवा विजयपथ )
UPSC आणि MPSC नागरी सेवा परीक्षांबरोबर भारतातील अन्य महत्त्वाच्या स्पर्धापरीक्षांविषयीची अद्ययावत माहिती हे पुस्तक देते. करिअर कसे निवडावे, पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व निबंध यांसाठी लेखन कसे करावे, प्रचलित घडामोडींचा अभ्यास कसा करावा यांसारख्या मूलभूत मुद्द्यांचा सर्वंकष ऊहापोह हे पुस्तक करते. स्पर्धापरीक्षांना नुकतीच सुरुवात करू इच्छिणार्यांना प्रशासनातील आपल्या अनुभवांद्वारे लेखकाने मार्गदर्शन केले आहे. UPSC आणि MPSCच्या विद्यार्थ्यांना सर्वार्थाने मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या विजयाप्रत घेऊन जाणारे अत्यंत वाचनीय असे पुस्तक.
-
Bhagirathache Varas ( भगीरथाचे वारस )
' पाणी पंचायती' चे प्रवर्तक विलासराव साळुंखे यांचं चरित्र.
-
Dhoka ( धोका )
‘ढोका’ मधे मध्य टप्प्यावर आयएसआयएस बरोबर आंतरराष्ट्रीय सीमापार दहशतवाद पार्श्वभूमी आहे. इसिसच्या दहशतवादी कारवायांवर आधारित ही कदाचित पहिली भारतीय थ्रीलर कादंबरी आहे. तसेच, कथानक आणि पंजाबमध्ये अशांतता निर्माण करण्याचा पाकिस्तानच्या बलुचिस्तान आणि पश्तूनिस्तानला ‘मुक्त’ करण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांभोवती फिरणारा भूखंड फिरला आहे. संजय सोनवणी यांच्या या कादंबरीतून इसिसचे भयानक जग उलगडले आहे.
-
Pharaocha Sandesh ( फराओचा संदेश )
ही गोष्ट आहे बरोबर ४,३०० वर्षांपूर्वी घडलेली. भारताला त्या काळात मेलुहा म्हणत. नागरी संस्कृतीने कळस गाठायला सुरुवात केली होती. मेलुहाचे साहसी व्यापारी पार सुदूर असिरिया ते इजिप्तपर्यंतचा कठीण प्रवास करीत आर्थिक समृद्धी साधत. वेगवेगळ्या राजदरबारांतही प्रतिष्ठा मिळवत. सत्ता, धर्म आणि संपत्ती याभोवती जगातील संस्कृतींचे परस्परसंबंध बनत अथवा बिघडत. या काळातही अशी माणसे जन्मतच होती जी काळावर मात करून मानवी संस्कृतीच्या इतिहासाला नवे वळण देत असत. ‘फराओचा संदेश!’ ही कथा याच विलक्षण काळात घडते.
-
Petlele Morpees ( पेटलेलं मोरपीस )
समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांतल्या त्या दोघी लहानपणापासून एकत्र वाढल्या आणि आयुष्याच्या एका वळणावर त्यांना एकमेकींबद्दल आकर्षण वाटू लागलं आणि त्यांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला,मात्र त्यांच्या लेस्बियन असण्याचा फायदा त्यांच्याच घरच्यांनी राजकारणात आपली पोळी भाजून घेण्यासाठी कसा करून घेतला, हे सांगणारी नितीन थोरात यांची उत्कंठावर्धक कादंबरी 'पेटलेलं मोरपीस'...
-
Soang ( सोंग )
संज्यानं दोन वेळा साडी नेसली होती ती फक्त परिस्थिती तशी होती म्हणून. एकदा सोंगात आणि एकदा नाटकात. पण आता त्यानं कायमस्वरूपी साडी नेसायचं ठरवलं होतं. त्याला हे जमेल? नितीन थोरात यांची आगळीवेगळी कादंबरी.. सोंग...
-
Shukkatha (शुककथा)
'शुककथा' हा मूळ संस्कृत भाषेत लिहिल्या गेलेल्या 'शुकसप्तती' या ग्रंथातल्या सत्तर कथांचा अनमोल ठेवा. वाक् चतुर आणि पतीविरहात मनोमन झुरत असल्याने कदाचित कुमार्गाला जाऊ शकणारी एक विरहोत्कंठिता यांच्यातल्या संवादावर आधारित या कथा असून, यातल्या प्रणयोत्सुक, धाडसी, धूर्त आणि परिस्थितीशी दोन हात करून स्वप्राणरक्षण करण्यात तरबेज स्त्रिया या कथांची रंगात आणखी वाढवतात. बुद्धिमान शुकानं आपल्या रसाळ, ओघवत्या शैलीत स्वामिनीला ऐकवलेल्या बोधपूर्ण कथा आणि त्यायोगे स्वामिनीचं चारित्र्यहनन टाळण्याचा केलेला यशस्वी प्रयत्न, हे ' शुककथा ' चं सार. साहस, शृंगार, विनोद, बुद्धीचातुर्य, धाडस अशा विविध काव्यरसांनी सजलेल्या या कथा खिळवून ठेवणाऱ्या आहेत.
-
Kathavali 2 (कथावली 2)
मानवी संबंध हा कथा-कादंबर्यांचा अनादी कालापासूनचा विषय. कथा लिहिणार्याचं भावविश्व, त्याचा प्रदेश, व्यवसाय, आयुष्यातले अनुभव या अनुषंगानं कथेचा आशय बदलत जातो. त्यानुसार मानवी संबंधांचे कंगोरे उलगडत जातात. त्यातूनच सशक्त कथा साकारतात. भारतभर असे समर्थ मराठी लेखक आहेत. अशाच लेखकांच्या कथांचा एकत्रित संच म्हणजे ‘कथावली’!
-
Pimpalpan 8 (पिंपळपान -भाग 8)
आशयसमृद्घ, भावस्पर्शी कथांच्या रूपानं आजवर अनेक सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीचा स्पर्श ‘मेनका’चं रंगरूप खुलवत राहिला आहे. मनाचा ठाव घेणार्या विलक्षण प्रवाही कथा हे ‘मेनका’चं बलस्थान. मराठी भावविश्वाला गेल्या साडेपाच दशकांहून अधिक काळ गुंतवून ठेवणार्या दिग्गज लेखकांच्या विविधरंगी कथा एकत्रित स्वरूपात आणणारं हे पिंपळपान...
-
Pimpalpan 7 ( पिंपळपान -भाग ७ )
Anuradha Gurav Asha Parchure Shripad Kale Dnyaneshwar Nadkarni Yashwant Karnik G.Va.Behere D.S.Kakdeआशयसमृद्घ, भावस्पर्शी कथांच्या रूपानं आजवर अनेक सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीचा स्पर्श ‘मेनका’चं रंगरूप खुलवत राहिला आहे. मनाचा ठाव घेणार्या विलक्षण प्रवाही कथा हे ‘मेनका’चं बलस्थान. मराठी भावविश्वाला गेल्या साडेपाच दशकांहून अधिक काळ गुंतवून ठेवणार्या दिग्गज लेखकांच्या विविधरंगी कथा एकत्रित स्वरूपात आणणारं हे पिंपळपान...
-
Bedakhal ( बेदखल )
मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. भरत वटवानी आणि त्यांच्या पत्नी डॉ. स्मिता वटवानी यांनी आतापर्यंत भारतामध्ये रस्त्यांवर दिशाहीन भटकणार्या जवळपास सात हजार मनोरुग्णांवर उपचार करून त्यांची कुटुंबीयांशी पुनर्भेट घडवून आणली आहे. एका अंदाजानुसार, अजूनही जवळपास चार लाख मनोरुग्ण असेच रस्त्यांवर भटकत आहेत. या मनोरुग्णांच्या कथा हृदय पिळवटून टाकणार्या असल्या, तरीही लेखकाने वस्तुनिष्ठ पद्धतीने अनुभवांची मांडणी केली आहे. हे कार्य करण्यास प्रेरणा कशाने मिळाली आणि या प्रश्नासंदर्भात समाज आणि सरकारने काय केले पाहिजे, यावर लेखकाने पुस्तकात नेमकेपणाने भाष्य केले आहे.
-
Jagana Premacha An Maranahi ! (जगणं प्रेमाचं अन मर
प्रकृतीची काही तक्रार नाही. ना कसली प्रापंचिक वा मानसिक चिंता. आर्थिक अन् सामाजिक दृष्ट्याही उत्तम स्थैर्य. अशा आपल्या समृद्ध, सार्थक जीवनावर स्वेच्छेने मरणशिळा ठेवून मृत्यूचा स्वीकार करणाऱ्या – ‘मरण म्हणजे जीवनाचा नैसर्गिक शेवट आहे’ याची जाणीव ठेवून त्याच्याकडे धीटपणे वाटचाल करणाऱ्या – मुलखावेगळया स्त्री-पुरुषांची सत्यकहाणी. विलक्षण बाब म्हणजे हे सारे एकाच ‘कुलकर्णी’ कुटुंबाचे सदस्य होते !
-
Mantra Guntavanukicha (मंत्र गुंतवणुकीचा)
अर्थनियोजनापासून आर्थिक उद्दिष्टांपर्यंत वाटचाल करण्याचे बहुविध मार्ग असतात. पैशाची गुंतवणूक आणि त्यासाठीचे विविध पर्याय म्हणजे अशा मार्गांवरची वाटचाल. कोणता पर्याय निवडावा? पीपीएफ? शेअर्स? म्युच्युअल फंड? सोने? स्थावर मालमत्ता? पेन्शन स्कीम? कोणताही पर्याय निवडायचा; तर संशोधन, अभ्यास आणि अनुभव म्हणजे यशस्वी गुतंवणुकीचा पाया. वस्तूचे योग्य मूल्यांकन करण्याची क्षमता, इतरांना न दिसलेली गोष्ट हेरणे आणि यथायोग्य विश्लेषण हे यशस्वी गुंतवणू्कदारासाठी आवश्यक गुण. या गुणांच्या आधारे यशस्वी गुंतवणुकीची पायाभरणी कशी करावी, हे सर्वांना उलगडून दाखवणारा || मंत्र गुंतवणुकीचा ||
-
Steve Aani Mee (स्टीव्ह आणि मी)
मगरीचं नाव काढलं, तरी सामान्य माणसाला भयाचा काटा फुटतो! तिचा अजस्र जबडा अन् कराल दात, तिचा बलाढ्य देह अन् विक्राळ शेपटी आणि तिच्याशी निगडित अशा किती तरी कथा-दंतकथा. मगरमिठी म्हणजे जणू मरणमिठीच! अशा मरणमिठीत आपणहून शिरणारा – केवळ मगरीशीच नव्हे, तर साऱ्याच प्राणीजगताशी मैत्र जुळवणारा – स्टीव्ह इरविन आणि आपल्या या जगावेगळ्या प्राणसख्याला त्याच्या या सगळ्या साहसी आयुष्यात सर्वस्वी साथ करणारी टेरी इरविन यांच्या सहजीवनाची विलक्षण सत्यकहाणी
-
Ya Saam Ha (या सम हा)
मराठ्यांच्या इतिहासात युगप्रवर्तक शिवछत्रपतींचा खराखुरा वारसदार शोभणारा अजिंक्य रणधुरंधर म्हणजे दुसरा पेशवा… थोरला बाजीराव. ऐन विशीच्या उंबरठ्यावर वडलांच्या मृत्यूमुळे पेशवेपदाची जबाबदारी त्याच्या अंगावर येऊन पडली. त्याच्या क्षमतेबद्दल शंका बाळगणाऱ्या अनेक ज्येष्ठ सरदारांच्या मनांतली असूया आणि द्वेष दूर सारण्यासाठी हवे होते ते लक्षणीय यश बाजीरावाने अवघ्या चार वर्षांतच मिळवले. मराठा सैन्याजवळ प्रचंड तोफखाना नव्हता. तथापि ती उणीव खिजगणतीतही न घेता त्याने वेगवान घोडदळ कल्पकतेने वापरले. रणांगणाची नेमकी निवड करण्यात, भौगोलिक वैशिष्ट्यांचा लष्करी फायदा उठवण्यात आणि कमीत कमी शक्ती वापरून शत्रूला शरण आणण्यात तो कमालीचा यशस्वी होत गेला. ज्याच्या अश्वारोही युद्धनेतृत्वाची फील्डमार्शल माँटगोमेरीसारख्या सुप्रसिद्ध पाश्चिमात्य सेनानीनेसुद्धा गौरवपूर्ण दखल घेतली, तो हा स्वराज्यविस्तारक अजिंक्य वीर! बाजीरावाच्या वीस वर्षांच्या कारकिर्दीतील विविध मोहिमांचा, त्याच्या अद्वितीय अश्वारोहणकौशल्याचा, अभिजात व्यूहरचनांचा, सरदारांपासून बारगीरांपर्यंत सर्वांनाच बरोबर घेऊन विजय खेचून आणणाऱ्या अलौकिक स्वभाववैशिष्ट्यांचा तपशीलवार वेध घेणारा हा ग्रंथ.