-
Ye Hai Mumbai Meri Jaan (ये है मुंबई मेरी जान)
सरदार कुलवंतसिंग कोहली.मुंबईच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अन् राजकीय क्षेत्रांतमोलाचं योगदान दिलेलं हे व्यक्तिमत्त्व.योगायोगानं मुंबईच्या मोहक मयसभेशी - चित्रपटसृष्टीशीकुलवंतजींचा घनिष्ठ संबंध आला. कपूर कुटुंब, दिलीपकुमार - राजेंद्रकुमार - धर्मेंद्रपासून राजकुमार - संजीवकुमार - जितेंद्रपर्यंतचे नायक,मीनाकुमारी - मधुबालापासून माला सिन्हापर्यंतच्या नायिका,व्ही. शांताराम - असीफ - मेहबूबसारखे दिग्दर्शक,नौशादपासून रवीपर्यंतचे संगीतकार, प्राणसारखे दिलेर खलनायक -किती किती नावं सांगायची?अशा दिग्गज कलाकारांबरोबर कुलवंतजींच्या तारा जुळल्या.सामान्य माणसासाठी आकाशीची नक्षत्रं असणारेहे चित्रपटसृष्टीतील तारे-तारका कुलवंतजींनाहाडामांसाची माणसं म्हणून न्याहाळता आली. अटलबिहारी वाजपेयी - बाळासाहेब ठाकरे -सुशीलकुमार शिंदे किंवा प्रमोद महाजन -झैलसिंग - बुटासिंग यांच्यासारखेराजकारणीदेखील या चित्राची चौकट बनून भेटतात. ही सारी माणसं अन्त्यांच्याबरोबर जगलेला अवघा काळकुलवंतसिंग यांनी आपल्यापुढे जिवंत केला आहे|
-
Hamarasta Nakaratana (हमरस्ता नाकारताना)
हमरस्ता नाकारायचाच, असं काही ठरवलं नव्हतं.पण स्वत: स्वतःची साक्ष काढत पुढे जातानापिढ्यानपिढ्या तुडवून तुडवून गुळगुळीत झालेलीवाट मागे पडली खरी.घेतलेली वाट बिकट होती, अनपेक्षित वळणांची होती,तशीच मधूनच सुखावणाऱ्या हिरवाईचीही होती.खूपसं चालून गेल्यावर मागे वळून पहावंसं वाटलं.भूतकाळच्या मुसक्या बांधून विस्मरणाच्या दरीतफेकून देण्यापेक्षा त्याच्याशी दोस्ती करावीशी वाटली.आपली मुळं शोधावीशी वाटली.नदीचं मूळ कधी शोधू नये म्हणतात –पण करू नये ते केलं.हा शोध घेता घेता मला माझ्यात दडलेलीमाझी आई गवसली, आजी सापडली.भूतकाळाशी दोस्ती करताना त्यातल्या माणसांबरोबर पुन्हा जगले…मला स्त्रीत्वाचं भान देणाऱ्या पुरुषांकडेप्रौढपणाच्या चष्म्यातून नीट न्याहाळलं.त्यावेळी भावनांच्या धुक्यात बुडालेले तिढे आज लक्षात आले.नात्यांचे निखळलेले सांधे जुळवताना वाटलं की,निखळ ‘मी’ अशी नाहीच. अनेक माणसांनी-त्यांच्या राग, लोभ, प्रेम, असूया, मैत्र अशाअनेक भावनांनी भारलेल्या नात्यांनी मला घडवलं आहे.गोष्ट माझीच नाही, तर त्या सर्वांची आहे.या गोष्टींशी जैवपणे जुळलेल्या काळाची ही गोष्ट आहे|