-
Kahani Londonchya Aajibainchi
राधा डहाके नावाची एक मुलगी विदर्भातील सावतेली समाजात, आडबाजूच्या एका खेडेगावात जन्माला आली. परिस्थितीचे टक्केटोणपे खात ती लंडनला पोहोचली. तिला तिथली भाषा येत नव्हती. माणसं-संस्कृती-परंपरा, इतिहास, काही माहीत नव्हतं. इथंही ती निरक्षरच होती; त्यामुळे लंडन हे गावाचं नाव आहे की देशाचं, असा संभ्रमही बरेच दिवस तिच्या मनाला असायचा! पण कालांतरानं ती लंडन शहरातील एक सन्माननीय व्यक्ती झाली. तिनं भरपूर पैसे मिळवले. भरपूर खर्चही केले. आपली माणसं, आपला धर्म, आपली जीवनपद्धती यांचं एक मूर्त चित्र स्वतःच्या आयुष्यात तिनं दाखवून दिलं. तिनं जीवनाचा निरोप घेतला तेव्हा तिच्या शवावर वाहण्यासाठी लंडनच्या गोर्या मेयरनं - मेयर ऑफ बारनेटनं फुलं पाठवली आणि लंडनमधल्या तिच्या भारतीय मुलांनी तिची शवपेटी प्रेमपूर्वक आपल्या खांद्यावर वाहून नेली !
-
Shivray M (शिवराय)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आतापर्यंत कोणी केलेला नव्हता. लढायांव्यतिरिक्त महाराजांचे अनेक क्रांतीकारी निर्णय अत्यंत दूरदर्शी आणि समाजमनावर शेकडो वर्षे प्रभाव टाकणारे आहेत. आर्थिक, सामाजिक, वैज्ञानिक क्रांती करताना अंधश्रद्धा निर्मूलन करून लोकशाही राज्यव्यवस्था आणि पंचायत राज ही संकल्पना अस्तित्वात आणली. जातीपातीच्या अभेद्य भिंती पाडून समतेची मुहूर्तमेढ वयाच्या पाचव्या वर्षी रोवली. उद्धवस्त पुणे शहरातील जमिनीवर सोन्याचा फाळ लावलेला नांगर चालवून हाती असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा लोक कल्याणासाठी कसा उपयोग करावा याचा आदर्श दाखवून दिला. अर्थात जिजाऊसाहेबांच्या सर्व गोष्टीच्या कर्त्या धर्त्या होत्या हे वेगळे सांगणे नको. महाराजांनी वतनदारांच्या ताब्यात असलेल्या खाजगी जमिनीचे राष्ट्रीयकरण करून गरीब श्रीमंत यातील दरी कायमची बुजविण्याचा कांतीकारक प्रयोग केला. महाराजांनी महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी प्रयत्नपूर्वक जलनियोजन केले. पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमेबरोबर विहीरी, तलाव, तळे, बंधारे बांधले. याशिवाय अतिक्तित उपलब्ध पाण्याचा पुरेपूर उपयोग व्हावा यासाठी फळबागांना पुरेसे प्रोत्साहन दिले. किल्यावर पावसाळ्यात उपलब्ध होणार्या पाण्याचे रेन हार्वेस्टिंग करून थेंब थेंब पाण्याचा उपयोग केला. त्याचाच परिणाम असा की महाराष्ट्रातील कोणताही किल्ला पाण्याच्या अभावामुळे शत्रूला जिंकता आला असे कधीच झाले नाही.
-
Krosha Vinkam (क्रोशा विणकाम)
बाहेर कुठेही विणलेले टेबलमॅटस्, पडदे, रूमाल पाहिले, की त्यांचे मनमोहक डिझाईन आपले लक्ष वेधून घेतात. आणि हे डिझाईन कसे केले असेल असा प्रश्न मनात येतो. एका सुईवर दोर्याने केलेले क्रोशाकाम पाहताक्षणी सर्वांनाच आवडते. या पुस्तकात अशीच अनेक डिझाईन्स पहायला मिळतील. सुई हातात कशी धरायची, टाक्यांची माहिती इथपासून विविध लेस, फुले, टेबलमॅटस्, टोप्या, कॉलर्स इ. साठी सुंदर डिझाईन कसे विणावे याची सचित्र माहिती या पुस्तकात समाविष्ट केलेली आहे. पुस्तकाच्या मदतीने स्वत: कलाकुसर करा आणि आपले घर सजवा.
-
Mahanayak (महानायक )
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जीवनकहाणी! अडतीस कोटी देशबांधवांची गुलामगिरीतून मुक्तता; याच एका प्राणप्रिय ध्येयासाठी एका कडव्या, लढवय्या देशभक्ताने अर्ध्या जगात मारलेली गरुडभरारी!
-
नाझी भस्मासुराचा उदयास्त
जर्मनीत सरकार उरले नाही. शास्ता उरला नाही. लक्षावधी सैनिक व सर्वसामान्य नागरिक बेघर झाले. अन्न नव्हते, निवारा नव्हता, सर्वत्र पडलेली घरे होती. चिंध्या पांघरून अर्धपोटी अवस्थेत पुढचा हिवाळा जनतेला काकडत काढवा लागणार होता. पुढे फक्त अंधार होता, भीषण अंधार. मृत्यू-दरीसारखा. तिसरे राईश इतिहासजमा झाले होते. या तिसर्या राईशच्या उदयास्ताची कहाणी.
-
Sachin Tendulkar (सचिन तेंडूलकर )
अनुवादित, क्रीडाविषयक, क्रिकेट,
-
Dairy (डायरी)
प्रवीण बर्दापुरकरांनी गेल्या तीस वर्षात अनेक सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय उलथापालथी पाहिल्या आहेत. हा काळच प्रचंड उलथापालथींचा आहे. त्यातील अनेक नायक-खलनायक वा प्रतिनायक-उपनायक प्रवीणना भेटले आहेत. काहीजण कुणीच नव्हते तेव्हा आणि पुढे स्वयंभू नायक- महानायक झाल्यावर. प्रवीण यांनी त्यांच्या त्या प्रवासाची मानसिक नोंद केली आहे आणि अर्वाचीन इतिहासात त्यांचे कोंदण कोणते ते ठरवून ती 'जागा' त्यांना दिली आहे. विशेष म्हणजे, प्रवीणच्या डायरीत आत्मप्रौढी नाही वा आत्मकरुणा नाही, आत्मवंचना नाही आणि कुठचा गंडही नाही. यामुळे या लेखनाला एकसहजता, एक तात्कालिक ऐतिहासिकता आणि एक प्रवाहीपणा प्राप्त झाला आहे. ही 'डायरी' प्रत्येक 'होतकरू' पत्रकारानेवाचावीच, मात्र तिचा परिसर पत्रकारितेच्या पलीकडे, म्हणजे आपल्या व्यापक सामाजिक राजकीयतेकडे आहे आणि म्हणूनच सर्वच प्रकारच्या वाचकांच्या मनोकक्षा रुंदावणारा आहे.
-
Negal: Hemalkashache Sangaati, Part 2
डॉ. प्रकाश आमटे यांच्याबरोबर काम करण्यासाठी श्री. विलास मनोहर १९७५ साली हेमलकशाला दाखल झाले. प्रकल्प सुरू होऊन वर्ष झालं होतं. दारिद्र्य, अज्ञान यांमुळे त्या भागात वन्यप्राण्यांची भरपूर शिकार होत असे. प्रकल्पावरच्या दवाखान्यात येणारे आदिवासी प्राणी मारल्यावर त्यांची पिल्लं प्रकाशकाकांना आणून देत.
-
Negal (नेगल)
डॉ. प्रकाश आमटे यांच्याबरोबर काम करण्यासाठी श्री. विलास मनोहर १९७५ साली हेमलकशाला दाखल झाले. प्रकल्प सुरू होऊन वर्ष झालं होतं. दारिद्र्य, अज्ञान यांमुळे त्या भागात वन्यप्राण्यांची भरपूर शिकार होत असे. प्रकल्पावरच्या दवाखान्यात येणारे आदिवासी प्राणी मारल्यावर त्यांची पिल्लं प्रकाशकाकांना आणून देत.