-
Sarv Prashna Anivarya
‘निशाणी डावा अंगठा’ ही उत्रादकरांची पहिली कादंबरी बरीच गाजली होती. तिच्यावर चित्रपटही आला. 'सर्व प्रश्न अनिवार्य' या कादंबरीचा विषयही ग्रामीण भागातील शिक्षणव्यवस्था हाच आहे. केवळ शिक्षणव्यवस्थेत-परीक्षा पद्धतीतच नाही तर आपल्या व्यक्तिगत व सार्वजनिक जगण्यात सरसकट फोफावत चाललेल्या अपप्रवृत्तींचा वेध या कादंबरीत घेण्यात आला आहे.
-
Pangira
पांढरी या गावाच्या बदलत्या मातीची कर्मकथा म्हणजे ’पांगिरा’. माणसांचं सामुदायिक आयुष्य आणि त्यातला चढउतार हीच या कादंबरीतली प्रधान पात्रं. ’गाव’च त्याचा नायक! लोकशाहीच्या प्रयोगासाठी संस्थानं खालसा झाली. कूळकायदा आला. वतनं गेली. दलालांच्या कुर्हाडी जंगलांच्या मानगुटींवर बसल्या. भूगर्भातलं पाणी संपलं. पिकं नाहीशी झाली. दुष्काळानं गावंच्या गावं गिळली. आणि लोकशाहीतून नवी घराणी जन्माला आली. कायदे आले. परंतु कायद्यातल्या फटी नेमक्या शोधून हव्या तशा वाटा वळवण्याचं नवं शासनही व्यवहाररूढ झालं. या कादंबरीचं वैशिष्ट्य आहेगावशिवेच्या सत्तास्पर्धेचं, पर्यावरणाच्या परवडीचं, सामान्य कष्टकर्याच्या हलाखीचं चित्र. दिवसेंदिवस अधिकच भयाण, भेसूर बनत चाललेलं.