-
Barbala
मी स्वत:ला वेश्या समजत नव्हते. माझ्या मनाच्या कोप-यात मी स्वत:ची एक प्रतिमा हळुवार जपली होती. बाहेरून मला कोणीही ओरबाडलं, रक्तबंबाळ केलं तरी त्या प्रतिमेला मी प्राणपणाने जपणार होते. ती प्रतिमा एका कलाकाराची होती. मनस्वी कलाकाराची. पण मला हे जमणार होतं का ? पुरुषांना जणू माझा वास यायचा, की ही अशी बाई आहे, जिला आपण चिरडू शकतो, वापरू शकतो. माझ्याबाबत घडूनघडून काय घडणार होतं ? काय घडायचं राहिलं होतं ? जे काय घडायचं ते घडो; पण मला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत नको होती. मुलांच्या आयुष्याची नासाडी नको होती. अपेक्षा खूप मोठ्या नव्हत्या पण जे आयुष्य होतं तसंच सुरू राहिलं असतं तर मी किती काळ जिवंत राहू शकले असते ? कशा अवस्थेत जिवंत राहू शकले असते ?
-
Egyptaayan
इजिप्तला लाभलेला इतिहास व सांस्कृतिक वारसा, आहार पद्धती इ. या पुस्तकात मीना प्रभू यांनी सोप्या पण सुंदर भाषेत मांडली आहे.
-
Chashak Aani gulab
भेण्डे यांनी युरोपच्या प्रवासात नुसतीच चैन केली नाही किंवा नुसत्या बघ्यासारखे देश पाहिले नाहीत. त्यांच्यातला अर्थशास्त्रज्ञ, ललित लेखक आणि चौकस सुशिक्षित महाराष्ट्रीय माणूस सतत आणि सर्वत्र जागरूक होता. शक्यतोवर त्यांनी तिथले लोक पाहिले. त्यांच्याशी गप्पागोष्टी केल्या. त्यांच्या देशांची स्थिती, त्यांची सुखदुःखे जाणून घेतली. पुष्कळ ठिकाणी ते प्रवासी बस सोडून एकटेच स्वतंत्रपणे हिंडले. त्यामुळे `कंडक्टेड’ प्रवासी सामान्यतः जे पाहत नाहीत ते भेण्डे पाहू शकले.
-
Turknama
तुर्कस्तानातील प्रेक्षणीय स्थळांचे भरभरून वर्णन या पुस्तकातून केले आहे. तसेच त्यांचा राजकीय, सामाजिक व भौगोलिक आढावा पण घेतलेला आहे.
-
Bhogale Je Dukh Tyala
माझ्या जन्मापासून नाही तर माझ्या जन्माअगोदरही माझ्या अस्तित्वावर नकारात्मक शब्दांचे आसूड ओढले गेले. पांढ-या पायाची, अपशकुनी, काळी, कुरूप, काळ्या जिभेची अशी कितीतरी अभद्र लेबल मला लावली गेली. अनेक घटनांना, परिस्थितीला मलाच जबाबदार धरून माझा छळ केला. जन्मदात्री आई असूनही माझ्या आसवांनी तिचं हृदय कधीही हेलावलं नाही. माझी प्रत्येक आशा, आकांक्षा, भावना, हक्क, अधिकार आपल्या टाचेखाली ती तुडवत आली. माझं अख्खं आयुष्य जणू तिनं आपल्यासाठी एक वस्तू मानली. केवळ एक वस्तू, जी गहाण ठेवून त्यावर कर्ज काढता येतं. स्वत:साठी, स्वत:च्या गरजपूर्तीसाठी. मा नं माझं आयुष्य आपल्याकडं गहाण ठेवलं. मला माझ्या गुलामीची प्रखरतेनं जाणीव झाली. यातून आपण सुटायला हवं, नव्हे सुटका करून घ्यायला हवी. "घाबरूनकोस. कितीही वादळ होऊ दे, विझू देऊ नकोस त्या आशेच्या पणतीला. आत्ता हरलीस तर मग पुढं कधीच नाही. कधीही नाही." मी स्वत:ला पुन:पुन्हा बजावत होते. स्वत:च स्वत:ला धीर देत होते.
-
Samradni
''ऐश्वर्या, लोक ज्याला महत्त्वाकांक्षा म्हणतात, त्या अर्थानं मी महत्त्वाकांक्षी नाही आणि मला स्वत:ला असं महत्त्वाकांक्षी व्हायला आवडतही नाही. दुस-या कुणाचं मी काय सांगू? पण जे दिसेल ते मिळवायला बघायचं, हाताला लागलं म्हणून खिशात घालायला बघायचं, हे मला बरोबर वाटत नाही. माझं कोणतं काम आहे, हे मला नक्की कळलेलं आहे. नुसतं मोठं होणं अशासारखी तर मला मुळीच महत्त्वाकांक्षा नाही. उलट सतत असं मोठं होण्यासाठी धडपड करणा-या लोकांच्या वागण्याचा मला अर्थच कळत नाही. हे लोक कशासाठी सारखे धावत सुटतात, ते समजत नाही, त्यामुळे हाती असलेल्या कामाला पूर्ण न्याय द्यायच्या अगोदरच ते दुसरं काहीतरी मिळवायला बघतात. कुठंच शांती नाही. ऐश्वर्या, अगं कोणतंच काम लहान किंवा मोठं नसतं. फक्त ते नीट समजून घेऊन केलं पाहिजे. मग ते छोटं कामही सगळ्यांत प्रभावी वाटतं आणि ते करणा-यालाही काहीतरी केल्याचं समाधान वाटतं आणि शेवटी, आयुष्याला मर्यादा असतेच ना? नुसतंच पळत सुटण्यात सार्थक कशाचं वाटणार? मला तर कधी कधी एखादा प्राथमिक शाळेचा शिक्षकही, शिक्षणमंत्र्यांपेक्षा थोर वाटतो. एखादा सरपंच मुख्यमंत्र्यांपेक्षा कर्तबगार वाटतो, कारण त्याला आपल्या कामाचा अर्थ कळलेला असतो.''
-
Pahili Pheri
यशवंतरावजी उत्तम व्यूहरचनाकार आणि जाणते रणनिती विचारवंत होते... डॉ. मनमोहन सिंग 1965 War Inside Story या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात पाकिस्तानविरुद्ध 1965 च्या सप्टेंबरमध्ये जे युद्ध झाले त्यावेळच्या कार्यवाहीचे वर्णन यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या रोजनिशीत केले आहे. चीनविरुद्धच्या 1962 मधील युद्धातील पराभवानंतर संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी घेतलेल्या यशवंतरावांनी सौन्याचे बल व मनोधौर्य वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच पाकिस्तान युद्धातील घटना व युद्धानंतरच्या राजकीय घडामोडी यांचा उहापोह राम प्रधान यांनी या पुस्तकात केला आहे. लष्करी, मुलकी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तर या सर्व दृष्टिकोनातून केलेले हे विश्लेषण, संरक्षणशास्त्र, राज्यशास्त्र, यांचे अभ्यासक तसेच सामान्य वाचक यांना उपयुक्त ठरेल.
-
For Here Or To Go?
"फॉर हिअर, ऑर टू गो ?" इथेच थांबून आस्वाद घेणार, की इथले खाद्यपदार्थ सोबत घेऊन 'तिकडे' जाणार ? - जगभरातल्या 'मॅकडोनल्डस्'मध्ये विचारला जाणारा हा प्रश्न. चाळीस-पंचेचाळीस वषा|पूर्वी मध्यमवर्गीय मानसिकतेची कुंपणं तोडून महासागर ओलांडण्याचं धाडस करणा-या मराठी माणसांनी उत्तर अमेरिकेत नवं आयुष्य उभारायची धडपड सुरूकेली, त्या क्षणापासून या प्रश्नाने त्यांचा पिच्छा पुरवला. 'इथेच' राहून इथले होणार? की 'इकडली' पुंजी बांधून घेऊन 'तिकडे' परत जाणार ? खिशात आठ डॉलर्स, बॅगेत वीस किलो सामान आणि अज्ञाताला तोंड देण्याइतपात मनाचा हिय्या एवढ्या भरवश्यावर या माणसांनी दहा हजार मौलांची उडी मारली, तर रात्रीचा दिवस आणि दिवसाची थेट रात्रच. उत्तर अमेरिकेच्या भूमीवर पाय रोवणारी मराठी माणसांची पाहिली पिढी. त्या पिढीच्या संघर्षाची ही कहाणी. परक्या देशात रुजण्यासाठी दिलेल्या झुंजीची... सोसलेल्या असह्य ओढाताणीची... अपार कष्टांची.. हिंमतीची... अपरंपार वैभवाची.. झळाळत्या यशाची आणि एकट्या, एकाकी अपयशाचीही !
-
Dollar Bahu
फार विचित्र आहे हा देश ! ते एक रंगीबेरंगी कोळ्याचं जाळं आहे. तिथं नोकर्या आहेत, यंत्र-तंत्र आहे. सुख संपत्ती आहे, डॉलर्स आहेत. आपली माणसं त्यातल्या कशाला तरी बळी पडून तिथं येतात, पण माघारी जायला जमत नाही. तिथून जावं असा आपला देशही नाही. इथून बाहेर पडण्यासाठी शेकडो खिडक्या आहेत, पण आत बोलावणारा एकही दरवाजा नाही. तिथल्या जीवनाची तुम्हाला कल्पना नाही. सेलमध्ये खरेदी करायची आणि डॉलरला चाळीसनं गुणायचं ! असं जगणारी मंडळी सुखी असतात काय ? तिथं हजार डॉलर्समध्ये सामान्य काम करत राहायचं आणि इथं चाळीस हजार रुपये पगार मिळतो असं सांगून भाव खायचा. तिथं डॉलर मिळविण्यासाठी आम्ही आपली माणसं, घर-दार सगळं सोडून, तिथल्या थंडी-वार्याला तोंड देत तिथं राहतो, पण तिथल्या समाजाचं अविभाज्य अंग होऊ शकत नाही. फारच महाग पडतो हा डॉलर ! पण हे भारतात कुणालाही समजत नाही. पैशाच्या दलदलीत सापडलोय आम्ही ! आमच्या लायकीपेक्षा फार उत्तम नोकरी मिळते तिथे. जाती, भाषा, यांचं राजकारण नाही तिथे. सुखानं आपलं आपण काम करु शकतो. तिथलं सगळं सोडून मी इथं आलो तर आणखी दु:खी होईन.
-
2
मनुष्याच्या लौकिक, तसंच शारीरिक आणि मानसिक आयुष्यात सतत स्थित्यंतरं घडत असतात. त्या स्थित्यंतरांत माणसाची मानसिक मोडतोड होत असते आणि त्याच मोडतोडीतून माणूस पुन्हा पुन्हा उठत असतो... आसपासच्या लोकांना प्रेरणा देत असतो... 'चिकन सूप'च्या या कथा म्हणजे माणसांतल्या विलक्षण ताकदीच्या कथा आहेत. मानवी स्वभावातल्या सूक्ष्मातिसूक्ष्म कंगो-यांवर ऊहापोह करणार-या या कथा, म्हणजे अनेकांच्या अंधा-या मार्गावरच्या, रस्ता दाखवणा-या ज्योती आहेत! ही प्रकाशाकडे नेणारी एक वाट.