-
Harit Yuddhe (हरित युद्धे)
एका पर्यावरण पत्रकार स्त्रीने केलेलं अनुभवकथन म्हणजे ‘ग्रीन वॉर्स.’ पर्यावरण रक्षणाच्या विविध मोहिमांदरम्यान आलेले हे अनुभव आहेत. त्या अनुभवांचं हे तपशीलवार चित्रण आहे. गारुड्यांचं पुनर्वसन, सारस पक्ष्यांना वाचविण्याची मोहीम, सुसरींच्या कमी होणाnया संख्येबाबत अभ्यास, मेघालयातील जंगलतोड थांबविण्यासाठी केलेले प्रयत्न, हुलॉक वानरांसाठी चालवलेलं मुक्तिकेंद्र, ‘सरस्वती वन्यजीव अभयारण्य’ वाचविण्यासाठी उघडलेली मोहीम, गोव्यात खाणमाफियांना दिलेली टक्कर, इंडोनेशियातील जंगल आणि ओरंग उटान माकडाचं अस्तित्व जपण्यासाठी केलेले यशस्वी प्रयत्न, हिमनद्या, ग्लोबल वॉर्मिंगसाठी अभ्यासदौरा इ. विविध प्रकारच्या पर्यावरण मोहिमा त्यांनी राबवल्या. तर पर्यावरणाच्या विविध अंगांचा बहार यांनी केलेला अभ्यास, पर्यावरणाच्या त्या त्या प्रश्नातील वंगोरे आणि आव्हानं, या समस्यांच्या संदर्भातील त्यांना भेटलेली माणसं इत्यादी बाबींबद्दल बहार यांनी वाचकांशी साधलेला हा.
-
Sokol Griho Haralo Jar (शोकोल ग्रिह हारालो जार)
अनंत अडचणींचा सामना करत, खुनाच्या धमक्या येऊनसुद्धा अंतरातल्या आवाजाला सतत प्रतिसाद देत, तळमळीने, निर्भयपणाने लिहिणाऱ्या मोजक्या लेखकांपैकी एक अग्रगण्य नाव म्हणजे तसलिमा नासरिन. ‘शोकोल ग्रिह हारालो जार’ हे पुस्तक उपरोक्त विधानाला पुष्टी देणारे असेच आहे. या पुस्तकात तसलिमाने विविध विषयांचा परामर्श घेतला आहे. अगदी अमेरिकेच्या निवडणुकीपासून ते फिडेल कॅस्ट्रोच्या क्यूबापासून अंधश्रद्धांपर्यंत अनेक विषयांवर तिने पोटतिडकीने, निर्भयतेने रोखठोक शब्दांत स्वतःची मते मांडली आहेत. त्याचबरोबर स्वतःच्या आयुष्यातील अडचणी, अन्याय, एकाहत्तर सालच्या कटू आठवणी यांबद्दलही लिहिले आहे. सर्व प्रकारची विषमता दूर होऊन सर्व जग म्हणजे एक एकसंध, सुसंस्कृत, मानवतावादी समाज घडावा, ही तळमळ हा तिच्या लिखाणाचा पाया आहे.
-
Udayan (उदयन)
‘कथासरित्सागर’ या सोमदेव शर्मा यांनी रचलेल्या संस्कृत ग्रंथात उदयनकथा विस्ताराने कथन केली आहे. राजेन्द्र खेर यांनी उदयन-वासवदत्ता यांची हीच भावमधुर प्रेमकथा उत्कटतेने रंगवली आहे. कलासक्त उदयन संगीतसाधना आणि विलासात मग्न होतो. त्याचीच परिणती वत्सदेशाच्या पतनात होते. पांडवानंतरच्या पाच पराक्रमी पिढ्यांनी अबाधित ठेवलेल्या सम्राज्याला पराजयाचे ग्रहण लागते. सम्राटपद गमावलेला उदयनराजा वीणावादन आणि नाट्यशालेत मश्गूल असतो. त्याचे वीणावादन इतके कर्णमधुर असते, की त्या स्वर्गीय वादनामुळे श्रोतेच नव्हे, तर पशुपक्षी, मदोन्मत्त हत्ती आणि निसर्गसुद्धा मंत्रमुग्ध होतो. अवंतीनरेश प्रद्योत आपली रूपसुंदर कन्या वासवदत्ता हिला वीणावादन शिकविण्यासाठी उदयनचं कुटिल डाव रचून अपहरण करतो. वीणेच्या प्रशिक्षणकाळात घडलेल्या सहवासातून उभयतांचं परस्परांवर प्रगाढ प्रेम बसतं. कलेच्या साक्षीने त्यांची प्रेमाराधना पुâलत जाते. वत्सदेशाचे महाअमात्य यौगंधरायण यांच्या मनात पराजयाचं शल्य असतंच, त्यात उदयनच्या अपहरणाच्या व्यथेची भर पडते. ते प्रतिज्ञा करतात... पुढे काय काय वेगवान घटना घडतात ते जाणून घेण्यासाठी ही उत्वंâठावर्धक कादंबरी अवश्य वाचायला हवी. ही कथा जशी उदयन-वासवदत्ता या युगुलाची आहे, तशीच साम्राज्याच्या पुनस्र्थापनेची प्रतिज्ञा घेणारे चाणाक्ष
-
Churchilchya Paulkhuna (चर्चिलच्या पाऊलखुणा)
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटनचं यशस्वी नेतृत्व केलेले ख्यातकीर्त नेते म्हणजे विन्स्टन चर्चिल. जागतिक इतिहासात त्यांची कामगिरी कधी सुवर्णाक्षरांनी नोंद व्हावी अशी, तर कधी विपरीत अर्थाने इतिहास घडवणारी ठरली. अशा या वादळी वा आलेख या पुस्तकामध्ये मांडला आहे. चर्चिल यांचे राजकीय व आणि वैयक्तिक जीवन या अपरिहार्यपणे एकमेकांमध्ये मिसळलेल्या वाटा होत्या. विन्स्टनच्या स्वभावाचे पडसाद त्यांच्या सार्वजनिक जीवनावर आणि पर्यायाने ब्रिटनच्या आणि उर्वरित जगाच्याही पटलावर कसे उमटले? याचा मार्मिक लेखाजोखा होम्स यांनी मांडला आहे.
-
River God (रिव्हर गॉड)
फेरोंच्या आधिपत्याखालील, सोन्याचा प्रचंड साठा असलेल्या एका समृद्ध प्रदेशातील म्हणजे इजिप्तमधील ही कहाणी आहे. पेÂरो मेमोसे हे इजिप्तचे राजे आहेत. इन्टेफ हा वजीर आहे. त्या वजीराला एक सुंदर मुलगी असते, लॉस्ट्रीस. ताईता, हा इन्टेफ वजीराचा गुणी गुलाम असतो. इन्टेफ हा व्रूÂर आणि विकृत असतो. त्याला स्त्रियांऐवजी पुरुषांबद्दल शारीरिक आकर्षण असते. तरुण गुलाम मुलांचं लैंगिक शोषण तो करत असतो. त्या दृष्टीने ताईता हा त्याचा आवडता गुलाम असतो. तसेच ताईताला वैद्यकशास्त्राची, ज्योतिषशास्त्राची चांगली माहिती असते, एवूÂणच तो हुशार असल्यामुळे त्याच्यावर इन्टेफची मर्जी असते. पण, अलीडा नावाच्या युवतीवर ताईताचं मन जडतं. हे जेव्हा इन्टेफला समजतं, तेव्हा तो ताईतासमोर अमानुष रीतीने अलीडाला मृत्युदंड देतो. अलीडाला मृत्युदंड देण्याचं काम रासफर या अधिकाNयाने केलेलं असतं.
-
Chotya Shaharacha Darya (छोट्या शहराचा दर्या)
ही गोष्ट आहे आयुष्याच्या पटावरील घटनांना अनिवार्यपणे सोसणाऱ्या एका किशोरवयीन मुलाची. वडिलांच्या दुर्धर आजारामुळं त्यांना त्यांच्या मूळ गावी अखेरचा श्वास घ्यायचा असतो. पण त्यांच्या इच्छेनं नायकाचं आयुष्य मात्र ढवळून निघतं. त्याचं मोठ्या शहरातलं धावपळीचं आयुष्य उखडून छोट्या शहरात रूजवलं जातं. तिथं जुळवून घेण्यासाठीची त्याची धडपड नव्या अवकाशातील माणसं..त्यांचं जगणं..नायकाच्या आयुष्याचा भाग होत जातं..पण तेव्हाच एक नवी वेदना त्याच्या पुढ्यात येऊन उभी राहते. प्रेम, मैत्री आणि नातेसंबंधांवरील मनाची पकड घेणारी कादंबरी.
-
Mahagai Ek Chakravyuh (महागाई एक चक्रव्यूह)
महागाई हा विषय केंद्रस्थानी घेऊन महागाईला कारणीभूत ठरणाऱ्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष गोष्टींबद्दल व महागाईवर परिणाम करणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी, नियम, करार इत्यादी गोष्टींचा ऊहापोह करण्याचा प्रयत्न लेखनाद्वारे केलेला आहे. त्याच वेळेला प्रसारमाध्यमे, राजकारणी, प्रशासकीय अधिकारी व सर्वसामान्य जनता यांनी हक्काबरोबर कर्तव्याची जाण ठेवल्यास फक्त महागाईच नाही, तर भेडसावणाऱ्या सर्व अडचणींवर मात करणे कसे सोपे जाईल, याबद्दलही विचार मांडले आहेत.
-
Chasing Tomorrow (चेसिंग टुमॉरो)
ट्रेसी व्हिटनी या सौंदर्यवतीच्या आयुष्यात जेफ स्टीव्हन्सच्या रूपाने एक देखणा तरुण येतो आणि ते दोघे लग्नाच्या बेडीत अडकतात. जवाहिरांच्या, पुरातन मौल्यवान वस्तूंच्या चोऱ्या करण्याचे आपले जुने आयुष्य मागे ठेवून संसाराला लागतात. पण त्यांचा हा आनंद अल्पकाळच टिकतो. एक प्रचंड वावटळ त्यांच्या आयुष्यात येते आणि त्यांचा संसार उधळून लावते. त्यांच्या औटघडीच्या संसाराला कायमचे ग्रहण लागते. ट्रेसी जेफच्या आयुष्यातून नाहीशी होते. जेफ सैरभैर होतो आणि तिला शोधण्यासाठी जंग जंग पछाडतो. पण त्याला आपल्या पत्नीचा काहीही ठावठिकाणा लागत नाही.
-
Rujwai (रुजवाई)
नकळत्या वयात संजूला हेतुतः दुर्लक्षित करणाऱ्या मानसीची योगायोगाने त्याच्याशी भेट होते आणि जुन्या ‘ऋणानुबंधा’ची जाणीव ठेवत त्याने केलेली पाठराखण तिला स्पर्शून जाते. मुकुंदाची आई ही प्रतिकूल परिस्थितीशी झगडून मुलाला मोठे करते; पण सून आल्यावर या आईवर बेघर होण्याची वेळ येते; मात्र तिचा कसा कायापालट होतो, ते सांगते ‘कायापालट’ ही कथा. ‘नातिचरामि’ कथेतील माधवीने एका कलंदर कलाकाराच्या प्रेमात पडून पस्तीस वर्षे त्याला मनापासून साथ दिली. आयुष्याच्या उतरणीवर त्यानेही खुल्या मनाने त्याचे श्रेय तिला दिले, पण एक अबोध अदृश्य सल तिला सतत खुपत होता... मानवी भावना व नातेसंबंधाच्या मनोहारी अनुबंधाचं मनोज्ञ दर्शन घडविणाऱ्या कथांचा संग्रह ‘रुजवाई’...
-
Madam Butterfly (मदाम बटरफ्लाय)
ही गोष्ट आहे जपानच्या एका फुलपाखरासारख्या नाजूक मदाम, च्यो-च्योची. 20व्या शतकाच्या पूर्वार्धातील अमेरिकी प्रभावातल्या जपानी वातावरणातलं हे कथाबीज. स्वयंभू, आत्मनिर्भर च्यो-च्यो कष्टाळू जपानी स्त्रीचं मूर्तिमंत उदाहरण.. एका अमेरिकी माणसासोबत ती प्रेमानं संसार थाटते. पण आयुष्यातले कष्ट कमी होण्याऐवजी तिच्या आयुष्यात नव्या प्रश्नांची भर पडते. जीवनातल्या चढउतारांना कणखरपणे सामोरं जाणारी च्यो च्यो ती सारी आव्हाने पेलते. पण या फुलपाखराला जणू दुर्दैवाचा शापच असतो. तिचा अमेरिकी नवरा पुन्हा नवं वादळ घेऊन तिच्या आयुष्यात येतो..आणि आयुष्याची घटी पुन्हा विस्कटते. आता मदाम बटरफ्लाय पुन्हा आशानिराशेच्या हिंदोळयावर भिरभिरू लागते..
-
Hows That (हाऊज दॅट)
‘पॉपकॉर्न’नंतर, सुप्रिया वकील यांचा ‘हाऊज दॅट!’ हा दुसरा विनोदी ललित गद्य संग्रह. आपल्या अवतीभवती घडणाऱ्या गोष्टी, होणारे बदल, स्वभावविशेष, जीवनातील विविध रंग टिपत, खुसखुशीत शैलीत लिहिलेले हे लेख वाचकांना आपलेसे वाटतील आणि खळखळून हसवतील. सूक्ष्म निरीक्षणातून जीवनातील गंमत टिपताना, त्यांची लेखणी कुठेही कडवट न होता निखळ विनोद फुलवते. अनुवादक म्हणून सुपरिचित असलेल्या सुप्रिया वकील यांचे हे स्वतंत्र लेखनही वाचकांना नक्की आवडेल.
-
Ruk Jaana Nahi (रुक जाना नाही)
ही जीवन गाथा आहे भावेश भाटिया यांची. राष्ट्रपती पुरस्काराने तीन वेळा सन्मानित करण्यात आलेले भावेश भाटिया म्हणजे ‘सनराईज कॅन्डल्स’ या उद्योगाचे संस्थापक. पूर्णत: दृष्टिहीन असूनही त्यांनी निश्चय व मेहनतीच्या बळावर महाबळेश्वरमध्ये एका हातगाडीवर मेणबत्त्यांचा व्यवसाय सुरू केला. आज कोटींत उलाढाल असलेला हा उद्योग हजारो दृष्टिबाधित बंधूभगिनींच्या जीवनात प्रकाश निर्माण करतो आहे. नेत्रदिपक व्यावसायिक भरभराटीसोबतच भाटिया यांनी क्रीडा क्षेत्रातही अतुलनीय योगदान देत ‘राष्ट्रीय पॅरालिम्पिक’ व ‘इंडियन ब्लाइन्ड स्पोर्ट्स असोसिएशन’ची एकूण ११४ पदके जिंकली आहेत.
-
Karnalok (कर्णलोक)
‘अनाथ' शब्दाची चीड असलेला बारा-चौदा वर्षांचा एक मुलगा योगायोगानं नेमका अनाथालयाशीच जोडला जातो. मी ‘त्यांच्यातला' नाही हे स्वतःला आणि जगाला बजावत असतानाच नकळत ‘त्यांच्या' सुखदुःखांशी बांधला जातो... त्याची आणि दहाव्या-बाराव्या वर्षीच त्या अनाथालयातल्या अवघ्या मुलांची आई झालेली दुर्गाई, तिची ती अनेक लहान मुलं.... तिथले कर्मचारी, संचालक, मार्गदर्शक, हितचिंतक, मुलांना दत्तक घेऊ इच्छिणारे भावी पालक यांची कहाणी...म्हणजेच ‘कर्णलोक.
-
Cocktail Carnival (कॉकटेल कार्निव्हल)
कॉकटेल कार्निव्हल हा तुमच्या साहित्यिक अभिरुचीला साद घालणाऱ्या कथांचा एक उत्सव आहे, एक रुचकर मेजवानी आहे. यात अनेक रस चाखायला मिळतात - मनोरंजनापासून ते कुतूहलापर्यंत, कारुण्यापासून ते विस्मयापर्यंत – कुठला रस केव्हा पुढे ठाकेल याची पूर्वकल्पना न देता. ज्याला विविध प्रकारच्या निमंत्रितांच्यात मिसळायला आवडेल अश्या वाचनवेड्यांसाठी ही जत्रा.
-
Nabhantmani (नभांतमणी)
ग्रामीण भागातील हुशार मुलगा मणिभद्र कात्यायिनी मठाचा भावी धर्मगुरू होण्याची संधी स्वीकारतो... यामुळे त्याला आजन्म ब्रह्मचारी राहावं लागणार असतं...डॉ. नभा महंती ही तरुण अध्यापिका त्याच्या प्रेमात पडते... धर्मशास्त्रातील आणि शिक्षणशास्त्रातील यशाच्या पायऱ्या चढलेला मणिभद्र नभाचं प्रेम स्वीकारू शकत नाही...वासनारहित, आत्मिक प्रेमाची महती मणिभद्र नभाला सांगू पाहतो....धर्म आणि लौकिक जीवन यांच्यातील द्वंद्वाचं प्रभावी चित्रण करणारी कादंबरी ‘नभांतमणी’
-
No Not Never (नो नॉट नेव्हर)
ही कहाणी आहे वऱ्हाड विदर्भातल्या दोन मुलींची. गुणी, सोज्वळ आणि गरीब राणीची आणि श्रीमंत कुटुंबातल्या हटखोर मंकीची. राणीच्या घरची परिस्थिती नसतानाही मंकीच्या वडिलांच्या दयेमुळे तिला पुढील शिक्षणाची संधी मिळते. बारावीनंतर इंजिनिअरिंग करण्यासाठी या दोघी पुण्यासारख्या महानगरात दाखल होतात. या महानगराचे रागरंग, इंजिनिअरिंग महाविद्यालयातील खळबळजनक वातावरण आणि दोघींचा परस्परविरोधी स्वभाव यातून या कथानकाला वेगवेगळी वळणं मिळत जातात. स्वैर, उच्छृंखल मंकी आपल्या अनिर्बंध जगण्यासाठी वेळोवेळी राणीला वेठीस धरते. आणि राणीचं पुण्यातलं जगणं आव्हानांनी भरून जातं. तरुणाईची मानसिकता आणि मोकळ्या अवकाशात मिळालेलं स्वातंत्र्य यांचा सुरस मेळ असणारी, कधी अंगावर शहारे आणणारी तर कधी सुखद रोमांच आणणारी विलक्षण कादंबरी
-
Jalianwala Baug (जालियनवाला बाग)
१३ एप्रिल, १९१९ या दिवशी ब्रिटिश सरकारने जालियनवाला बागेत शीख समुदायावर केलेला बेछूट गोळीबार... या गोळीबारातून वाचलेला एक विशीचा तरुण राम मोहम्मद सिंग आझाद... या हत्याकांडाचा सूड घेण्याची त्याने घेतलेली शपथ... मार्गात आलेल्या अनेक अडचणींना तोंड देत या हत्याकांडास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यास या ध्येयवेड्याने लंडनमध्ये जाऊन दिलेले देहान्त शासन... एका क्रांतिवीराची धगधगती कहाणी..सत्यकथेवर आधारित कथाबीज असलेली विलक्षण कादंबरी
-
Atmavanchana (आत्मवंचना)
सेल्फ डिसेप्शन’ (आत्मवंचना) या पुस्तकात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारत-चीन संदर्भात केलेला पत्रव्यवहार आणि त्या संदर्भात केलेली भाषणे यांचा आढावा घेऊन त्यावर अरुण शौरींनी भाष्य केलं आहे. त्यातून भारत-चीन संदर्भात नेहरूंचं धोरण कसं होतं, त्या धोरणांचे परिणाम काय झाले, तत्कालीन राजदूतांची भारत-चीन संदर्भातील मते, या प्रश्नाच्या संदर्भात माध्यमं काय करतात इ. मुद्द्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे
-
Lady Jallad (लेडी जल्लाद)
जल्लाद...हा शब्दही अंगावर शहारे आणणारा. स्त्रियांच्या नाजूक स्वभावाकडे पाहता हे काम कुणी स्त्री करू शकेल, याबाबत क्वचितच कुणाला विश्वास बसेल. पण बावीस वर्षीय चेतना मुल्लीक वर जल्लाद या वडिलोपार्जित कामाची जबाबदारी येते. आणि तिचं संपूर्ण आयुष्यचं नवं वळण घेतं. सामाजिक गृहितकांना धक्का देत वेगळ्या वाटा धुंटाळणारी ही चेतनाची कहाणी अनेक अर्थ्यांनी वाचकांसाठी उत्कंठावर्धक आहे
-
Saad Ghalto Kalahari (साद घालतो कालाहारी)
This is the story of the Owens' Travel and life in the Kalahari desert. Here they met and studied unique animals and were confronted with danger from drought, fire, storms, and the animals they loved. This best-selling book is for both travellers and animal lovers. ‘क्राय ऑफ कालाहारी’ हे पुस्तक म्हणजे कालाहारी वाळवंटात सात वर्षे राहिलेल्या मार्क आणि डेलिया ओवेन्स यांच्या जंगली प्राण्यांच्या सहवासातील अनुभवांवर आधारित कादंबरी आहे. त्याचा मंदार गोडबाले यांनी मराठी अनुवाद केला आहे. बदली कपड्यांचा एक जोड आणि एक दुर्बीण वगळता बाकी विशेष काही न घेता मार्क आणि डेलिया या तरुण अमेरिकन जोडप्याने प्राणिजीवनाचा अभ्यास करण्यासाठी आफ्रिकेचे विमान पकडले. तिथे पोहोचल्यावर एक जुनाट लँडरोव्हर गाडी विकत घेऊन त्यांनी कालाहारी वाळवंटात (डिसेप्शन व्हॅली) खोलवर मजल मारली. ते सात वर्षे त्या परिसरात राहिले. विशेष म्हणजे त्या ठिकाणी कोणीही मानव कधीही गेलेला नव्हता, तिथे ना कोणते रस्ते होते, ना कोणी माणसे. हजारो चौरसमैलांच्या परिसरात पाण्याचा कोणताही स्रोत नव्हता. त्यांच्या आजूबाजूला जे प्राणी होते, त्यांनीही कधी माणूस पाहिला नव्हता. मध्य कालाहारी कितीही मोठे असले, तरी त्यामध्ये तेथील अस्थिर प्राणिसृष्टीसाठी पे अन्न-पाणी नाही, चरणाऱ्या आणि शिकारी दोन्ही प्राण्यांसाठी! त्या अभयारण्यात एकही कायमस्वरूपी पाणवठ्याची जागा नाही; त्यामुळे पिल्लांची व स्वतःची सुरक्षितता आणि बदलत्या ऋतूमानानुसार कालाहारीतील हायना (तरस), सिंह, हरणे, कोल्हे आणि इतर अनेक प्राणी सतत आपली निवासाची जागा बदलत असतात. या प्रचंड जंगलात ओवेन्स जोडप्याने आपला प्राणिशास्त्राचा अभ्यास केला. यामध्ये या जोडीने दिवसा तसेच रात्री-अपरात्री पा वेळ देऊन अनेक प्राण्यांचे अगदी बारकाईने निरीक्षण केले व अभ्यास केला आणि वेळोवेळी त्याच्या नोंदी केल्या.
-
The Mind Gym Relationships (द माइंड जिम रिलेशनशिप्
माणसामाणसांतील संबंध कसे सुधारावेत, हे सांगणारं पुस्तक आहे ‘द माइंड जिम रिलेशनशिप्स.’ या पुस्तकात एकूण चार विभाग आहेत. ते चार विभाग आणि त्यात चर्चेसाठी घेतलेले मुद्दे असे आहेत – संबंध जुळलेले - या विभागात योग्य मन, तुमची नाडी तपासा, शांत राहणं, संकोचणारा ते चमकणारा. एकत्र येणं - आपण ऐकता का?, आनंदी शाळा, लक्ष द्या, माझ्यावर विश्वास ठेवा. कठीण हे प्रेम! -फाइट क्लब, विष काढा, व्यवहार किंवा व्यवहार नाही, त्रास असल्याचा संशय, कठीण शब्द. त्वेगळ्या पद्धतीचे संबंध - चाकोरीबाहेर, कठोर बोलणं, तापदायक माणसं, सन्माननीय सुटका. तसेच या पुस्तकात काही कार्यक्रम आणि ‘ऑनलाइन माइंड जिम’ या संकल्पनेचा अंतर्भाव आहे. संबंध सुधारण्याचं सखोल मार्गदर्शन करणारं हे पुस्तक जरूर वाचलं पाहिजे.