-
Kalokhache Themb (काळोखाचे थेंब)
एक एक व्यक्ती म्हणजे काळोखाचा एक एक थेंब. आपल्यातल्या काळोखाला आकार देत, ‘अर्थ’ देत, प्रत्येक थेंब काही क्षण थरथरत राहातो आणि कधीतरी अचानकपणे ओघळून जातो. पण सगळ्यांनाच आपल्यातला अंधार आकळतो असं नाही. ज्यांना तो आकळतो त्यांना आपली असहायता उमगते, असहायतेतली अपरिहार्यता जाणवते. आपल्या असहायतेवर, तात्पुरती का होईना, मात करायचा एकच उपाय त्यांना दिसत असतो. धडपडत, हातपाय मारत, जगत राहणं आणि त्या जगण्याचा आविष्कार शब्दबद्ध करणं.
-
Pisantola (पिसांतोला)
"रोबोटमधला माणूस, मृत्यूनंतरही जिवंत राहणं, पाण्यात राहणारी माणसं, कधी गायब होणं तर कधी चौथ्या मितीत अडकणं, कधी इतिहासातला माणूस आजचा वर्तमान तयार करताना बघणं तर कधी ल्युसिड ड्रीमने स्वप्नं तयार करून त्यावर सत्ता गाजवणं अशा विविध विज्ञान संकल्पनांनी भविष्यात घेऊन जाणाऱ्या कथा. माणसाच्या कल्पना, त्याची स्वप्नं आणि सत्य विज्ञान यांची सांगड घालून जीवनाच्या आणि मानवी स्वभावाच्या विविध पैलूंना दाखवणाऱ्या अतिशय मनोरंजक अशा विज्ञान आणि स्पेक्युलेटीव्ह कथांचा हा संग्रह पाचव्या मितीचं दर्शन घडवतो. खऱ्या जीवनाचा अर्थ, काही स्वप्नं सत्यात उतरल्यावरचं त्याचं रूप विज्ञान लख्ख दाखवू शकतं. त्याचा अर्थ, विज्ञान माणसाला मर्यादा समजावून सांगतं. "
-
Lullaby Town (ललबाय टाऊन )
"पीटर अॅलन नेल्सन हा अतिशय यशस्वी चित्रपट दिग्दर्शक आहे, ज्याला हवे ते मिळवण्याची सवय आहे. आणि आता त्याला हवे आहे, यशाच्या मागे धावताना ज्यांना त्याने सोडून दिले, त्या पत्नीला आणि लहान बाळाला शोधून काढणे. हा प्रकार कोल सहज हाताळू शकला असता; पण जेव्हा तो नेल्सनची माजी पत्नी शोधून काढतो, तेव्हा प्रकरण भयानक वळण घेते. या भीषण गुंत्यात कोलचा सामना न्यूयॉर्कमधील निर्दयी माफिया कुटुंबाशी आणि गॉडफादरच्या विकृत, सायको खुनी मुलाशी होतो. आणि अनपेक्षित स्वभावाचा नेल्सन जेव्हा स्वतःच या सगळ्यात उडी घेतो, तेव्हा आधीच तणावग्रस्त परिस्थितीचा स्फोट होतो."
-
Atarkya (अतर्क्य)
कल्याणीरमण बेन्नुरवार यांचा ‘अतर्क्य’ हा वास्तव आणि कल्पना यांत गुंफलेला, अंगावर शहारे आणणारा कथासंग्रह आहे. यामध्ये सत्य, कल्पित आणि या दोन्हींचे मिश्रण असलेल्या अशा विविध कथा आहेत. मानवी मनाच्या सर्वसामान्य जाणिवा आणि तर्काच्या पलीकडल्या काही घटना यांचा अनुभवही अशाच खास; परंतु विशिष्ट जाणिवांच्याच मनुष्य प्राण्याला येत असेल किंवा आला असेल; एकदा – अनेकदा – अचानक आणि त्याचीच गुंफण या कथासंग्रहात झाली आहे. एकूण सहा कथांचा हा कथासंग्रह काहीअंशी वास्तवतेतील वेदनादायी परिस्थिती विशद करतो. गूढ - भय – रहस्य – भुतं – पूर्वजांवरची निष्ठा-अनिष्ठा – पिढ्यांना मिळालेला शाप – बळी प्रथा – अटळ गोष्टींमागची सत्यता – करणी केल्यामुळे उमटणारे पडसाद – अपमानाचा बदला घेण्यासाठी मृत्युपश्चातही जिवंत असलेली क्रूर वासना अशा विचित्र व अमानविय वाटणाऱ्या भावनांचा संग्रह म्हणजे ‘अतर्क्य..!’
-
Spymaster (स्पायमास्टर)
एका गुप्त दहशदवादी संघटनेच्या हल्ल्याशी सामना - कथानकाचा मुख्य चेहरा `स्कॉट हार्वथ` हा कार्लटन ग्रूपचा आधारस्तंभ - अमेरिकेतली ‘द कार्लटन ग्रूप` ही संघटना अमेरिकेच्या ‘सीआयए` या मुख्य सुरक्षा संघटनेच्या नोकरशाही पद्धतीच्या चौकटीबाहेर जाऊन काम करणारी गुप्तहेर संघटना - कामगिरीची सुरुवातीस रशियन संघटनेचा नायनाट - नंतर स्वीडनमधल्या गॉटलँड टापूतील रशियन टोळीकडे मोर्चा - गोटलँडमधील एका स्थानिक राजकारणी महिलेचा मुलगा ताब्यात - कुझनेत्सोव्ह नामक रशियन एजन्टचा पाठपुरावा, इथून पोलंडमधून चोरीला गेलेल्या अमेरिकेच्या मिसाइल्सचा शोध कसा लागला? मॅटरहॉर्न नामक महत्त्वाचा एजन्ट म्हणजे नेमकं कोण? कार्लटन ग्रूपची सगळी गुप्त माहिती शत्रूंच्या ताब्यात जाण्याचा धोका कोणामुळे? कथानकाचा शेवटी घडतं काय? कसं? तीन देश - तीन हल्ले आणि तीन राजनैतिक अधिकार्यांची हत्या अशी पार्श्वभूमी असलेली `स्पायमास्टर` कादंबरी.
-
Don Sant (दोन संत)
रामकृष्ण परमहंस आणि रमण महर्षी या दोन संतांना त्यांच्या आयुष्यात घेऊन आले. या संतांच्या आयुष्यातील वास्तविक चमत्कार म्हणजे त्यांचा चांगुलपणा, त्यांची कणव, तसेच त्यांची शिकवण आणि त्यांचे जीवन त्यांच्या शिकवणीशी एकरूप. ‘मी’ कोण आहे याचा शोध घेत-घेत कोणी परमपिता परमात्म्यापर्यंत पोहोचू शकतो. मी - देह, हाडे, मांस की मज्जारज्जू? मन की बुद्धी? याचं विश्लेषण करत गेलो की जाणीव होते की, यापैकी काहीही म्हणजे ‘मी’ नाही. या प्रक्रियेला ‘नेति नेति’ म्हणजेच ‘हे नाही’(न±इति) असे म्हणतात. कोणालाही आत्म्याचे आकलन होत नाही, की त्यास स्पर्शही करता येत नाही. तो सर्व गुण किंवा वैशिष्ट्यांविरहित असतो. खरेतर श्री रामकृष्ण यांनी आपल्या भक्तांना मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील ईश्वराची ओळख यातील फरक समजावताना जे शब्द उच्चारले आहेत, ते आपण श्री रमण यांच्या संदर्भात वापरतो. आपण श्री रामकृष्ण-श्री रमण यांच्यासारखे अगदी १०पैशांइतपत बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
-
Backstage (बॅकस्टेज)
"सिकंदराबादमधील साध्या सुरुवातीपासून नवी दिल्लीतील सत्ताकेंद्रांपर्यंत अहलुवालिया यांच्या आयुष्याचा विलक्षण प्रवास मांडणारे हे पुस्तक भारताच्या घडणाऱ्या कथेमागील आतल्या गोटातील नोंद आहे. राज्यनियंत्रित अर्थव्यवस्थेतून बाजारआधारित अर्थव्यवस्थेकडे भारताच्या परिवर्तनात अहलुवालिया यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि तब्बल तीन दशकांपर्यंत ते भारताच्या आर्थिक धोरणनिर्मितीच्या सर्वोच्च पातळीवर कायम प्रभावी राहिले. हे पुस्तक भारताच्या अलीकडच्या इतिहासातील राजकारण, व्यक्तिमत्त्वे, घटना आणि संकटांचा मागोवा घेते. आकड्यांच्या पलीकडे जाऊन ते सुधारणा प्रक्रियेतील राजकारण उलगडते आणि धोरणात्मक बदल कसे पुढे नेले गेले हे स्पष्ट करते—सुरुवातीला पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात हळूहळू, आणि नंतर १९९१ मध्ये गंभीर देयक तुटीच्या (बॅलन्स ऑफ पेमेंट्स) संकटाचा लाभ घेत व्यापक सुधारणांसाठी धाडसी पावले उचलली गेली. या निर्णायक काळात वाणिज्य सचिव आणि वित्त सचिव म्हणून काम पाहणाऱ्या अहलुवालिया यांनी त्या वेळी करण्यात आलेल्या आरोपांना छेद देत ठामपणे मांडले आहे की १९९१ मधील आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कार्यक्रमाच्या अटींमध्ये समाविष्ट असलेल्या सुधारणा या भारतावर लादलेल्या नव्हत्या, तर त्या देशांतर्गत विचारमंथनातून जन्मलेल्या होत्या. युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स (यूपीए) सरकारच्या काळात नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष (कॅबिनेट दर्जा) म्हणून कार्यरत असताना, त्यांनी त्या कालखंडातील यश-अपयशाचा सविस्तर आढावा घेतला आहे. यूपीएच्या पहिल्या कार्यकाळातील भारताच्या उल्लेखनीय आर्थिक वाढीची कहाणी तसेच दारिद्र्यनिर्मूलनातील ऐतिहासिक कामगिरी ते मांडतात. त्याचबरोबर यूपीए-२ च्या अखेरच्या काही वर्षांत दिसून आलेली धोरणात्मक अडचण (पॉलिसी पॅरॅलिसिस) आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबतही ते स्पष्ट व प्रांजळ चर्चा करतात. विनोदबुद्धी, हलका-फुलका शैली आणि विलक्षण बौद्धिक सामर्थ्य यांच्या संगमातून कथन केलेले ‘बॅकस्टेज’ हे पुस्तक भारताच्या आर्थिक आणि राजकीय इतिहासातील एक महत्त्वपूर्ण आणि अधिकृत योगदान मानले जाते—अशा व्यक्तीकडून, ज्यांना ही कथा सांगण्याची अनन्यसाधारण संधी आणि स्थान लाभले."
-
Ethiopiyi Suras Katha (इथियोपियी सुरस कथा)
आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस’ या जागतिक मानवतावादी संघटनेतल्या कार्याचा प्रदीर्घ अनुभव असलेले उमेश कदम यांचा ‘इथिओपियी सुरस कथा’ हा कथासंग्रह. कामाच्या निमित्ताने दहा वर्षं ते आफ्रिकेत होते. त्यांपैकी अडीच वर्षं ते इथिओपियात वास्तव्यास होते. या कथासंग्रहातल्या कथा त्यांच्या तिथल्या वास्तव्यातल्या अनुभवांवर आधारित आहेत. कथासंग्रहातल्या कथा त्यांच्या तिथल्या वास्तव्यातल्या अनुभवांवर आधारित आहेत. ‘भुतांची टेकडी’, ‘मेंगेशा’, ‘इथिओपियी कांद्यांची गोष्ट’, ‘चिन्मय आफ्रिका’ यांसारख्या एकूण पंधरा कथा त्यात समाविष्ट केल्या आहेत. सर्वच कथांमधून इथिओपियन संस्कृती, दैनंदिन जीवन आणि त्या अनुषंगाने सर्व गोष्टींचं चित्रण आढळतं. त्या संदर्भातले विविध उल्लेख अगदी बारकाव्यांसहित येतात. इथिओपियातलं दैनंदिन जीवनच या कथांमधून वाचकांना भेटत राहतं. लेखकाच्या स्वानुभवांवर आधारित असलेल्या या सर्वच कथांमधून त्याच्या परिघातल्या सर्व माणसांचं भावविश्वही उलगडतं. उमेश कदम यांनी सत्य घटनांना कल्पिताची जोड देऊन लिहिलेल्या या कथा अतिशय ओघवत्या शैलीत आल्या असून त्या वाचकांच्या मनाचा ठाव घेतात.
-
Pavsat Na Bhijnyachi Yukti Ani Itar Katha (पावसात न भिजण्याची युक्ती आणि इतर कथा)
पावसात न भिजण्याची युक्ती आणि इतर कथा हे सुनंदा कुलकर्णी यांचे बालसाहित्याचे पुस्तक आहे. या पुस्तकात एकूण २१ लघुकथांचा समावेश आहे. प्रत्येक कथा एखाद्या गमतीशीर, कुतूहलजनक किंवा अवघड परिस्थितीभोवती फिरते. सामान्य शहाणपण, बुद्धीचातुर्य आणि विनोद यांच्या साहाय्याने समस्या कशा सोडवता येतात, हे या कथांमधून दाखवले आहे. भारतीय लोककथा आणि जीवनानुभव यांचा कथांवर प्रभाव दिसून येतो. रंजक पात्रे आणि सोपी भाषा यामुळे कथा सहज वाचनीय आहेत. या कथा मुलांना विचार करायला शिकवतात आणि जीवनमूल्यांची ओळख करून देतात. त्यामुळे हे पुस्तक मुलांसह प्रौढ वाचकांसाठीही आनंददायी आणि अर्थपूर्ण ठरते.
-
The Escape Artist (द एस्केप आर्टिस्ट)
द एस्केप आर्टिस्ट: द मॅन हू ब्रोक आऊट ऑफ ऑशवित्झ टू वॉर्न द वर्ल्ड हे पुस्तक रुडी व्हर्बा यांच्या अद्वितीय धैर्याची आणि मानवतेविरुद्ध झालेल्या भयानक अत्याचारांशी संघर्षाची कथा साकारते. रुडी, एक युवा यहूदी, ऑशवित्झ कॅम्पमधील छळछावणी आणि नरसंहाराचा साक्षीदार बनतो, जिथे प्रत्येक क्षण जीव वाचवण्याच्या लढाईसारखा असतो. पण तो भयावहतेला सामोरे जातो. चाणाक्षतेचा वापर करून आपल्या मित्र फ्रेडीसोबत पळून जातो. त्याच्या साहसामुळे जगाला ऑशवित्झचं सत्य समजतं. जे ऑशवित्झ रिपोर्ट म्हणून इतिहासात अमर झालं. हे पुस्तक केवळ ऐतिहासिक नोंद नाही; ते धैर्य, निश्चय आणि मानवतेच्या प्रती सुसंगत न्यायासाठी उभे राहण्याच्या शक्तीची एक सजीव चित्रकथा आहे.
-
Mithak Ani Natak (मिथक आणि नाटक)
लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर लिखित ‘मिथक आणि नाटक’ हे महत्त्वपूर्ण वैचारिक पुस्तक आहे. यामध्ये १९२०पर्यंतच्या मराठी पौराणिक नाटकाचा परामर्श घेण्यात आला आहे. डॉ. तारा भवाळकर यांच्या प्रबंधाचा उत्तरार्ध यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. विष्णुदास भावे यांच्या नाटकांपासून खाडिलकरांच्या पौराणिक नाटकापर्यंतच्या मराठी पौराणिक नाटकाची जडणघडण यात स्पष्ट केली आहे. त्यासाठी या ग्रंथात पौराणिक नाटकाची संकल्पना, या नाटकाची आशयवस्तू असलेली पुराणकथा, तिचे स्वरूप, पुराणकथेचा नाटकनिर्मितीशी असलेला अन्योन्य संबंध यांची विस्तृत बैठक उलगडली आहे. प्रारंभीच्या विधिनाट्याकडून नाटकाकडे होत गेलेली ‘नाटक’ या वाङ्मयप्रकाराची वाटचाल लेखिकेने नाट्यवस्तू, नाट्यस्थळ, नट व प्रेक्षक अशा सर्व अंगांनी विशद केली आहे. त्यामुळेच, लोकसाहित्याच्या अभ्यासाच्या कक्षा विस्तारणारे हे पुस्तक आहे. मिथकीय समीक्षादृष्टीतून अभिव्यक्त झालेले हे वैचारिक लेखन आहे.
-
Kanganam (कंगनम)
कंगणम् ही पेरुमाल मुरुगन यांची कादंबरी ग्रामीण तमिळ समाजातील लिंग असमतोल आणि त्याचे सामाजिक परिणाम यांवर प्रकाश टाकते. स्त्रीभ्रूणहत्या आणि मुलींची कमी संख्या यामुळे लग्न न होऊ शकलेल्या मारीमुत्तू या पुरुषाच्या जीवनाभोवती कथा फिरते. त्याच्या एकटेपणातून, मानसिक संघर्षातून आणि सामाजिक उपेक्षेतून ही कादंबरी पुरुषप्रधान समाजरचनेतील खोलवर रुजलेल्या समस्या, लैंगिक भेदभाव आणि मानवी वेदना प्रभावीपणे मांडते.
-
Yogini (योगिनी)
"संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई ही चार भावंडं म्हणजे, मराठी अस्मितेचा मानबिंदू! त्यांपैकी संत मुक्ताबाई यांच्या जीवनावर आधारित ‘योगिनी’ संक्षिप्त चरित्रात्मक पुस्तक आहे. त्यामध्ये लहानपणापासूनची अल्लड-खेळकर मुक्ता ते संतपदापर्यंत पोहोचलेली ‘योगिनी’ मुक्ता हा संपूर्ण जीवनप्रवास उलगडला आहे. या पुस्तकात मुक्ताईचे अनेक स्वभावपैलू आपल्याला उलगडत जातात. तिच्या प्रचंड विद्वत्तेला लाभलेली मायेची झालरही या पुस्तकात चित्रित होते. या अनुषंगाने अनेक प्रसंग त्यात चित्रित झाले आहेत. मुक्ताईची लहान वयातली प्रचंड समज, विलक्षण बुद्धिमत्ता, दूरदृष्टी आणि परिस्थितीला खंबीरपणे सामोरं जाण्याची क्षमता हे सर्व पैलू पुस्तकातून ज्ञात होतात. तिचा इतर भावंडांशी असलेला अनोखा अनुबंधही लक्षात येतो. या सगळ्यांमधूनच ‘संत मुक्ताबाई’पर्यंतचा तिचा जीवनप्रवास तिची खऱ्या अर्थाने ‘योगिनी’ म्हणून ओळख करून देणारा आहे. तसंच, ‘योगिनी मुक्ता’ म्हणून तिचं चिरंतनत्व अबाधित आहे, हे अधोरेखित करणाराही आहे"
-
Kalokhatil Kalokh (काळोखातील काळोख)
`काळोखातील काळोख' या दीर्घ कथासंग्रहातील ग्रामीण भाग, त्यांची राहणी आणि त्यातील भयावह वाटावेत असे प्रसंग शहरी लोकांच्या अंगावर काटा आणणारे आहेत. घडी घडीला चांगल्या-वाईट प्रकाराचे आश्चर्य वाचनातून अनुभवताना एकच विचार येतो की, जर हे सत्यात घडलं अथवा घडत असेल तर, त्या भागातील मानवजातिच्या संवेदनांचं काय होत असेल? या संग्रहात एक ‘चक्रव्यूह’ असतो.. पैसा आणि स्त्री-वासना असते.. शाळेतील मास्तर संस्कारांची उधळण करतो; पण त्याचा बळी जातो. संस्कारांचा `काळोखातील काळोख’ आपल्याला बघायला मिळतो तो स्त्रीयांच्या धंद्यातील चढाओढीत.. स्वत:चा पदर पाडणं आणि दुसर्यांना पाडायला शिकवणं यात प्रत्येक जण धंद्याच्या काळोखात खोल खोल जातो. वैचारिक ज्ञानाची `येल’ सगळीकडे खुंटलेलीच दिसते. ‘दलित’ ही फक्त एक जात? नाही ते एक शाब्दिक शस्त्र आहे व व्यापारी आणि दलित यांच्यातील वादात स्वत:चाही आर्थिक फायदा करून घेणारे गुरुजी हे नावाचे गुरुजी आहेत हेच बरं आहे... चला वाचू या..!
-
Children Are From Heaven (चिल्ड्रेन आर फ्रॉम हेवन)
जच्या काळात पालक आणि मुलं यांच्या नात्यांमध्ये सतत येणारा दुरावा कमी करण्यासाठी आणि पालकांनी कसं स्वत:ला बदलावं - मुलांशी संवाद साधत कसं त्यांना सक्षम करावं याबद्दल मार्गदर्शन करणारं हे पुस्तक आहे. मुलांशी संवाद साधताना ‘करू शकशील का?’ ऐवजी ‘करशील का?’ असा उल्लेख करावा; पण त्याने नेमका काय बदल होतो ते विस्तृतपणे मांडताना लेखक सांगतात की, ‘करू शकशील का?’ यात कुठेतरी शंका दडलेली आहे; तर ‘करशील का?’ यात पाल्यापोटी विश्वास दिसून येतो. परंतु, इथेही पालकांनी स्वत:वरचा आत्मविश्वास ढळू न देणे - प्रत्येक क्षणी नमतं न घेणे - मुलांना सतत स्पष्टीकरण न देणे हे करावे. मुलांना काही परिपूर्ण पालकांची गरज नसते; पण त्यांना नक्की असे पालक हवे असतात जे प्रयत्नांची पराकाष्ठा करतील आणि आपल्या चुकांचे खापर दुसर्याच्या माथी न मारता त्यांची जबाबदारी स्वत:च घेतील. जेणेकरून पालकांचं अनुकरण करताना मुलं स्वत:च्या चुकांची जबाबदारी स्वत:च घेण्यास सक्षम होतील. हेच पुस्तक सांगते.
-
Mahasamrat Asmanbharari Khand-3 (महासम्राट अस्मानभरारी खंड-३)
श्री. विश्वास पाटील यांना अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या इंदिरा गोस्वामी राष्ट्रीय साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यासाठी त्यांचे साहित्यिक योगदान, विशेषत: ‘झाडाझडती’ आणि अलीकडच्या ‘नागकेशर’ या कादंबरीचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे. नोव्हेंबर २०१९मध्ये पासीघाट (अरुणाचल प्रदेश) येथे झालेल्या तेवीस भारतीय भाषांच्या बहुभाषिक संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. त्यांच्या कादंबऱ्या यांची अनेक भारतीय भाषांमध्ये भाषांतरे होऊन त्या जनप्रिय ठरल्या आहेत. त्यांच्या ‘पानिपत’, ‘महानायक’ आणि ‘संभाजी’ या कादंबऱ्या इंग्रजीमध्ये वेस्टलँड अमेझॉन कंपनीने तर ‘झाडाझडती’ (A DIRGE FOR THE DAMMED) ही कादंबरी हॅचेट या कंपनीने प्रकाशित केली आहे. त्यांना या आधी केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कार, प्रियदर्शनी नॅशनल अवॉर्ड, गोव्याचा नाथमाधव पुरस्कार, कोलकात्याचा भारतीय भाषा परिषदेचा साहित्य पुरस्कार असे साठहून अधिक साहित्य पुरस्कार गेल्या बत्तीस वर्षांत प्राप्त झाले आहेत. पाटील यांच्या साहित्यगुणांचा गौरव श्री. सुनील गंगोपाध्याय, श्री. अमिताव घोष, इंदिरा गोस्वामी अशा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या साहित्यिकांनी जाहीरपणे केला आहे. राज्य शासनाच्या सेवेत असताना आय.ए.एस. अधिकारी या नात्याने त्यांनी शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे अनेक वर्षं रखडलेले बांधकाम चौदा महिन्यांच्या अवधीत अग्रक्रमाने पार पाडले. मराठी व इंग्रजी भाषेतील एक उत्तम वक्ते म्हणून श्री. पाटील यांनी लौकिक मिळविला आहे. शिवाय दिल्ली, लखनऊ, कोलकाता, भुवनेश्वर आदी शहरांतील लिटररी फेस्टिव्हल व इतर साहित्यविषयक समारंभांमध्ये आपल्या साहित्याचे व भाषेचे दर्शन घडविले आहे.
-
Operation Sindoor
A GRIPPING ACCOUNT OF THE DEVASTATING PAHALGAM ATTACK IN APRIL 2025 AND INDIA’S DECISIVE MILITARY RESPONSE THROUGH OPERATION SINDOOR. IT EXPLORES THE STRATEGIC SHIFT IN INDIA’S DOCTRINE, FROM RESTRAINT TO PRECISE, INTELLIGENCE-LED AIR AND GROUND STRIKES AGAINST PAKISTAN-BACKED TERROR INFRASTRUCTURE, HIGHLIGHTING PIVOTAL OPERATIONS BY THE ARMED FORCES AND THE COMPLEXITIES OF DIPLOMATIC MANEUVERING IN THE AFTERMATH. THROUGH DETAILED NARRATIVES AND EYEWITNESS PERSPECTIVES, THE BOOK REVEALS HOW THE EVENTS TRANSFORMED INDIA’S NATIONAL SECURITY APPROACH AND REGIONAL STABILITY. A GRIPPING NARRATIVE IN SIMPLE LANGUAGE, CLEAR EXPLANATIONS, AND RELATABLE EXAMPLES, ENSURING READABILITY AND EASY UNDERSTANDING FOR ALL READERS."
-
Aai Mazi Ahe (आई माझी आहे)
एक रंगेल तरुण श्रीमंतीत वाढलेला. श्रीमंती सुखं (`ती’ची) त्याच्या नसानसांत भिनलेली असतात... स्त्रीसुख ही त्याच्या दृष्टीने दोन घटकांची करमणूक असते. पावित्र्य, शील, चारित्र्य, सामाजिक आणि कौटुंबिक चौकटीतले संकेत, शिष्टाचार, नातेसंबंध या गोष्टींशी सदानंदाला काहीही देणंघेणं नसतं. सुगंधी फुलाचा वास घेऊन ते चुरगाळून टाकायचं एवढंच त्याला माहीत असतं. हवापालटासाठी थांबलेल्या हॉटेलात, एक कमनीय बांध्याची सुंदर स्त्री, आपल्या बारा वर्षांच्या मुलासह राहायला येते. हवापालटामुळे मुलाच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी इतकाच तिचा उद्देश असतो. पण, वेगळंच घडू लागतं... रंगेल तरुणाची वासना व स्त्रीची हतबलता का दडलेली आशा? एक स्त्री – एक पुरुष मित्र नसू शकतात या वाक्याला पुरक असं हळूहळू घडत जातं का कोणी घडवत जातं? जे घडतं ते स्वप्न का सत्य? आई - मुलगा आणि तो यांच्यात नेमकं कसं नातं तयार होतं? या विचारांना पलटणार्या पानागणिक उत्तरं मिळत जातात आणि ‘आई माझी आहे’ हे सिद्ध होतं.
-
Day Care (डे केअर)
या कथासंग्रहात एकूण सतरा कथा आहेत. ‘...आणि तुम्ही म्हणता’, ‘डे-केअर’, ‘रामायण- रामायण’ या कथा वेगवेगळ्या अंगाने वृद्धांच्या जीवनावर प्रकाश टाकतात. तर ‘क्षण’ या कथेतून प्रकटते माणसाची किळसवाणी लालसा... ‘गाऱ्हाणं’ कथेतील मालकीण आपल्या मोलकरणीसाठी देवीकडे मागते सन्मान. ‘कॉरिडॉर’मधून व्यक्त होते कोमातून बाहेर आलेल्या अरू या नर्सची व्यथा. ‘जजसाहेब’ या कथेतून व्यक्त होतं पत्नीपीडित पुरुषाचं मनोगत. ‘तर्री’ आणि ‘सहज’ दोन कथा फेसबुक मैत्रीवर भाष्य करणाऱ्या आहेत. एका विशिष्ट विषयावर केलेलं भावरूपी, व्यामिश्र चिंतन, अशा सूत्रातून या कथा साकारल्या आहेत.
-
Yugandhar Shreekrushna Ek Chintan (युगंधर श्रीकृष्ण एक चिंतन)
श्रीकृष्ण ही लोकोत्तर व्यक्तिरेखा; पण केवळ चमत्काराच्या चष्म्यातून त्याच्याकडे न बघता, त्याचं लोकोत्तरत्व जाणून घेणं कसं महत्त्वाचं आहे, ते या पुस्तकरूपी चिंतनातून शिवाजी सावंत यांनी अधोरेखित केलं आहे. ‘युगंधर’ ही कादंबरी लिहिण्याआधी त्या कादंबरीतून श्रीकृष्णाचं व्यक्तित्व ते कसं उलगडणार आहेत, याची ही रूपरेषा आहे. खरंच, मराठी साहित्यात आज श्रीकृष्ण आवश्यक आहे काय?, श्रीकृष्णाचं मराठी लोकजीवनाशी असलेलं अतूट, तिपेडी भावनातं, वैज्ञानिक युगाच्या पसार्यात धर्माचं स्थान कोणतं? श्रीकृष्ण धर्मसंस्थापक होता काय? खरंच, बालकृष्ण कसा असेल? ‘युगंधर’ शीर्षकाची पार्श्वभूमी, तसं ‘युगंधरा’चं सार्थ चित्र एक तरी चितारलं गेलंय का?, ‘कृष्णा’चा युगंधर कसा झाला?, कंस ही गुंतागुंतीची व्यक्तिरेखा कशी?, श्रीकृष्णाचं वास्तव बालपण कसं असेल?, गीतोपदेशासाठी अर्जुनाचीच निवड का?, राधा-मीरेपासूनचे श्रीकृष्णभक्त इ. मुद्द्यांच्या आधारे त्यांनी श्रीकृष्णाचा आणि त्याच्या युगंधरत्वाचा वेध घेतला आहे.
-
Krantikaal (क्रांतीकाल)
`स्वातंत्र्यप्राप्तीसाठी १८५७साली भारतात पहिला देशव्यापी उठाव झाला. तेव्हापासून क्रांतिकाल प्रारंभित झाला असं मानायला प्रत्यवाय नाही. त्यानंतर स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत हा क्रांतिकाल संपला नव्हता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९५२साली स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिनव भारत या क्रांतिसंस्थेचा पुण्यात मोठ्या थाटामाटात सांगता समोर झाला.’ याच इतिहासास साक्षी ठेवून केवळ भारतीय क्रांतीविषयीच नव्हे, तर जगातील अन्य क्रांतिकार्यांचीही दखल यात घेतलेली आहे. `ते सारे लेख क्रांतीचं मूळ सूत्र धरून, प्रस्तुत पुस्तकात एकत्र गुंफले आहेत. अर्थात देशाप्रमाणे व काळाप्रमाणे क्रांतीचं स्वरूप भिन्न होतं जातं; परंतु `क्रांती’ या शब्दाचाच अर्थ ‘आमूलाग्र बदल’ असा घेतला, तर या सर्व देशांतून क्रांतीचं ते सूत्र समान होतं. हा कोणत्याही एका राष्ट्राच्या क्रांतीचा समग्र इतिहास नव्हे!’ भा. द. खेरांच्या या लेखणीचा अनुभव हे पुस्तक वाचल्यावरच येतो.
-
Smashanvasi Aghori (स्मशानवासी अघोरी )
सुमन बाजपेयी लिखित या पुस्तकात अघोरी साधूंच्या गूढ, अनेकदा गैर समजल्या जाणाऱ्या आणि अतिशय दुर्मीळ अशा आध्यात्मिक परंपरेचे सखोल व अभ्यासपूर्ण चित्रण केले आहे. शिवभक्त असलेले हे साधू स्मशानभूमीत वास करून जीवनमृत्यू, शुद्धअशुद्ध आणि सामाजिक नियम, टॅबू यांच्या पारंपरिक सीमा जाणूनबुजून ओलांडत, आध्यात्मिक मुक्तीच्या शोधात कठोर साधना करतात. शरीरावर भस्म धरणे, मानवी अस्थी वा कवटींचा उपयोग करणे आणि सामान्यांना अतिशय टोकाचे वाटणारे इतर विधी हे सर्व त्यांच्या उच्च चेतना प्राप्तीच्या मार्गातील अविभाज्य घटक असल्याचे लेखिका विवेचनात्मक पद्धतीने स्पष्ट करतात. नागा साधूंसारख्या इतर संन्यासी परंपरांपासून अघोरींच्या तत्त्वज्ञानातील व साधनापद्धतीतील वैशिष्ट्यपूर्ण भेदही त्यांनी सूक्ष्मपणे मांडले आहेत. इतिहास, अध्यात्म, सांस्कृतिक अभ्यास आणि मानवी वर्तनशास्त्र यांच्या संतुलित मिश्रणातून बाजपेयी अघोरी परंपरेचे एक आदरपूर्ण, संवेदनशील आणि विद्वत्तापूर्ण चित्र उभे करतात ज्यात अघोरी हे विचित्र वा अघोरीपणाचे प्रतीक म्हणून नव्हे, तर मोक्ष आणि आत्मोद्धाराच्या कठोर मार्गावर निघालेले गंभीर आणि समर्पित साधक म्हणून उलगडतात.
-
Basvanna (बसवण्णा)
गावकुसाबाहेरच्या वस्तीत जन्मलेल्या हुशार बसवण्णाचं स्वप्न असतं शिक्षक होऊन खूप शिकण्याचं; पण त्याच्या होणार्या पत्नीला, चिन्नीला तिची जोगतीण आत्या देवदासी बनवते. देवदासी प्रथेच्या विरोधात काम करणार्या डॉ. दीक्षितांच्या संपर्कात येऊन बसवण्णाही त्यांच्या कार्यात सामील होतो; पण जोगतिणीचे लोक त्याच्या जिवावर उठतात. जीव वाचवण्यासाठी त्याला कबरीत लपावं लागतं, नंतर मुंबईला धारावीत जाऊन राहावं लागतं, किराप्पा मोईली या गुंडाकडे. किराप्पा त्याच्या रखेलीच्या मुलीशी बसवण्णाचं लग्न ठरवतो आणि बसवण्णा तिथून गायब होऊन एका स्मशानात आश्रय घेतो, जवळजवळ दहा वर्षं. नंतर त्याच्या बालमित्राच्या मदतीने त्याला सरकारी नोकरी लागते, चिन्नीशी प्रतीकात्मक विवाह होतो, नंतर सुभद्राशी लग्न होऊन, मुलं होऊन, तो सर्वसामान्य आयुष्य जगतो; पण स्मशानात राहत असताना थोडीफार अघोरी विद्या शिकलेल्या बसवण्णाचा मृत्यू फार विचित्र पद्धतीने होतो. अंगावर शहारे आणणारी सत्यकथा
-
Part Of The Pride (पार्ट ऑफ द प्राइड)
प्राणीशास्त्रज्ञ आणि प्राणी वर्तनशास्त्रज्ञ म्हणून दक्षिण आफ्रिकेतील एका सिंह उद्यानात काम करणार्या तरुण मनुष्य प्राण्याची ही अनोखी कहाणी. लहानपणापासून छोट्या-मोठ्या प्राणी–पक्षी(घरात पाळता येतील) अशांना पाळून, त्यांचं संगोपन करून- त्यांचं बारकाईनं निरिक्षण करण्याची त्याची सवय त्याला सिंहाच्या मनीचे भाव वाचायला मदत करते. मनुष्य प्राण्याचे दैनंदिन काम म्हणजे - जगातील सर्वांत भयानक-घातक जंगलचा राजा असणार्या सिंहाच्या डोळ्यांना डोळा भिडवून स्वत:च्या हाताने खाऊ घालायचं, सिंहिणींनी वाळीत टाकलेल्या बछड्यांना स्वहस्ते बाटलीतून दूध पाजायचं, त्यांच्यासमोर बसून-त्यांच्या पाठीवर झोपून वेळ काढायचा, त्यांच्याशी कधी गवतावर- मोकळ्या जागेत खेळायचं; तर कधी तळ्यात मनसोक्त डुंबायचं आणि जर सिंहाचा मूड असेल तर, कधी कधी त्या सामान्य माणासांसाठी असणार्या भयानक प्राण्यांच्या नाकांचे चुंबन घेऊन त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करणारा अशक्य असा मनुष्य प्राणी आहे ‘केव्हिड रिचर्डसन..!