-
Padchaya (पडछाया)
‘सौभाग्य’ या कथेतून डॉ.सोहनी गिनीपिग प्रयोग करतात. ‘विद्या विनयेन शोभते’ मधून ‘मेकॅनिकल ट्यूटर’– कॉम्प्युटरच्या साह्याने मेंदूत ज्ञान भरण्याचा शोध लावतात. ज्ञानग्रहण करणार्या पेशी उत्तेजित करून मेंदूपेशीत टेपरेकॉर्डरप्रमाणे ज्ञान रेकॉर्ड होते.या भोवती हे कथानक फिरते. ‘ऐलमा पैलमा’ या कथेतून दत्तक घेतलेल्या ईशाच्या मानेला गाठ असल्याचे समजते... ही फसवणूकच असते, नीताला याचा त्रास होतो. प्रभाकर यंत्रमानव नंदिनीला घरी आणतो. ती सर्वांना शेकहॅण्ड करते. यावेळी सर्वांना ईशाची खूप आठवण येते.मग पुन्हा ईशाला दत्तक म्हणून सांभाळण्याचा निर्णय होतो. ‘एका यंत्र मानवाची डायरी’ या कथेत स्वार्थी रमेश संपत्तीसाठी मोठ्या भावाचा खून करतो,हे रोबो पाहतो व स्वत;शीच म्हणतो,‘यंत्रमानवाला नाती नाहीत ते किती बरं आहे.मानवाची निरपेक्ष सेवा करणे,हेच यंत्रमानवाचे व्रत आहे.’ ‘तो मी नव्हेच!’ या कथेतील अभिनेता- हनुमंत बाप्या कोरेगावकर ‘बहारकुमार’ नावाने फिल्मी दुनियेत प्रवेश करतो. एके दिवशी त्याची प्रामाणिक, हुशार व शास्त्रज्ञ मित्र संजयशी भेट होते. हनुमंत आजारी असतो. पण तो संजयला माझ्याऐवजी माझा क्लोन इंडस्ट्रीत पाठव,असं सांगतो. संजयला या खोट्या प्रकाराची कल्पनाच नसते. हा क्लोन ‘बहारकुमार’ म्हणून वावरतो. सर्वांनाच फसवून माणुसकीला काळिमा फासून,‘तो मी नव्हेच!’ म्हणून तो जगतो. ‘पडछाया’, ‘मृत्यू,’ ‘सत्य आणि मिथ्य’ या व इतर वैज्ञानिक कथा वाचकांना आधुनिक विज्ञानाची ज्ञानसमृद्धतेची वाट दाखविणार्या.
-
The Secret Friend (द सीक्रेट फ्रेन्ड)
बोस्टन बंदरात एक मृतदेह सापडतो. डार्बी मॅकार्मिक करत असलेल्या दोन खुनांच्या तपासाशी याचा संबंध असतो. या गुन्ह्यात एक चक्रावणारी गोष्ट असते, ती म्हणजे मृतदेहांसोबत आढळलेली व्हर्जिन मेरीची छोटी मूर्ती. आणखी एका मुलीच्या अपहरणानं हे रहस्य आणखी भयावह होतं. सगळे धागे आधीच्या खुनांशी जुळतात. आणि डार्बीचा शोध आणखी गुंतागुंतीचा होतो. ख्रिस मुनी यांचं हे सायकोथिलर पुस्तक पानागणिक शहारे आणतं. आणि डार्बीसोबत वाचणाराही पुस्तकाच्या अखेरपर्यंत खुन्याच्या शोधात गुंतून राहतो.
-
Junglee Kulguruchi Jangi Katha (जंगली कुलगुरूची जं
कोप्पळ जिल्ह्यातल्या अळवंडी या कुग्रामातील यंकप्पा रामोशी यांचा तेजस्वी हा मुलगा. गदगच्या हॉस्टेलमध्ये प्रवेश न मिळाल्याने, तिथे चोरून वर्षभर रहाणारा, आठवी पास होईपर्यंत म्हशी राखत फिरणारा, शेण गोळा करत, शेंगा चोरत फिरणारा, हा मुलगा इंदिरा गांधी राष्ट्रीय अदिवासी विश्वविद्यालयाचा कुलगुरू होतो, उत्तम बांधणी करत विद्यापीठ प्रगतीपथावर नेतो आणि विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील कीर्ती व सन्मान मिळवून देतो. त्या मुलाची आत्मकथा म्हणजेच हे पुस्तक. डॉ. कट्टीमनी यांचं जीवन म्हणजे शून्यातून सिंहासन निर्माण करणाऱ्याच्या कथेचं रूपक आहे. जातीयवादाची बजबजपुरी आणि मुलभूत सुविधांचा अभाव अशा कात्रीत अडकलेल्या इंदिरा गांधी राष्ट्रीय अदिवासी विश्वविद्यापीठाला डॉ.कट्टीमनींच्या रुपाने एक भाग्यविधाता लाभला. पदभार स्वीकारताच त्यांनी विद्यापीठातील रुळलेल्या उदासीन वाटा नाकारत कायापालट सुरू केला. आणि अवघ्या काही काळात आपल्या साध्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. त्यांचा हा विलक्षण प्रवास देशातील शिक्षण व्यवस्थेच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. हा प्रवास या पुस्तकाच्या पानापानातून वाचकांसमोर उलगडत जातो.
-
Bhartachya Las Nirmititil Pragatichi Goshta (भारता
"पाश्चिमात्य लोकांनी १७९६ साली लसींचा शोध लावला, त्याच्याही आधीच्या काही शतकांपासून भारतीय लोक ‘लस` टोचण्यात तरबेज होते. ‘भारताच्या लस-निर्मितीतील प्रगतीची गोष्ट’ हे पुस्तक एडवर्ड जेन्नर यांच्या काळापासून ते कोविड-१९ साथीपर्यंतच्या लसींच्या प्रवासाचा आलेख उलगडून दाखवते; ज्यात लसींच्या बाबतीतल्या भारतीय दृष्टिकोनापासून ते जागतिक दृष्टिकोनापर्यंत, लसींचे अनेक पैलू समाविष्ट आहेत. लस नेतृत्व, लसींच्या बाबतीतला राष्ट्रवाद, लस घेण्याबाबतची अनिश्चितता, उत्सुकता आणि नि:पक्षपात, तसेच अगदी अलीकडची ‘राजनैतिक चलन` ठरलेली ‘लस-मैत्री`, या सगळ्या गोष्टींचा उहापोह तर या पुस्तकात केलेला आहेच, पण त्याचबरोबर, जगातली सर्वांत मोठी व्यापक अशी लसीकरण मोहीम राबवताना भारताने जे अगदी बारकाईने विचार करून काळजीपूर्वक आणि काटेकोर असे लक्षवेधक नियोजन केले होते, त्यांची संपूर्ण माहिती हे पुस्तक वाचकांना करून देते."
-
The Golden Age (द गोल्डन एज)
या कादंबरीचे नायक-नायिका आहेत फ्रॅंक आणि एल्सा. ‘द गोल्डन एज’ या पोलिओग्रस्त मुलांवर उपचार करणार्या ऑस्ट्रेलियातील संस्थेत या दोघांची भेट होते आणि ते परस्परांच्या प्रेमात पडतात. मेयेर आणि इडा हे फ्रॅंकचे आई-वडील. जॅक आणि मार्गारेट हे एल्साचे आई-वडील, यांच्यासह या संस्थेतील परिचारिका लिद्जा, ऑलिव्ह, तसेच या संस्थेत राहणारी मुलं इ. यांचंही जीवन त्यांच्या व्यक्तिरेखांसह या कादंबरीतून उलगडतं. पोलिओग्रस्त मुलांना उपचारांबरोबर सकारात्मकता देणारी ही संस्था आहे. एका परिचारिकेला एकदा फ्रॅंक आणि एल्सा एका अंथरुणात नको त्या अवस्थेत सापडतात. मग त्या दोघांना संस्थेतून काढून टाकल्यामुळे ते आपापल्या घरी परत येतात; पण एकमेकांसाठी झुरत राहतात. इडा मार्गारेटशी संपर्क साधून फ्रॅंक आणि मेअरसह एल्साच्या घरी जाते. एल्सा आणि फ्रॅंकची भेट होते. अतिशय साध्या कथानकातून उच्च भावनिक स्तरावरचा आनंद देणारी कादंबरी.
-
An Incomplete Life By Vijaypat Singhaniya (अन इनकॉ
विजयपत सिंघानिया म्हणजे भारतीय उद्योगसमूहातलं अग्रगण्य नाव. पण त्यांची ओळख फक्त रेमंड उद्योग समूहापुरती मर्यादित नाही. हा उद्योगपती ओळखला जातो त्याच्या अगम्य जिद्दीसाठी. मग ते हॉट एअर बलुनमधून ६९ हजार फुटांवरून उड्डाण घेणं असो वा छोट्या विमानातून केलेला विमान प्रवासाचा विक्रम असो. विजयपत आपल्या जीवनप्रवासातून नवा आदर्श घालून देतात. तर त्याच वेळी कौटुंबिक पातळीवर एका हतबल पित्याची कहाणीही ते सांगतात. आपल्या जीवनानुभवांवर कोणताही पडदा न टाकता अभिनिवेषहीन पद्धतीने मांडलेलं त्यांचं हे आत्मकथन म्हणूनच वाचकांवर मोहिनी टाकणारं ठरतं.
-
Adharmakand (अधर्मकांड)
या कादंबरीचे कथानक आहे सोळाव्या शतकातले. जेव्हा गोव्यातील काही भागावर पोर्तुगीजांची सत्ता होती. राय गावातील जमीनदार पिएदाद (मूळचा वासू पै) पोर्तुगिजांच्या पूर्णपणे गुप्त असलेल्या तुरुंगात (मोठं घर) एका ओढूनताणून लावलेल्या आरोपाची सजा भोगतोय. इंक्विझिटरसमोर न केलेल्या गुन्ह्याची कबुली तो देत नाहीये. पाशवी वागणूक मिळते त्याला तिथे. त्याची पत्नी पिएदाद (गोमती) धर्मांतराच्या धक्क्याने आणि मुलांच्या वियोगाने भ्रमिष्ट होते आणि त्यातच तिचा अंत होतो. एकतर धर्मांतर करा, नाहीतर गाव सोडून जा, या पोर्तुगीजांच्या कुटिल नीतीला बळी पडलेलं पिएदादचं कुटुंब हे एक प्रातिनिधिक उदाहरण. धर्मांतरामुळे लोकांच्या मनाची होणारी घुसमट, हिंदूंना लग्नसोहळे साजरे करण्यास बंदी, मोठ्या घरातील वैÂद्यांचं जीवन, त्यातील काहींना जाहीरपणे जिवंत जाळण्याची शिक्षा (कायतानलाही शेवटी तीच शिक्षा मिळते), अशा जुलमी वातावरणाचं आणि त्यात होरपळणार्या माणसांचं ज्वलंत चित्रण करणारी, अंतर्बाह्य हलवून टाकणारी कादंबरी.
-
Coronanatarche Udyogvishwa (कोरोनानंतरचे उद्योगविश
डॉ. गिरीश वालावलकर यांनी लिहिलेले `कोरोना नंतरचे उद्योग विश्व ` हे पुस्तक येत्या काळात आवश्यक असलेल्या उद्योजकीय मानसिकतेचा, कष्टाचा, जिद्दीचा आणि संधींचा संदर्भग्रंथ आहे. त्याच बरोबर उद्योजक बनण्याची प्रेरणा नवोदितांना यामधून नक्कीच मिळेल. गोष्टीरूप उद्योग कथा नेहमीच जास्त परिणामकारक होतात हेच नेमके ह्या पुस्तकाने साधले आहे. उद्योग यशस्वी होण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात त्याचा धांडोळा हे लिखाण अप्रत्यक्षपणे घेते. भांडवल, ग्राहकसेवा, वस्तू किंवा सेवेचा दर्जा, जाहिरात तंत्र, वितरणाचे आयोजन अशा उद्योगावश्यक गोष्टी अनेक संदर्भातून समोर येतात. कोरोनानंतरचे जग नोकरी मागणाऱ्याऐवजी नोकरी देणाऱ्यांचे असेल यावर भर देणारे हे लेखन आहे.
-
Anuwadatun Anusarjanakade (अनुवादातून अनुसर्जनाकडे
लीना सोहोनी यांनी त्यांचा अनुवाद क्षेत्रातील प्रवास या पुस्तकातून मांडला आहे. तो सांगताना त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, अनुवादाच्या क्षेत्रातील पदार्पण आणि जीवनाला मिळालेली कलाटणी, अनुवादासाठी पुस्तकं कशी निवडावीत, इ. बाबींकडे त्यांनी या पुस्तकाच्या पहिल्या भागातून लक्ष वेधलं आहे. दुसर्या भागात त्यांनी सुनील मेहता, अनिल मेहता, सुधा मूर्ती, किरण बेदी, जेफ्री आर्चर या व्यक्तिमत्त्वांबद्दल लिहिलं आहे. तिसर्या भागात अनुवाद कलेची पार्श्वभूमी, अनुवाद आणि भाषांतर, अनुवादाची तंत्रे, अनुवादाचे स्वरूप, अनुवादाचे वर्गीकरण, साहित्यिक अनुवाद आणि त्याच्याशी संबंधित समस्या इ. मुद्द्यांचं सविस्तर विवेचन केलं आहे. पुस्तकाच्या चौथ्या भागात ‘भाषा आणि व्याकरण’ आणि ‘अनुवादात हरवलेल्या गोष्टी’ हे मुद्दे स्पष्ट केले आहेत. या पुस्तकात आवश्यक तिथे सुयोग्य उदाहरणांचा वापर त्यांनी केला आहे. स्वत:चे अनुभव व्यक्त करतानाच अनुवादासंबंधीचं सखोल मार्गदर्शन त्यांनी केलं आहे. सर्वसामान्य वाचकांना हे पुस्तक आवडेलच; पण अनुवादाच्या क्षेत्रात पदार्पण करू इच्छिणार्या आणि या क्षेत्रात नवोदित असलेल्यांना हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल.
-
Golmaal (गोलमाल)
‘‘हे पहा, बाहेर टळटळीत दुपार आहे. उजेड नुसता पावसानं कोसळणाऱ्या दरडीसारखा अंगावर कोसळतोय. तरीही तो बाहेरच ठेवून इथं मिट्ट काळोख केल्याशिवाय तुम्हाला काही दिसत नाहीय. मघाशी तुम्हाला दिलेली कॉफी जीभच काय पण हातही भाजेल इतकी कडकडीत होती. त्यात पाक होण्याइतपत साखर घातली होती; पण ती तुम्हाला प्रेतासारखी थंडगार आणि खारट लागली. उलट तुम्हाला दिलेल्या दुसऱ्या कपात बर्फाचा खडा आणि चमचाभर मीठ घालताच ती तुम्हाला व्यवस्थित वाटली. आज उन्हाळ्याचा कडाका आहे. रेकॉर्ड ब्रेक करणारं टेम्परेचर आहे. आणि तुम्ही अर्धा डझन ब्लँकेट्स अंगावर घेऊनही थंडीनं कुडकुडताय. मी तुमच्या गालावर सॅन्डपेपर फिरवला तेव्हा तुम्हाला कोणीतरी मोरपीस फिरवल्यासारखं हुळहुळलं. उलट कापसाच्या बोळ्यांत कोणी टाचण्या का ठेवल्यात म्हणून तुम्ही बोंब ठोकलीत. निरनिराळे रंग मी तुम्हाला दाखवले तेव्हा जांभळ्याच्या ठिकाणी तुम्हाला पिवळा दिसला, तांबड्याच्या जागी हिरवा आणि नारिंगीच्या ऐवजी निळा. आता समजलं, तुम्हाला काय झालंय ते?’’
-
Asa Asava Jodidar (असा असावा जोडीदार)
एलियट काट्झ यांनी ‘बीइंग द स्ट्राँग मॅन ए वुमन वाँट्स’ या विचारांना चालना देणार्या पुस्तकात ‘महिलांना नेमकं काय हवं असतं?’ या मुद्द्याचा वेध घेतला आहे. एका निरोगी स्त्रीला कणखर पुरुष हवा असतो. निर्णय घेईल असा पुरुष, ज्याच्यावर अवलंबून राहता येईल असा पुरुष, आपल्या जवळच्या माणसांसाठी सर्वोत्तम असंच ठरवेल असा पुरुष, योग्य गोष्टी करेल असा पुरुष - केवळ सोप्या, लोकप्रिय, फायदेशीर गोष्टी करणारा नाही. अनादि काळापासूनच्या शिकवणीतून, काट्झ यांनी वाचकांचा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. स्त्री-पुरुषांच्या भूमिकांबाबत सध्या होत असलेल्या चर्चांतून निर्माण झालेला संभ्रम. हजारो वर्षांपासूनच्या उपयुक्त तत्त्वांचा आधार घेऊन, अधिकार न गाजवता, अपमानास्पद न वागवता, नियंत्रित करण्याचा प्रयत्न न करता, महिलांना हवा असलेला पुरुष कसं बनायचं, हे काट्झ यांनी आधुनिक पुरुषांना सांगितलं आहे.
-
Mothyanchya Chotya Goshti (मोठ्यांच्या छोट्या गोष्
माणूस आपल्या कर्तृत्वावर मोठा होतो. त्यांचा आदर्श, त्यांचे कार्य, त्यांची थोरवी समाजाला प्रेरणा देते. विविध क्षेत्रांतील निवडक ३२ व्यक्तींच्या आयुष्यांतील या छोट्या गोष्टी. सहज लक्षात ठेवण्यासाठी. गोष्टीच्या पहिल्या भागात त्या थोर महापुरुषाची धावती, सारभूत ओळख. त्याच्या महान कार्यावर एक प्रकाशझोत. नंतरच्या भागात त्याच्याशी संबंधित असलेली घटना, प्रसंग अशी मांडणी केलेली आहे. प्रामुख्याने माध्यमिक शाळेतील विविध स्पर्धा डोळ्यांसमोर ठेवून केलेले हे लेखन लहान-थोर दोघांनाही आवडेल. शिक्षकांना, पालकांनाही त्याचा उपयोग होईल.
-
Aku-Aku (आकु-आकु)
‘आकू आकू’ पुस््तकाचे लेखक थॉर हेयरडाहल यांनी पॉलिनेशियन लोकांच्या उत्पत्ती सिध्दांताबद्दलचा रहस्यमयता उलगडून दाखविली आहे. जगाचे टोक गाठायला निघालेली ही शोधमोहीम ‘प्रशांत महासागरा’कडे निघते व ‘ईस्टर बेटा’वरील यूकेचा भाग जगातील अतिशय दुर्गम वस्तीचा. चिलीच्या महाद्विप किनार्याचे हे अंतर ३७०३ कि.मी. ‘इस्टर संडे’-१७२२ रोजी डच प्रवासी जेकब रोगवेन याने या बेटाचा शोध लावला. ही मोहीम राक्षसांचे व लंबकर्ण जमातींचे गुपित जाणून घेते.पुतळे स्वत: ठिकाणे बदलतात,असे म्हटले जायचे. ‘रानोराराकू’ च्या ज्वालाकुंडावर उभे राहून शोधमोहिम गवताळ बेटाचे नयनरम्यदृश्य पाहते. पाण्याने भरलेला ज्वालामुखी म्हणजे-‘रानोराराकू’, हे जगातले सर्वांत मोठे कोडे.‘आकु-आकु’ म्हणजे भूत-सैतान किंवा आत्मा. यांना ‘वरुआ’ही म्हणतात. प्रत्येकाचा ‘आकु-आकु’ स्वत:शी संवाद साधतो. ‘इस्टर बेटा’ च्या ‘रापानुई ’ पौराणिक कथेतील हे मानवीय आत्मे असून, ते आपल्या बांधवांशी बोलतात.मेयर आपल्या आजीच्या ‘आकु-आकु’शी बोलायचे. ईस्टर बेटाच्या पहिल्या राजाच्या पूर्वजांची ही कहाणी ‘मायथॉलॉजी-मिथक विद्या,’ ‘आकु-आकु’ तून दंतकथेप्रमाणे वाचकांसमोर येते.
-
Icon (आयकॉन)
बलाढ्य रशिया अराजकतेच्या चक्रात सापडतो. समाजजीवन गढूळ होते. जनता दु:खसागरात लोटली जाते. अशा भावूक स्थितीत देशाला तरून नेणारा तारणहार नेता-‘इगॉर कोमारोव्ह’ समोर येतो. कोमारोव्हची प्रभावी भाषणे, आत्मीयता पाहून, योग्य नेता मिळाल्याचा आनंद रशियन जनतेला होतो. रशियाचा सुवर्णकाळ आता दूर नाही, असे स्वप्न लोक पाहतात... आणि एकदमच रहस्यमय, ‘काळ्या जाहीरनाम्या’ चा बोलबाला होतो. कोमारोव्हने गुप्तपणे लिहलेला ‘काळा जाहीरनामा’ चोरीस जातो. त्याचे हिटलरशाही राबवायचे मनसुबे कोसळतात. ‘काळा-रहस्यमय जाहीरनामा’ ब्रिटिशांच्या हाती लागतो. जाहीरनामा अनधिकृत असल्याने पाश्चात्य राष्टे कारवाई करू शकत नाहीत. पण ‘कॉन्सिल ऑफ लिंकन’ हा प्रभावी आंतरराष्ट्रीय समुदाय, अनधिकृत अस्तित्व नाकारणारा गट. हा गट ‘गुप्तहेर यंत्रणेचे-सीआयए’ चे ‘जेसन मंक’ यांची प्रतीक-आयकॉन-म्हणून निवड करतात. ही महान कामगिरी मंक यांचेवर सोपवल्याने इमॉर कोमारोव्हचे दुष्ट मनोरे गळून पडतात. जेसन मंक त्याची कृष्णकृत्ये शोधून ती धुडकावून लावतात. कोमारोव्हचा पर्दापाश होऊन हिटलरशाहीला पायबंद बसतो, हे ‘आयकॉन’ ही कादंबरी सांगते.
-
Mumbai After Ayodhya (मुंबई आफ्टर अयोध्या)
गेल्या तीन दशकांत मुंबईने जे अनपेक्षित असे पाहिले, भोगले, अनुभवले त्याचा दस्तऐवज म्हणजे हे पुस्तक. अयोध्या घटनेनंतर माफिया जगतातील घडामोडींनी समाजकारण आणि राजकारणही बदलले. सोबतच मुंबईचे भौगोलिक रूपदेखील बदलले. नवीन उपनगरांची आणि वस्त्यांची निर्मिती झाली. शहर दंगलीतून बाहेर पडून नि:श्वास सोडत नाही, तोच पुन्हा २००२मध्ये झालेली बॉम्बस्फोट मालिका आणि २००८मधील २६/११चा दहशतवादी हल्ल्यामुळे हिंसेने परमोच्च सीमा गाठली. जीतेंद्र दीक्षित हे याच शहरात जन्माला आले आणि इथेच वाढले. ज्या तीन दशकातील घडामोडींबद्दल त्यांनी वर्णन केले आहे, त्यातील बराच काळ त्यांनी स्वत: अनुभवला आहे. त्यांचे हे पुस्तक म्हणजे जणू मुंबई शहराची आत्मकथा. गिरण्यांचे शहर ते मॉलचे शहर झालेली मुंबई, इथे गगनचुंबी इमारती वैÂक पटींनी वाढल्या. शहराची जीवनवाहिनी असणारी लोकल ट्रेन लांबीने वाढतच गेली, तरीही गर्दीला सामावून घेणे, मुंबईला अवघड जात आहे. जगातील सर्वांत मोठं सिनेजगत असणारं बॉलिवुडही या विळख्यातून सुटले नाही. इथं चित्रपटकारांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. येथील पारंपरिक, ऐतिहासिक गणेशोत्सव आणि दहीहंडीसारखे उत्सव भक्तिभावरहित झाले आहेत आणि त्यांचे व्यापारीकरण झाले आहे. अत्यंत महत्त्वाचे घटनाक्रम, शहराला मुंबई म्हणून घडवणार्या लोकांची माहिती आणि मुंबईच्या व्यक्तिमत्त्वातील बदलाचे वर्णनही या पुस्तकात अनुभवास येते. शहराची भौगोलिक स्थिती, नागरी समस्यांचा चढता आलेख, गजबजलेले अर्थकारण, रिअल इस्टेटचा बुजबुजाट आणि राजकारणाची शंभर शकले, असे सगळे एकत्रित वाचायला मिळते.
-
Maharudra (महारूद्र)
पहिल्या प्रयत्नातच कुशल खेळाडूप्रमाणे कुठल्याही खेळाची लय भीमरावांना साधत असे. या दैवी देणगीला कठोर कष्टांची जोड देऊन भीमरावांनी फुटबॉल बहरवला. या खेळाचा स्थायीभाव आहे, त्या खेळाची विलक्षण गती. भीमरावांना सहजसाध्य असलेले अनेक खेळ होते, परंतु फुटबॉलकडे लक्ष द्यायचं असं न ठरवताही भीमराव फुटबॉलमध्येच रमले. कारण या खेळाची नैसर्गिक गती आणि भीमरावांच्या व्यक्तिमत्त्वातील असामान्य वेग यातील ताळमेळ सहज होता. फुटबॉलमध्ये नावारूपास येणं हे त्यांच्या अंतर्बाह्य व्यक्तिमत्त्वाचं सहजसुंदर प्रकटीकरण होतं. फुटबॉलशी त्यांचं नातं ही सर्वात नैसर्गिक गोष्ट होती.
-
Solapur Malshal Law 1930 (सोलापूर मार्शल लॉ १९३०)
"सत्याग्रहाची विलक्षण देणगी महात्माजींनी देशाला दिली. महात्माजींच्या सत्याग्रही तंत्राचा पूर्ण विकसित अविष्कार १९३० सालच्या सोलापूरच्या स्वातंत्र्यलढ्यात दिसला. याची अखेर महात्माजींच्या कल्पनेतले ‘लोकराज्य` सोलापूरात अस्तित्वात येण्यात झाली. चाणाक्ष साम्राज्यसत्तेने यामधला धोका ओळखत सोलापूरात मार्शल लॉ जारी करून तब्बल एकोणपन्नास दिवस राबवला. सोलापूरात जे घडले ते सोलापूरबाहेर कधी आलेच नाही. खुद्द महात्माजींना व त्यांच्या अनुयायांना आपल्या सत्याग्रही तंत्राचा हा विजय अखेरपर्यंत समजला नाही. समज गैरसमजाच्या या कल्लोळात सोलापूरच्या लढ्याबाबतची तमाम भारतीयांची धारणा ही सिसेरोच्या वरील वचनाप्रमाणे राहिली. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात सुवर्णपान ठरावे अशी ही घटना सजगपणे नोंद न झाल्याने विस्मृतीच्या अडगळीत गेली. सोलापूर मार्शल लॉ १९३० या पुस्तकात या अज्ञाताचा शोध घेतलेला आहे. "
-
Swamikar (स्वामीकार)
सरदार घराण्यात जन्मूनही लेखणी हातात घेतलेले रणजित देसाई...पद्मश्रीसारखा नागरी सन्मान मिळालेला साहित्यिक...लहानपणीच मातृसुखाला मुकलेल्या रणजितजींनी आपल्या दोन्ही मुलींना आईचंही प्रेम दिलं, दोन्ही मुलींबाबतची कर्तव्यं मन:पूर्वक निभावली. कनवाळू पिता, दिलदार मित्र, कोवाडच्या लोकांवर मायेची पाखर घालणारा गावप्रमुख, मेहता पब्लिशिंग हाऊसशी घट्ट ऋणानुबंध असलेला लेखक, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे यांच्यासारख्या कलावांतांशी स्नेहबंध जोडणारा कलासक्त रसिक, प्रचंड लोकप्रियता लाभून, मानसन्मान मिळवूनही मनाचं नितळपण जपणारा माणूस... तर रणजित देसाई यांच्या व्यक्तिमत्त्वाचे त्यांच्या कन्या मधुमती शिंदे यांनी हृद्यतेने उलगडलेले हे पैलू आहेत.
-
The Art Of Choosing (द आर्ट ऑफ चूझिंग)
निवडप्रक्रिया...जीवनातील एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया. निवड करण्याची कला काय काय नाही करत? ती तुमच्या व्यक्तिमत्त्वाला, जीवनाला आकार देते. अगदी दैनंदिन जीवनातील गोष्टींपासून ते जीवनातील महत्त्वाच्या निर्णयापर्यंत हे निवड करण्याचं कौशल्य तुम्हाला उपयुक्त ठरतं आणि तुमच्या जीवनात सुसूत्रता आणून तुम्हाला आनंदही देतं. क्षेत्र कुठलंही असो, निवडीची कला तुम्हाला यशस्वितेच्या मार्गावर नेऊन ठेवते. तर असं सुसूत्र, आनंदी, समतोल, यशस्वी जीवन साध्य करायचं असेल तर ‘द आर्ट ऑफ चूझिंग’ हे पुस्तक तुम्हाला नक्कीच मदत करेल; कारण हे पुस्तक करतं निवडीची कला अंगात कशी बाणवावी याचं शास्त्रशुद्ध मार्गदर्शन. शीना अयंगार यांनी अंध असूनही डोळस लोकांच्यात वावरून आपलं ‘निवडप्रक्रिये’चं संशोधन चिकाटीने पूर्णत्वास नेलं व सत्य निष्कर्ष काढून जगासमोर ठेवले. अर्थातच या निष्कर्षांना सुयोग्य अशा उदाहरणांची जोड दिली आहे
-
Eka Aparichit Gandhichi Aatmakatha (एका अपरिचित गा
नटवर गांधी यांचं हे आत्मकथन आहे. गुजरातमधल्या एका खेड्यातून मुंबईत येऊन त्यांनी बी.कॉम.पर्यंत घेतलेलं शिक्षण, ओढग्रस्तीची आर्थिक परिस्थिती, धाकट्या सहा भावंडांची जबाबदारी त्यांनी घ्यावी, अशी वडिलांची अपेक्षा, नोकरीसाठीचा संघर्ष, लग्नानंतर भाड्याच्या एका खोलीसाठी करावा लागलेला संघर्ष, तुटपुंज्या पगारात प्रपंच चालवताना होणारी असह्य ओढाताण, अशातच अमेरिकेत मित्राच्या मदतीने एम.बी.ए.साठी मिळालेला प्रवेश, एम.बी.ए.नंतर अमेरिकेत प्रोफेसरची मिळालेली नोकरी, यथावकाश अमेरिकेत स्वत:चं घर, गाडी, अपत्यांसह संपन्न जीवनाचा घेतलेला अनुभव, तेथील नोकरीचे, पीएच.डी.चे अनुभव, वॉशिंग्टन डी. सी.च्या टॅक्स विभागात कमिशनर आणि सीएफओ पदावर केलेलं महत्त्वपूर्ण काम, अमेरिका आणि भारताची विविध बाबतीत तुलना इ. बाबींतून ओघवत्या भाषेतून हे आत्मकथन उलगडत जातं. तत्कालीन मुंबई, तत्कालीन अमेरिकेचं दर्शन घडतं. अंतर्मुख करणारं प्रेरणादायक आत्मकथन.
-
The New BJP (दि न्यू बीजेपी)
"२०१४ पासून भाजपने केंद्र आणि राज्य दोन्ही पातळ्यांवर निवडणुकांमागे निवडणुका जिंकल्या आहेत. हे त्यांच्या हिंदू परिघापलीकडच्या विस्ताराचे संकेत आहेत. प्रश्न असा आहे की, जात, धर्म आणि लिंगाधारित विभागणीच्या पुढे जात इतके लोक अनाकलनीय आक्रमक हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या पक्षाला मत का देतात? त्यांच्या बहुचर्चित विकास योजनांमध्ये दोष काहीही असोत, त्या योजनांच त्यांच्यासाठी लक्षवेधी ठरताहेत का? की आरएसएस केडरचे सक्रिय एकत्रीकरण कारणीभूत ठरतेय? या आकर्षक सुधारणावादी इतिहासात, राजकीय शास्त्रज्ञ आणि पत्रकार नलिन मेहता भाजप हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष कसा बनला याचे परीक्षण करतात. पक्षाच्या हिंदुत्वाच्या राजकारणाच्या नेहमीच्या कथनाच्या पलीकडे जाऊन नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात त्यांनी स्वत:च्या सोशल इंजिनिअरिंगचा ब्रँड वापरून भारतीय राजकारणाचा आकार कसा बदलला हे स्पष्ट केले. ही पुनर्रचना चतुराईने नवीन जातीय युती, उपेक्षित सामाजिक गटांवर लक्ष केंद्रित करणार्या नवीन कल्याणकारी राज्याचा दावा आणि महिला मतदारांचा आधार बनवण्याद्वारे करण्यात आली. भारतीय राजकीय पक्षांच्या जातीय रचनेचा अभ्यास करणार्या तीन अनन्य निर्देशांकांच्या डेटावर आधारित मांडणी मेहता करतात. पक्ष आणि देश या दोहोंच्या कार्यपद्धतीबद्दल द न्यू बीजेपी पुस्तक चकित करणारी नवी अंतर्दृष्टी देते. पूर्वी न वापरलेल्या ऐतिहासिक नोंदी, पक्षाच्या नेत्यांच्या विशेष मुलाखती आणि संपूर्ण भारतातील सर्वसमावेशक अहवाल यातून देशातल्या राजकीय स्थित्यंतराचा आलेखच समोर येतो. भाजप आणि आजच्या भारताचा स्पष्ट आणि वस्तुनिष्ठ अभ्यास करणारे हे पुस्तक आहे जे राजकीय विभाजनाच्या सर्व बाजूंनी सहभाग आणि वादविवादाची मागणी करते. "
-
Sex Scotch And Scholarship (सेक्स स्कॉच अँड स्कॉलर
खुशवंत सिंग म्हणजे एक बहुरंगी आणि बहुढंगी असे व्यक्तिमत्त्व, साहित्य, इतिहास, संस्कृती, तत्त्वज्ञान आणि विविध विषयांवरील स्तंभलेखन यामुळे ते भारतात व परदेशातही वाचकप्रिय लेखक आहेत.‘सेक्स, स्कॉच अँड स्कॉलरशिप’ या त्यांच्या निवडक लेखसंग्रहात काही सेक्स, थोडी स्कॉच आणि बरंच काही स्कॉलरशिप, अशा विषयांवरील लेख आहेत. त्यांचे निसर्गप्रेम, पंजाब प्रश्नाबाबतची आस्था, जगातील सर्व धर्मांचा अभ्यास आणि त्याचबरोबर स्वत:च्या शीख धर्माचे संशोधन, या विषयांवरील अभ्यासपूर्ण आणि उत्कट विवेचन ही या संग्रहाची वैशिष्ट्ये आहेत. खुशवंत सिंग यांचे खास खुसखुशीत आणि परखड शैलीत केलेले स्वत:चे सविस्तर असे लिखाण हे या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. किंबहुना खुशवंत सिंग यांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रांपैकी हे परिपूर्ण असे व्यक्तिचित्र आहे. खुशवंत सिंग यांच्या ‘सेक्स, स्कॉच अँड स्कॉलरशिप’ या पुस्तकातील एकूण लेखनाचा केंद्रबिंदू हा ‘माणूस’ आहे, म्हणून हे लेख वाचताना प्रत्येकजण नकळत अंतर्मुख होतो.
-
Manjirya (मंजिऱ्या)
श्री. वि.स.खांडेकरांच्या सतरा ललित गद्यलेखांचा हा संग्रह आहे. श्री. खांडेकरांनी लेखनास प्रारंभ केला, तो साप्ताहिकातून. सावंतवाडीच्या `वैनतेय` या साप्ताहिकात ते नियमितपणे लिहीत असत. त्यानंतर `अखंड भारत` या साप्ताहिकात त्यांनी असेच सातत्याने लेखन केले. लघुनिबंधाशी जवळचे नाते सांगणारे हे लेखन आहे. त्यातील विषय प्रासंगिक स्वरूपाचे असले, तरी त्यावरील हे लेखन चिंतनगर्भ असे आहे. त्यावर श्री. खांडेकरांची स्वतंत्र अशी मुद्रा उमटलेली आहे. पंचाहत्तर वर्षांपूर्वींची मराठी संस्कृती कशी होती, याचे नेमके चित्रण या सतरा ललित गद्यलेखांच्या संग्रहातून अभ्यासू वाचकाला आढळेल.