-
Manzadhar (मंझधार)
वि.स.खांडेकर यांच्या ‘मंझधार’ या मूळ बृहदसंग्रहातून वेगळ्या काढलेल्या वीस लघुनिबंधांचा हा संग्रह आहे. काव्य, विनोद व तत्वज्ञान यांचा त्रिवेणी संगम साधण्याचा प्रयत्न या संग्रहात ग्रथित केलेल्या लघुनिबंधांत दिसतो. लघुनिबंधातली काव्यस्थळं मावळत्या सूर्याच्या सौम्य सोनेरी छटांसारखी असावीत, त्यांतला विनोद हा अर्धवट मिटलेल्या कमळांसारखा मोहक, पण नाजूक... पोट धरून हसवणारा नव्हे, नुसता गालाला खळी पाडणारा... असावा, आणि त्यातून सूचित होणारे तत्वविचार क्षितिजावर नुकत्याच चमकू लागलेल्या चांदण्यांप्रमाणे विरळ, पण सुंदर असावेत, अशा आदर्श लघुनिबंधांविषयीच्या खांडेकरांच्या धारणा होत्या. प्रत्यक्षात खांडेकरांच्या लघुनिबंधात तत्वदर्शन, भावनाविहार आणि कल्पनाविलास हे तीन गुण प्रकर्षानं आढळत असले, तरी आणखी एका महत्वाच्या वैशिष्ट्याचा उल्लेख आवश्यक आहे. तो आहे विचारशक्तीचा उच्छृंखल विलास. हा असा गुणसंपन्न लघुनिबंधसंग्रह वाचकांना नक्कीच मंत्रमुग्ध करील, असा विश्वास वाटतो.
-
Pahile Pan (पहिले पान)
श्री. वि. स. खांडेकर यांच्या मंझधार या मूळ बृहद्संग्रहातून वेगळ्या काढलेल्या वीस लघुनिबंघांचा हा संग्रह आहे. काव्य, विनोद व तत्वज्ञान यांचा त्रिवेणी संगम साधण्याचा प्रयत्न या संग्रहात ग्रथित केलेल्या लघुनिबंधात दिसतो. लघुनिबंधातील काव्यस्थळं मावळत्या सूर्याच्या सौम्य सोनेरी छटांसारखी असावीत, त्यातला विनोद हा अर्धवट मिटलेल्या कमळांसारखा मोहक, पण नाजूक... पोट धरून हसवणारा नव्हे, नुसता गालाला खळी पाडणारा... असावा, आणि त्यातून सूचित होणारे तत्त्वविचार क्षितिजावर नुकत्याच चमवूÂ लागलेल्या चांदण्यांप्रमाणे विरळ, पण सुंदर असावेत, अशा आदर्श लघुनिबंधाविषयीच्या श्री. खांडेकरांच्या धारणा होत्या. प्रत्यक्षात श्री. खांडेकरांच्या लघुनिबंधांत तत्त्वदर्शन, भावनाविहार आणि कल्पनाविलास हे तीन गुण प्रकर्षानं आढळत असले, तरी आणखी एका महत्त्वाच्या वैशिष्ट्याचा उल्लेख आवश्यक आहे. तो आहे विचारशक्तीचा उच्छृंखल विलास. हा असा गुणसंपन्न लघुनिबंधसंग्रह वाचकांना नक्कीच मंत्रमुग्ध करील, असा विश्वास वाटतो.
-
Ragini (रागिणी)
"‘मी एका ज्यू आईच्या पोटी जन्माला आलो. जर्मनीनं माझ्या शरीराचं पालनपोषण केलं. युरोपनं माझ्या आत्म्याला संस्कारसंपन्न बनवलं. धरणी हेच माझं घर आणि सारं जग हीच माझी पितृभूमी...’ अशा गौरवपूर्ण शब्दांत स्वत:विषयी प्रांजळ निवेदन करणा-या अन्स्र्ट टोलरनं तुरुंगातून लिहिलेल्या छोट्या छोट्या पत्रांचा हा स्वैर अनुवाद. मागच्या पिढीतल्या एका प्रतिभासंपन्न, ध्येयवादी आणि असामान्य अशा कलावंत क्रांतिकारक आत्म्यानं लिहिलेल्या या पत्रांमध्ये कवित्व आणि कर्तृत्व या दोन्ही दृष्टींनी प्रतिबिंबित झालेलं त्याचं व्यक्तित्व जेवढं कलापूर्ण, तेवढंच जीवनदर्शीही आहे. भोग आणि त्याग, प्रतिभा आणि प्रज्ञा, विचार आणि आचार, कठोरपणा आणि कोमलपणा यांच्या संगमात न्हाऊन निघालेल्या टोलरच्या व्यक्तित्वाचं समग्र दर्शन या पत्रांतून वाचकांना घडेल.
-
An Island (ॲन आयलंड)
"सॅम्युअल प्रदीर्घ काळापासून एकटा राहिला आहे. ठरावीक कालावधीनं सामानाचा पुरवठा करणारी बोट आणि भूतकाळात मुख्य भूमीवरून आलेले सरकारचे प्रतिनिधी यांनीच केवळ इथं भेट दिली आहे. तो दीपस्तंभाची व्यवस्था पाहतो आणि आपल्या कोंबड्या सांभाळत किनार्यावर येणार्या लाटा बघत राहतो. मग एका सकाळी, त्याच्या सोबतीसाठी आणि त्याच्या एकांतवासाला धोका निर्माण करण्यासाठी समुद्र कुणाला तरी घेऊन आला असल्याचं त्याला आढळतं... अपराधभाव आणि भीती, मैत्री आणि नकार यांविषयीची; तसंच `घर` या संकल्पनेच्या अर्थाविषयीची उत्कट आणि प्रभावी कादंबरी. "
-
Bhavgiri (भावगिरी)
मृत्यूच्या सावलीत सतत वावरणारी कोकणी माणसं भुताला घाबरत नसली, तरी त्यांच्या सभोवतालचे जग व त्यांच्या कुटुंबांच्या व्यथा-वेदना-दु:ख, काळजाला पीळ पाडते; कारण कोकणातील निसर्गसमृद्धी जरी आपल्याला वेड लावत असली, तरी परिस्थितीने गांजलेल्या माणसांची दुनिया तिथेही आहेच.गरिबीत दिवस काढूनही कोकणी माणूस काटेरी फणसासारखा आहे. वरून कठोर वाटला तरी त्याच्या हृदयात शहाळं असल्याची जाणीव कायमच दिसते. कोकण म्हणजे पिशाच्चांचं आगर समजलं जातं. मानवी प्रवृत्तीत जसा स्वार्थ-अधाशीवृत्ती दडलेली असते,तीच अतृप्त इच्छा मनात धरून भुतांच्या जगतातील विचित्र असे मानसिक व्रÂौर्य, बदला आणि अतृप्त आत्म्यांची घालमेल कोकणकथांतून आपल्याला दिसते. भावगिरी पर्वताचे दर्शन मनाला मोहवणारे, त्यामुळे माणूस कोकण प्रेमात पडला नाही तर नवलच! येथील जीवनानुभव, जीवनसंघर्ष नाट्यमयता, गूढगुंजनात्मकता कोकणचे गाणं बनते... मनात रुंजी घालते. ‘भावगिरी’ पर्वताशी केलेलं हे हितगुज म्हणजे आपल्या गावातील मातीशी असलेलं विश्वासाचं घट्ट नातं!
-
Room Number 312 Aani Itar Katha (रूम नंबर ३१२ आणि
देशभरातील नामांकित लेखकांनी लिहिलेल्या १९ खुमासदार कथांचा हा संग्रह. कथानकांमधले अजब ट्वीस्ट आणि रंगत प्रत्येक कथेत अनुभवास येते. मैत्री, नातेसंबंध, भयपट आणि अशाच गमतीशीर रोमांचित करणाऱ्या या कथा आहेत.
-
Amir Khusro (अमीर खुस्रो)
तेराव्या शतकातील भारतीय कवी, संगीतकार, संशोधक, तत्त्वज्ञानी व भाषातज्ज्ञ अबुल हसन यमीनुद्दीन ख़ुसरो. सुलतान जलालुद्दीन खिलजीने खुसरोंच्या काव्यरचनेवर खूष होऊन त्यांना `अमीर` हा किताब दिला. या अमीर खुस्रो यांची जीवनकथा उलगडणारे पुस्तक म्हणजे मिलिंद जाधव यांची ही नवी कादंबरी `अमीर खुस्रो`. खुस्रो यांचा जन्म सध्याच्या पंजाबातील पतियाळा येथे झाला. खुस्रोनी फारसी, हिंदवी आणि उर्दू मध्ये काव्यरचना व लिखाण केले. ते उर्दू भाषेतील पहिले कवी. खुस्रो उत्तर भारतीय संगीतातील खयाल गायकीचे, कव्वाली रचनांचे आणि गझल या काव्यप्रकाराचे जनक मानले जातात. खुस्रो दिल्लीच्या तत्कालीन सात सुलतानांचे दरबारी जाणकार, संगीतकार होते. मिलिंद जाधव यांनी खुसरोंच्या जीवनपटासोबतच तेव्हाच्या काळाला देखील वाचकांसमोर उभे केले आहे. खुस्रो यांच्या मूळ लेखनाच्या बरोबरीने त्या लेखनाची प्रक्रिया, खुस्रो यांचा दरबार, समाज आणि वैयक्तिक आयुष्यतील वावर, त्यांनी केलेल्या चर्चा, टीका यांचा समावेश कथानकात केला आहे. तत्कालीन उर्दू, हिंदवी भाषेचा लहेजा वापरत कादंबरीची भाषा नटवली आहे.
-
Manasa Ashi Aani Tashihi (माणसं अशी आणि तशीही)
माणसं...स्वार्थी...लोभी... वासनांध...दुष्ट...माणसं...माणुसकी जपणारी, प्रेम करणारी, िंचतावणारी, खंतावणारी, दुसर्याचं दु:ख जाणणारी, हसणारी आणि रडणारीही...अनंत परी माणसांच्या...टर्नर सिंड्रोमची समस्या असलेल्या कोट्यधीश अमृताशी लग्न करून संपत्ती की माणुसकी या कात्रीत सापडलेला निशिकांत...नवर्याकडूनच कुंटणखान्यात विकली गेलेली अनामिका...वार्धक्यातही कॉलेजमधल्या कुमुदची आठवण मनाशी जपणारा ‘तो’...नवर्याच्या अपघाती मृत्यूच्यावेळी त्याच्या बरोबर असणार्या तरुणीविषयीचं गूढ उलगडू पाहणारी ऊर्मिला...दोन खतरनाक गुंडांचा खात्मा करणारे मनोहर आणि मदिरा...भावनांच्या आणि विचारांच्या वादळात सापडलेली घटस्फोटित सविता...रोजच्या धावपळीने उबगलेला अशोक...प्रवासात एकमेकींना भेटलेल्या दोन तरुणी, पारंपरिक गौरी आणि आधुनिक सान्वी...पोलिसांनी पकडलेलं असतानाही फाटलेला शर्ट घालून इन्टरव्ह्यूला पोचणारा विठ्ठल...माणसं बहुरंगी आणि त्यांच्या कथा बहुढंगी.
-
Dnyanasuryache Akash-Sant Nivruttinath (ज्ञानसूर्य
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या चौघांच्याही जीवनाशी निगडित सर्व घटना याही कादंबरीत अपरिहार्यतेने येतात. निवृत्ती हे ज्ञानदेवांचे मोठे बंधू आणि गुरू, तसेच सोपान-मुक्ताईचेही मोठे बंधू. त्यामुळे या चौघांच्याही जीवनाशी निगडित सर्व घटना याही कादंबरीत अपरिहार्यतेने येतात; पण त्या घटनांकडे पाहण्याचा निवृत्तिनाथांचा दृष्टिकोन, भावंडांवर मायेची पाखर घालणं, ज्ञानदेवांचं गुरूपद स्वीकारणं इ. बाबींतून निवृत्तिनाथांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू या कादंबरीतून उलगडत जातात. निवृत्ति-ज्ञानदेव-सोपान-मुक्ताबाई या चार अलौकिक मुलांना जन्म देणार्या विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंचे ज्येष्ठ अपत्य म्हणून निवृत्तिनाथांचा जन्म होणं आणि तीन भावंडांना सामधिस्थ होताना त्यांना पाहावं लागणं, नाथपंथाची दीक्षा घेऊनही विठ्ठलभक्ती आणि भागवत धर्माशीही त्यांनी स्वत:ला जोडून घेणं, हेच निवृत्तिनाथांच्या जीवनातील वेगळेपण ही कादंबरी अधोरेखित करते.
-
Eden (ईडन)
ईडन एका अनोख्या भारतीय प्रिझममधून अब्राहमिक मिथकांच्या विशाल जगाचा शोध घेते, जिव्हाळ्याच्या, पण अपमानास्पद नसणाऱ्या अशा कथाकथनाद्वारे आणि वाचकांना देवदूत, राक्षस, संदेष्टे, कुलपिता, न्यायाधीश आणि राजांच्या अनेक मोहक कथांचा परिचय करून देते. हे मेसोपोटेमियन, इजिप्शियन आणि झोरोस्ट्रियन पौराणिक कथांच्या कथा देखील सांगते ज्यात पुढे अब्राहमिक एकेश्वरवादाचाही उल्लेख येतो. जगभऱच्या धर्माधारित कल्पनांचा अभ्यासपूर्ण आढावा या पुस्तकातून अनुभवता येतो.
-
Tawaifnama (तवायफनामा)
म्हटलं तर त्या मनस्वी कलाकार. साधनेचा सोस बाळगून कलेवर हुकूमत गाजवणाऱ्या रागरागिणी. पण काळओघात त्यांचं अवमूल्यन होत गेलं. एका समृद्ध परंपरेला नैतिकानैतिकतेच्या संकोची चौकटीत बसवलं गेलं. आणि अभिजात संगीत आणि नृत्यातल्या या सम्राज्ञी काळाच्या उदरात नामशेष होत गेल्या. हा प्रदीर्घ आणि जीवाला चटका लावणारा प्रवास सबा दिवाण लिखित ‘तवायफनामा’ पुस्तकातून वाचकांच्या भेटीस येतो. ज्यात बनारस आणि भभुआतल्या तवायफ कुटुंबाचा तब्बल शतकाहून अधिक काळाचा पट समोर येतो. १८५७च्या उठावात प्राणांची बाजी लावणाऱ्या धरमनबीबीपासून सदाबहार, गुलशन, उमराव, तीमा ते अलीकडच्या काळातील हिंदू-मुस्लिम तिढ्यात हकनाक वेदना सहन करणाऱ्या तवायफांच्या जगण्याचा आलेख पहायला मिळतो. शमादानच्या मंद उजेडासारख्याच यांच्या कथा अस्वस्थ करत राहतात आणि यातल्या पानागणिक ठुमरीचे आर्त स्वर खोल जखम करत राहतात.
-
Chamblechya Palikade (चंबळेच्या पलीकडे)
महादजी शिंदे...दौलतीची निरपेक्ष सेवा करणारे...अंतर्गत बंडाळ्यांमुळे व्यथित होणारे...राघोबादादांचा बिमोड करण्यासाठी, इंग्रजांना वठणीवर आणण्यासाठी, मोरोबा आणि बापूंचा नानांना गोत्यात आणण्याचा डाव उधळण्यासाठी, करवीरकरांचा बंदोबस्त करण्यासाठी नानांच्या मदतीला धावलेले ...नानांनी कोणत्याही प्रकारे सहकार्य न देता उलट महादजींचा द्वेष करूनही उत्तरेत मराठ्यांचं वर्चस्व प्रस्थापित करणारे...कवायती फौज पदरी बाळगणारे...नानांना वठणीवर आणण्यासाठी त्यांना उघडउघड शह देणारे...सवाई माधवरावांच्या पायी निष्ठा वाहणारे... इंग्रजांना शरण यायला भाग पाडणारे...भाऊसाहेब तोतया प्रकरणात मदतीला धावणारे...अहिल्याबाईंच्या विरोधात राघोबादादांना साथ देण्यास स्पष्ट नकार देणारे...नानांना दिलजमाई करण्यास भाग पाडणारे...दिल्लीच्या बादशहाला त्याच्या तख्तावर परत नेऊन बसवणारे... अशा महादजींच्या पराक्रमाची आणि स्वामिनिष्ठेची धगधगती कहाणी
-
Mazadache Jadugar (माझदाचे जादूगार)
"‘माझदाचे जादूगार’ ह्या पुस्तकाचं कथानक भूतकाळातून आणि विविध भौगोलिक वैशिष्ट्यांच्या प्रदेशातून वेड्यावाकड्या पद्धतीनं वाट काढत प्रवास करतं. हे कथानक, इस्लामिक जिहादचा कालखंड, मॅसिडोनियन सूडाचा कालखंड, अकिमेनिड साम्राज्याच्या वैभवाचं युग, प्रेषिताच्या जन्माचं युग, आर्यांमध्ये पडलेल्या फुटीचा कालखंड ... अशा कित्येक कालखंडांमधून चित्तथरारक प्रवास करत, अखेरीस ह्या सगळ्याची जिथून सुरुवात झाली होती, तिथे ... म्हणजेच वेदकालीन उगमापाशी येऊन पोचतं. ही अश्विन सांघी यांची आतापर्यंतची सर्वात प्रक्षोभक आणि मनाची पकड घेणारी कादंबरी आहे. "
-
The Princess (द प्रिन्सेस)
भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याच्या मार्गावर असतानाच्या संस्थानिकांच्या मानसिकतेचं चित्रण ही कादंबरी करते. त्या निमित्ताने त्या वेळचा संस्थानांचा कारभार, संस्थानिकाच्या पत्नीचं जीवन, संस्थानांमधील सामाजिक-सांस्कृतिक जीवन, तिथल्या चालीरीती, त्यांचा डामडौल इ. वर्णन या कादंबरीत येतं. दादा हे बेगवाड या छोट्याशा संस्थानाचे अधिपती. संस्थानिक असल्याचा अभिमान त्यांच्या नसानसांत भिनलेला असतो. त्यांचा मुलगा अभय लहानपणापासून संस्थानिक वातावरणात वाढलेला असतो. दादांचं आणि अभयचं वैवाहिक जीवन, त्यांची अंगवस्त्रं याच्या चित्रणातून संस्थानांमधील स्त्री-जीवन समोर येतं. हिंदुस्थानातून ब्रिटिशांची सत्ता हद्दपार होण्याच्या मार्गावर असताना संस्थानांचं अस्तित्व राहणार की नाही, असा प्रश्न निर्माण होतो आणि दादांमधला कट्टर संस्थानिक अस्वस्थ होतो. अभय मात्र होणार्या बदलांना सामोरा जायला तयार असतो. दादा हे बदल स्वीकारतात का? संस्थानांचं आणि संस्थानिकांचं प्रातिनिधिक, सर्वांगीण चित्रण करणारी कादंबरी.
-
Upchar Tan Manache (उपचार तन मनाचे)
सर्वांगीण विचार करता असे दिसते की, वैद्यकशास्त्राकडे पाहण्याच्या आधुनिक भौतिक विचारपद्धतीमुळे आपण जे काही करू शकतो, ते केवळ चमत्कार या श्रेणीत बसवावे असेच असते. प्रतिजैविके वापरून आपण जंतुसंसर्ग नाहीसा करू शकतो, रासायनिक उपचारांनी कर्करोगावर उपचार करू शकतो, पोलिओ, गोवर, कांजिण्या यांच्यापासून तसेच काही प्राणघातक रोगांपासून मुलांना वाचवू शकतो, रोगग्रस्त अवयव बदलू शकतो. मात्र, आपले मन हे सगळ्या रोगांवरचा रामबाण उपाय आहे; तसेच आपला आत्मविश्वास आणि आशा औषधापेक्षा अधिक चांगले कार्य करतात. साहजिकपणे आपले शरीर विविध रोगांसंदर्भात आणीबाणीचा सामना करत असताना आपल्यावर कमी ताण येतो आणि आपले शरीर स्वत:ची दुरुस्ती आणि वाढ यांच्याकडे अधिक लक्ष पुरवते. या एकाच मार्गदर्शक तत्त्वाच्या आधारे त्यांनी अनेक रोगांवरील नानाविध उपचारपद्धतींचा सखोल अभ्यास केला. मन आणि शरीर यांच्यावर एकत्रितपणे केल्या जाणार्या उपचारांबद्दल मिळालेली ही समग्र माहिती त्यांनी या पुस्तकाद्वारे वाचकांसमोर आणली आहे.
-
Man Vs Ocean (मॅन Vs ओशन)
"वैवाहिक आणि व्यावसायिक जीवनात अपयशी, असमाधानी असणार्या अॅडमला आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची ईर्ष्या होती. जीवनाला काहीतरी अर्थ द्यायचा होता; पण त्याला त्याचे ध्येय सापडत नव्हते आणि एका विमान प्रवासामध्ये अचानक त्याला ते सापडले. विमानप्रवासामध्ये ‘ ON A CLEAR DAY’ हा एका जलतरणपटूच्या इंग्लंडची खाडी पोहून जाण्याच्या प्रयत्नावर आधारित सिनेमा त्याच्या बघण्यात आला आणि त्याला त्याचे ध्येय सापडले. त्यानंतर इंटरनेटवर शोध घेत असताना ‘स्टीव्ह मुनाटोन्स’ या अमेरिकन जलतरणपटूने त्याच्या ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या जोरावर निवडलेल्या जगातील सर्वांत अवघड अशा, ज्याची तुलना गिर्यारोहणाच्या क्षेत्रातील सात उत्तुंग शिखरे चढून जाण्याशीच होऊ शकेल, अशा समुद्रातील सात आव्हानात्मक पोहण्याच्या जागांचा त्याला शोध लागला आणि त्याला त्याचे नेमके ध्येय सापडले. ही अॅडम वॉकरच्या जिद्दीची, सात समुद्री साहसांची, उत्कंठावर्धक आणि एक वेगळाच अनुभव देणारी कहाणी आहे."
-
Freedom On Fire (फ्रीडम ऑन फायर)
या कथासंग्रहातील सातही कथा रशिया-युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या वर्तमान युद्धाच्या पार्श्वभूमीवरील आहेत. ‘द ग्रेट डिक्टेटर’मधील अभिनेत्री / मॉडेल बार्बारा देशप्रेमाने भारून, युद्धात उतरून, रशिया-युक्रेन युद्धावर आधारित सिनेमाची निर्मिती करते; पण... ‘लव्ह, वॉर अॅन्ड...?’मधील घटस्फोटित अँजेलिना आणि सैनिक असलेल्या बोरिसचं वैवाहिक आयुष्य एक दिवसाचं ठरतं. बोरिस मारला जातो युद्धात; पण त्याचा वंश वाढत असतो अँजेलिनाच्या पोटात. मग अँजेलिनाच्या मनात पडतं महाकादंबरीचं बीज... ‘फ्रीडम ऑन फायर’मध्ये इगोर आणि सोफिया या पिता-पुत्रीच्या आंधळ्या रशियानिष्ठेला दिमित्री हा इगोरचाच मुलगा दाखवतो युक्रेनमधील विध्वंसाचा आरसा आणि मग सोफिया जाग आणू पाहते रशियनांना... ‘सच ए लाँग जर्नी’ मध्ये भारतीय शिवच्या मनात पाकिस्तानविषयी असलेल्या अढीमुळे माहजबिन ऊर्फ मून या पाकिस्तानी मुलीची दोस्ती स्वीकारायला तो तयार नसतो; पण युक्रेनमधील युद्धामुळे आपापल्या मायदेशी परतत असतानाच्या प्रवासात शिवचं मनपरिवर्तन होतं...रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे दोन्ही देशांतील नागरिकांच्या मनात उठलेल्या भावनिक/मानसिक संघर्षाच्या आणि राष्ट्रप्रेमाच्या उत्कट कथा THE RUSSIA-UKRAINE WAR HAS UNSETTLED THE ENTIRE WORLD. IN THIS LONG STRUGGLE, A SMALL COUNTRY LIKE UKRAINE IS PUTTING ALL THE EFFORTS. THESE STORIES HIGHLIGHT THE COURAGEOUS CITIZENS OF THIS COUNTRY AND THEIR STRUGGLE.
-
JRD - Ek Chaturastra Manus (जेआरडी - एक चतुरस्त्र
‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळालेले पहिले अन् एकमेव उद्योगपती जेआरडी टाटा यांनी उद्योगाचा विकास करताना ‘जे देशाच्या भल्याचे ते टाटांसाठी उत्तमच असेल’ हा विचार प्रधान मानला. नीतीमूल्यांची बूज राखत व्यवहार, उद्योग चालवणारे हात अन् मने जपणे, समाजातून मिळवलेली संपत्ती समाजाच्या विकासासाठी वापरणे, उद्योग उभा असलेल्या परिसराचा विकास ही टाटा उद्योगसमूहाची संस्कृती आहे. नव्याचे स्वागत करत जेआरडींनी अनेकजणांना घडवले, नव्या वाटा खोदल्या, नवे मापदंड निर्मिले. त्यांना लाभलेला उज्ज्वल वारसा, व्यक्तिमत्त्वाची जडणघडण, नवे आयाम मिळत विकसित झालेले त्यांचे समृद्ध, चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व याची ओळख या पुस्तकातील लेख करून देतात. विशेषत: अनेकविध भूमिकांना पुरून वर दशांगुळे उरणारा त्यांच्यातील सहृदय, रसिक, संभाषण चतुर, आनंदी ‘माणूस’ वाचकाला अधिक भावतो.
-
Replay (रिप्ले)
"अॅन्ड्र्यू स्टिलमनचा खून झाल्यापासून त्याचं आयुष्य पार बदलून गेलं. २०१२ च्या ९ जुलैच्या सकाळी, न्यू यॉर्क टाइम्सचा शोधपत्रकार अॅन्ड्र्यू स्टिलमन हडसन नदीच्या भागात जॉगिंगसाठी गेल्यावर त्याच्या पाठीच्या खाली अचानक तीव्र वेदना त्याला जाणवते. रक्ताच्या थारोळ्यात तो कोसळतो. त्याची शुद्ध परत येते तो दिवस असतो ७ मे, २०१२– म्हणजे दोन महिने आधीचा. त्याचा मृत्यू व्हावा आणि का व्हावा, असं कुणाला वाटतं, याचा शोध घेण्यासाठी अॅन्ड्र्यूकडे आता बासष्ट दिवस उरले आहेत. त्याचं स्वतःचं आयुष्य वाचवण्यासाठी त्याला एक संधी आहे. न्यू यॉर्क सिटी ते ब्यूनॉस आयरिसच्या प्रवासात अॅन्ड्र्यूची काळाविरुद्धची शर्यत वाचकांच्या मनाची चांगलीच पकड घेते. कौशल्यपूर्ण रचना असलेली आणि चातुर्यानं सांगितलेल्या या रोमांचक कहाणीचे लेखक आहेत फ्रान्सचे सर्वांत लोकप्रिय समकालीन कादंबरीकार. कथेचा शेवट अविस्मरणीय रीतीनं करतात. "
-
Heads You Win (हेड्स यु विन)
अलेक्झांडर कारपेन्कोला बालपणापासूनच स्पष्ट दिसत असतं की, तो देशवासीयांचं नेतृत्व करण्यासाठीच जन्माला आला आहे; पण राज्य वाचविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्याच्या वडिलांची ‘केजीबी’द्वारे हत्या होते, तेव्हा जीव वाचविण्यासाठी त्याला आपल्या आईबरोबर रशियातून पळ काढावा लागतो. गोदीवर त्यांच्यासमोर दोन पर्याय असतात – त्यांनी अमेरिकेला जाणार्या जहाजाच्या कंटेनरमध्ये चढावं की ग्रेट ब्रिटनला जाणार्या, याची निवड अलेक्झांडर नाणं उडवून करतो... एका क्षणात, अलेक्झांडरच्या भविष्याला दुहेरी कलाटणी मिळते. दोन खंड आणि तीस वर्षांच्या काळाची व्याप्ती असलेल्या या भाग्य आणि भविष्याच्या दंतकथेमध्ये, एक स्थलांतरित म्हणून नवीन जगावर राज्य करण्याच्या त्याच्या जय आणि पराजयाच्या हिंदोळ्यांवर आपणही स्वार होतो. अलेक्झांडरची ही अद्वितीय कथा उलगडत असताना, आपल्या नशिबात काय लिहिलं आहे याची त्याला जाणीव होते आणि शेवटी रशियातील भूतकाळ आपली पाठ सोडणार नाही, हे तो स्वीकारतो.
-
Ice Station Zebra (आइस स्टेशन झेब्रा)
ही एक रहस्यकथा/थरारकथा आहे. आइस स्टेशन झेब्रा या बर्फावर उभारलेल्या तळावर एक मोठी आग लागून तिथे राहून काम करणारे अनेक जण मरण पावले किंवा भयंकर जखमी झाल्याची खबर येते. त्यांना वाचवण्याची कामगिरी अमेरिकन नौदलाची अत्याधुनिक अणुपाणबुडी `यूएसएस डॉल्फिन`वर सोपवली जाते. डॉक्टर कार्पेंटर हा ब्रिटिश गुप्तहेर अनेक खटपटी करून तिच्यावर दाखल होतो. त्याला संशय असतो की आग मुद्दाम लावली गेली आहे. काही संकटांवर मात करून, बर्फाखालून प्रवास करत पाणबुडी आइस स्टेशन झेब्रा शोधून काढून तिथून सर्वांत जवळच्या ठिकाणी पोहोचण्यात यशस्वी होते. ब्रिटनमधले रशियाला फितूर असलेले काही लोक आइस स्टेशन झेब्रावर काम करणार्या लोकांमध्ये सामील होऊन तिथे पोहोचलेले असतात. याचा संशय डॉक्टर कार्पेंटर या ब्रिटिश गुप्तहेराला असल्यामुळे तो आइस स्टेशन झेब्रावर पोहोचलेला असतो. फितुरांमुळे या पाणबुडीवर अनेक जीवघेणी संकटंही येतात. कार्पेंटर या फितुरांना उघडं पाडण्यात यशस्वी होतो का?
-
Telgi Scam Reporter Chi Diary (तेलगी स्कॅम रिपोर्ट
"एका पत्रकाराच्या हाती एक रिपोर्ट लागतो. वरवर कंटाळवाणा वाटणारा हा अहवाल. पण त्याची ब्रेकिंग न्यूज होताच अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. असं काय असतं या अहवालात? हा अहवाल असतो, तेलगीच्या महाघोटाळ्याचा. एका रात्रीत डान्सबारमध्ये कोटभर रुपये उधळणारा तेलगी. त्याच रात्री सुरक्षा यंत्रणेच्या रडारवर येतो. आणि तपास यंत्रणेचीही मती गुंग होते. राजकारण आणि प्रशासनातली बडी धेंडं त्याला सामील असल्याची चर्चा सुरू होते. एका मागोमाग नवनवी नावं गुंफली जातात. राजकारण, पोलीस, प्रशासन, माध्यमं आणि सामान्य जनता या सगळ्यांना हादरवून टाकणारा हा महाघोटाळा. बनावट स्टॅम्पच्या धंद्यातून त्यानं निर्माण केलेली एक समांतर यंत्रणा आणि त्याचे भयंकर परिणाम, हे सगळं नंतर उघड्यावर आलंच. भारतीय दंड संहितेनुसार त्याला शिक्षाही झाली. पण हा संपूर्ण घोटाळा आणि त्याचं शोधपत्रकारितेच्या अनुषंगाने एका पत्रकारानं धुमाकूळ उडवणारं केलेलं संशोधन यांची ही रोचक आणि आश्चर्यचकित करणारी कहाणी. जी सोनी ‘SCAM 2003 : THE TELGI STORY’ या मालिकेतून सिनेजगतातही धुमाकूळ घालत आहे."
-
The Elephant Whisperer (द एलेफन्ट व्हिस्परर)
"दक्षिण आफ्रिकेत प्राणिसंवर्धनाचे काम करणार्या लॉरेन्स अँथनीला जेव्हा एक ‘गुंड’ जंगली हत्तींचा कळप त्याच्या थुला थुला अभयारण्यात स्वीकारण्याबद्दल गळ घातली जाते, तेव्हा त्याचे सामान्य व्यवहारज्ञान त्याला सांगत होते की त्यांना नाकारावे; पण त्याने होकार दिला तरच त्या कळपाची जगण्याची शेवटची संधी होती. जर त्याने कळप नाकारला असता, तर तो ठार केला गेला असता. त्यांचे प्राण वाचवण्यासाठी अँथनीने त्यांना स्वीकारले. पुढच्या काही वर्षांत तो त्यांच्या कुटुंबाचा भाग बनला. त्यांच्याशी संबंध प्रस्थापित व्हावा म्हणून जसा तो प्रयत्न करत गेला, तसे त्याच्या लक्षात आले की त्यांच्याकडून त्याला आयुष्याबद्दल, निष्ठेबद्दल आणि स्वातंत्र्याबद्दल खूपच शिकण्यासारखे आहे. आकाराने प्रचंड पण तरीही मनाने दयाळू असणार्या प्राण्यांबरोबरची अँथनीची ‘द एलेफंट व्हिस्परर’ ही कथा अतिशय हृदयस्पर्शी, उत्कंठावर्धक, मजेशीर आणि कधीकधी विषण्ण करणारी आहे. आफ्रिकेतील अभयारण्यातील आयुष्याची त्याला पार्श्वभूमी आहे. त्यातील सहज न विसरता येणारी पात्रे आणि अनोखी प्राणिसृष्टी ह्यांच्या पार्श्वभूमीवरची ही गोष्ट आनंद देऊन जाते. प्राणिमित्रांना आणि साहसी कथा आवडणार्यांना तर ही गोष्ट खूपच आवडेल. "
-
The Hungry Tide (द हंग्री टाइड)
हंग्री टाइड ही कलकत्ता आणि बंगालच्या उपसागरातील बेटांच्या विशाल द्वीपसमूहातील एक समृद्ध गाथा आहे. बेटांचा हा विशाल द्वीपसमूहच अमिताव घोष यांच्या नवीन कादंबरीची मांडणी करतो. सुंदरबनमध्ये समुद्राच्या भरती १०० मैलांपेक्षा जास्त अंतरापर्यंत पोहोचतात आणि दररोज हजारो हेक्टर जंगल नाहीसे होते आणि काही तासांनंतर पुन्हा उगवते. याच पार्श्वभूमीवर दुर्मीळ डॉल्फिनच्या शोधात आलेली पियाली, तिला डॉल्फिन शोधण्यात सहाय्यक ठरणारा फोकीर, कनाई या प्रमुख पात्रांभोवती फिरणारी ही कादंबरी घडते.खारफुटीच्या जंगलातली समृद्ध जलसंपदा, वाघोबाच्या भीतीनं आदिवासी जीवनात उदयाला आलेल्या लोककथा आणि जंगल भयाचं आव्हान पेलतही निसर्गावर मनमुराद प्रेम करणाऱ्या माणसांची ही गोष्ट आहे. जी सुंदरबनच्या जंगलातून अनहद प्रवास घडवते.