-
Rajyache Vaibhav Birbal Ani Itar Katha (राज्याचे वैभव बिरबल आणि इतर कथा)
भारतीय चातुर्यकथा म्हटलं की बिरबल आणि तेनालीराम हीच नावं झटदिशी डोळ्यांपुढे येतात. या दोन्ही अत्यंत हुशार व्यक्ती इतिहासात अजरामर होऊन बसलेल्या आहेत. त्यातही बिरबलाच्या कथा तर अजूनही संदर्भासाठी वापरल्या जातात. अगदी इंटरनेटवर, मॅनेजमेंटच्या धड्यांमध्ये बिरबलाचं स्थान अव्वल असल्याचं दिसतं. अकबर बादशाह आणि बिरबल यांचं मेतकूट फारच खुमासदार जमलेलं आहे. अकबराच्या दरबारातल्या नऊ रत्नांपैकी बिरबल अकबराचा विशेष लाडका होता. बिरबलानं आपलं बुद्धिचातुर्य, हजरजबाबीपणा, सच्चेपणा, निर्भयता, शौर्य वगैरे गुणांच्या जोरावर बादशाहचं मन तर जिंकून घेतलं होतंच; पण देशविदेशांतही त्याची कीर्ती पसरलेली होती. बिरबल-बादशाहच्या कथा वाचताना करमणूक तर होतेच, पण बोधही मिळतो. शहाणपण मिळतं. शिकायला मिळतं. आपल्या देशात इतकं मौल्यवान रत्न जन्माला आलं, याचा अभिमानही वाटतो. या गोष्टी केवळ मुलांनाच नाही, तर सर्व वयोगटांच्या, लहान-थोर माणसांना अनेक प्रकारे आनंद देतील अशाच आहेत.
-
Durche Pravasi Ani Pravasi Itar Katha (दूरचे प्रवासी आणि इतर कथा)
राजू आमचा आहे हुशार. विज्ञानाची त्याला आवड फार. कनसाई गावाची तो आहे शान. रनाळ्यात एकदा रात्रीच्या वेळी पाहिली त्याने अद्भुत चकती, चकतीतून त्या उतरल्या सहा विचित्र आकृत्या, पडक्या घराभोवती फिरू लागल्या. राजूने लावला छडा त्या आकृत्यांचा. एकदा रनाळ्यातच रात्रीच्या वेळेला राजूला तळ्यात सापडला एक अद्भुत जीव, ज्याच्यातून प्रकाश बाहेर येत होता. राजूने शेवटी जाणूनच घेतलं त्या जिवाचं रहस्य. एकदा रनाळ्यात झाली ढगफुटी; पण राजूने सगळ्यांना वाचवलं त्या संकटातून. आष्ट्याला एकदा गेला असताना रात्री त्याला शेतात उतरताना दिसलं एक यान. त्या यानातून चार काळसर आकृत्या बाहेर पडल्या; पण त्या विघातक नाहीत हे राजूने त्यांच्या स्पर्शातून जाणलं. तर अशा या राजूच्या करामती. त्याला विज्ञानाची आहे संगती. त्याचा आयुकातील शास्त्रज्ञ किरणमामा आणि विज्ञान क्षेत्रातील, पोलीस खात्यातील मंडळी नेहमीच उभी त्याच्या पाठीशी.. गूढ वातावरणातून उलगडणारं विज्ञान, त्याच्या जोडीला रंगीत चित्रं छान. राजूची ही हुशारी आणि मानवता, आवडेल खास आमच्या कुमार दोस्तांना.
-
Avakashatil Doot Ani Itar Katha (अवकाशातील दूत आणि इतर कथा)
राजू आमचा आहे हुशार. विज्ञानाची त्याला आवड फार. कनसाई गावाची तो आहे शान. राजूला एकदा सापडला एक विचित्र धोंडा. त्या धोंड्याची मग राजूने केली शहानिशा. राजू एकदा गेला प्रतापगडावर. अफजलखानाच्या वधाची घटना प्रत्यक्ष घडताना पाहिली त्याने डोळ्यांसमोर. त्याच्यामागचं विज्ञान जाणून घेतलं राजूनी. राजूला रानात सापडली एक अळी. मग नेहमीच्या पद्धतीने त्याने घेतला तिचा विज्ञानातून शोध. कनसाई गावात अमावस्येला घटना घडत होत्या भीतिदायक. राजूने एका चिमणीच्या माध्यमातून त्या घटनांचा घेतला वेध. अशा या राजूच्या करामती. त्याला विज्ञानाची आहे संगती. त्याचा आयुकातील शास्त्रज्ञ किरणमामा आणि विज्ञान क्षेत्रातील, पोलीस खात्यातील मंडळी नेहमीच उभी त्याच्या पाठीशी. गूढ वातावरणातून उलगडणारं विज्ञान, त्याच्या जोडीला रंगीत चित्रं छान. राजूची ही हुशारी आणि मानवता, आवडेल खास आमच्या कुमार दोस्तांना.
-
Chanakya (चाणक्य)
इ. स. पूर्व 300 वर्षापूर्वीची ही कहाणी. त्यावेळी भारतात अनेक गणराज्य नांदत होती. परंतु त्यांच्यात एकमेळ नव्हता. आपापसात सतत संघर्ष होत होती. मगध हे त्यांपौकीच एक ! त्या राज्याचा राजा धनानंद हा विलासी राजा होता. अतोनात कर लावून तो प्रजेची पिळवणूक करीत असे. त्याच्या अनियंत्रित कारभाराला प्रजा कंटाळली होती. चाणक्य विष्णुगुपत हा त्या राज्यातील एक तेजस्वी ब्राह्मण. तक्षाशिलेला जाऊन विद्यासंपन्न झालेल ! राजाचा दानाध्यक्ष या नात्यानं काम करताना धनानंद राजानं त्याचा अपमान केला. ते पाहून चाणक्यनं शपथ घेतली की, उन्मत्त धनानंद राजाचं सिंहासन मी यथावकाश उलथून टाकीन.' त्याच वेळी जगज्जेता बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून ग्रीक सेनानी सिकंदर यानं भारतावर आक्रमण केलं. चाणक्यानं अपार परिश्रम करून सिकंदराचं आक्रमण थोपविण्यासाठी अनेक योजना आखल्या. त्याचीच परिणीती म्हणून सिकंदराला भारतविजेता न होता परतावं लागलं. चंद्रगुप्ताला हाताशी धरून चाणक्यानं त्याला उत्तम शिक्षण दिलं. अनेक तेजस्वी तरुणांची एक मळी उभी केली आणि अनेक युक्त्या-प्रयुक्त्या योजून त्यानं धनानंद राजाला पदच्युत केलं. त्याच्या सिंहासनावर चंद्रगुप्त मौर्याला अधिष्ठित करून त्याच्याच सहाय्यानं चाणक्यानं एकसंध, बलसंपन्न आणि अखंड भारत निर्माण केला. आपल्या आयुष्याच्या उतरार्धात "कौटिलीय अर्थशास्त्र' हा ग्रंथ लिहून भारतीय साहित्यात अनमोल भर घातली. अशा या नृपनिर्मात्या युगंधर क्रांतिकारी महापुरुषाच्या जीवनावरील ही ललितरम्य कादंबरी अनेक नाट्यपूर्ण, रहस्यमय प्रसंगांनी सजलेली ! प्रचलित असलेल्या 'चाणक्यनीती'च्या आणि प्रसिद्ध असलेल्या 'कौटिल्याचे अर्थशास्त्र'च्या 'चाणक्य'वर संदर्भांचा छडा लावून लिहिली गेलेली ही कादंबरी. स्वत: सत्तेपासून अलिप्त राहायचे पण सत्ता परकीयांच्या हातातून दिसणार नाही म्हणून डावपेच रचायचे, त्यासाठी एखाद्या चंद्रगुप्ताला अगदी श्रीगणेशापासून तयार करायचे न् प्रजाहित साधण्याचा प्रयत्न करायचा हे सारेच अजब आहे म्हणूनच अशी व्यक्तिरेखा लेखकालाही आव्हानात्मक आहे, असे मूळचेच जबरदस्त कथानक लेखकाचीही परिक्षा घेणारे आहे अर्थात भा. द. खेर ह्यांच्यासारख्या ज्येष्ठ श्रेष्ठ लेखकाला हे शिवधनुष्य न पेलवते तरच नवल ! खेर ह्यांनी ते कसे समर्थपणे पेलले आहे हे एकदा वाचलेच पाहिजे असे आहे.
-
The Silent Film (द सायलेंट फिल्म)
भारतीय चित्रसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनाचा हा विस्तृत पट आहे. काय केलं नाही दादासाहेबांनी? फोटोग्राफीचा व्यवसाय केला. प्रेस चालवला, नाटक केलं, कलात्मक वस्तू विकल्या आणि चित्रपटाच्या ध्यासाने तर ते ‘भारतीय चित्रसृष्टीचे जनक’ झाले. चित्रपटनिर्मितीसाठी त्यांनी अपार कष्ट घेतले. नावलौकिक, यश आणि पैसाही मिळाला त्यांना चित्रपटनिर्मितीतून; पण व्यवहारज्ञान कमी, शीघ्रकोपी स्वभाव, तत्त्वांशी तडजोड न करण्याची वृत्ती, हितशत्रूंचा त्रास, सर्वोत्तमाचा ध्यास यामुळे त्यांच्या पैशांना आणि यशाला ओहोटी लागली. यश-अपयशाचा लपंडाव त्यांच्या जीवनात सदैव सुरू राहिला. त्यांचं कलासक्त मन सदैव अतृप्त राहिलं. तर एका कलासक्त जीवनाची ही संघर्षमय कहाणी आहे. मूकपटांच्या इतिहासालाही त्या निमित्ताने उजाळा मिळतो. दुर्मिळ छायाचित्रांनी सजलेला , व्यामिश्रतेने साकारलेला जीवनपट.
-
Independence (इंडिपेन्डन्स)
१९४६ चा भारत. बदलाचं वारं घेऊन आलेला. अशा भारतातल्या बंगालमधील राणीपूरमध्ये राहणाऱ्या डॉ. नंदकुमार यांच्या तीन मुलींची ही गोष्ट. प्रिया, जामनी आणि दीपा यांची. फाळणीच्या दंगलीत डॉ. नंदकुमार यांची हत्या होते. आणि तिघींचं आयुष्य पार बदलून जातं. प्रियाचं डॉक्टर होण्याचं स्वप्न एका दृढ निश्चयात परिवर्तित होतं, तर दुसरीकडे जामनी आणि दीपा आपल्या आईला रजाई बनवण्यात हातभार लावून घर सावरतात. त्याचवेळी दीपा मुस्लिम लीगच्या रजाच्या प्रेमाने झपाटून जाते आणि घरदाराला अंतरते. रझासोबतच्या प्रवासात तिचा देशही सुटतो. या सगळ्यात जामनी मात्र आईचा आधार बनून राहते. पण तरीही फाळणीची झळ तिला सुखानं जगू देत नाही. या लाटेत तिन्ही बहिणींचं आयुष्य हेलकावे खात राहतं. या तीन बहिणींची गोष्ट वेगवान कथानकासोबत आणि अंगावर शहारे आणणाऱ्या घटनाक्रमाने अचंबित करत राहते.
-
Dnyanyogi Eknath (ज्ञानयोगी एकनाथ)
संत एकनाथांच्या जीवनावरची ही कादंबरी आहे. एकनाथांच्या घराण्याची पूर्वपीठिका, त्यांचं जन्मरहस्य, त्यांचा जन्म ते त्यांनी घेतलेली जलसमाधी इथपर्यंतचा प्रवास या कादंबरीतून उलगडला आहे. एकनाथांचं बालपण, त्यांचा गुरूशोध, जनार्दन स्वामींशी त्यांची झालेली भेट, त्यांच्या सहवासात बहरत गेलेली त्यांची प्रतिभा, शूलभंजन नावाच्या छोट्याशा पर्वतावर त्यांनी केलेली तप:साधना, त्यांनी वेळोवेळी रचलेले अभंग, भारुडं, गवळणी, चतु:श्लोकी भागवताचं मराठीत केलेलं भाषांतर, चातुर्वर्ण्य, शिवाशिव, अस्पृश्यांना मिळणारी वागणूक याबद्दल त्यांनी वेळोवेळी आपल्या आचरणातून-बोलण्यातून व्यक्त केलेली नाराजी, त्यामुळे त्यांना सनातन्यांचा झालेला विरोध, गिरिजेशी झालेला विवाह, ज्ञानेश्वर-माउलींच्या समाधीचा जीर्णोद्धार आणि त्यांच्या ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार करण्याचं एकनाथांच्या हातून घडलेलं कार्य इ.प्रसंग-घटनांतून त्यांचं संपन्न गृहस्थाश्रमी आणि आध्यात्मिक जीवन उलगडत जातं. एकनाथांच्या जीवनावरची रसाळ, भावसंपन्न कादंबरी.
-
Vector (व्हेक्टर)
अमेरिकेतील मॅनहटन भागातील एका गालिचा व्यापार्याचा, जेसनचा अचानक मृत्यू ओढवलाय... सोव्हिएत महासंघातल्या जैविक अस्त्र कारखान्यात काही काळ काम केलेल्या युरीनं जेसनला जैविक अस्त्राचं लक्ष्य केलंय... शवविच्छेदन करणारा जॅक स्टेपलटन जेसनच्या मृत्यूच्या कारणापर्यंत पोचलाय... जेसनवरचा प्रयोग यशस्वी झाल्याने युरी मोठ्या प्रमाणावर अॅन्थॅ्रक्स पावडरच्या निर्मितात मग्न आहे...आपल्या बायकोला, कोनीला यासंदर्भात काहीतरी संशय आलाय हे कळल्यावर युरीने तिला बोटुलिनम हे विष देऊन संपवलंय...कोनीचा मृत्यू आणि जेसनचा मृत्यू, यात काहीतरी धागादोरा आहे असं जॅकला वाटतंय....युरीच्या मदतीने कर्ट आणि स्टीव्ह (स्किनहेड या नाझी संघटनेशी संबंधित) दाट लोकवस्तीच्या भागात जैविक अस्त्राचा उपयोग करून लाखो अमेरिकनांचा जीव घेण्याच्या तयारीत आहेत...जेसन आणि कोनीच्या केसच्या माध्यमातून जॅक सत्यापर्यंत पोचू पाहतोय...पोचतो का तो सत्यापर्यंत? युरी, कर्ट आणि स्टीव्ह आपल्या योजनेत यशस्वी होतात का?
-
Vidroha (विद्रोह)
हेन्री डेन्करच्या ‘आऊटरेज` या गाजलेल्या कादंबरीचा ‘विद्रोह` हा स्वैर अनुवाद आहे. वाचताना अखेरपर्यंत मन खिळवून ठेवणार्या या कादंबरीत पुष्कळ काही असे आहे की, जे समाजजीवनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकते. कायद्याचाच आधार घेऊन खरे गुन्हेगार कसे सुटतात, यात कायद्याच्या तांत्रिक बाबींनाच कसं महत्त्व येतं, त्यामुळं एखादी केस लढविताना वकिलांना किती प्रचंड आणि जिकिरीचे खटाटोप करावे लागतात, एका नालायक सराईत गुन्हेगारानं एखाद्या मुलीवर बलात्कार केल्यानं त्या मुलीचं संपूर्ण घरच कसं उद्ध्वस्त होतं, एखाद्या सनसनाटी बातमीचे हक्क मिळवून कथाकादंबर्या लिहिणारे पोटभरू साहित्यिक कसे असतात, तसेच मूळ वस्तुस्थितीचा विपर्यास करून पोटभरू बातमीदारही कशी पत्रकारितेच्या नावाखाली सतत गुन्हेगारी करत असतात व शहाजोगपणे समाजात हिंडत असतात, न्यायाधीश म्हणून निर्णय देणार्याला खरा गुन्हेगार कोण हे माहीत असूनही केवळ कायद्याच्या तंत्राने त्याचे हात बांधलेले असल्यामुळे त्याला विपरीत निर्णय कसे द्यावे लागतात, आजची कायदा व्यवस्था ही अनेक दृष्टींनी कशी निकामी झाली आहे इत्यादी अनेक पदर या कादंबरीला आहेत. जेव्हा आपल्याला खरा न्याय मिळत नाही, खरा गुन्हेगारच जेव्हा सहीसलामत सुटतो, तेव्हा नाइलाजाने कायदा हातात घेऊन खरा न्याय मिळवावा लागतो; हा या कादंबरीचा मध्यवर्ती गाभाही तितकाच महत्त्वाचा आहे."
-
Bread,Cement,Cactus (ब्रेड सिमेंट कॅक्टस)
घर म्हणजे नक्की काय? आणि त्याला जोडली गेलेली आपलेपणाची भावना म्हणजे काय? एखाद्या परिसरात अल्पसंख्याक म्हणून वावरताना या संकल्पनेपुढे भलतेच प्रश्न उभे राहतात. काय आपलं आणि काय परकं याचीच संदिग्धता लागून राहते. त्यातून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा संघर्ष आणखी गुंतागुंतीचा होतो. अॅनी झैदी अशाच एका प्रश्नातली गुंतागुंत मांडत स्वतःचं आयुष्य मांडतात. आपल्या वडिलोपार्जित गावापासून, गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या प्रदेशात, त्या आता राहत असलेल्या मेगा-सिटीपर्यंतचा हा प्रवास आहे. झैदी अल्पसंख्याक म्हणून आपलेपणाच्या भावनिक निकडीबद्दल आणि इतर समुदायांकडून मिळणाऱ्या तुसड्या वागणुकीबद्दल मांडणी करत स्थलांतरितांच्या जगण्याबद्दलचा एक सूक्ष्म दृष्टीकोन प्रदान करतात.
-
Chumban (चुंबन)
तळागाळातल्या असंख्य स्त्रिया आणि त्यांचे संघर्ष... कधी स्थलांतराच्या वाटेत भरडणाऱ्या, तर कधी पुरुषी वर्चस्वाखाली भरडणाऱ्या या स्त्रिया. त्यांच्या दुःखांना शब्दबद्ध करण्याचं काम तसलिमा नासरिन करतात. या नायिका जितक्या परिस्थितीने हतबल आहेत, तितक्याच खमक्याही आहेत. जगण्याची अगम्य जिद्द त्यांच्यात दिसते. त्या अघोरी धर्मवादाविरोधात उभ्या राहतात, अनिष्ट रूढी-परंपरांविरोधात उभ्या राहतात. प्रसंगी प्राणांची बाजी लावून स्वतःची मूल्ये जोपासतात. त्यामुळेच यातल्या प्रत्येक कथेत एक थक्क करणारी नायिका भेटते.
-
Moharlela Chandra (मोहरलेला चंद्र)
मोहरलेला चंद्र` — बाबाराव मुसळे यांचा हा कथासंग्रह. या संग्रहातील कथा वाचताना मुसळे यांच्या मनात फुलू लागलेला साहित्यिक मोहर स्पष्टपणे जाणवत जातो आणि हा मोहर कुठल्या साध्यासुध्या आंब्याचा नसून स्वत्वानं फुलून येणार्या नवतरुण ग्रामीण मनाचा आहे, याची खात्री होते. ग्रामीण जीवनात अनेक लहान-मोठे संघर्ष होत असतात. नवरा-बायकोतील रूसवे, तारुण्य बहरून आलेल्या विवाहित षोडशेच्या मनाचा कोंडमारा, अंधश्रद्धेमुळे निर्माण होणारा तणाव, जमीन हडपण्यासाठी पांघरलेले वेडेपण, आपल्याच समाजाविरुद्ध उभे राहिलेले कुटुंब, खेड्यातील राजकारण यांसारख्या विविध संघर्षाच्या ठिणग्या घेऊन मुसळ्यांनी आपल्या कथा फुलविल्या आहेत. या कथांतील व्यक्ती असहाय्य न होता संघर्षाविरुद्ध धडपड करीत असल्याने कथेत वेधकता आली आहे. ग्रामीण बोलीभाषेचा गंध असलेल्या या कथा वैदर्भीय मातीचा कस घेवून आकाराला येतात आणि तरूण साहित्यिक पिढीत जे नव्य उमेदीचे वैदर्भीय साहित्यिक आहेत; त्यात श्री. मुसळे यांचे महत्त्वाचे साहित्यिक स्थान आहे, हे पटवून देतात.
-
Gopichi Diary Ek Unad Divas (गोपीची डायरी - एक उना
आपल्या घरच्या उबदार वातावरणातून बाहेर पडलेला गोपी रस्त्यावर भटकत असताना खूप नवनवीन अनुभवांना सामोरा जातो. त्याला रस्त्यात अनेक भटकी कुत्री भेटतात, त्यांचा जीवनसंघर्ष त्यांच्याबरोबर तोही अनुभवतो. या संपूर्ण दिवसांमध्ये गोपीला एक नवी भटकी मैत्रीण मिळते आणि त्याच्या दिवसभरातल्या अनेक कारनाम्यांमध्ये ती त्याची सोबत करते. एक दिवस असा काही विलक्षण उजाडतो, अगदी जगावेगळा! पण, गोपीला मात्र क्षणोक्षणी आपल्या आवडत्या आजीची आठवण येत असते. गोपीला आपल्या घराचा पत्ता सापडेल का? आजी आणि गोपी यांची परत भेट होईल का? ही सुंदर आणि मनाला आनंद देणारी गोष्ट वाचा, म्हणजे तुम्हाला त्याचा उलगडा होईल. सुधा मूर्तींनी आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीत लिहिलेली ही कथा आबालवृद्धांचं मन नक्कीच जिंकून घेईल. रस्त्यावर भटकणार्या कुत्र्यांचं आयुष्य किती कष्टाने भरलेलं असतं, हे गोपी आपल्याला दाखवून देईल, त्याचबरोबर आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो, हेही आपल्याला त्यातून समजेल.
-
The Hidden Hindu Part 3 (द हिडन हिंदू भाग ३ )
"देवध्वज नक्की कोण आहे, नागेंद्र की ओम? परिमल आणि एलएसडी एकमेकांवर विश्वास ठेवण्यासाठी धडपडत आहेत, तर नागेंद्र मृतातून पुनरुत्थित झाला आहे. असुरक्षित आणि पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. परशुराम आणि कृपाचार्य ओमच्या कोलमडलेल्या भूतकाळात अडकले आहेत तर वृषकपी निश्चित मृत्यूशी लढत आहेत, ज्याने आधीच मिलारेपाला संपवलं आहे. पराक्रमी अश्वत्थामाला अनभिज्ञ सोडून, इतर सर्व चिरंजिवी सर्व आघाड्यांवरून निघून गेले आहेत. उरलेले शब्द कुठे लपले आहेत? नागेंद्र त्या सर्वांना शोधून श्लोक पूर्ण करेल की अमर त्याला रोखू शकेल? काळाशी झगडत असलेल्या चिरंजिवीच्या अनपेक्षित रहस्याचा उलगडा..."
-
Velecha Niyojan Kara Tanavmukta Vha (वेळेचे नियोजन
वेळेचे नियोजन करा तणावमुक्त राहा’ हे लेखिका रिटा एमेट यांचे सुंदर पुस्तक . पुढील आठ प्रकरणांतून त्यांनी दिवसेंदिवस वाढणाऱ्या तणावपूर्ण जीवनाचा अभ्यास करून, त्यावरील उपाय आणि मानवी जीवनाचा खरा आनंद व उत्कर्ष शोधला आहे. ८ प्रकरणांतून उच्च पदावर कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था-त्यांची ध्येय-धोरणे, कार्यपध्दती तसेच सामान्यांचे दैनंदिन प्रश्न, यांचा मनोविश्लेषणात्मक दृष्टीने लेखिकेने अभ्यास केला आहे.
-
The Hidden Hindu Part 2 (द हिडन हिंदू भाग २)
ओम अनोळखी ठिकाणी डोळे उघडतो, त्याच्या भूतकाळासंबंधीची उत्तरं तो अजून शोधतोय. दृष्ट प्रवृत्तींनी मृत संजीवनीचं पुस्तक हस्तगत केलंय, अशा परिस्थितीत जो सदाचारी आहे तो विजयी होईल? सद्गुणांचा विजय होईल? मृत संजीवनीत अशी कोणती गुपितं दडली आहेत, जी चुकीच्या हातात पडली तर गहजब माजेल आणि विनाश होईल? ओम कोण आहे? LSD चं आणि परिमलचं वास्तव काय आहे? बाकीचे चिरंजीव कुठे लपले आहेत? विचित्र, गूढ ठिकाणी विखुरलेले हे शब्द आहेत तरी काय आणि नागेंद्र ते का गोळा करतोय? मर्त्य मानव, देवता आणि दानव या सगळ्यांसाठी अमरत्वापेक्षाही मोठं उद्दिष्ट ज्यात दडलं आहे अशा शब्दांचा शोध ती अतूट त्रयी घेत असताना, त्यांच्यासोबतच ‘द हिडन हिंदू २` मधून तुम्ही कधीही न पाहिलेल्या प्रदेशांची उत्कंठावर्धक सफर करायला सज्ज व्हा.
-
Delivering Happiness (डिलिव्हरिंग हॅपिनेस)
डिलिव्हरिंग हॅपिनेस हे पुस्तक आपल्याला, व्यावसायिक यशासोबतच लेखकाच्या आयुष्याचा प्रेरणादायक प्रवास पोहोचवते. अतिशय लहान वयातच व्यवसायाची ओढ निर्माण झालेल्या टोनीची ही कथा आपल्याला बरंच काही शिकवून जाते. लहानपणी मिस्किल, खट्याळ, डांबरट, उद्योगी; पण ध्येयवादी असणार्या टोनीने कुमारवयातच छोट्या छोट्या उद्योगांना सुरुवात केली. मित्राच्या सहकार्यानं त्यानं सुरुवातीला `लिंक एक्स्चेंज’ नावाची सॉफ्टवेअर कंपनी आणि त्यानंतर इंटरनेटद्वारा बूट विकणारी ‘झापोस’ नावाची त्यांनी कंपनी सुरू केली. या कंपनीला नावारूपाला आणण्यासाठी त्यानं किती संकटं झेलली; धैर्यानं, जिद्दीनं तो कशा प्रकारे उभा राहिला; कंपनीला तारणारं मार्गदर्शक तत्त्व त्याला कसं उमगलं; इथपर्यंतचा टोनीचा प्रवास हा विलक्षण आहे. केवळ सदतीस वर्षांचा असणारा हा व्यावसायिक त्याच्या जीवनकहाणीतून अनेक मूल्यं आपल्यापर्यंत पोहोचवतो.
-
The Art Of Management (द आर्ट ऑफ मॅनजमेंट)
या पुस्तकाद्वारे लेखक शिव शिवकुमार यांनी स्व-व्यवस्थापन, तुमच्या टीमचे व्यवस्थापन आणि तुमच्या उद्योगाचे व्यवस्थापन यांविषयी संपूर्ण आणि सखोल मार्गदर्शन केले आहे. शिवकुमार यांनी चक्क २१ आघाडीच्या अनुभवी ‘लीडर्स`च्या सखोल आणि सविस्तर मुलाखतींद्वारे व्यवस्थापनाचे हे तिन्ही घटक ही तुमची स्वत:चीच जबाबदारी आहे, असे सारांशरूपाने अधोरेखित केले आहे. शिवकुमार यांनी अनेकविध उद्योगांचे व टीम्सचे नेतृत्व केले आहे. त्यांच्याकडे समृद्ध अनुभवसंचित आहे. त्यांनी लिहिलेल्या ‘स्व-व्यवस्थापन’ या विषयावरील पुस्तकात त्यांचा इतक्या वर्षांचा अनुभव आणि त्यांनी आजवर मिळवलेले ज्ञान यांतून तरुण पिढी नक्कीच शिकू शकेल. आयुष्याच्या सर्व क्षेत्रांत स्व-व्यवस्थापन करण्यासाठी माणसाने शिकत राहाणे गरजेचे असते. वेगवेगळ्या क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणार्या ‘प्रोफेशनल्स`चे विचार, मते आणि अनुभव यांचे हे संकलन आहे; तसेच स्व-व्यवस्थापन, टीम व्यवस्थापन व बिझिनेस व्यवस्थापन या विषयांनाही स्पर्श केलेला आहे. वेगवेगळ्या ‘प्रोफेशनल्स`कडून तुम्हाला शिकता यावे आणि तुमच्या लक्ष्यापर्यंत जाणारा मार्ग तुम्हालाच तयार करता यावा हा उद्देश आहे.
-
Hitler Ani Bharat (हिटलर आणि भारत)
हिटलर - जगात सर्वत्र अत्यंत तिरस्कारानं उच्च्चारल्या जाणारं नाव – भारतीय उपखंडात मात्र काही वेळा हा गैरसमज पाहायला मिळतो की फ्युहरर हा भारतीयांचा मित्र होता. पत्रकार वैभव पुरंदरेंना जाणवलं की या जर्मन हुकूमशहानं स्वत:च्या लिखाणात भारताविषयी त्याचं खरं मत बेधडकपणे मांडून ठेवलेलं असूनही या विषयी भारतीय जनमानसात घोर अज्ञान आहे. ही उणीव भरून काढण्याच्या निकडीतून त्यांना जर्मनी, भारत आणि इतर जागची अभिलेखागारं खंगाळून काढण्याची प्रेरणा मिळाली. हिटलरची भारत देश आणि इथल्या लोकांबद्दलची धारणा, ब्रिटिश राजवटीविरुद्ध त्यांनी केलेल्या संघर्षाविषयी त्याची मतं आणि भारताचा इतिहास, संस्कृती आणि सभ्यते विषयी त्याचा अभिप्राय ह्यांचं समर्पक विश्लेषण या पुस्तकात आहे. या शिवाय हे पुस्तक नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांची तिसर्या साम्राज्याशी झालेली गुंतागुंत, नाझी जर्मनीत राहिलेल्या इतर भारतीयांचे अनुभव, हिटलरद्वारे हिमालयात ‘शुद्ध रक्ताचे आर्यन’ शोधण्यासाठी चालवली गेलेली मोहीम आणि या संदर्भातील अनेक अप्रचलीत घटनांवरदेखील प्रकाश टाकतं.
-
Third Man (थर्ड मॅन)
डॉ. संजय ढोले हे सध्याच्या घडीला विज्ञानसाहित्यातील आघाडीचे विज्ञानकथालेखक असून, त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून हा ‘थर्ड मॅन’ नावाचा विज्ञानकथासंग्रह साकारला आहे. त्यांच्या विज्ञानकथा या विज्ञानाच्या मध्यवर्ती कल्पनांचा आविष्कार असून, सैद्धान्तिक, प्रायोगिक व भविष्यातील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वेध घेणार्या स्वतंत्र कलाकृती आहेत. त्यांच्या कथा प्रस्थापित विज्ञानाचं बोट धरून पुढे जातातच; पण त्याच वेळी भविष्यातील येऊ घातलेल्या विज्ञानाचा परामर्श घेणार्याही आहेत. डॉ. ढोले यांनी विज्ञानकथेत भौतिकशास्त्र, जैवशास्त्र, किरणशास्त्र व इतर आंतरशाखीय शास्त्रांचे विषय हाताळले असून, लालित्याचा सक्षमपणे आधार घेऊन, त्या वाचकांपर्यंत पोहोचण्याचं कार्य केलं आहे. ‘थर्ड मॅन’ ही कथा भविष्याचा वेध घेणारी असून, ‘उपरा’ व ‘मोकळं अवकाश’ या कथा अंतराळाचा ठाव घेणार्या आहेत. शिवाय ‘अंधारातील डोह’ व ‘ट्रीटमेंट’ या कथा वैद्यकीय शास्त्रातील घडामोडींशी निगडित असून, ‘नि:पात’ आणि ‘मागोवा’ या मानवी जनुकाशी नातं सांगणार्या आहेत. तर ‘दरड’ ही तंत्रज्ञानाचा पुरावा देणारी आहे. डॉ. ढोले यांच्या सर्वच कथा विज्ञानाशी नातं सांगणार्या असून, प्रवाहित व रोमहर्षक आहेत. म्हणूनच या निश्चितपणे वाचकांच्या मनाचा ठाव घेऊ शकतील.
-
Hollywoodche Vinodveer (हॉलीवूडचे विनोदवीर)
राजेन्द्र खेर लिखित ‘हॉलिवूडचे विनोदवीर ‘ या पुस्तकात हॉलिवूडच्या माध्यमातून जगभरातील रसिकांची मनमुराद करमणूक केलेल्या आठ विनोदवीरांची चरितकहाणी आहे. प्रसिद्धी-नावलौकिक सहजासहजी किंवा अनायासे मिळत नाही. त्यासाठी जन्मत:च अभिजात कलागुण अंगी असावे लागतात. या प्रत्येकाची शैली वेगवेगळी असली... तरी प्रेक्षकांची हसवणूक हाच या विनोदवीरांचा एकमेव धर्म होता. यातील बहुतेकांनी सुरुवातीला मिळेल त्या संधीचं सोनं करत या क्षेत्रात पाय रोवला... त्यांच्या दुर्दम्य ध्यासाला अडथळे-अडचणींची पर्वा नव्हती. उलट विपरीत परिस्थितीने त्यांच्यातील कलागुणांना अलौकिक झळाळी प्राप्त करून दिली. मूकपटाचा काळ त्यांनी गाजवला तसाच बोलपटाचा काळही... हॉलिवूडला लाभलेली ही रत्नंच होती. त्यांच्या कारकिर्दीची ओळख सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. आवर्जून वाचावे असेच हे पुस्तक आहे.