-
ZINGU LUKHU LUKHU (झिंगू लुखू लुखू)
बळीराजाच्या घरी लेकीचा जन्म म्हणजे जणू तिच्या लग्नखर्चाच्या हिशोबाची सुरुवातच. शेतात राबणाऱ्या हातांनी कमावलेलं सारं लेकीच्या सासरच्यांच्या वाट्याला द्यावं लागण्याचा जणू शापच. या मानसिकतेतून असंख्य कुटुंबं आजही भरडली जातात. त्यामुळं लग्नाचा सुखावह सोहळाही दुःखाचा पट समोर मांडणारा ठरतो. अशाच आयुष्यांचे अनेक पदर हा कथासंग्रह मांडतो. लग्नसमारंभारतले हेवेदावे असतो की लेकीच्या वडिलांसमोर असणारा हुंड्याचा काळराक्षस असो, अशा अनेक अस्वस्थ करणाऱ्या घटनांची हृदय पिळवटणारी मांडणी या कथा करतात आणि भारतीय समाजाच्या एका विघातक प्रथेवर जोरदार प्रहार करतात. The birth of a girl in farmer's house is like the beginning of the calculation of her wedding expenses. It is like a curse to have to give everything earned by the hands working in the fields. Many families are still burdened by this mindset. Therefore, even the happy ceremony of marriage becomes a face of sorrow. This collection of stories presents many layers of such lives. The stories provide a heart-wrenching account of many disturbing incidents, whether it be the dowry black monster facing the bride's father in marriages, and attack a pernicious practice of Indian society.
-
Parvez (परवेझ)
आपल्या सूक्ष्म निरीक्षणाक्ती आणि संवेदनशीलता या गुणांच्या साहाय्याने पेस्तनजी यांनी आपल्या समाजातील लोकांच्या जगण्याच्या पद्धतींवर तत्कालीन ज्वलंत समस्यांच्या पार्श्वभूमीवर सडेतोड टीका केली आहे. पेस्तनजी या आत्मपरीक्षणातून बंडखोर झालेल्या आहेत. मुंबईमध्ये या कादंबरीतील गोष्ट घडत जाते. एक तरूण पारशी स्त्रीच्या राजकीय परिपक्वतेचा प्रवास दाखवणारी ही कहाणी आहे. आपले एका ख्रिश्चन माणसाशी झालेले लग्न मोडून ती मुंबईला परत आली आहे. परवेझचे मूळचे कुटुंब हे एक उच्चभ्रू, श्रीमंत असे घर आहे. मुंबईला परत आल्यावर ती चळवळीतील काही कार्यकर्त्यांच्या कामात ओढली जाते. बाबरी मशिद जमीनदोस्त करण्यात आली त्या घटनेच्या आधीचा हा अस्वस्थ असा काळ आहे. अशा काळात वावरताना आपण सनातनी विचारांच्या विरोधात उभ्या राहिलो आहोत, हे तिच्या लक्षात येते. सामाजिक न्याय, धर्म, सहिष्णुता या विषयांवर ती विचार करायला लागते. सामाजिक असमतोलामुळे पेटून उठलेल्या तिच्या रागाचा कडेलोट होतो एका घटनेत, तिच्यातून ती आपला बचाव करत बाहेर येते, आपल्या विचारांचं कृतीत रूपांतर करते आणि आपल्या अस्वस्थपणाला संतापाला त्यातूनच वाट करून देते. ही कादंबरी पारशी लोकांच्या जगण्यावर प्रकाश टाकतेच, त्याबरोबरच समकालीन महत्त्वाच्या प्रश्नांची मांडणी करताना दिसते. Set in Mumbai, This novel traces the political maturation of Pervez, a young Parsi woman whose marriage to a Christian has fallen apart. Coming from an affluent background, Pervez is drawn into the activist movement in the months preceding the demolition of the Babri Masjid, to find herself confronting fundamental beliefs regarding social privilege, justice, religion and secularism. Her outrage is tempered by a survival instinct that propels her into action and eventual catharsis. A novel that looks at contemporary issues while giving an insight into the Parsi way of life.
-
DHAG (धग)
सेल्व्हनचं आयुष्य पूर्वीसारखं राहिलं नव्हतं. गृहनिर्माण वसाहतीच्या योजनेखाली त्यांना आपली वडिलोपार्जित जमीन विकावी लागली. बालपणी त्याच्या मनात ठसलेलं हिरव्यागार निसर्गाचं चित्र विस्कटून पुसून गेलं. सेल्व्हनला व त्याच्या कुटुंबाला छोट्या जागेत स्थलांतरीत व्हावं लागलं. त्यानंतरच्या काळात त्याच्या कुटुंबावर ओढवलेल्या नाना प्रसंगांच्या दबावामुळे घरातील वातावरण तापू लागलं. लालसा व मत्सर या घातक वृत्तींनी आयुष्य झाकोळून गेल्यामुळे नशीबाचे फासे उलटे पडू लागले, हे सेल्व्हनला कळून चुकलं. मानवी संबंधांतील गुंतागुंतीचं आणि ताणतणावांचं भेदक चित्रण व विषयातील नाविन्य हे वैशिष्ट्य असणाऱ्या मुरुगन यांची लक्षवेधी कादंबरी. आज सर्वत्र सुरू असलेल्या अथक शहरीकरणामुळे खालावलेल्या जीवनाची व ढासळलेल्या जीवनमूल्यांची वाचकांना तीव्रतेने जाणीव करून देईल. "Young Selvan's life is no longer the same. His family's ancestral land has been sold in order to make way for the construction of a housing colony. Now the verdant landscape of his childhood has been denuded, while Selvan and his family are compelled to move to much smaller lodgings. In the ensuing years, as the pressures of their situation simmer to a boil, Selvan observes his family undergo dramatic shifts in their fortunes as greed and jealousy threaten to overshadow their lives. Murugan's first novel, which launched a splendid literary career, is a tour de force. Now translated for the first time, it poses powerful questions about the human cost of relentless urbanization in the name of progress.
-
NADIMUKH(नदीमुख)
कुमारासुर, त्याची पत्नी मंगासुरी आणि त्यांचा मुलगा मेघास, असं एक त्रिकोणी कुटुंब. कुमारासुर सरकारी नोकरीत आहे. एकूणच, तंत्रज्ञानाविषयी कुमारासुर उदासीन आणि नकारात्मक आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयातील वसतिगृहात राहणारा मेघास कुमारासुराकडे नवीन महागड्या मोबाइलची मागणी करतो. मेघासला मोबाइल गेम खेळण्यासाठी हवा असेल किंवा ब्ल्यू फिल्म पाहण्यासाठी हवा असेल किंवा सेल्फी काढण्यासाठी पाहिजे असेल, असा समज कुमारासुर करून घेतो. टेक्नॉलॉजीमुळे आणि आजूबाजूच्या वातावरणामुळे मेघास बिघडणारच अशी ठाम समजूत करून घेतल्यामुळे कुमारासुर विचित्र मनोव्यापारांमध्ये भोवंडत असतो. मंगासुरीला त्याच्या अशा विचित्र वागण्यामुळे त्याची काळजी वाटायला लागते. ती कुमारासुराच्या मित्राला, अधिकासुराला त्याला यातून बाहेर काढण्याची विनंती करते. अधिकासुराच्या सहवासात कुमारासुराच्या मनावरचं मळभ नाहीसं होतं. आजूबाजूच्या वास्तवाचं रुपकात्मक चित्रण करणारी कादंबरी. Estuary brings alive the different ways—absurd and endearing by turns—in which a man and his young son navigate the contemporary world. In the process, it peels back the layers of Kumarasurar’s loneliness: the hurt of a married man whose wife cares only for the happiness of their child, the endless monotony of an office job and the struggle of the salaried middle-class to give their children the best chance of success. Perumal Murugan’s latest novel, his first in an urban setting, is also a razor-sharp parody of everything from e-commerce to the fitness industry, art appreciation to political manipulation, cram schools to social networks. Through a meditative exploration of a father’s emotional landscape, Murugan tells of a world wrecked by unchecked consumerism and an obsession with growth, where technology overrides common sense and degrees don’t guarantee education. And, with characteristic tenderness, he also weaves in a way to redemption.
-
EYE OF THE NEEDLE (आय ऑफ द नीडल)
दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी लाभलेली ही रहस्यमय कादंबरी आहे. जर्मनीचा गुप्तहेर डाय नाडेल, इंग्लंडमध्ये फेबर या नावाने वावरतोय. त्याच्या मार्गात आडवं येणार्यांना आणि काही निरपराध व्यक्तींनाही ठार मारण्याचं सत्र आरंभलंय त्यानी. एमआय १५ही ब्रिटिश गुप्तहेर संघटना आणि पोलीस यांना तो गुंगारा देतोय. काही महत्त्वाचे फोटो जर्मनीला पाठवण्यासाठी तो पोहचू पाहतोय पोर्तुगालला; पण चक्रीवादळामुळे तो पोचतो एका बेटावरच्या घरात. त्या घरातील पांगळा सैनिक डेव्हिडला तो ठार मारतो. त्याची सुंदर पत्नी ल्युसी आणि डायमध्ये शारीर आकर्षण निर्माण होतं; पण डायने डेव्हिडला ठार मारल्याचं ल्युसीला समजतं आणि आपला व आपल्या तीन वर्षाच्या मुलाचा जीव धोक्यात असल्याची तिला जाणीव होते. डाय कोण आहे, हे तिला समजतं. मग तिच्यात आणि डायमध्ये निर्माण होतो जीवघेणा संघर्ष. ल्युसी आणि तिचं बाळ वाचतात का डायच्या तावडीतून? ते फोटो जर्मनीपर्यंत पोचवण्यात डाय यशस्वी होतो का? चित्तथरारक पाठलागाची उत्कंठावर्धक कथा. his is a mysterious novel set in the background of World War II. Die Nadel, a German spy, goes by the name Faber in England. He has started a session of killing those who come in his way and some innocent people too. MI 15 is also giving a thumbs up to the British spy agency and the police. He is trying to reach Portugal to send some important photos to Germany; But due to a hurricane he reaches a house on an island. He kills David, a crippled soldier in that house. His beautiful wife Lucy and Die develop a physical attraction; But Lucy learns that Diane has killed David and realizes that her life and that of her three-year-old son are in danger. She understands who Die is. Then a deadly conflict develops between her and Die. Do Lucy and her baby survive Die's clutches? Does Die succeed in getting the photo to Germany? A thrilling story of a thrilling chase.
-
VICTORY CITY (व्हिक्टरी सिटी)
पंपा कंपाना ही बिसनागची राणी, कवयित्री तर होतीच; पण ती एक लोकविलक्षण स्त्री होती. ती नऊ वर्षांची असताना तिला देवीचा साक्षात्कार झाला. तिच्या अंत:प्रेरणेतून बिसनाग नगराची निर्मिती झाली. त्या नगरीचा पहिला राजा हक्कपासून शेवटचा राजा अळीय राया इथपर्यंतचा काळ तिच्या दोनशे सत्तेचाळीस वर्षांच्या आयुष्यात तिने पाहिला. पंपा कंपानाचा निर्भयपणा, कलाप्रेम, युद्धकौशल्य इ. गुणांतून तिचं व्यक्मित्त्वं तर ही कादंबरी उलगडतेच; पण तिने पाहिलेल्या राजकीय कारकिर्दींपेक्षा त्या कारकिर्दितील मानवी स्वभावाचे, अंतर्मनाचे पैलू उलगडून मानवी मनाचं, जीवनाचं वास्तव, सूक्ष्म आणि थक्क करणारं दर्शन ही कादंबरी घडवते. The epic tale of a woman who breathes a fantastical empire into existence, only to be consumed by it over the centuries—from the transcendent imagination of Booker Prize-winning, internationally bestselling author Salman Rushdie. In the wake of an insignificant battle between two long-forgotten kingdoms in fourteenth-century southern India, a nine-year-old girl has a divine encounter that will change the course of history. After witnessing the death of her mother, the grief-stricken Pampa Kampana becomes a vessel for the Goddess, who begins to speak out of the girl's mouth. Granting her powers beyond Pampa Kampana's comprehension, the goddess tells her that she will be instrumental in the rise of a great city called Bisnaga—literally 'victory city'—the wonder of the world.
-
SYCAMORE ROW (सिकॅमोर रो)
सेथ हबर्ड यांनी त्यांच्या प्रचंड संपत्तीचा नव्वद टक्के भाग त्यांच्याकडे घरकाम करणार्या लेटी लँग नावाच्या गरीब, कृष्णवर्णीय मोलकरणीला मृत्युपत्राद्वारे देऊन टाकला होता! अर्थातच मृताच्या नातेवाइकांनी मृत्युपत्राच्या वैधतेला कोर्टात आव्हान दिलं. लेटीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेले. अन्यही आरोप झाले तिच्यावर; पण वकील जेक ब्रिगन्स लेटीच्या पाठीशी भक्कमपणे उभा होता; कारण त्यानेच आपल्या मृत्युपत्राची केस चालवावी असं सेथ यांनी मृत्युआधी त्याला लिहिलेल्या पत्रात बजावलेलं होतं. असं काय कारण घडलं असावं, की ज्यामुळे सेथ हबर्ड यांनी त्यांच्या अगदी अखेरच्या क्षणी नवं मृत्युपत्र लिहून त्यांची बहुतेक सगळी मालमत्ता लेटीला देऊन टाकली? त्यांनी आत्महत्या करण्यासाठी फार पूर्वी ‘सिकॅमोर रो’या नावाने ओळखल्या जाणार्या एका निर्जन भागाची निवड का केली? त्यांनी ज्याचं वर्णन ‘कोणीही आयुष्यात कधीही बघू नये’ या शब्दांत केलं, असं कोणतं भयंकर दृश्य त्यांनी आणि त्यांच्या भावाने त्यांच्या लहानपणी पाहिलं होतं? Seth Hubbard bequeathed ninety percent of his vast fortune to a poor, black maid named Lettie Lang who worked for him as a housekeeper! Of course, the relatives of the deceased challenged the validity of the will in court. Letty's character was assailed. There were other allegations against her; But attorney Jake Brigance stood firmly by Letty's side; Because Seth had warned him in a letter written to him before his death that he should handle the case of his will. What could have caused Seth Hubbard to write a new will in his final moments, leaving most of his property to Letty? Why did he choose a secluded area long ago known as 'Sycamore Row' to commit suicide? What horrible sight did he and his brother witness in their childhood, which he described as 'no one should ever see in his life'?
-
SHAHU MAHARAJANCHYA ATHAVANI (शाहू महाराजांच्या आठ
ज्यांना शाहू महाराजांचा सहवास लाभला अशा लोकांनी महाराजांच्या सांगितलेल्या आठवणींचं हे भाई माधवराव बागल यांनी केलेलं संकलन आहे. शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू या आठवणींमधून समोर येतात. प्रयाग स्नानाला महिनाभर जात असताना महाराज शूद्र आहेत म्हणून पुराणोक्त सांगणार्या नारायण भटजींमुळे महाराजांना ब्राह्मण्याचा बसलेला पहिला तडाखा, महाराजांच्या विश्वासातील ब्राह्मण लोक, गोविंदराव टेंबे यांच्या सांगण्यावरून एका असहाय विधवेला मदत करण्यासाठी महाराजांनी शोधलेला सयुक्तिक मार्ग, गंगाराम कांबळेच्या चहाच्या दुकानासमोर जाऊन महाराजांचं चहा पिणं, महाराजांच्या मेहुण्याने त्यांच्या हुजऱ्याला स्वत:च्या पायातले बूट काढायची केलेली आज्ञा आणि महाराजांनी मेहुण्याची केलेली कानउघाडणी, बालगंधर्व, आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना महाराजांनी दिलेलं प्रोत्साहन इ. आठवणींमधून महाराजांचं पुरोगामी, दिलदार, प्रेमळ, न्यायप्रिय, द्रष्टं, गुणग्राहक, हजरजबाबी, साधेपण जपणारं व्यक्तिमत्त्व समोर येतं. THIS BOOK, COMPILED BY BHAI MADHAVRAO BAGAL, IS A COLLECTION OF THE REMINISCENCES OF ALL THOSE PEOPLE WHO GOT AN OPPORTUNITY TO SPEND VALUABLE TIME WITH SHAHU MAHARAJ. VARIOUS ASPECTS OF HIS PERSONALITY ARE REFLECTED FROM THESE MEMORIES. WHILE MAHARAJ USED TO GO FOR A BATH IN PRAYAG FOR A MONTH, NARAYAN BHATJI CHANTED SHLOKAS AS HE WAS FROM SHUDRA COMMUNITY. THIS WAS THE FIRST BLOW OF BRAHMINISM RECEIVED BY SHAHU MAHARAJ. INSPITE OF THIS, HE FOUND A SOLUTION TO SUPPORT A HELPLESS WIDOW ON THE ADVICE OF GOVINDRAO TEMBE AND OTHER BRAHMINS THAT HE TRUSTED. MAHARAJ WAS HUMBLE ENOUGH TO HAVE TEA IN GANGARAM KAMBLE`S TEA SHOP. MAHARAJA`S BROTHER-IN-LAW ORDERED MAHARAJ’S ATTENDANT (HUJRYA) TO REMOVE HIS SHOES. HOWEVER, MAHARAJ DID NOT APPROVE OF THIS AND REPRIMANDED HIM. THIS BOOK ALSO TELLS US ABOUT THE ENCOURAGEMENT GIVEN BY THE MAHARAJA TO ARTISTS LIKE BALGANDHARVA, ABALAL RAHIMAN AND SO ON. FROM THE RECOLLECTIONS, MAHARAJA`S PROGRESSIVE, KIND HEARTED, LOVING, JUSTICE-LOVING, VISIONARY, MERITORIOUS, HUMBLE, SIMPLE PERSONALITY COMES TO THE FORE.
-
Athak (अथक)
पुनर्वसन केंद्रातील अपंग जवानांच्या वास्तव कहाण्यांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली कादंबरी आहे ‘अथक.’ कर्नल मुखर्जी या पुनर्वसन केंद्राचे प्रमुख आहेत. नायक सुरेश कार्की यांचं छातीपासून खालचं शरीर एका अपघातामुळे लुळं झालं. पुण्यातील खडकीच्या रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये दाखल झाले. आता त्यांनी बॅडमिंटनमध्ये प्रावीण्य प्राप्त करून जागतिक क्रमवारीत स्थान पटकावलं आहे. मृदुल घोष हा जवान विमानांची देखभाल-दुरुस्ती करणारा. अपघातात त्याचं मानेपासून खालचं शरीर लुळं पडलं; पण आता तो तोंडात ब्रश घेऊन उत्तम चित्र काढतो. अशा आणखी काही जवानांच्या कहाण्या यात आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन शेफाली आणि क्षितिज हे तरुण-तरुणी सर्वसामान्य अपंगांसाठी कन्नू मेहता सेंटर सुरू करतात. जवानांच्या प्रचंड इच्छाशक्तीची आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन सर्वसामान्य अपंगासाठी सेंटर सुरू करणार्या शेफाली आणि क्षितिजची ही प्रेरणादायक कहाणी.
-
Maharani Bayajabai Shinde (महाराणी बायजाबाई शिंदे)
बायजाबाई शिंदे यांचा हा जीवनपट आहे. घाटगे घराणं हे त्यांचं माहेर. स्वातंत्र्याचा व शौर्याचा वारसा त्यांना आपले पिता सर्जेराव घाटगे यांच्याकडूनच मिळाला. त्या सौंदर्यवती होत्या. त्यांचा विवाह महादजी शिंदे यांचे उत्तराधिकारी दौलतराव शिंदे यांच्याशी झाला. विवाहानंतर राज्यकारभारात, युद्धात बायजाबाईंचा सहभाग असायचा. पतीच्या मृत्यूनंतर ग्वाल्हेरची राज्यव्यवस्था पाहण्यास त्यांनी सुरुवात केली; त्यांच्या अवघ्या सहा वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी व्यवसाय, व्यापार वाढवून आपली राज्यातील तिजोरी, कोषागार समृद्ध केले. सैन्याची चोख व्यवस्था करून आपल्या राज्यातील पेंढारी व ठग लोकांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला, मक्त्याच्या मामलतीची जी चाल होती, ती बंद करण्याचा प्रयत्न केला. जनकोजी या त्यांच्या दत्तक पुत्रामुळे त्यांना बराच त्रास भोगावा लागला. त्यांचे नातू जयाजीराव शिंदे यांनी मात्र बायजाबाई साहेबांना त्यांच्या वृद्धापकाळात खूप जपले. भारताच्या पहिल्या महिला बँकर म्हणून लौकिक मिळवणार्या बायजाबाई यांचा प्रेरक जीवनप्रवास.
-
Indias Railwayman (इंडियाज रेल्वेमॅन)
भारताचे रेल्वेमॅन डॉ.श्रीधरन यांचं हे चरित्र आहे. त्यांचं बालपणीचं जीवन, त्यांची बहीण-भावंडं, त्यांचा शैक्षणिक प्रवास, त्यांचं विवाहोत्तर कुटुंब, रेल्वेतील नोकरी, पाम्बनच्या पुलाचं काम, जहाजबांधणीच्या कामाच्या वेळचा अनुभव, निवृत्तीनंतर कोकण रेल्वेच्या कामाची आलेली जबाबदारी, कोकण रेल्वेचं काम करताना अध्यक्ष असूनही मिळणारं नियमबाह्य वेतन, त्यासाठी त्यांना द्यावा लागलेला लढा आणि त्यांचा झालेला विजय, कोलकाता मेट्रोचं काम, भारतात मेट्रो सुरू करण्याचं श्रेय, चेन्नई आणि मुंबईत केलेली कामं, दिल्ली मेट्रोचं आव्हानात्मक काम, त्या कामादरम्यान झालेला अपघात, राजीनाम्याची केलेली घोषणा आणि नंतर मागे घेतला राजीनामा, त्या कामाच्या दरम्यान आलेला हृदयविकाराचा झटका, मेट्रो रेल कायदा, ब्रॉड गेज-स्टॅन्डर्ड गेज वाद, त्यांच्यावर झालेली टीका आणि त्याला श्रीधरन यांनी दिलेली उत्तरं इ. बाबींवर आणि त्यांच्या शिस्तप्रियता, कार्यतत्परता, ऋजुता इ. गुणांवर या चरित्रातून प्रकाश पडतो. यशस्वी व्यक्तिमत्त्वाचं प्रेरणादायक चरित्र.
-
The Hidden Hindu Part 1 (द हिडन हिंदू भाग १ )
"एकवीस वर्षांचा पृथ्वी ओम शास्त्री या मध्यमवयीन रहस्यमय अघोरीच्या शोधात आहे, ज्याला पकडून एकाकी असलेल्या एका भारतीय बेटावरच्या उच्च तंत्रज्ञानानी युक्त अशा सुविधाकेंद्रात नेऊन ठेवण्यात आलं होतं. जेव्हा या अघोरीला औषधांच्या अंमलाखाली संमोहित करून तज्ज्ञ लोकांच्या टीमनं प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा त्यानं हिंदू पुराणांमध्ये वर्णन केलेल्या चारही युगांचा साक्षीदार असल्याचा आणि रामायण व महाभारतातल्या घटनांमध्ये सहभागी असल्याचा दावा केला. मर्त्य जगाचे नियम धुडकावणार्या ओमच्या अतर्क्य भूतकाळाच्या या साक्षात्कारामुळे तिथे असणारा प्रत्येक जण चक्रावून गेला. त्या टीमला असाही शोध लागला की, प्रत्येक युगातल्या इतर चिरंजीव व्यक्तींच्या शोधात ओम होता. ही विलक्षण गुपितं जगासमोर आली असती तर प्राचीन काळापासून चालत आलेल्या धारणांना धक्का बसू शकला असता आणि येणारं भविष्य बदलून गेलं असतं. तर मग, हा ओम शास्त्री आहे तरी कोण? त्याला का पकडण्यात आलं? पृथ्वी त्याचा शोध का घेत आहे? चला तर मग, या उत्कंठावर्धक प्रवासात ओम शास्त्रीची गुपितं, पृथ्वीचा शोध आणि हिंदू पुराणकथांमधील इतर गूढ चिरंजीवांची साहसं यांचे आपणही सहप्रवासी होऊ यात.
-
Nisargaputra (निसर्गपुत्र)
‘निसर्गपुत्र’ ही अॅड्रियन बोशियरच्या जीवनाचे सत्य सांगणारी कादंबरी. आई पुनर्विवाह करते,नवे वडील द. आप्रिÂकेत कुटुंबास आणतात. तेव्हा १६ वर्षांचा ब्रोशियर दक्षिण आप्रिÂकेतील रानावनात भटकून सत्य व खडतर अनुभव सोसतो. शिंगविहिन- प्रकरणात रक्ताला महत्त्व, त्यामुळे बोकड कापून बोशियरवर प्रथम धार्मिक विधी केला जातो. मोहलासाना: झुडुप- वाटेत दिसणार्या झाडांची, पाना-फुलांची औषधी माहिती बोशियर मिळवतो. मोरारा: महान वेल- सर्व प्रकारच्या मांत्रिकांना, वैदूंना वनऔषधींबद्दलचे ज्ञान असते. एका रुग्णाचा पाय कापायचे निदान होते, पण अतिमहत्त्वाच्या कामास तो रुग्णालयातून बाहेर पडतो व वैदू वनौषधीने त्याचा पाय न कापता बरा करतो. तेमोसो: पूर्वसूचना-आदिवासीं-वैदूंच्या ज्ञानातून पूर्वकल्पनेने दैनंदिन जगणे सोपे व आजारही बरे केले जातात. जमीन-भूमीला येथे महत्त्व. इ.स.१९२० मध्ये गर्टरूड कॅटन-थॉम्सन या ब्रिटिश पुरातत्त्ववेत्तीने आप्रिÂका पालथी घालून, नवे उत्खनन करून खरी संस्कृती जगापुढे आणली. ब्रोशियरनेही अल्प भटकंतीतून-जिव्हाळ्याने अभ्यास केला, म्हणूनच प्रो. रेमंड डार्ट यांनी आपल्या या हुशार शिष्याला नवदृष्टी-नवप्रेरणा व त्याच्या भटकंतीला योग्य दिशा दिली. या १६प्रकरणांतून निसर्गपुत्र बोशियरचे विश्वातील महान कार्य दिसते. हा निसर्गपुत्र आपली ‘जीवनगाथा’ लिहण्याचा प्रयत्न करतो; पण पोहताना अपस्माराच्या झटक्याने १९७८ ला त्याचे निधन होते.
-
Dangerous Minds (डेंजरस माइंड्स)**
‘दहशतवादी दुनियेची दस्तक’ कशी असते, हे आपल्याला ‘डेंजरस माइंड्स’ मधून दिसून येते. विकृत व स्वार्थी प्रवृत्ती देशद्रोह करण्यास तरुणांना भाग पाडतात. ‘जन्नत आणि जिहाद’ च्या गैरसमजांतूनच दहशतवाद पोसला जातोय. या मूठभर ‘दहशती जगताला’ कायमची वेसण घालण्याचे महानकार्य आपले सैनिक करत आहेतच. यासाठी देशातल्या प्रत्येकाने आपले योगदान, शिस्त, वर्तन चांगले ठेवून सतर्क राहणे गरजेचे आहे, हेच ‘डेंजरस माइंड्स’ आपल्याला सांगत आहे.
-
Chotyansathi Hava ,Pani, Prakashache Prayog (छोट्य
‘छोट्यांसाठी - हवा, पाणी ,प्रकाशाचे प्रयोग हे पुस्तक लिहिताना छोट्या मित्रांना हवा, पाणी, प्रकाश यांचे गुणधर्म व त्यामुळे होणारी गंमत सोप्या प्रयोगांतून कशी दाखविता येते, याचे वर्णन केले आहे. त्याचबरोबर त्यांचे ज्ञान खेळतखेळत दिले आहे. या पुस्तकाचे तीन विभाग केले आहेत. प्रत्येक प्रयोगाला आकृती काढलेली आहे. त्यामुळे ते प्रयोग सहज समजू शकतात. प्रयोगासाठी लागणार्या सर्व वस्तू सहज उपलब्ध होणार्या असल्यामुळे प्रयोग करताना कोणतीच अडचण येणार नाही. प्रयोग करताना त्या विषयाचे तात्त्विक ज्ञान होईल, जोडणी कशी करायची याची माहिती होईल व शेवटी प्रयोग पूर्ण झाल्यावर आत्मविश्वास निर्माण होईल.
-
Deserter(डेझर्टर)
आघाडीवर प्राण पणाला लावून लढणार्या, दुर्दैवी परिस्थितीवर मात करणार्या साहसवीरांची अर्थात ल लष्करातील ढवय्या सैनिकांच्या पराक्रमाची गाथा उलगडवून दाखविणारी कादंबरी ‘डेझर्टर्स’. या कादंबरीतील संघर्ष, नाट्य, शोकांतिका, व्यथा-वेदना वाचकाचे मन खिळवून ठेवतात. सैनिक कसे तोंड देतात या युद्धपरिस्थितीला? का ‘डेझर्टर्स’ म्हणून घोषित केलं जातं त्यांना? सैनिकांच्या पलायनामागील घेतलेला अचूक शोध म्हणजेच ‘डेझर्टर’
-
The Stories We Tell (द स्टोरीज वी टेल)
‘द स्टोरीज वी टेल : पुराणकथांतून आधुनिक जीवनाचा अर्थ शोधताना’ या पुस्तकात प्रख्यात पुराणकथा अभ्यासक देवदत्त पट्टनायक यांनी भारतातील व जगभरातील पुराणकथांच्या खजिन्यातून ७२ रत्ने निवडली आहेत. `टी टाईम टेल्स’ या त्यांच्या वेबकास्टमध्ये त्यांनी सांगितलेल्या कथांवर हे पुस्तक आधारित आहे. या पुस्तकात त्यांनी पुराणकथांतून आधुनिक जीवनाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला आहे. हे पुस्तक वाचकाला काळाच्या प्रदीर्घ टप्प्याची अनोखी सफर घडवते.
-
Khulbhar Dudhachi Kahani (खुलभर दुधाची कहाणी)
अमरापूरकर हे नाव ऐकलं की लगेच चित्रपटांच्या रुपेरी पडद्यावरचा एक चेहरा नजरेसमोर अवतरतो. अर्थातच सदाशिव अमरापूरकर यांचा. एकीकडे हा दिग्गज अभिनेता आपल्या दमदार अभिनयाने सिनेसृष्टीवर ठसा उमटवत होता, तर त्याच वेळी कौटुंबिक पातळीवर त्यांची सहचारिणी सगळ्या ताळमेळाचं नेमकं गणित मांडत होती. म्हटलं तर ती खुलभर दुधाची कहाणी आणि म्हटलं तर एका दीर्घ प्रवासाचा नितळ पट. ज्यात सुनंदा अमरापूरकर आपल्या जीवनपटाची छोटी छोटी क्षणचित्रे असोशीने जगतात. वडिलांच्या अकाली निधनामुळे सोसावे लागलेले दारिद्र्याचे चटके...शैक्षणिक प्रवास...नाटकातूनच सदाशिव अमरापूरकरांशी जुळलेले सूर आणि नंतर त्यांच्याशी झालेला विवाह...विवाहोत्तर जीवन...असा हा पट. पतीच्या प्रसिद्धीच्या वलयापासून स्वतःला दूर ठेवून त्यांनी एका कलावंताला आवश्यक असणारा अवकाश जोपासला. त्याच वेळी साऱ्या जबाबदाऱ्या नेटाने पार पाडल्या. स्वतः नाटकात काम करण्याची क्षमता असूनही नवऱ्याचं कलावंतपण जोपासण्यासाठी इच्छेला मुरड घातली. सदाशिव अमरापूरकरांच्या करिअरसाठी मुंबईला केलेलं स्थलांतर असो वा दोन शहरातला, नातेसंबंधातला आपुलकीचा धागा कायम जोपासणं असो, सुनंता अमरापूरकरांनी सगळं अढळ श्रद्धेनं केलं. सोबत अनुवादाच्या क्षेत्रातही स्वतःचा ठसा उमटवला. त्यामुळंच त्यांचं हे आत्मकथन निष्ठेनं संसाराची सूत्रे चालवणाऱ्या खमक्या स्त्रीचं चरित्र वाटतं. माणसांनी, छोट्या-मोठ्या घटना-प्रसंगांनी गजबजलेलं बहुआयामी आणि हृदयस्पर्शी आत्मकथन...
-
Gazal (गझल)
"मूळ उर्दू ग़जल ही काय चीज आहे? ह्या दिलकश गुलबदनीची असली खूबसूरती कशी आहे? तिच्या रंगात नि अंतरंगात गेल्या दीडशे वर्षांत काय बदल होत गेले ? तिचा स्थायिभाव कोणता? प्रमुख शिल्पकार कोणते? इत्यादी बाबींविषयी रसिकतेनं आणि व्यासंगीपणानं विवेचन करणारा ‘ग़जल’ हा ग्रंथ म्हणजे उर्दू शायरीचा छोटासा ‘हेमकोश’च (GOLDEN TREASURY) आहे! "
-
Kanchanmrug (कांचनमृग)*
"‘श्री’ मिळवायची झाली, तर वेडीवाकडी वळणं घेतल्याखेरीज ती हाती येत नाही. पण आज ‘श्री’चं वेडंवाकडं वळण तेवढंच लक्षात ठेवलं जातं.‘श्री’च्या वळणातलं सामथ्र्य नेमकं विसरलं जातं. वेडीवाकडी वळणं घेतच नदी जाते. पण तिची वळणं भूभाग अधिक समृद्ध करायला कारणीभूत ठरतात. वेडीवाकडी वळणं घेत द-याखो-यांचा रस्ता जातो. म्हणूनच माणसाला सहजतेनं संकटांचे डोेंगर तरता येतात. आज ‘श्री’चं नेमकं सामथ्र्य हरवून वेडीवाकडी वळणं तेवढीच कवटाळली जातात! कष्ट, सेवा हे शब्द फक्त उच्चारण्यापुरते उरलेत. सामथ्र्याच्या पायाखाली ‘त्याग’ चिरडला जात आहे. जीवनमूल्यांचा हा -हास माणसाला कुठवर पोहोचवणार आहे ?"
-
Anand Janmala (आनंद जन्माला)
मुकुंद आणि सुनंदाची भेट झाली ‘संततिनियमन करावे की नाही?’ या परिसंवादाच्या निमित्ताने. मग त्यांचं लग्न होतं. त्यांच्या संसारवेलीवर अरुणच्या रूपाने गोंडस फूल उमलतं. अरुणच्या जन्मानंतर मुकुंद मूल न होण्याची शस्त्रक्रिया करून घेतो; पण सुनंदाला पुन्हा दिवस गेले असल्याची चाहूल लागते आणि मुकुंदा हैराण होतो. सुनंदाच्या चारित्र्यावर शंका उत्पन्न करणारी परिस्थिती निर्माण होते. त्याचा पुण्यात बदलून आलेला मावसभाऊ गोविंदा त्याच्या अनुपस्थितीत सुनंदाशी गप्पा मारायला येत असल्याचं, त्याच्या लक्षात आलेलं असतं. गोविंदाला खरं म्हणजे सुनंदाशी लग्न करायचं असतं; परंतु मुकुंदाने तिला मागणी घातल्यावर आपला विचार बदलून गोविंदा दुसर्या गावी निघून गेलेला असतो. मुकुंदाने सुनंदाला मागणी घालण्यापूर्वी तिलाही तो पसंत होता, असं सुनंदाने म्हटल्याचं मुकुंदाला आठवत असतं. त्यांच्या सुखी संसारात संशयासुराने प्रवेश केलेला असतो... काय होतं पुढे? मुकुंद आणि सुनंदाच्या भावांदोलनांची कहाणी.
-
Rigeta (रिगेटा)
या कथासंग्रहातील ‘घाणेरीचं फूल’ कथेतील सवर्ण चित्रकार दलित मुलीशी प्रतारणा करून परदेशी मुलीशी लग्न करतो आणि ती दलित मुलगी आत्महत्या करते. ‘तोडगा’ मधील सुमार रूपाच्या सुनंदाचं लग्न लागत असताना मांडवातच तिचा नवरा मरण पावतो आणि त्यानंतर लग्नाआधी तिच्यावर मोहित झालेल्या बापूंनी तिला लिहिलेलं पत्र ती वाचते आणि तिच्या उजाड जीवनात ते पत्र ‘ओअॅसिस’ आणतं. ‘जखम’ कथेतील चाळिशी उलटलेल्या, संसार उत्तम तर्हेने मार्गी लागलेल्या सुमतीचा कॉलेजमधील मित्र प्रभाकर तिच्या घरी येतो. सुमतीने आणि त्याने एकत्र घालवलेल्या उत्कट प्रेमाच्या क्षणांचं स्मरण तो तिला देऊ पाहतो. ‘देणं’ या कथेत ईव्हा या स्वैर परदेशी तरुणीच्या माध्यमातून भारतीय संस्कृती (विशेषत: स्त्री-पुरुष संबंधांच्या बाबतीत) आणि पाश्चात्त्य संस्कृतीची तुलना भारतीय लेखकाच्या मनात येते. मानवी जीवनातील योगायोग, नियती, मानवी मन, स्त्री-पुरुष, कला आणि जीवन या कोलाजमधून साकारलेल्या वाचनीय कथांचा संग्रह.