-
Origin (ओरिजिन)
गुगेनहाईम वस्तुसंग्रहालयातील एडमंड कर्षचं एक रहस्यमय प्रात्यक्षिक...प्रात्यक्षिकात, निमंत्रितांच्या उपस्थितीत, तो सांगणार असतो मानवाच्या उत्पत्तीसंबंधी आणि मानवाच्या भविष्याविषयी लावलेला शोध... पण तो सांगण्याआधीच कार्यक्रमस्थळी होते त्याची हत्या... हल्लेखोराचं पलायन... तो असतो नौदलातील माजी अधिकारी... कर्षचे गुरू रॉबर्ट लँग्डन आणि वस्तुसंग्रहालयाची मुख्याधिकारी अॅम्ब्रा व्हिडाल (जी स्पेनचे भावी राजे ज्युलियन यांची वाग्दत्त वधू असते) कर्षचा हा शोध जगासमोर आणायचा बांधतात चंग... पण त्यासाठी कर्षच्या महासंगणकाचा पासवर्ड आणि त्या महासंगणकाची जागा शोधण्याचं त्यांच्यासमोर असतं आव्हान... अॅम्ब्राचे सुरक्षारक्षक आणि पोलीस यांचा त्यांच्या मागे असतो ससेमिरा... कर्षच्या खुनाच्या पार्श्वभूमीवर राजवाड्यातून ज्युलियन आणि बिशप वाल्डेस्पिनो गूढ रीतीने गायब होतात...एक जबरदस्त गुंतागुंतीची, उत्कंठावर्धक कादंबरी...
-
Besharam (बेशरम)
तसलिमा नासरिन यांची ही कादंबरी स्थलांतरितांच्या जीवनाची चित्तरकथा आहेण् आपली जन्मभूमि सोडून परक्या मुलखातए जगभरच्या कानाकोपऱ्यातए वेगवेगळ्या वातावरणात स्वतःला रूजवू पाहणाऱ्यांची ही गोष्ट आहेण् अर्थात तसलिमा यांनी स्वतः हे आयुष्य जवळून अनुभवलेले आहेण् म्हणूनच स्वतः तसलिमा यांचं जगणंही यात प्रतिबिंबित होत राहतंण् त्यांच्या ष्लज्जाष् कादंबरीमुळे त्यांना कट्टरपंथी लोकांनी देश सोडायला लावलाण् लज्जामध्ये अनुभवाला येणाऱ्या प्रसंगांचीच पुढील आवृत्ती या कादंबरीत पाहायला मिळतेण् तसलिमा यांनी मोठा काळ देशाबाहेर व्यतित केला आहेण् आपली मूळे उखडली जाण्याची ही वेदना या कादंबरीत प्रकर्षाने येतेण् कादंबरीची सुरुवातच एका भेटीने होतेण् लज्जा कादंबरीतील पात्र असणारा सुरंजन लेखिकेला अचानक भेटायला येतोण् हा तोच सुरंजन असतोए जो लज्जा कादंबरीच्या केंद्रस्थानी आहेण् लेखिका या गोष्टीपासून अनभिज्ञ आहे की सुरंजन आणि त्याचे कुटुंब बांगलादेशातील 1993मधील सांप्रदायिक दंगलीवेळी स्वतःचा बचाव करत भारतात येण्यात यशस्वी झाले होतेण् या भेटीत लेखिकेला कळतं की सुरंजनचे वडील सुधामय यांचे निधन झाले आहेए तर त्याची आई आणि बहीण जिवंत आहेतण् या भेटीत सुरंजनच्या स्थलांतराचे गोष्ट समोर येतेण् या दोघांच्या संवादातून एकेक धागा उलगडत जातोण् याच धर्तीवर लेखिकेला एकेक पात्र भेटत जातेण् आणि त्यांच्या कथा समोर येत जातातण् हे पुस्तक कट्टरपंथीयांची बेशरमी वृत्ती अधोरेखित करत त्या विरोधात आवाज उठवण्याच्या संभावनांची चाचपणी करतंण् पण हे पुस्तक राजकीय नाहीए तर सामाजिक स्तरावरील स्थितीबाबत अधिक निवेदन करतंण् लेखिका अर्थात तसलिमा यांना सुरंजनए किरणमयीए माया आणि जुलेखा ही चार पात्र भेटतातण् आणि या पात्रांसोबतचा संवाद कादंबरी प्रवाहित करतोण्
-
I.C.184 Apaharnache 173 tas (आय.सी.८१४ अपहरणाचे १७
इंडियन एअरलाईन्सच्या काठमांडू ते नवी दिल्ली फ्लाईट आय्. सी. च्या सुमारे २०० प्रवाशांच्या आणि विमानातील कर्मचाNयांच्या दृष्टीने तो एक नरकाचा प्रवास होता... बंदिवासातील त्या आठ दिवसांमध्ये त्यांच्यांतील प्रत्येकाने नानाविध मानवी भावभावनांचा भयभीषण अनुभव घेतला. आपल्या परीने असाच अनुभव त्यांच्या अपहरणकत्र्यांनी घेतला. त्या बुरखाधारी अपहरणकत्र्यांनी स्वत:ची नावे चीफ, बर्गर, डॉक्टर, शंकर आणि भोला अशी घेतली होती. या पुस्तकामध्ये त्या संपूर्ण अपहरणनाट्याची पुनर्निर्मिती करण्यात आली आहे. यातील एकेक अनुभव रसरशीत, जिवंत होऊन आपल्यापुढे उभा राहतो. त्या १७३ तासांतील तो मानसिक ताण, ती दहशत आपल्याला वेगळ्याच भयावह जगात घेऊन जाते. मग ते काठमांडू असो, नाहीतर अमृतसर, दुबई असो, की वंÂदाहार! नवी दिल्ली येथील, सत्तावेंÂद्रे आणि अर्थात विमानांच्या अंतर्भागाचाही या अपहरणनाट्यात समावेश आहे. अपहरणाची ती संपूर्ण धाडसी योजना आखण्यापासून ते ती पूर्णपणे पार पडेपर्यंतचे सर्व दुवे एकसूत्राने गुंफण्यात आले आहेत... — आणि अखेर अपहरणकर्ते पाकिस्तानात जाऊन कसे भूमिगत होतात, त्याचेही दर्शन या पुस्तकातून घडवण्यात आले आहे.
-
Ayushyacha Nava Dav (आयुष्याचा नवा डाव)
नैराश्य ही सबंध जगाला भेडसावणारी समस्या. दर चार व्यक्तींमागे एक व्यक्ती नैराश्याने ग्रासलेली असते. नैराश्यातनं होणाऱ्या आत्महत्यांमध्ये भारत जगात आघाडीवर आहे. पण तरी मानसिक आरोग्याबद्दल मोकळेपणाने बोललं जात नाही. हे पुस्तक नैराश्यासारख्या महत्त्वपूर्ण विषयावरचं आपलं मौन सोडायला लावतं. डॉ. शैलजा सेन यांचा मानसिक आरोग्यातला प्रदीर्घ अनुभव, त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनुभवलेल्या केसेस गोष्टरूपात या पुस्तकात समोर येतात. या गोष्टीतून आणि रूग्णांसोबतच्या त्यांच्या संवादातून प्रत्येकाला आपल्या मानसिक दुखण्यावरही इलाज सापडत जातो. मानसिक अनारोग्याबाबतची लांच्छनाची भावना, लाज यांच्याविरोधात आवाज उठवत हे पुस्तक तुम्हाला समजून घेणारी मैत्री बहाल करतं.
-
Mahaparva.. (महापर्व)
मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धाचा सुसूत्र लेखाजोखा. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य संभाजी महाराजांच्या वधानंतर मोगल आपल्या घोड्यांच्या टापांखाली तुडवत होते. औरंगजेब आणि त्याचे प्रचंड सैन्य मराठ्यांना चिरडू पाहत होते. सुमारे पंचवीस वर्षांहून अधिक काळ औरंगजेब आणि त्याच्या सैन्याला झुंजवणाNया राजाराम महाराज, संताजी-धनाजी, ताराबाई आणि अन्य अनुभवी मराठी सरदारांची शौर्यगाथा.
-
Shanghayachya Muli (शांघायच्या मुली)
शांघाय शहरातील पर्ल व मे या दोघी तरुण बहिणी... जुगारात हरल्यानंतर त्यांचे वडील या दोघींनाही लॉस एंजलिसला स्थायिक झालेल्या लुई नावाच्या मूळ चिनी माणसाच्या दोन मुलांच्या वधू म्हणून विकतात...त्या दोघींचा चीन ते अमेरिका असा खडतर प्रवास, लुईच्या कुटुंबात गेल्यानंतरचं त्यांचं आयुष्य आणि कालांतराने परिस्थितीवश या दोघींमध्ये उभी राहिलेली भिंत...स्थलांतराच्या अनेक पैलूंचं दर्शन घडवणारं, मनाला चटका लावणारं भावनाट्य
-
Gahan Padleli Tekadi (गहाण पडलेली टेकडी)
गहाण पडलेली टेकडी हा आदिवासी स्त्रियांच्या कहाण्यांचा संग्रह. या कहाण्या मारिजा स्रेस यांनी त्या अदिवासींमध्ये त्यांच्यापैकी एक होऊन, त्यांच्यात राहून लिहिल्या आहेत. ‘इथं तर हे नेहमीचंच’ या कथेतील मुकादम आणि ठेकेदाराच्या पाशवी वासनेला बळी पडून जीव गमवावी लागलेली नुकतीच वयात आलेली लाली...‘ठेवलेली बाई’ कथेतील पहिला नवरा गेल्यावर नाईलाजाने दुसरं लग्न करावं लागलेली आणि दुसऱ्या नवऱ्याने बाई ठेवली आहे, हे कळल्यावर बंड करू पाहणारी खातरी...‘दुभती गाय’ कथेतील आदिवासी स्त्रियांना हाताशी धरून गावात दूध सोसायटी उभी करू पाहणाऱ्या मीराबेनला पुरुषी मानसिकतेचा करावा लागणारा सामना...‘जो मैं ऐसा जानती’ कथेतील तारुण्यात पाय घसरलेली, पण नंतर नेकीने संसार करणारी मकू...‘बदलत्या काळाची पावलं’मधील ठार मारू पाहणाऱ्या नवऱ्याच्या आणि सासरच्या लोकांच्या तावडीतून सुटून आलेली, नंतर नानजीशी लग्न करून सुखाचा संसार करताना गावातील बायकांचा उद्धार करू पाहणारी फूली...काही शोषित आणि काही संघर्ष करू पाहणाऱ्या आदिवासी स्त्रियांचं वास्तव विश्व.
-
Congress Viruddha Maharashtra (काँग्रेस विरुद्ध मह
आचार्य अत्रे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता; पण काही कारणाने अत्रे आणि काँग्रेस यांच्यात वितुष्ट आलं आणि अत्रे काँग्रेसच्या बाहेर पडले. अत्र्यांनी काँग्रेसवर, विशेषत: यशवंतराव चव्हाण आणि पंडित नेहरूंवर आपल्या लेखणीने नेहमीच शरसंधान केलं. ‘काँग्रेस विरुद्ध महाराष्ट्र’ या पुस्तकातून अत्र्यांमधील कट्टर काँग्रेस विरोधकाचं दर्शन घडतं. यशवंतरावांची नेहरूनिष्ठा आणि नेहरूंचा महाराष्ट्रद्वेष यावर अत्र्यांनी कडाडून टीका केली. यशवंतराव चव्हाणांनी संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधात घेतलेली भूमिका, आणीबाणीच्या वेळी यशवंतरावांनी काँग्रेसचा केलेला त्याग आणि त्यादरम्यान इंदिरा गांधींनी त्यांची केलेली निंदा आणि यशवंतरावांची मलिन झालेली प्रतिमा, भाषावार प्रांतरचनेला नेहरूंनी केलेला विरोध इ. अनेक महत्त्वाच्या घटनांवर या पुस्तकातून तपशीलवार भाष्य करण्यात आलं आहे आणि अत्र्यांच्या निर्भीड, पारदर्शक व्यक्तिमत्त्वाचं दर्शनही घडवलं आहे.
-
Never Go Back (नेव्हर गो बॅक)
मिलिटरी पोलीस म्हणून सैन्यामधून निवृत्त झालेला जॅक रीचर हा सडाफटिंग, असामान्य बुद्धीचा, ताकदवान माणूस. त्याच्यावर सोळा वर्षांपूर्वी घडलेल्या खुनाचा आरोप ठेवण्यात येतो आणि त्याला पुन्हा सैन्यात भरती करून घेण्यात येते. तसंच त्याला एका प्रेमप्रकरणातही अडकवण्यात येतं. त्याला कोण आणि का गुंतवत असतं अशा आरोपांत? एका अफगाणीने दोन डेप्युटी चीफ्स ऑफ स्टाफ्सच्या मदतीने चालवलेला बेकायदा व्यापार... रीचरने या सर्वच प्रकरणांचा लावलेला छडा
-
Shubh Shubhmangal (शुभ शुभमंगल)
पति-पत्नी ही संसाररथाची दोन चाके आहेत. काही वेळा वाद, मतभेद, भांडण यामुळे ही चाके कुरकूर करू लागली तरी प्रेम, सामंजस्य यांचं वंगण घालून ती चाकं चालती ठेवणं महत्त्वाचं. वाद, मतभेद टोकाला जाऊ न देण्यासाठी काय करावं, याचं मार्गदर्शन करणारं, वैवाहिक नात्यात निर्माण होणाऱ्या समस्या, त्यांचे परिणाम यांचा विचार करतानाच त्यावरील उपाययोजना सुचवणारं, सुखी वैवाहिक जीवनाचा मूलमंत्र देणारं पुस्तक.
-
The Mute Anklet (द म्यूट अँक्लेट)
म्हैसूरचे संस्थानिक महाराज. उमा ही त्यांच्या मृत बहिणीची आणि वॉरेन या ब्रिटिश सैनिकाची मुलगी. म्हैसूरच्या किल्ल्याला वेढा घालून बसलेला इंग्रज सैन्यातील देखणा ब्रिटिश तरुण अॅश्टन एका नाट्यमय प्रसंगामुळे महाराजांच्या तावडीत सापडतो. ते त्याच्यासमोर उमाशी विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवतात. उमाच्या मनात ब्रिटिशांविषयी द्वेष आणि अॅश्टनलाही विवाहबंधनात अडकायचं नसतानाही त्यांचा विवाह होतो. अॅश्टनशी झालेला विवाह हा उमाच्या जीवनातील नावडता, तरी महत्त्वाचा अध्याय आहे. तर दुसर्या बाजूला उमाकडे असलेल्या एका वस्तूमुळे (ज्या वस्तूबद्दल ती स्वत: अनभिज्ञ आहे) तिच्यावर हल्ल्याचे, तिच्या अपहरणाचे प्रयत्न होत आहेत. उमा आणि अॅश्टनचं वैवाहिक जीवन फुलतं का, तिच्याजवळ असलेल्या वस्तूचा शोध तिला लागतो का आणि ती वस्तू कुणाला आणि का हवी असते, याचं काय रहस्य असतं? ऐतिहासिक पार्श्वभूमीवर फुललेली एक हळुवार, रहस्यमय प्रेमकहाणी.
-
The Innocent Man (द इनोसंट मॅन)
अडा या ओक्लाहोमाच्या छोट्या गावातील रॉन विल्यमसन... बेसबॉलमध्ये उज्ज्वल भविष्य असताना दारू आणि अमली पदार्थांच्या आहारी गेलेला, विचित्र वागणारा, आईबरोबर राहणारा एक बेरोजगार, घटस्फोटित, मानसिक विकारांनी त्रस्त तरुण.. नाइट क्लबमध्ये काम करणाऱ्या डेबी कार्टर या कॉकटेल वेट्रेसवर अमानुष बलात्कार करून तिचा खून करण्यात येतो... खुनाच्या आदल्या रात्री ग्लेन गोअर या माणसाबरोबर तिला पाहिल्याचं बNयाच साक्षीदारांनी सांगूनही रॉन विल्यमसनवर या खुनाचा आळ येतो... त्याला खुनी ठरवणारा एकमेव साक्षीदार असतो ग्लेन गोअर... रॉनचा मित्र डेनिस प्रिÂट्झ यालाही त्यात अडकवलं जातं... डेनिसला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येते, तर रॉनला मृत्युदंडाची...ते दोघं आपलं निरपराधित्व सिद्ध करू शकतात का याचा थरारक वेध घेणारी सत्य घटनेवर आधारित कादंबरी द इनोसन्ट मॅन
-
A Quiver Full Of Arrows (अ क्विव्हर फुल ऑफ अॅरोज)
जेफ्री आर्चर यांचा ‘अ क्विव्हर फुल ऑफ अॅरोज’ हा कथासंग्रह शीर्षकाला अगदी सार्थ ठरवणारा आहे. जेफ्रीच्या भात्यातला प्रत्येक बाण अगदी धारदार आहे. या बारा कथांमधील प्रत्येक कथा वाचकांच्या मनावर जबरदस्त परिणाम घडवून आणते. कथालेखनात जेफ्री आर्चर यांचा हात कुणीच धरू शकणार नाही. त्यांच्या कथेचा शेवट नक्की कसा होणार आहे याचा अगदी शेवटच्या ओळीपर्यंतसुद्धा वाचकाला अंदाज येऊ शकत नाही. या पुस्तकातील बारा कथांपैकी प्रत्येक कथा एका वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणी, एका वैशिष्ट्यपूर्ण वातावरणात घडते. मग ते ठिकाण प्राचीन बेथलहेम असो नाहीतर ब्राझीलमधील पंचतारांकित हॉटेल असो. एक गोष्ट तर उघडच आहे, या प्रत्येक ठिकाणाचा, तसंच गोष्टीत चित्रित केलेल्या कालखंडाचा जेफ्री आर्चर यांनी तपशीलवार अभ्यास केलेला आहे. त्या संदर्भात पुष्कळ संशोधन केलेलं आहे. जेफ्री यांच्या कथांचे विषयही अत्यंत वैविध्यपूर्ण असतात. प्रेम, राजकारण, विनोद यांपैकी कोणत्याही विषयावरील त्यांची कथा तेवढीच रोचक आणि उत्कंठावर्धक असते. जेफ्री आर्चर यांना ‘मास्टर स्टोरीटेलर’ असं म्हटलं जातं, कारण विंचवाचा डंख जसा त्याच्या शेपटीच्या टोकात असतो, त्याचप्रमाणे जेफ्री यांच्या प्रत्येक कथेचा शेवट वाचकांची मती गुंग करून टाकणारा असतो. शेवटच्या क्षणी त्यांची कथा असं काही अनपेक्षित, वेगळंच वळण घेते की, वाचकाला आधी त्याचा काही अंदाजच येऊ शकत नाही. अ क्विव्हर फुल ऑफ अॅरोज हा कथासंग्रहही याला अपवाद नाही. सोदबीज्च्या लिलावगृहामध्ये खरेदीसाठी आलेल्या एका कलासक्त रसिकाला, एका लहानशा संगमरवरात कोरलेल्या चिनी मूर्तीमध्ये एक विलक्षण रहस्य दडलेलं सापडतं. अभिजात साहित्याच्या अभ्यासात रममाण होणारा एक तरुण आणि एक तरुणी परस्परांशी स्पर्धा, हेवेदावे आणि चढाओढ करता करता एकमेकांमध्ये असे काही गुंतून जातात, की तो अनुबंध त्यांच्या मृत्यूनंतरही तुटत नाही. न्यूयॉर्कच्या एका पंचतारांकित मेजवानीच्या वेळी अनपेक्षितरीत्या एका लेखकाची गाठ त्याच्या जुन्या चाहत्याशी पडते आणि ती त्याला भूतकाळात घेऊन जाते.
-
Kar Har Maidan Fateh (कर हर मैदान फ़तेह)
सबंध महाराष्ट्रातील तरुणाईच्या गळ्यातला ताईत आणि उत्तुंग मनोबल व धैर्यानं दहशतवाद्यांशी दोन हात करणारं पराक्रमी व्यक्तिमत्त्वं म्हणजे श्री.विश्वास नांगरे पाटील. त्यांचा आजवरचा प्रवास, पोलीस अधिकारी म्हणून जडणघडण होत असतानाचे टक्केटोणपे आणि गुन्हेगारी जगतावर त्यांनी बसवलेला चाप, या सर्वाची दमदार यशोगाथा म्हणजे श्री. विश्वास नांगरे पाटील यांचं ‘कर हर मैदान फ़तेह’ हे पुस्तक. एका ग्रामीण युवकाचं एका अधिकाऱ्यात रूपांतर होत असतानाचे विलक्षण अनुभव आणि त्या अनुभवांच्या आधारे घडलेली यशस्वी कारकीर्द यांचा सांगोपांग आढावा म्हणजे हे पुस्तक.
-
A Twist In The Tale (अ ट्विस्ट इन द टेल)
कार्लाचा खून होतो... एक इन्शुरन्स एजंट मेन्झीस आणि तिचा प्रियकर कॅसानोव्हा तिच्या खुनाच्या आधी वेगवेगळ्या वेळी तिच्याकडे आलेले असतात...कुणी केलेला असतो खून?...भ्रष्टाचाऱ्यांचं पितळ उघडं पाडणारा नायजेरियाचा अर्थमंत्री इग्नेशियस एका स्विस बँकेच्या चेअरमनकडून त्या बँकेतील खात्यांचे तपशील प्राप्त करण्यासाठी त्याच्या डोक्याला पिस्तूल लावतो... मल्टाव्हियाच्या राजाकडून जेराल्डला सोन्याचा एक रत्नजडित हार बक्षीस म्हणून मिळतो...काय होतं त्या हाराचं? धक्कादायक शेवट असलेल्या कथा
-
The Railway Man (द रेल्वे मॅन)
मलाया-सियामच्या निबिड जंगलात जपान्यांनी बलाढ्य ब्रिटिश सैन्याला शह दिला. अतिशय दुष्टप्राप्य खडतर अशा रेल्वे मार्गाच्या उभारणीचा चंग जपानी सैन्याने बांधला व त्यासाठी तब्बल २,००,००० दोस्त राष्ट्रांच्या ब्रिटिश, ऑस्ट्रेलियन व कॅनेडियन सैनिकांना युद्धबंदी बनवून त्यांच्याकडून हया रेल्वेमार्गाची उभारणी केली. वैयक्तिक पातळीवर ही अमानुषता अनुभवलेल्या एका सैनिकाची ही प्रथमपुरुषी कहाणी, परंतु एका विशिष्ट कालखंडाच्या इतिहासाचे दर्शन घडविणारी अद्भुत कथा.
-
Aagaman (आगमन)
अविचल...तंत्रविद्या कोळून प्यायलेला एक श्रीमंत तरुण...वामपंथीयांच्या तावडीत सापडलेल्यांची सुटका करण्याचं काम निरपेक्षपणे करणारा... श्रीनिवास...एका खेडेगावातील पुजाऱ्याचा तरुण मुलगा...प्रिया नावाच्या तरुण मुलीच्या माध्यमातून हंबीर नावाचा वामपंथी त्याच्यावर जाळं टाकतो...श्रीनिवास त्या जाळ्यात पुरेपूर अडकतो... अविचल त्याची त्या जाळ्यातून सुटका करतो...बाहेरची बाधा झालेल्या तनयाची बाधा उतरवायला एका गूढ वाड्यात अविचल जातो आणि तनयाच्या आजीच्या जाळ्यात सापडतो...अविचलचा मित्र भैरव आणि दत्तभक्त पाठक त्या जाळ्यातून अविचलला सोडवतात आणि अविचल तनयाच्या आजीला धडा शिकवतो...वांचूमाळ या आदिवासी माणसाबरोबर अविचल आणि त्याच्यासारखे काही तांत्रिक वांचूमाळच्या गावी पोचतात आणि मृत्यूच्या सापळ्यात अडकतात...थरारक घटनांची रेलचेल असलेल्या उत्कंठावर्धक लघुकादंबऱ्या ‘‘वेताळाय नम:। तीव्राय नम:। तमनायकाय नम:।’’ असं म्हणत त्यांनी मद्याने भरलेल्या उलट्या वलयाच्या शंखातून धार ओतून विचमन केलं आणि जारण मंत्राच्या पठणाला त्यांनी सुरुवात केली. जारण मंत्राच्या जबर तडाख्याखाली अविचलचं मन होलपटलं. खोल भोवऱ्यात सापडल्याप्रमाणे अविचलचं मन चोळामोळा होण्यापूर्वी त्याच्या मनात लख्ख प्रकाश पडला. तनयाचं झपाटणं म्हणजे फक्त आमिष होतं! खरं सावज तर तोच होता. त्याचं मन पूर्ण असंरक्षित आणि बेसावध असताना त्याच्यावर जारण जागवता यावं म्हणून हा सर्व खेळ काळजीपूर्वक आखला गेला होता. तनयाचं संरक्षण करताना जेव्हा त्याच्या शक्ती पूर्णपणे एका दिशेने एकवटल्या गेल्या होत्या, त्या वेळी त्याच्यावर हल्ला करण्याचा हा कावा भ्याडपणाचा होता यात शंकाच नव्हती! पण वाममार्गात योग्य काय आणि अयोग्य तरी काय?
-
Factory Girls (फॅक्टरी गर्ल्स)
छांग यांनी त्यांच्या कुटुंबाच्या चीनअंतर्गत स्थलांतराची आणि त्यानंतर पश्चिमेकडच्या स्थलांतराची कहाणी कुशलतेनं गुंफली आहे. चीनमध्ये अंदाजे १३ कोटी स्थलांतरित कामगार आहेत. त्यांपैकी जवळजवळ सगळेच तिशीच्या आतले आहेत. फॅक्टरी गर्ल्स पुस्तकामध्ये लेस्ली टी. छांग यांनी प्रामुख्याने दोन तरुणींची जीवनकथा उलगडून या कामगारांची कहाणी मांडली आहे. तोंगकुआन या औद्योगिक शहरामध्ये या दोघी तरुणी करिअरमध्ये असेम्ब्ली लाइनपासून मोठी झेप घेण्याच्या प्रयत्नांत असतानाच्या तीन वर्षांतला त्यांचा जीवनसंघर्ष लेखिकेनं त्यांच्या सोबत राहून प्रत्यक्ष अनुभवला. छांग यांनी स्वतःचं रुग्णालय असलेला महाकाय स्नीकर कारखाना, विद्यार्थी अतिशय समर्पणानं शिकत असलेले इंग्रजीचे वर्ग, आणि मुलींना घर सोडून बाहेर पडायला लावणारी गरिबी आणि रिकामपणानं ग्रासलेली शेतीप्रधान गावं अशा ठिकाणांची सफर आपल्याला घडवली आहे. जागतिक स्तरावर अतिशय महत्त्वाचे असलेले फॅक्टरी गर्ल्स हे पुस्तक, ग्रामीण भागातल्या गावांपासून शहरांकडे होत असलेल्या प्रचंड स्थलांतरामुळे चिनी समाजामध्ये कसे बदल घडवत आहे, हे दर्शवते.