-
Vadivasal - Kadambari (वाडीवासल - कादंबरी)
वाडीवासल’ ही सी. एस. चेल्लप्पा लिखित १९४९ साली प्रकाशित झालेली तामिळ भाषेतील अभिजात लघुकादंबरी असून तामिळनाडूच्या एका खेड्यात होणारा जल्लिकट्टू (बैलाला शरण आणण्याचा खेळ) हा खेळ या लघुकादंबरीचा विषय आहे. कादंबरीचा नायक पिक्ची हा एक उमदा तरुण या खेळात तरबेज मानल्या जाणाऱ्या कारी या बैलाविरुद्ध उभा ठाकतो. पिक्चीला कारीशी का झुंज द्यायची असते? जल्लिकट्टूमध्ये त्याला कारीलाच का नमवायचं असतं ? एका पशूवर विजय मिळवून त्याला असं काय मिळणार असतं? असे काही प्रश्न कादंबरी वाचताना वाचकाला पडत राहतात. कादंबरीच्या शेवटी त्याची उत्तरं तर मिळतातच; पण बैलाला नमवण्याच्या पिक्चीच्या अथक प्रयत्नांतून त्याचे धाडस, अभिमान आणि उच्चनीचतेची सामाजिक उतरंड असे अनेक पीळ आपल्याला या लघुकादंबरीत उलगडताना दिसतात. माणसाचे पशुवत समोरच्यावर ईष्र्येने झडप घालणे आणि पशूने माणसागत धूर्त विचारांनी खेळी खेळणे असा एक सूक्ष्मसा विरोधाभासही या कादंबरीत अधोरेखित केलेला आहे. ‘जल्लिकट्टू’ या क्रीडाप्रकाराच्या अतिशय चित्रमय आणि रोमांचकारी वर्णनामुळे ही कादंबरी वाचकाला खिळवून ठेवते. या खेळातील रांगडी ऊर्जा आणि त्याचे सांस्कृतिक महत्त्व या लघुकादंबरीत लक्षणीयरीत्या अधोरेखित केलेले आहे. रानटी पशुत्व, निसर्ग आणि सूडबुद्धीने ग्रासलेले मानवी व्यवहार या कादंबरीत ठळकपणे आविष्कृत होतात.
-
Chincheche Zaad (चिंचेचं झाड)
'चिंचेचं झाड' ही सुंदर रामस्वामी यांची तमिळमधून भाषांतरित झालेली आधुनिक अभिजात कादंबरी आहे. एका प्रदेशाचा सामायिक इतिहास, हरपण्याचं दुःख, निसर्गाविषयीचं आपुलकीचं नातं आणि एखाद्या पौराणिक दंतकथेमध्ये शोभेल असं गावातल्या आयुष्याच्या केंद्रस्थानी असणारं एक चिंचेचं झाड, याविषयीचं मन भारावून टाकणारं चित्रण या कादंबरीत वाचायला मिळतं. दक्षिण भारतातल्या एका लहानशा गावामधला मध्यवर्ती तिठा, माणसांच्या आणि वाहनांच्या रहदारीने गजबजलेला; तिथे हे चिंचेचं झाड डौलाने उभं होतं. जोवर ते जिवंत होतं तोवर त्या झाडाचा आब जराही कमी झाला नव्हता. पन्नास वर्षांहून अधिक काळ ते भोवतालच्या जगाचा एक सहृदय साक्षीदार होतं. तिथला आनंद, दुःख, हसणं, रडणं प्रत्येक क्षण त्याने पाहिला. सावली देताना कोणताही भेदभाव केला नाही. बैलगाडीच्या जमान्यापासून सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि पर्यावरणीय बदलांनी गजबजून गेलेला गावाचा प्रवासही या झाडाने पाहिला. त्याच गावामधला दामोदर आसन; एक गूढ तत्त्वज्ञ, असंख्य आठवणींचा संग्राहक, कथाकथनात निपुण असणारा. ते चिंचेचं झाड आणि त्या संदर्भात त्याने प्रसवलेल्या सगळ्याच कहाण्या, पिढ्यान्पिढ्या लोकांना झपाटून टाकणाऱ्या रसाळ गोष्टींचा अखंड झरा त्याच्यापाशी होता. दामोदर आसनच्या कथांनी भुरळ घातलेल्या एका अनामिक निवेदकाच्या कटू-गोड आठवणींमधून उलगडणारी 'चिंचेचे झाड' ही कादंबरी स्थित्यंतर, भौतिक विकासातील तडजोडी, अविनाशी प्रतिष्ठा, संस्कृती आणि काळाच्या पडद्याआड गेलेल्या, तरीही स्मृतींमध्ये अखंड जिवंत राहिलेल्या एका प्रतीकाची वैश्विक कथा आहे
-
Samee (सामी)
लहानपणी ऐकलेली ‘आजीची गोष्ट’ आठवते? व्यक्तिरेखांसह तो काळ, स्वभाव, सवयी, जीवनपद्धती, आचरण, शिकवण यांचे कळत-नकळत संस्कार करण्याची क्षमता त्या गोष्टींमध्ये होती. पेरुमल मुरुगन यांच्या ‘सामी’ मध्ये अशीच क्षमता आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या एका दक्षिण भारतीय शेतकऱ्याच्या कौटुंबिक आणि सामाजिक संघर्षाची ही गोष्ट. तामिळ संस्कृतीच्या गोडव्यासह लोकरीची गुंडाळी सोडवावी तशी मुरुगन यांच्या लेखणीतून कथा हळुवार उलगडत जाते. एखाद्याच्या पायाखालची जमीन सरकण्याइतकी रक्ताची नाती, पोटच्या पोरांशी जोडलेली नाळ कमकुवत असते का? प्रस्थापित समाजव्यवस्था आणि एकत्र कुटुंबसंस्थेला मुरुगन यांच्या ‘सामी’ या कादंबरीने असेच काही प्रश्न विचारले आहेत. तामिळ भाषेत सामी म्हणजे श्रेष्ठ मालक. कादंबरीतल्या मुथ्थूसामीसोबत वाचक एका नव्या जमिनीच्या शोधात निघतो. सेतूर आणि कोरडूसारखी गावं ओलांडून पलीकडे जाताना नाचणीची शेतं, कडुलिंबाचे वृक्ष आणि चिंचेची झाडं दाट छाया धरतात. पंगुणी महिन्यातली रिमझिम आणि सित्तिरईचा कडक उन्हाळा सोसत बाजरी नाहीतर नाचणीच्या ‘कळी’मध्ये कुस्करलेल्या वालपापडीच्या बियांची झणझणीत चव चाखत हा प्रवास रंजक होतो. कादंबरीचा काळ जुना असला तरी मनुष्यस्वभाव आजही तसाच आहे, त्यामुळे संदर्भ कालबाह्य ठरत नाही. पहिल्या पानावरचा वाचक शेवटचं पान पलटताना एक विद्यार्थी होऊन जीवनानुभवाचं गाठोडं सोबत घेऊन जातो. पण मुथ्थूचं काय? स्वतः सह त्याच्या कुटुंबियांचं आयुष्य पणाला लागलंय. आपण ‘सामी’ असल्याचं तो कसं सिद्ध करेल?
-
Sattak (सट्टक)
"सट्टक हा कवी भालचंद्र नेमाडे यांचा काव्यसंग्रह, देखणी (मेलडी आणि देखणी एकत्रित - 1991 (प. आ.)) नंतर तब्बल पस्तिसेक वर्षांच्या अंतराने प्रकाशित होत आहे. कवीच्या उत्तुंग प्रतिभेची साक्ष देणारा हा संग्रह आहे. आधुनिकीकरणाच्या माऱ्याखाली अधोगतीला लागलेल्या स्त्रिया, शेतकरी, कष्टकरी, दुय्यम पातळीवर ढकललेला शोषित जीव हे घटक या कवितेच्या केंद्रभागी आहेत. वास्तविक सट्टक म्हणजे आजच्या मूल्यऱ्हास झालेल्या जगण्यावर ओढलेला प्रखर आसूड आहे. सट्टक मधील कविता चक्रधर, तुकाराम, मुक्ताबाई, जनाई, बहिणाबाई, महात्मा फुले, मर्ढेकर यांच्या गद्य व पद्य परंपरेशी थेट नाते सांगते. सट्टक मधील ‘सरवा’, ‘अस्तुरीमृग’ आणि ‘मृत्यू’ या तीनही विभागांतील प्रत्येक कविता चिरंतन शिल्पासारखी आहे. या सर्व शिल्पांच्या अंतरंगात कधी ठिणग्या तर कधी ज्वाळा धगधगताना आढळतात. कवी आपल्या जगण्याचे कथन कवितेतून मांडत भोवतालच्या परिवेषाचा उभा आडवा छेद कसा घेतो याचे साक्षात रूप म्हणजे सट्टक. ‘घराघरातून’ या पहिल्या कवितेपासून ते ‘स्व’ ह्या अखेरच्या दीर्घ कवितेपर्यंत अस्वस्थ व सळसळते, करुणेने भरलेले कविहृदय प्रत्ययास येते. कवी भालचंद्र नेमाडे यांच्या प्रतिभाशक्तीचा संचार तळागाळापासून ते प्रस्थापित, उच्चभ्रू व्यवस्थेला, कधी पित्तृसत्ताक तर कधी मातृसत्तात्मकतेला कसा भेदत जातो याची येणारी प्रचीती सट्टक मध्ये अधिक तीव्र स्वरूपाची आहे. सत्तात्मक संबंधांतून आकारलेल्या शोषितांच्या वेदनांची कैफियत हा सट्टकचा केंद्रबिंदू असून कवीच्या संचित मनशक्तीतून, अनुभूतींतून, वास्तवाच्या प्रामाण्यातून ह्या कवितांचा आकृतिबंध साकारलेला दिसतो. ‘सरवा’, ‘अस्तुरीमृग’ आणि ‘मृत्यू’ हे तिन्ही विभाग चढत्या क्रमाने वाचकाच्या मेंदूचा कब्जा घेतात. एकूण सट्टक कृषी परंपरेतील जगण्याचा तळ शोधत, भारतीय सामाजिकतेचा, सांस्कृतिकतेचा नवा परीघ अधोरेखित करणारा काव्यसंग्रह आहे. जगण्याच्या संचिताचा चटका लावणारा ‘सरवा’ वेचत स्त्री-पुरुषांतील ठराविक नात्यापलीकडची शुद्ध मोकळीक, माणुसकीची नाती ‘अस्तुरीमृग’ मध्ये साकारतात. प्रस्थापित व्यवस्थेत आकारलेल्या स्त्री-जीवनाची काळजाला घरे पाडणारी वास्तव चित्रे वाचकाला सुन्न करून सोडतात. ‘अस्तुरीमृग’मधील कविता म्हणजे वेदनेचा दुखरा स्वर आहे. तर ‘मृत्यू’ या शेवटच्या विभागात कवी भालचंद्र नेमाडे यांचे श्रेष्ठ कवित्व गूढ उत्कटतेची परिसीमा ओलांडते. सट्टकचा आशय जसा अनवट आहे तसाच आकृतिबंधसुद्धा कोणत्याही परंपरेत बसवता न येणारा स्व-तंत्र आहे. लोकसंगीताची लय अंगात भिनवून ही कविता मौखिक परंपरेला स्वतःशी जोडून घेत संत परंपरेला आपलेसे करून स्वतःचे नवे प्रारूप घडवते. सट्टक हा काव्यसंग्रह मराठी कवितेला नवा आयाम प्राप्त करून देतो हे विशेषत्वाने नोंदवले पाहिजे. — शोभा नाईक "
-
Shikhandi Aani Na Sangitalya Janarya Katha (शिखंडी आणि न सांगितल्या जाणाऱ्या कथा)
पितृसत्ताक व्यवस्था म्हणते कि पुरुष हे स्त्रियांपेक्षा श्रेष्ठ आहेत. स्त्रीवाद स्पष्ट करतो की स्त्री आणि पुरुष सामान आहेत. भिन्नत्व विचारते की पुरुषत्व म्हणजे काय आणि स्त्रीत्व म्हणजे काय. भारतीय पुराणशास्त्राचे अभ्यासक देवदत्त पटनायक म्हणतात, भिन्नत्त्व हे फक्त आधुनिक, पाश्चात्य किंवा लैंगिकच असते असं नाही. हिंदू धर्मातील लेखी आणि मौखिक परंपरांचं नीट निरीक्षण करा, त्यातील काही परंपरा तर दोन हजार वर्षांपूर्वीच्या आहेत. त्यांत ' शिखंडी' सारख्या काही दुर्लक्षित कथा दिसतील. पत्नीला तृप्त करण्यासाठी शिखंडी पुरुष बनली होती. महादेवांन भक्तिणीच्या लेकीची प्रसूती करण्यासाठी स्त्रीरूप घेतलं होतं. पाटील ज्ञान मिळावं म्हणून चूडाला पुरुष बनली होती. सामवान आपल्या मित्राची पत्नी बनला होता. अशा बऱ्याच कथा तुम्हाला आढळून येतील. खेळकर आणि हृदयस्पर्शी असलेल्या आणि कधीकधी अस्वस्थही करणाऱ्या या कहाण्यांची तुलना त्यांच्या समकालीन मेसापोटेमियन, ग्रीक, चिनी आणि बायबली कहाण्यांशी आपण करतो तेव्हा ह्या वेगळेपणाचा अर्थ लावण्याचा खास भारतीय दृष्टिकोन आपल्यासमोर उघड होतो.
-
Saiyyad Haidar Raza Eka Pratibhavant Chitrakaracha Pravas (सैय्यद हैदर रझा एका प्रतिभावंत चित्रकाराचा प्रवास)
आधुनिक चित्रकलेला आपल्या 'बिंदू'तून एक नवा आयाम देणारे आणि त्याद्वारे कलाविचारांमधली स्वतःची स्वाभाविक आणि उपजत भारतीयता आंतरराष्ट्रीय स्तरावर साकार करणारे ज्येष्ठ चित्रकार सय्यद हैदर रझा यांचे यशोधरा डालमिया यांनी इंग्रजीतून चरित्रलेखन केले. दीपक घारे यांनी रझा यांच्या या चरित्राचा मराठी अनुवाद केला असून तो पॉप्युलर प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे.
-
-
100 Favourite Hand Picked Recipes
Take the time to decide which recipes are your own favourites. Try them out and discover that favourite or not, every recipe is a winner.
-
KalyaMalya - Bhingolya (काळ्यामाळ्या-भिंगोळ्या)
कृष्णात खोतांची काळ्यामाळ्या भिंगोळ्या काय काय आहे ? शिक्षणाच्या बाजारात फोफाट माजलेल्या आर्थिक, नैतिक आणि बौद्धिक भ्रष्टाचाराच्या वर्तमान वास्तवाचा त्रिमितिक एक्सरे. आधुनिक मराठी साहित्याच्या देशीवादी गद्य परंपरेतील महत्त्वाचा नवा आविष्कार. कादंबरीकाराच्या सामाजिक सभानतेशी एकरूप कथन- नीतिमत्ता कशी असावी याचे उत्कृष्ट उदाहरण. ग्रामीण महाराष्ट्रात समाजाच्या सर्वच स्तरावर खोल आत घुसलेली कीड, किडनी विकून जगणाऱ्या शालेय शिक्षकाच्या आणि आत्महत्यांच्या कड्याकडे ढकलल्या गेलेल्या, कोंडीत सापडलेल्याच्या नजरेतून क्षण-दर-क्षण टिपणारा 'समक्ष' अनुभव वृत्तांत. 'आपण दगडं फोडलेली बरी. इथं माणसाला माणूस म्हणून काहीच कसं ऐकायला येत नाही? आपल्या या व्यवस्थेनं मातीच्या गोळ्यांचं दगड तर घडवलं नाहीत?', विचारत, व्यवस्थेचा दगड फोडून दाखवणारी. भारतीय साहित्यात क्लासिक मानल्या गेलेल्या श्रीलाल शुक्लांच्या 'राग दरबारी'च्या कसाची, दमदार राजकीय-वृत्तांत कादंबरी. - गणेश देवी"
-
Vyavasay Sutra (व्यवसाय सूत्र)
व्यवसाय व्यवस्थापनातील भारतीय दृष्टिकोनास अधोरेखित करणाऱ्या या पुस्तकात नेतृत्व प्रशिक्षक आणि पौराणिक कथांचे अभ्यासक देवदत्त पट्टनायक यांनी या विषयातील वस्तुनिष्ठतेच्या दिखाव्यास बाजूला सारले आहे. पाश्चिमात्य श्रद्धांमध्ये रुतलेले आधुनिक व्यवसाय व्यवस्थापनाचे निकष, त्यातील उद्दिष्टपूर्तींबाबत त्यांची असलेली कठोर आसक्ती आणि भागधारकांचे वाढते महत्त्व हे देवदत्त यांनी या पुस्तकात विस्तृत मांडलेले आहे. उलटपक्षी, व्यवसाय करण्यातील भारतीय पद्धत – जी भारतीय पौराणिक कथांमध्ये तर दिसून येते, पण प्रत्यक्ष व्यवस्थापनात मात्र तिचा उपयोग केला जात नाही – ही पद्धत कशारीतीने सर्वसमावेशकतेचा पुरस्कार करणारी आहे, सापेक्षता आणि वैविध्य बाळगणारी आहे आणि ध्येयपूर्तीतीच्या प्रत्येक स्तरावरील सर्वंकष यशप्राप्तीचा ती कशा प्रकारे विचार करते, हे विशद केलेलं आहे.
-
Ravan Ani Eddie (रावण आणि एडी)
ब्रिटिश वसाहतीनंतरच्या भारतातल्या दोन कल्पनातीत हिरोंच्या जीवनात घडणाऱ्या वात्रट व साहसी कृत्यांची एक अतिशय विनोदी, 'रिबल्ड' कादंबरी.