-
Akhand Sherlock Holmes -Nishabd Part-5 (अखंड शेरलोक होम्स नि:शब्द भाग -५)
शेरलॉक होम्सच्या रहस्यकथा मराठीत प्रथमच अखंड स्वरूपात. जशा घडल्या तशा.
-
Akhand Sherlock Holmes -Adhure Tari Atut Part -4 (अखंड शेरलोक होम्स अधुरे तरी अतूट भाग -४)
शेरलॉक होम्सच्या रहस्यकथा मराठीत प्रथमच अखंड स्वरूपात. जशा घडल्या तशा.
-
Akhand Sherlock Holmes- Shubhasanket Part -3 (अखंड शेरलोक होम्स शुभसंकेत भाग -३)
शेरलॉक होम्सच्या रहस्यकथा मराठीत प्रथमच अखंड स्वरूपात. जशा घडल्या तशा.
-
Akhand Sherlock Holmes-Tarkashaktiche Ayudh Part -2 (अखंड शेरलोक होम्स - तर्कशक्तीचे आयुध भाग- २)
शेरलॉक होम्सच्या रहस्यकथा मराठीत प्रथमच अखंड स्वरूपात. जशा घडल्या तशा.
-
Akhand Sherlock Holmes-Ek Avaliya Part-1 (अखंड शेरलोक होम्स-एक अवलिया भाग -१)
शेरलॉक होम्सच्या रहस्यकथा मराठीत प्रथमच अखंड स्वरूपात. जशा घडल्या तशा.
-
Aabhalache Tukade (आभाळाचे तुकडे)
या विस्तीर्ण आभाळखालचा माणूस इथून तिथून जरी एकच असला तरी या आभाळाखालील निसर्ग, पर्यावरण, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय परिस्थिती यातून त्यानं आपलं जगणं कसं समृद्ध केलं, विकसित केलं किंवा बरबाद केलं. या सगळ्याचा धांडोळा म्हणजे जगण्याचा प्रवास ! या प्रवासात कळत नकळत आजूबाजूच्या वातावरणाचे, घटनांचे, मानवी जीवन, नातेसंबंध, नियतीचे खेळ, कला, साहित्य, विनोद किंवा राजकारण या सर्वांचे ठसे मनावर उमटत राहतात. त्यातूनच जे मनात खोलवर मुरलेलं असतं ते या ना त्या निमित्ताने शब्दांत उमटतं. प्रख्यात कादंबरी लेखक, नाटककार, अभिनेता आणि दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांच्या लेखणीतून उतरलेल्या अशाच काही ललित लेखांचा संग्रह...
-
Trio (ट्रायो)
भीती ही गोष्ट माणसाच्या जन्माबरोबरच त्याच्या आयुष्याला चिकटून आलेली आहे. भीतीपेक्षा मृत्यू बरा असे म्हटले जाते; कारण मृत्यू एकदाच तुमचे प्राण हरण करतो, पण भीती पदोपदी तुम्हाला मरणाच्या दारात उभी करत असते. अशा विषयांशी निगडित कथा लिहिणाऱ्या कथाकाराकडे वेगळे कौशल्य असावे लागते ते वातावरणनिर्मितीचे. त्यात राजीव तांबे यांचा हातखंडा आहे. त्यांच्या कथांमध्ये ते आरंभापासून असा काही माहोल निर्माण करतात की वाचक त्या भीतीच्या डोहाच्या काठापर्यंत कधी येऊन पोहोचतो ते त्यालाच समजत नाही. सकस कथाबीजातून अज्ञाताच्या त्या विश्वामध्ये ते वाचकांना घेऊन जातात. मग गूढतेचे एकेक पापुद्रे उलगडायला लागतात. इथे वाचकांवरची कथाकाराची पकड थोडी जरी ढिली झाली तरी अपेक्षित परिणाम साधता येत नाही. 'ट्रायो' या कथासंग्रहातील सर्व कथा वाचल्यानंतर राजीव तांबे या कथांमध्ये वाचकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी झाले आहेत याची साक्ष पटते.
-
Detective Alpha Aani Blue Moor Che Rahasya (डिटेक्टिव अल्फा आणि ब्लू मूरचे रहस्य)
भारतीय गुप्तचर संघटनेच्या हेडक्वार्टरमधून अत्यंत गोपनीय कागदपत्रांची चोरी झाली आहे. ती कागदपत्रे चोरणारा 'रॉ'चाच एक गद्दार एजंट मनीषकुमार बेदी हा इंग्लंडमध्ये जाऊन धडकतो. बेदीला 'रॉ'चे इतर एजंट्स ठाऊक असल्याने त्याला पकडण्यासाठी 'रॉ'ला हवाय कोणीतरी त्रयस्थ गुप्तहेर आणि पहिलं नाव समोर येतं अल्फाचं ! अल्फा इंग्लंडमध्ये पोचतो आणि तिथे केंब्रिज विद्यापीठात संशोधन करणाऱ्या त्याच्या प्रिय मित्राला प्रभवला सोबत घेतो. आणि मग सुरू होतं अॅडव्हेंचर ! अल्फा आणि प्रभव बेदीपर्यंत पोचतात, पण त्याच्या खोलीत तो मरून पडलेला आढळतो. त्याने चोरलेली कागदपत्रे गायब आहेत आणि त्याच्या मोबाइलवर एक गूढ मेसेज टाइप केलेला आहे 'फाईंड ब्लू मूर'! बेदीकडची कागदपत्रे कोणी चोरली? शत्रू राष्ट्रांच्या हातात पडण्याआधी अल्फा ती कशी मिळवणार? आणि बेदीने पाठवलेल्या गूढ मेसेजचा अर्थ काय आहे ?
-
Detective Alpha Aani Gramdevatecha Prakop (डिटेक्टिव अल्फा आणि ग्रामदेवतेचा प्रकोप)
मुंबईतून कोकणच्या वाटेवर जाताना समुद्रकिनारी, गर्द नारळ-आंब्यांच्या झाडांच्या कुशीत वसलेलं नावगाव हे गाव जितकं सुंदर, तितकेच तिथं राहणारे लोक चमत्कारिक. गावात देव कालभैरवाचं एक पुरातन मंदिर आहे. गावकऱ्यांची अशी समजूत आहे, की या मंदिरातला देव हा जागृत आहे. तो रात्रीच्या अंधारात मंदिराबाहेर पडतो आणि गावाचं रक्षण करतो. पण त्याची दृष्टी इतकी प्रखर आहे, की त्यात चुकून जर कोणी मनुष्य आला, तर तोही जळून भस्म होतो. या देवतेच्या भीतीने गावातले लोक रात्रीच्या वेळी घरातून बाहेर पडायला घाबरतात. अशा या नावगावातून अल्फाला एक गूढ निनावी पत्र येतं आणि मग सुरू होतो एक जीवघेणा खेळ. गावातले जुने मुरब्बी लोक एक एक करून मरायला लागतात आणि मंदिरातील देवतेचा प्रकोप झाला, अशी गावकऱ्यांची समजूत होते. डिटेक्टिव्ह अल्फा आणि त्याचा मित्र प्रभव यांच्यासमोर आव्हान आहे, या गावात घडणाऱ्या अनैसर्गिक, दैवी वाटणाऱ्या घटनांमागचं सत्य शोधून काढण्याचं. ते हे करू शकतील का ?
-
Detective Alpha Aani Makhamali Mohjal (डिटेक्टीव अल्फा आणि मखमली मोहजाल)
पावसाळ्यातील एक अंधारी रात्र. संदीप आपल्या कारमधून उशिरा घरी जातो आहे. वाटेत त्याला दिसते एक भिजून चिंब झालेली, साडी परिधान केलेली एक तरुण, सुंदर स्त्री. तो तिला लिफ्ट देतो, ती त्याला घरी चलण्याचा आग्रह करते. संदीपला एकूणच हा प्रकार थोडा गूढ वाटतो, पण तिच्या सौंदर्याला भाळून तो तयार होतो. ते दोघेही तिच्या घरी जातात आणि पुढे जे घडतं, त्याची संदीपने स्वप्नातही कल्पना केलेली नसते ! तो एका जीवघेण्या जाळ्यात ओढला जातो एक असं मोहजाल, जे त्याला अखेर मृत्यूच्या दारात नेऊन ठेवणार आहे. त्याच्या गळ्याभोवती सर्व बाजूंनी फास आवळला जाणार आहे. त्याला यातून वाचवू शकेल, अशी एकमेव व्यक्ती आहे, आणि ती म्हणजे डिटेक्टिव्ह अल्फा ! पण अल्फा हे कसं साध्य करेल?
-
Operation Sindoor Aani Tyanantar (ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर)
दि. २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मिरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी आतंकी हल्ला करून, २६ निरपराध प्रवाशांना धर्म विचारून ठार मारले. त्या निर्घृण आतंकी हल्ल्याच्या प्रत्युत्तरार्थ भारतीय सशस्त्र सेनादलांनी 'ऑपरेशन सिंदूर' ची कारवाई केली. पाकिस्तान आणि पाक- व्याप्त काश्मिरमधील नऊ आतंकी तळ नष्ट करणे; पाकिस्तानी एअर डिफेन्स सिस्टिम (प्रणाली) चा नाश करणे; पंधरा भारतीय विमानतळांवर केलेल्या पाकिस्तानी हलूयांचा प्रतिरोध करून एकही पाकिस्तानी क्षेपणास्त्र अथवा ड्रोन लक्ष्यापर्यंत पोहोचवू न देणे; आणि अकरा पाकिस्तानी सैनिकी तळांचा तेथील कमांड तथा कण्ट्रोल सेंटर्स सहित नाश करणे, या सर्व घटना भारतीय सशस्त्र सेनादलांनी केवळ ८८ तासांमध्ये (दि. ६ ते १० मे २०२५) यशस्वीरीत्या घडवल्या. परिणामतः पाकिस्तानला युध्दविरामाची याचना करण्यास भाग पाडले. हे अत्यंत कठीण कार्य करून सैनिकी दृष्ट्या प्रचंड यश संपादन केले. त्यामुळे भारतीय सशस्त्र सेनादलांचे, विशेषतः भारतीय वायुसेनेचे, स्थान विश्वामधील अपराजित सेनादलांमध्ये दृढ झालेले आहे. अर्थात 'ऑपरेशन सिंदूर' च्या अतुलनीय यशाच्या मागे भारतीय राजकीय इच्छाशक्ति, सशस्त्र सेनादलांना प्रदान केलेली स्वायत्तता, आत्मनिर्भरता, सशस्त्र सेनादलांचा उत्कृष्ट समन्वय आणि पराक्रम, तसेच त्यांना असलेला डी. आर. डी. ओ., इस्त्रो, आदी संस्थांचा अप्रतिम सहयोग, अशा घटकांमुळे हे अप्रतिम यश प्राप्त झाले. त्याचे विश्लेषण येथे दिलेले आहे.
-
Parthsutra (पार्थसूत्र)
पार्थसूत्र' ही अर्जुनाच्या जीवनयात्रेतील एक प्रेरणादायी गाथा आहे. महाभारत या कालातीत महाकाव्याचा आधार घेत, हे पुस्तक नेतृत्व, जीवनध्येय, अंतःशक्ती आणि भावनिक स्थैर्य यांचे मौल्यवान धडे वाचकांसमोर आणते. प्राचीन तत्त्वज्ञान आणि आधुनिक दृष्टिकोन यांची सांगड घालत, लेखकद्वयी वाचकांना अर्जुनाचे आयुष्य उलगडवून दाखवतात. तुम्ही नवोदित व्यावसायिक असाल किंवा अनुभवी, विद्यार्थी असाल किंवा शिक्षक, कुटुंबातील सदस्य असाल - वडील, आई, मुलगा, मुलगी, सासू, सून किंवा इतर कुठलेही नाते असो... 'पार्थसूत्र' आपल्या प्रत्येकातल्या अर्जुनाशी संवाद साधते.
-
Artificial Intelligence 2025 ++ (आर्टिफिशियल इंटेलिजन्स 2025++)
संगणक क्षेत्रात अनेक लाटा येत असतात. त्यातील सध्याची लाट आहे एआय. ही लाट अजून काही वर्षं राज्य करेल. एआयच्या क्षेत्रातील सगळ्यात मोठी प्रगती मशीन लर्निंग आणि डीप लर्निंगमध्ये होईल. यामुळे यंत्रे अधिक स्मार्ट होतील, आणि मनुष्याच्या दृष्टीने 'स्वयंसिद्ध' कामे करू शकतील. चॅट जेनआय व चॅटबॉट्स सर्वमान्य होतील. चॅट जीपीटी, डीप सिक मुळे अनेकांना ह्याचे कुतूहल निर्माण झाले. गिबली ही पण एक नवीन लाट. आपले छायाचित्र गिबली वापरून अॅनिमेटेड रूपांतर करण्याचा धुमाकूळ सर्वत्र सुरू आहे. भविष्यात एआय वर आधारित यंत्रणा स्वतः निर्णय घेऊ शकतील. हे विविध क्षेत्रांमध्ये, जसे की वैद्यकीय निदान, उद्योग, वित्तीय क्षेत्र, आणि वाहतूक व्यवस्थापनात लागू होईल. एआयच्या मदतीने आरोग्य क्षेत्रात मोठे बदल होतील. स्वयंचलित रोग निदान, वैद्यकीय उपचारांची अधिक अचूकता, आणि आरोग्य सेवांचे प्रभावी वितरण होईल. एआय आणि मनुष्य यांच्यातील सहकार्य वाढेल. यामुळे विविध उद्योगांमध्ये कार्यक्षमतेत वाढ होईल, आणि हे दोन्ही एकमेकांना मदत करत कार्य करतील. एआय अनेक रोजगार संपवेल; पण अनेक निर्माणपण करेल. त्यामुळे त्याला स्पर्धक न मानता साहाय्यक मानणे सयुक्तिक ठरेल.
-
Nehrunchya 115 Ghodchuka (नेहरूंच्या ११५ घोडचुका)
घोडचुका' हा शब्दप्रयोग या पुस्तकात व्यापक अर्थाने वापरला आहे. त्यात केवळ चुकांचा समावेश नसून, नेहरूंना आलेली अपयशे, त्यांनी केलेले दुर्लक्ष, उपेक्षा, चुकीची राजकीय खेळी, महागात पडलेले निर्णय, आणि अकारण हडप केलेली पदं अशा अनेक बाबी मोडतात. या पुस्तकाचा हेतू नेहरूंवर केवळ टीका करणे नसून इतिहासातील कधी विपर्यास करून चमकदार मुलामा देऊन लपवलेल्या किंवा दडपलेल्या घटना सर्वांसमोर मांडणे हा आहे. जेणेकरून या चुकांची पुनरुक्ती होणार नाही आणि भारत उज्ज्वल भविष्याची आकांक्षा धरू शकेल. कुणी म्हणेल - नेहरूंवर एवढी माथेफोड कशासाठी? त्यांना सदेह आपल्यातून जाऊन बराच काळ उलटून गेलेला आहे. पण दुर्दैवाने त्यांच्या बऱ्याच योजना आणि बरेच विचार आजही जिवंत आहेत. ते ज्या मार्गावर चालले तो चुकीचा होता हे आपल्याला समजणे आवश्यक आहे.
-
Chaldhakal Karnyapasun Mukti (चालढकल करण्यापासून मुक्ती)
सगळेच जण कधी ना कधी कामाची टाळाटाळ करतात. आपण गोष्टी पुढे ढकलतो; कारण त्या कराव्याशा वाटत नाहीत, किंवा आपण इतर कामांना प्राधान्य देत असतो. कधी कधी काम सुरू करणंच खूप कठीण होऊन बसतं ! काही वेळा आपण स्वतःला समजावतो की अजून थोडा वेळ मिळाला तर वेगळा दृष्टिकोन बाळगून किंवा नव्या ऊर्जेने काम सुरू करू. लहान-मोठ्या कामांची टाळाटाळ करणं हा मनुष्य स्वभावच आहे. पण जेव्हा या कामाच्या दिरंगाईमुळे आपल्याला हताश वाटू लागतं आणि ते काम डोईजड होऊ लागतं. तेव्हा त्याचा परिणाम तुमच्या कामावर, घरात किंवा नात्यांवर दिसू लागतो. अशा वेळी त्या दिशेने हातपाय हलवणं अनिवार्य ठरते. तुम्हाला प्रत्येक कामाची टाळाटाळ करण्याची सवय आहे का ? त्यावर उपाय आहे. पण एका रात्रीत तुमची सवय बदलेल अशी अपेक्षा ठेवू नका. तुम्ही एके दिवशी अचानक कामाची दिरंगाई करणं सोडून देणार नाही. पण हळू-हळू, एखाद-दोन सोपी कामं पार पाडू शकता, जेणेकरून तुमचे काम लवकर आणि अधिक त्रासाशिवाय पूर्ण होईल. दिरंगाईचा भार दूर केल्यावर, तुम्हाला जो मोकळेपणा जाणवेल त्याची कल्पनाही तुम्ही केली नसेल. याचे फायदे तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात पाहायला मिळतीलच.
-
Aatmasamman (आत्मसन्मान)
जर तुमचा स्वतःवरच विश्वास नसेल, तर लोकांनी तुमच्यावर विधार ठेवावा अशी अपेक्षा तुम्ही कशी ठेवू शकता? लोकांच्या मनातील तुमची प्रतिमा म्हणजे आत्म-सन्मान नव्हे- स्वतःकडे तुम्ही कसे पाहता याला आत्मसन्मान म्हणतात. आत्मसन्मान हा जन्मापासून जोपासला जातो. आणि जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणाने त्यामध्ये बदल केला जाऊ शकतो. जर तुमचा आत्मसन्मान उच्च असेल, तर तुम्हाला मिळणारे यशही तेवढेच मोठे असते. सकारात्मक आत्मसन्मानामुळे आत्मविश्वासाने कृती केल्या जातात आणि योग्य निर्णय घेतले जातात. नकारात्मक आत्म-सन्मान असल्यास आत्मविश्वासाचा अभाव, भित्रेपणा आणि निर्णय घेण्यात चालढकल करणे असे वर्तन दिसून येते. जसजसा तुमचा आत्मसन्मान वाढीस लागतो, तसतसे तुमचे खरे स्वरूप प्रकट होऊ लागते. तुम्ही जोखीम उचलू लागता आणि अपयशाचे भय कमी होते; तुम्हाला इतरांचा पाठिंबा आहे की नाही याची फारशी फिकीर वाटेनाशी होते; तुमचे नातेसंबंध अधिक अर्थपूर्ण होऊ लागतात; तुम्हाला ज्यातून आनंद आणि समाधान मिळते अशा कृती तुम्ही करू लागता: आणि तुम्ही समाजात एक सकारात्मक योगदान देऊ लागता. सर्वात महत्त्वाचे, उच्च आत्मसन्मान असल्यास तुम्हाला मनःशांती मिळते... प्रश्न असा आहे की, आपला आत्मसन्मान वाढवण्यासाठी मनापासून प्रयत्न करण्याची तुमची तयारी आहे का ?
-
Manvi Mendu (मानवी मेंदू)
अनेक वर्षांपासून असा समज होता की मेंदूच्या पेशींची वाढ बालपणानंतर थांबते आणि वृद्धत्वात त्या आपोआप क्षीण होऊन नष्ट होतात. परंतु अलीकडील वैज्ञानिक संशोधनाने या गैरसमजुती आणि नियतीवादाला छेद दिला आहे. संशोधनाने दाखवून दिले आहे की मेंदूला प्रशिक्षण, संवर्धन आणि जीवनातील प्रत्येक दिवस चपळ व सतर्क ठेवण्याचे मार्ग आपण अवलंबू शकतो. मेंदूचे संवर्धन म्हणजे आपल्या नैसर्गिक क्षमता वृद्धिंगत करणे, ज्यामुळे स्मरणशक्ती टिकून राहते आणि बळकट होते. मेंदू हा असा यंत्रमाग आहे, जो विचारांचे आणि भावनांचे सुंदर रेशीम विणतो. तो मज्जासंस्था आणि पाठीच्या कण्याला नियंत्रित करतो. इतकेच नव्हे, तर हृदयाचे ठोके, शरीराचे तापमान आणि रक्तदाब यांसारख्या महत्त्वपूर्ण प्रक्रियांचा तो संचालक आहे. मेंदूच्या संवर्धनासाठी मज्जासंस्था, पाठीचा कणा आणि एकंदरीत आरोग्य यांच्यात सुसंवाद असणे आवश्यक आहे. हे छोटेसे पुस्तक तुम्हाला मेंदूच्या कल्याणासाठी काय करता येईल याबाबत नवीन दृष्टिकोन आणि उपाय सुचवते, जेणेकरून तुमचा मेंदू तुम्हाला उत्तम आणि परिपूर्ण जीवनाचा मार्ग खुला करेल.
-
Manovrutti Ekagrata(मनोवृत्ती एकाग्रता)
सकारात्मक मन हे आनंद, सुख, आरोग्य आणि प्रत्येक परिस्थितीत यशस्वी परिणामांची अपेक्षा करते. सकारात्मक विचारसरणी म्हणजे अशी मानसिकता, जी मनात वाढ, प्रगती आणि यशाला पोषक असे विचार, शब्द आणि प्रतिमा आणते. ही एक अशी मनोवृत्ती आहे, जी चांगल्या आणि अनुकूल परिणामांची अपेक्षा करते. ज्याची जशी मनोकामना, त्याची तशी प्राप्ती. पण तुम्हाला माहीत असलेल्या किती जणांनी सकारात्मक विचारसरणीच्या सामर्थ्यावर खरोखर विचार केला आहे? बहुतेक लोक या शब्दांना गांभीर्याने घेत नाहीत किंवा त्यांच्या आयुष्यात याचा अर्थ काय, हे समजून घेण्यासाठी वेळ देत नाहीत. तुमच्या सध्याच्या आयुष्याकडे एकदा नजर टाका; तुमचे आरोग्य, आर्थिक स्थिती, जीवनशैली, म्हणजेच तुमच्या चांगल्या आणि वाईट सर्व गोष्टी. या साऱ्या तुमच्या विचारांनी घडवलेल्या आहेत. जर तुमचे सध्याचे आयुष्य तुमच्या इच्छांशी पूर्णपणे जुळत नसेल, तर कदाचित आत्मचिंतनाची वेळ आली आहे. झेप मालिकेतील हे पुस्तक तुम्हाला सकारात्मक दृष्टिकोन आणि सकारात्मक आयुष्याच्या मार्गावर घेऊन जाईल.
-
Veleche Parinamkarak Vyavasthapan (वेळेचे परिणामकारक व्यवस्थापन)
वेळ व्यवस्थापन म्हणजे तुमची व्यावसायिक आणि वैयक्तिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी तुमच्या वैयक्तिक वेळेचा कार्यक्षम आणि प्रभावी वापर होय. याचा अर्थ केवळ तुमच्या तातडीच्या कामांनाच नव्हे तर महत्त्वाच्या गोष्टींनाही प्राथान्य देणे. तुम्ही तुमच्या वेळेचं व्यवस्थापन करण्यासाठी दैनंदिन प्लॅनर आणि करायच्या कामांची यादी वापरू शकता. ही साधनं निश्चितच उपयुक्त आहेत; परंतु ती महत्त्वाची कामे आणि तातडीची कामं कोणती यातला फरक स्पष्ट करत नाहीत. महत्त्वाच्या उपक्रमांचा एक परिणाम असतो ज्यामुळे तुमची उद्दिष्टे साध्य होतात. तातडीच्या उपक्रमांकडे त्वरित लक्ष देण्याची गरज असते. आणि बऱ्याचदा ते उपक्रम इतरांची उद्दिष्टे पूर्ण करण्याशी संबंधित असतात. लक्षात ठेवा, की विलंब हा प्रभावी वेळ व्यवस्थापनाचा सर्वात मोठा शत्रू आहे. गोष्टी लांबवल्याने किंवा टाळल्याने, तुमच्या कामाचा ढीग होत राहील / तुमचे काम साचून राहील. प्रभावी वेळ व्यवस्थापनामुळे तुम्हाला खालील फायदे मिळू शकतात. प्राधान्यक्रम ठरवून, तुम्ही वेळखाऊ आणि अनावश्यक उपक्रम वगळ शकता. एकाच वेळी अनेक कामं हाताळण्यापेक्षा तुम्ही दररोज असलेल्य कामाचे योग्य व्यवस्थापन करू शकता. तुमच्या कामांच्या दैनंदिन प्रगतीचं तुम्ही अवलोकन करू शकता. या पुस्तकात 'वेळ' या मौल्यवान साधनाचा उपयोग आणि व्यवस्थाप अधिक चांगल्या रीतीने करण्याचे उपाय सांगितलेले आहेत.
-
Rag Samjun Ghetana (राग समजून घेताना)
राग येणं ही नैसर्गिक भावना आहे. पण तो अनावर झाल्यावर आपण हिंसक कधी बनतो हे आपल्या लक्षातही येत नाही. रागामुळे आपल्या कामाच्या ठिकाणचं वातावरण बिघडू शकतं, आपल्या इतरांशी असलेल्या नात्यावर परिणाम होतो आणि एकूणातच आपल्या आयुष्याची लय बिघडून जाते. अनावर झालेला राग आपल्या मनाचा ताबा घेतो आणि अतिशय तीव्र भावनांची आपण शिकार होतो. आपल्या मनातली खळबळ कोणत्या दिशेला जाईल याचा काहीही अंदाज बांधता येत नाही. मनातला राग स्पष्टपणे व्यक्त करणं हा सगळ्यांत योग्य मार्ग आहे. हे करण्यासाठी आपल्याला नक्की काय हवंय आणि जे हवं आहे ते इतरांना न दुखावता कसं मिळवता येईल हे आपण जाणून घ्यायला हवं. एखादी आपल्याला हवी असलेली गोष्ट इतरांना स्पष्टपणे आणि ठामपणे सांगणं म्हणजे खऱ्या अर्थानं स्वतःचा आब राखून इतरांशी आदराने वागणं होय. रागाचं नियमन कसं करायचं हे शिकवता येतं. रागाला कारणीभूत ठरणाऱ्या भावनिक आणि शारीरिक आवेगांची तीव्रता कमी कशी करायची हेच तर शिकवलं जातं.. आपल्याला संताप आणणाऱ्या गोष्टींना किंवा माणसांना किंवा परिस्थितीला आपण टाळू शकत नाही. आपण त्यांच्यात काही बदलही घडवू शकत नाही. पण त्यांच्याशी आपल्या वागण्यावर परिणामकारक पद्धतीनं नियंत्रण कसं ठेवायचं हे शिकणं आपल्या हातात आहे.
-
Dheyanichiti (ध्येयनिश्चिती)
तुमच्या आदर्श भविष्याचा विचार करण्यासाठी, तसेच तुमच्या भवितव्याचे हे स्वप्न प्रत्यक्षात आणायची प्रेरणा मिळून ते सत्यात आणण्यासाठी ध्येय ठरवणे ही एक प्रभावी प्रक्रिया आहे. तुम्हाला आयुष्यात जो पल्ला गाठायचा आहे त्याचा विचार करा. ही तुमची आयुष्यभराची ध्येयं असतात. तुम्हाला काय साध्य करायचं आहे ते तुमच्या लक्षात आलं की तुमच्या प्रयत्नांची दिशा तुम्हाला ठरवता येईल. तुमच्या मार्गात येणारे अडथळे तुमच्या लगेच लक्षात येतील. विचारपूर्वक ठरवलेली ध्येयं ही अत्यंत प्रेरक असतात. जसजशी तुम्हाला ध्येय ठरवण्याची आणि ती साध्य करण्याची सवय होईल, तसतसा तुमचा आत्मविश्वासही वाढल्याचे तुमच्या लक्षात येईल. कालानुरूप आपली ध्येयं बदलत जातात हे लक्षात घेणंही महत्त्वाचं असतं. तुमची ध्येयं ठरवत असताना आधी शिकलेले धडे लक्षात घ्या. आपले ज्ञान आणि अनुभव यांच्यात वाढ होण्याच्या दृष्टीने आपली ध्येयं समायोजित करा. काही वेळा जेव्हा काही विशिष्ट ध्येय तुमच्यासाठी निरुपयोगी ठरतात तेव्हा ती सोडून देण्याचा विचार करा. तुम्ही जर यापूर्वीच आपली ध्येयं ठरवली नसतील तर आता ठरवा. एकदा का तुम्ही तुमच्या जीवनात या तंत्राचा समावेश केलात की हे यापूर्वीच का केलं नाही असच तुम्हाला वाटत राहील!