-
Bill Gates Source Code Maze Suruvatiche Divas (बिल गेट्स सोर्स कोड माझे सुरुवातीचे दिवस)
नव्या युगाची पहाट होत असतानाच्या काळात एका अस्वस्थ किशोरवयीन मुलात संगणकाच्या आज्ञावलीचे कोडिंग करण्याची आवड कशी निर्माण झाली, आणि ‘माझ्या बुद्धीच्या साहाय्याने मी जगातील कोणत्याही गुंतागुंतीच्या गूढाची उकल करू शकेन’ हा आत्मविश्वास त्यांच्या अंगी कसा निर्माण झाला ते दिसून येतं. त्यांच्या अभूतपूर्व व्यावसायिक कौशल्याची चिन्हे त्यांच्या बालपणातच आपल्याला आढळतात. वयाच्या विसाव्या वर्षी हॉर्वर्डमधील शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी आपली सर्व शक्ती लहानपणीच्या मित्रासोबत, पॉल अॅलनबरोबर स्थापन केलेल्या मायक्रोसॉफ्टसाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला. पुढच्या आयुष्यात ज्यांनी संगणक युगातील क्रांतीत महत्त्वाची भूमिका पार पाडली त्या स्टीव्ह जॉब्स, स्टीव्ह वॉझनियाक आणि स्टीव्ह बामर या तीन स्टीव्हजबरोबर झालेल्या पहिल्या भेटींविषयी त्यांनी आत्मीयतेने लिहिलं आहे. मायक्रोसॉफ्टमध्ये केवळ दहाबारा कर्मचारी असताना १९७०मध्ये त्यांनी जेव्हा अॅपलशी पहिला करार केला. त्या सुमारास या पुस्तकाचा, बिल गेट्स यांच्या सुरुवातीच्या काळाचा शेवट होतो. अशा प्रकारचे अनेक करार पुढे होत गेले आणि कोणी कल्पना केली नसेल एवढी मायक्रोसॉफ्टची वाढ होत गेली. पण तरीही ‘तू निर्माण केलेल्या संपत्तीचा तू फक्त काळजीवाहकच आहेस, हे कधीही विसरू नकोस,’ हे आपल्या आईचे शब्द बिल गेट्स कधीही विसरले नाहीत. बिल गेट्स यांची अखंड ऊर्जा, महत्त्वाकांक्षा आणि त्यांनी या जगात स्वतःला कसं घडवलं, हे समजून घेण्यासाठी त्यांच्या या प्रेरणादायक पुस्तकाची मदत होते.
-
Changej Khan Aani Adhunik Jagachi Nirmiti (चंगेज खान आणि आधुनिक जगाची निर्मिती)
रोमन लोकांनी चारशे वर्षांत जितकी भूमी पादाक्रांत करून जितक्या लोकांना अंकित केले त्यापेक्षा अधिक भूमी नि लोक चंगेज खान ह्याच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या सैन्याने पंचेचाळीस वर्षांत जिंकून घेतले. जिंकलेल्या प्रत्येक देशात मंगोल लोकांनी सांस्कृतिक अभिसरण व व्यापार वाढवला. त्यातून संस्कृतीला बहर आला. आशिया आणि युरोपातील बहुसंख्य राजांच्या तुलनेत प्रागतिक असणाऱ्या चंगेज खान ह्याने जनतेची छळवणूक थांबवली, सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य दिले आणि सरंजामशाही रद्द करून परंपरागत विशेषाधिकारांना मूठमाती दिली. एका भटक्या जमातीपासून सांस्कृतिक कल्लोळ निर्माण करणाऱ्या मंगोल साम्राज्यापर्यंतच्या आधुनिक जगाची निर्मिती कशी झाली ह्या प्रवासाची ही गाथा! “अमंगल प्रारंभापासून इतक्या उंचीवर पोहोचणारे येशू ख्रिस्ताचा अपवाद वगळता अन्य कुणी असू शकेल, असे वाटत नाही!” – हार्पर्स “वेदरफोर्ड ह्यांच्या जिवंत विश्लेषणामुळे मंगोल संस्कृतीचा लौकिक पुनःस्थापित झालेला आहे. अत्यंत बुद्धिमत्तापूर्ण वळसे घेत वाचकांना तपशील वैविध्याची भेट देणारे अत्यंत कसबी लेखन !” – कीर्कस रिव्ह्यूस “वेदरफोर्ड हे विलक्षण कथाकथनकार आहेत. त्यांनी रेखाटलेले चंगेज खान ह्याचे व्यक्तिमत्त्व हे सखोल परिश्रमातून आणि गुंतागुंतीच्या तपशिलांतून निर्माण झाले आहे. वेदरफोर्ड ह्यांचे लेखन म्हणजे मंगोल साम्राज्यनिर्मात्याच्या गुणावगुणांचे उदारतेने घडवलेले दर्शन !” – मिनियापोलीस स्टार ट्रिब्यून
-
Allamiyacha Karkhana (अल्लामियाचा कारखाना)
अल्लामियाचा कारखाना’ ही कादंबरी सध्याच्या काळात उर्दू भाषेत लिहिल्या जात असलेल्या काही अत्यंत महत्त्वपूर्ण कादंबऱ्यांपैकी एक आहे. या कादंबरीत एका किशोरवयीन मुलाच्या नजरेतून मुस्लीम समाजातील व्यक्तींच्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक आणि कौटुंबिक जगण्यातील समस्यांचं प्रभावी चित्रण करण्यात आलं आहे. लेखकाच्या नजरेतून पाहताना रोजच्या वास्तवातल्या नेहमीच्या गोष्टी हैराण करणाऱ्या वास्तवात रूपांतरित होतात. याची विविध उदाहरणं विचारप्रवृत्त करणाऱ्या या कादंबरीत पानोपानी आढळतात. रोजच्या जगण्यातील ताण्याबाण्यांना कुशलतेने कलात्मक रूप देण्यात, संदिग्धतेला फाटा देऊन रोजच्या जगण्यातल्या गोष्टींमागे दडलेला अर्थ शोधण्यात मोहसीन खान यांचा हातखंडा आहे. याचा प्रत्यय या कादंबरीभर येत राहतो. एकूणच, सहज-सोप्या शैलीत मार्मिक भाष्य करणाऱ्या या कादंबरीचा विषय जितका गंभीर आहे, तितकीच या कादंबरीची लेखनशैली प्रायोगिक आहे.
-
Technical Analysis (टेक्निकल ॲनालिसिस)
“Finowings Training & amp; Academy Pvt Ltd” ने संस्थापक, मुकुल अग्रवाल यांनी लिहिलेले हे पुस्तक, स्टॉक, इंडेक्स आणि कमोडिटी मार्केट्समध्ये तुमची एंट्री, एक्झिट आणि एक्झिट करण्यासाठी टेक्निकल अनिलिसिस कसे वापरावे हे स्पष्ट करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून काम करते. मी जे काही शिकलो ते आणि गेल्या 18 वर्षात या मार्केटमधून अनुभवलेले, मी तुम्हाला या पुस्तकाच्या माध्यमातून सोप्या भाषेत समजावून सांगण्याना प्रयत्न केला आहे. ज्यांना टेक्निकल ऑनलिसिस शिकायचे आहे त्यांनी हे पुस्तक वाचायला हवे. कारण या पुस्तकाची लेखन शैली सहज समजण्याजोगी आहे. हे पुस्तक ट्रेडर्स किंवा गुंतवणूकदारांना अशी सर्व मूलभूत आणि जटिल तंत्रे सोप्या पद्धतीने समजावून सांगेल जी त्यांना टेक्निकल ऑनेलिसिस समजून घेण्यासाठी आवश्यक असतील आणि हे पुस्तक वाचल्याने हे ट्रेडर्स किंवा गुंतवणूकदारांना योग्य वेळी योग्य स्टॉक खरेदी करण्याचा पर्याय निवडण्यात देखील उपयुक्त ठरेल जेणेकरून त्यांना त्यांच्या स्टॉकमधून चांगला परतावा मिळू शकेल. यामध्ये समाविष्ट असलेली विविध उदाहरणे ट्रेडर्स किंवा गुंतवणूकदारांना ट्रेड करताना सपोर्ट आणि रेझिस्टंस, मूव्हिंग ऑव्हरेज, कैंडलस्टिक पॅटर्न आणि चार्ट पॅटर्न इत्यादी सारखी विविध टेक्निकल ऑनलिसिसनी तंत्र समजून घेण्यास आणि ती लागू करण्यासाठी योग्य दिशेने मार्गदर्शन करतील. या व्यतिरिक्त, या पुस्तकामध्ये ट्रेडिंग जर्नलसह पोझिशन साइडिटंग, स्टॉक पिकिंग स्ट्रेटेजीज, आद्याक्षरे सेट अप करणे आणि ट्रेलिंग स्टॉप लॉस यासारख्या जोखीम व्यवस्थापनाचा समावेश आहे.
-
Nehruncha Bharat Itihas,Vartman Aani Bhavishya (नेहरूंचा भारत इतिहास, वर्तमान आणि भविष्य)
इतिहास आणि भारताचा सांस्कृतिक भूतकाळ याविषयी नेहरूच्या आकलनावर भर देत हे पुस्तक अशी एक खिडकी उघडतं जिच्यातून आपल्याला सांप्रदायिकतेविषयी नेहरूंची समज काय होती आणि धर्मनिरपेक्षतेविषयी त्यांची बांधिलकी कशी होती ते दिसतं. हे पुस्तक लोकशाही समाजावरील त्यांचा अढळ विश्वास आणि भारतातील लोकशाहीचं पालनपोषण करण्यात त्यांची अमूल्य भूमिका यावर प्रकाश टाकतं. तसंच स्वतंत्र, समतावादी अर्थव्यवस्था उभारत असतानाच त्याच्या जोडीला विज्ञानाधिष्ठित दृष्टिकोनयुक्त समाजव्यवस्था उभारण्याच्या नेहरूच्या प्रयत्नांची दखलही घेत. या सर्व प्रयत्नांतूनच विसाव्या शतकातील एका महान व्यक्तिरेखेचे जीवन आणि कार्य यासंबंधी आपल्याला पुष्कळ माहिती मिळते, त्यांच्या निधनानंतर सहा दशके उलटली आहेत, इतका काळ गेल्यावरही भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्या मूल्यांचं प्रतिबिंच उमटलं होतं आणि त्यातील जी तत्त्वं नेहरूंनी स्वीकारली होती ती तत्त्वं आजही तेवढीच कालसुसंगत आहेत का? हे पुस्तक अतिशय रोखठोक, युक्तिवादपूर्ण आणि विचारप्रवृत्त करणारं असून ते नवभारताची मूलभूत संकल्पना शोधण्यासाठी, तिचा प्रसार करण्यासाठी आणि तिचं संरक्षण करण्यासाठी ज्या माणसाने अतिशय प्रामाणिक प्रयत्न केले त्याच्याबद्दल महत्वाची माहिती देत.
-
Aalashipanach Manasshastra (आळशीपणाचं मानसशास्त्र)
वैमानिक व्हायचं असेल तर विमान कसं चालतं, हे आधी समजायला हवं. तसंच जगातील सगळ्यात शक्तिशाली गोष्ट म्हणजेच तुमचं मन. ते नियंत्रित करायचं असेल, तर त्याचं शास्त्र माहिती असायला हवं. • जगातील बहुतांश यशस्वी व्यक्तींसारखं तुम्हीही आठवड्याला १०० तास काम करू इच्छिता का ? • तुम्हाला सतत ऊर्जावान राहण्याची इच्छा आहे का? • कामात परिपूर्णता येण्याची तुम्ही वाट बघताय का? • तुम्ही कामात चालढकल करता का ? • तुम्ही नेहमीच आळस करता का ? • तुम्ही अजूनही ज्यावर काम करायला सुरुवात केली नाही अशी काही तुमची स्वप्नं आणि ध्येयं आहेत का ? असं असेल तर, हे पुस्तक तुमच्यासाठी जादूसारखं काम करेल. आधी लिहिल्या गेलेल्या गोष्टींवर लिहायला मला अजिबात आवडत नाही. हे पुस्तक तुम्हाला स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवण्याचं नवं सूत्र देईलच, आणि कामात चालढकल करणाऱ्यांसाठी तर हे पुस्तक वरदानच ठरेल!
-
Shuddha Buddha Kaya Tukobarayaa (शुद्ध बुद्ध काया तुकोबाराया)
कलावंतांनी शक्यतो भूमिका घ्यायचीच नाही, चुकून घेतलीच तर ‘हाही छान, तोही छान’ असा आशाळभूत बोटचेपेपणाच करायचा, असा लाचार काळ बोकाळला आहे. त्यात सुस्पष्ट आणि खणखणीत भूमिका घेऊन प्रसंगी सत्तेच्या विरोधात बेडरपणे उभा ठाकणारा, त्यासाठी पडेल ती किंमत मोजणारा, मेंदूगहाण ट्रोल्सच्या झुंडी अंगावर घेऊन साता समुद्रापार भिरकावून देणारा मराठीतला खराखुरा ‘अँग्री यंग मॅन’ म्हणजे किरण माने. नुसताच अभिनेता नाही, तर चौफेर टोलंदाजी करणारा फर्डा वक्ता आणि फेसबुकवरच्या एकेका पोस्टमधून लोकांना एकीकडे शब्दांच्या तालावर डोलवत दुसरीकडे त्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारा एक प्रखर सामाजिक भान बाळगणारा लेखक. आपल्या धडावर आपलंच डोकं बाळगणाऱ्या किरण मानेंची वैचारिक नाळ जुळली आहे ती आपल्या काळातील ‘अँग्री यंग मॅन’च असलेल्या, दांभिक व्यवस्थेवर शब्दांचे आसूड ओढणाऱ्या तुकोबारायांशी. म्हणूनच तुकोबांच्या एरवी सर्वपरिचित असलेल्या अभंगांचीही ओळख माने वेगळ्याच प्रकारे करून देतात. टाळकुटे, परमार्थी संत अशी सगळ्याच वारकरी संतांची मतलबी मांडणी करणाऱ्या पोटार्थी परंपरेला धुडकावून, या अभंगांवर झळझळीत प्रकाश टाकतात. ही तुकोबांची ‘शुद्ध बुद्ध काया’ रूप महाप्रतिमा उभी करणारी मांडणी तुकोबांच्या विद्रोही परंपरेचाच वारसा अभिमानाने पुढे चालवते आणि वाचकांना तुकोबाराया नव्याने भेटवते.
-
Steal Like An Artist (स्टील लाइक ॲन आर्टिस्ट)
सर्जनशीलतेला मुक्त करा. १) कलाकारासारखी चोरी करा. २) तुम्ही कोण आहात है समजेपर्यंत सुरुवात करायला थांबू नका. ३) तुम्हाला वाचायला आवडेल असं पुस्तक लिहा. ४) तुमच्या हातांचा वापर करा. ५) दुय्यम प्रकल्प आणि छंद अत्यंत महत्त्वाचे असतात. ६) महत्त्वाचं गुपित : चांगलं काम करा आणि लौकांना ते सांगा. ७) आता भूगोल तुमच्यावर नियंत्रण गाजवू शकत नाही. ८) चांगले वागा. (जग है एक लहानसं गाव आहे.) ९) कंटाळवाणे व्हा. (काम पूर्ण करण्याचा हाच एक मार्ग आहे. १०) सर्जनशीलता म्हणजे वजाबाकी.
-
Show Your Work (शो युअर वर्क)
कलाकाराप्रमाणे शेअर करा. १) तुम्ही ‘जीनियस’ असण्याची गरज नसते. २) उत्पादनापेक्षा प्रक्रियेचा विचार करा. ३) रोज काहीतरी थोडंसं शेअर करा. ४) कुतूहलांचं कपाट खुलं करा. ५) चांगल्या गोष्टी सांगा. ६) तुम्हाला जे माहीत आहे ते शिकवा. ७) मानवी स्पॅम होऊ नका. ८) एखादा ठीसा खायला शिका. ९) सेलआउट – ‘विकला गेलेला’. १०) चिकाटीने टिकून रहा.
-
Keep Going (कीप गोइंग)
आता थांबू नका ! १) प्रत्येक दिवस नकारात्मक पुनरावृत्तीचा असतो. २) निर्भेळ आनंदाचं केंद्र बांधा. ३) नाम विसरून जा, क्रियापद करा. ४) भेटवस्तू बनवा. ५) ऑर्डिनरी + एक्स्ट्रा लक्ष -एक्स्ट्राऑर्डिनरी अर्थात असाधारण ६) कला राक्षसांचं शिरकाण करा. ७) तुम्ही तुमचं मत बदलू शकता. ८) जेव्हा शंका वाटेल, तेव्हा नीटनेटकं आवरा. ९ ) सैतानांना ताजी हवा आवडत नाही. १०) तुमची बाग तुम्ही फुलवा.
-
Swatashi Khote Bolane Thambava (स्वतःशी खोटे बोलणे थांबवा)
ही अशी कठोर सत्ये आहेत जी कोणीच तुम्हाला सांगणार नाही, पण ती ऐकण्याची, समजून घेण्याची नितांत गरज आहे. तुमच्या जीवनाच्या जोडीदाराच्या वर्तनाबद्दल स्पष्टीकरणे देणे, त्याच्या समर्थनार्थ सबबी सांगणे बंद करा. तुमच्या एखाद्या मित्राने तुमचा अपेक्षाभंग केला असेल, तुम्हाला निराश केले असेल, तर त्याकडे मित्र म्हणून दुर्लक्ष करू नका. कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या उत्तम कामाविषयी उगीचच विनम्रता दाखवू नका, त्याविषयी चारचौघांत अभिमानाने बोलायला अजिबात कचरू नका, मागे-पुढे पाहू नका.
-
Ravan (रावण)
आपल्या भावांप्रति असलेल्या प्रेमाबाबत राम आणि रावण यांच्यात काय फरक होता ? शूर्पणखेने रावणाविरुद्ध कशा प्रकारे षड्यंत्र रचलं ? कोण होती रावणाची बहीण कुंभिनी ? बौद्ध परंपरेत रावणाविषयी कोणती समजूत आहे ? रामायणातील खलनायक लंकाधिपती रावण याच्याविषयी असे अनेक प्रश्न भारतीय जनमानसात उपस्थित होत राहतात. हे पुस्तक भारतातील सर्वांत विख्यात महाकाव्य रामायण आणि रावण यांचं विस्तृत विश्लेषण करत, रावणास सविस्तरपणे जाणून घेण्याची वाट मोकळी करतं. या ज्ञानी आणि महान राजाच्या कर्मांमुळे त्याचं राज्य आणि परिवार यांवर आपत्ती कोसळली. आधुनिक काळात पौराणिक गाथांच्या प्रासंगिकतेविषयी तर्कपूर्ण रीतीने लेखन करणारे देवदत्त पट्टनायक यांचं हे पुस्तक रावणाच्या पतनाची कारणं समजावून सांगण्याचा प्रयत्न करतं. इथे रावण एक मनोवैज्ञानिक अवस्थेचं रूपकही आहे. रावणाला समजून घेताना आपण स्वतःला आणि आपल्या व इतर लोकांच्या आत दडलेल्या रावणाला समजून घेऊ शकतो.
-
Mahanayak Karna (महानायक कर्ण)
महाभारतातील एक महानायक म्हणजे कर्ण. त्याचं नाव घेताच मनामध्ये अनेक परस्पर विरोधी प्रतिमा उभ्या राहतात – इंद्राला आपली कवचकुंडलंही दान करणारा कर्ण कधी दानशूरतेच्या सर्वोच्च शिखरावर असतो, तर कधी तो दुर्योधनाच्या दरबारामध्ये द्रौपदी वस्त्रहरणाच्या घृणास्पद कृत्यात सहभागी होतो. या कादंबरीचा निवेदक कर्णाचा बालपणीचा मित्र आणि हितचिंतक आहे. सूतपुत्र असल्याने कर्णाला भोगावे लागलेले अपमान तसंच सर्वोत्तम धनुर्धर म्हणून झालेला त्याचा विकास यांचा तो साक्षीदार आहे. तो केवळ त्याच्या वीरत्वाचे, दानशूरतेचे प्रसंग कथन करत नाही, तर तो कर्णाचं पतन झाल्यामुळे मित्र म्हणून त्याला होणाऱ्या यातनाही झेलतो. पाप-पुण्य यांच्यात दुभंगलेलं जीवन कर्ण बेधडकपणे जगतो खरा, परंतु अंतिमतः तो मृत्युशय्येवर असताना पाप-पुण्याच्या पारड्यांतील कोणतं पारडं जास्त जड आहे हे ठरवण्याची जबाबदारी श्रीकृष्णावर येते. तेव्हा तो जे उत्तर देतो, ते चिंतनीय तर आहेच, परंतु कर्णाच्या जीवनाच्या कहाणीचा सर्वोच्च शिखरबिंदूही आहे.
-
Vivahsanstha,Kutumbsanstha Aani Streemukti (विवाहसंस्था, कुटुंबसंस्था आणि स्त्रीमुक्ती)
दिवाकर मोहनी ह्यांनी १९९२ ते २००१ या काळात ‘आजचा सुधारक’ ह्या मासिकात लिहिलेल्या लेखांचे हे संपादित संकलन आहे. ह्यात मोहनींनी विवाहसंस्था, कुटुंबसंस्था आणि स्त्रीमुक्ती ह्यांसंदर्भात अभिनव मांडणी केली आहे. विवाहसंस्था, कुटुंबसंस्था आणि स्त्रीमुक्ती ह्यांना परस्परांपासून वेगळे करताच येत नाही. किंबहुना, विवाहसंस्था आणि कुटुंबसंस्था ह्यांच्यातील जे नाते आतापर्यंत विविध विचारप्रणालींनी गृहीत धरले आहे, त्यालाच हे पुस्तक छेद देते. स्त्रियांच्या लैंगिक स्वातंत्र्यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या व तेवढ्याच नाजूक-निषिद्ध विषयाला ह्या पुस्तकातून मोहनींनी हात घातला आहे. ह्या विचारांवर जी साधकबाधक चर्चा घडली, तिचाही ह्या पुस्तकात समावेश केलेला आहे. मोहनींची मांडणी रूढ विचारांना धक्का देणारी असली, तरी त्यावर विचारविमर्श करण्यास अजूनही जागा आहे. त्यामुळे सुजाण वाचकांनी आपापले पूर्वग्रह दूर ठेवून समाजहिताच्या दृष्टिकोनातून ह्या पुस्तकाचे वाचन, त्यावर चिंतन व मुक्त चर्चा करावी, असे आमचे त्यांना नम्र आवाहन आहे.
-
The Big Bull Of Dalal Street (द बिग बुल ऑफ दलाल स्ट्रीट)
बाजाराचा आदर करा. मोकळे मन ठेवा. काय भाग घ्यायचा हे जाणून घ्या. तोटा कधी घ्यायचा हे जाणून घ्या. जबाबदार रहा,' असे भारतातील प्रतिष्ठित शेअर बाजार गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला अनेकदा म्हणत असत. 'बिग बुल' म्हणून विख्यात असलेल्या राकेश झुनझुनवाला यांच्यावर माणूस आणि गुंतवणूकदार अशा दोन्ही बाबतींबाबत हे पुस्तक प्रकाश टाकतं. हे पुस्तक म्हणजे, त्यांचं चरित्र नसून त्यांना लखलाभ ठरणाऱ्या गुंतवणुकीचं ते विस्तारानं विवेचन करतं. दीर्घकालीन गुंतवणुकीचे फायदे, शेअर बाजारातल्या टाळता येण्याजोग्या चुका, कर्ज घेऊन केलेली गुंतवणूक अशा आणि इतरही मुद्द्यांचा समावेश आहे.
-
Raja Harishchandra (राजा हरिशचंद्र)
भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील पहिला मूक चित्रपट हा ‘राजा हरिश्चंद्र’ होय! चित्रपट, नाटके, गीते, कथा, कविता, अभंग, पोवाडे, भारूडे, आख्याने अशा अनेक कलाकृतींतून वर्षानुवर्षे ‘सत्यवादी राजा हरिश्चंद्र’ या व्यक्तिरेखेने मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. मराठी साहित्याला समृद्ध केले. तर रसिक वाचकांच्या भेटीसाठी घेऊन येत आहोत, पौराणिक कथेतील फॅन्टसी (कल्पनाविलास) टाळून ऋषी विश्वामित्र, तारामती आणि हरिश्चंद्र यांच्या स्वगतातून साकारलेली, ‘राजा हरिश्चंद्र’ या विषयावरील पहिली मराठी कादंबरी ! राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज साहित्य सेवा पुरस्काराने सन्मानित कादंबरी
-
Dhoka (धोका)
सध्या जगात आणि भारतातही नवउदारमतवादाचे युग अवतरले आहे. याचे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण असेही वर्णन केले जाते. माझ्या मताने हे शब्दप्रयोग फसवे आहेत. ‘उदारीकरण’ म्हटले की, त्यात काही तरी चांगले आहे, असा भास निर्माण होतो. या नव्या जागतिक प्रवाहामध्ये चांगले काहीही नाही. हे निव्वळ भांडवलाने आणलेल्या निर्लज्ज नफेखोर नशेचे युग आहे. कुठल्याही मार्गाने नफा मिळवला; तर तो योग्यच आहे, अशी शिकवण अप्रत्यक्षपणे मिळत आहे. परिणाम म्हणून जगभर खोट्या, बनावट, आरोग्याला हानिकारक अशा पदार्थांची निर्मिती आणि विक्रीचं प्रमाण वाढते आहे. एका अंदाजानुसार जगात एकूण बनावट, खोटा, आरोग्याला हानिकारक माल बनवण्याचा काळा धंदा हा आता १.५ ट्रिलिअन डॉलर इतका व्यापक झाला आहे आणि इतर कुठल्याही उद्योगाच्या तुलनेत तो जास्त वेगाने वाढतो आहे.
-
Mithakanpasun Vidnyanaparyant (मिथकांपासून विज्ञानापर्यंत)
विज्ञान आणि धर्माच्या मध्ये ‘वास्तविकतेची’ सीमारेषा विज्ञान आणि धर्म हे एकमेकांचे विरोधक आहेत की एकमेकांना पूरक ? एक अत्यंत धार्मिक व्यक्ती, चांगली वैज्ञानिक असू शकते का? विज्ञान हे लोकांना धर्मभ्रष्ट करतं का? एखाद्या अत्यंत धार्मिक समाजात, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढू शकतो का ? आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वैज्ञानिक असलेल्या, कवीमनाच्या गौहर रझा ह्यांच्यासमोरसुद्धा हे प्रश्न अनेकदा उपस्थित झाले. कधी कुंभमेळ्याच्या गर्दीत, तर कधी विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारताना. ह्यांपैकी काही प्रश्न आपल्याला विज्ञानाकडे आणि काही धर्माकडे घेऊन जातात. ह्या प्रश्नांची उत्तरं एका कवीमनाच्या वैज्ञानिकाने शोधायला सुरुवात केली, तेव्हा मिथकं आणि कहाण्यांबरोबरच धर्म, तत्त्वज्ञान, अध्यात्म आणि विज्ञानाचे अनेक पैलू पुढे आले. हे पुस्तक ब्रह्मांडाच्या आणि जीवसृष्टीच्या विकासाची बदलती कहाणी सांगताना ‘विज्ञाना’ची व्याख्या करण्याचा एक प्रयत्न आहे. इतिहासाची पानं उलटत-उलटत यात सांगितलं गेलंय, की विज्ञान आणि धर्म ह्यांच्यामध्ये ‘वास्तविकते’ची सीमारेषा आखणं आवश्यक आहे. ही गोष्टसुद्धा पावला-पावलांवर स्पष्ट होत जाते, की तार्किक दृष्टी, वैज्ञानिक पद्धती आणि मानवी संवेदना या परस्परपूरकच आहेत.
-
Ramrao Kahani Bhartachya Sheti Sankatachi (रामराव कहाणी भारताच्या शेती संकटाची)
शेतकरी आत्महत्यांसाठी ओळखल्या जाणार्या महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील कापूस उत्पादक रामराव पंचलेनीवार यांनी २०१४ मधील एका सकाळी दोन बाटल्या कीटकनाशक प्राशन केले. जर आत्मघाताचा त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला असता तर शेतकरी आत्महत्येच्या आकड्यांमधील ( आता अप्रकाशित ) इतरांसारख्या एक आकडा बनून राहिले असते. कारण भारतात प्रत्येक तीस मिनिटाला एक शेतकरी आपले प्राण गमावतो. केवळ महाराष्ट्रातच गेल्या दोन दशकांत अशा ६० हजार आत्महत्या झालेल्या आहेत. पण चमत्कार व्हावा तसे रामराव यातून बचावले. रामरावांच्या माध्यमातून त्यांनी शेती संकट सोप्या शब्दांत मांडले आहे. या माध्यमातून त्यांनी भारतीय शेतकर्याचे दैनंदिन आयुष्य आणि त्यातील आव्हाने जशीच्या तशी वाचकांसमोर उलगडली आहेत. त्यांचा संघर्ष आणि अनेक बाबतींत येणारे अपयश, दलदलित फसावे अशा समस्यांना त्याचे तोंड देणे आणि या सगळ्याचा शेवट करण्यासाठी त्याला टोकाचा निर्णय घ्यावा लागणे हा सगळा पटच वाचकांसमोर उभा राहतो.
-
Osarlele Vadal (ओसरलेले वादळ)
आपल्या मनोविश्वात अशी गर्दी करणाऱ्या सगळ्याच माणसांच्या स्मरणखुणा राहत नाहीत. काहींची मिथकेच असतात. काहींचे फक्त गूढ, तर काहींचा शतकानुशतके प्रभाव. ज्यांनी ‘ज्ञानेश्वरी’ वाचलेली नाही त्यांच्यावरही ज्ञानेश्वरांचा अप्रत्यक्ष संस्कार होतो. ज्यांनी शेक्सपिअरची नाटके वाचलेली नाहीत, त्यांनाही शेक्सपिअरबद्दल कुतूहल असते. ज्यांनी कार्ल मार्क्स किंवा सिग्मंड फ्रॉइड यांच्या विचारांचा अभ्यास केलेला नाही, त्यांनाही त्यांचा प्रभाव असल्याचे भासत राहते. ज्यांना आपण प्रत्यक्ष पाहतो वा ज्यांच्या प्रभावाखाली थेट येतो त्यांचे अनेक कंगोरे आपल्याला कळतात. काहींच्या मर्यादा लक्षात येतात, तर काहींचे अथांगपण जाणवते. पत्रकारांवर एक सांस्कृतिक जबाबदारी असते. समाजावर प्रभाव टाकणाऱ्या अशा काही माणसांची भेट वाचकांबरोबर घडवून आणणे हे त्यांचे एक कर्तव्य असते. ही भेट कधी मृत्युलेखाद्वारे घडवायची असते, तर कधी जन्मशताब्दीच्या निमित्ताने. कधी एखादा पुरस्कार मिळाला म्हणून तर कधी त्यांच्या साहित्यकृतीचा गौरव होतो म्हणून. या माणसांनी आपल्या मनात वादळे उत्पन्न केलेली असतात. त्या वादळांनी आपल्या मनात झालेली उलथापालथ आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देते. कधी आपल्या मनात नाही, पण समाजात त्यांनी घडवून आणलेली उलथापालथ इतिहास घडवून जाते. ती वादळे ओसरल्यानंतर आपल्याला त्यांचा प्रभाव वेगळ्या प्रकारे जाणवू लागतो. आपल्या मनात वा समाजात ते झंझावात चालू असतात, तेव्हा त्यांचा वेग व व्याप्ती लक्षात येत नाही. आपण स्वतःला सावरून घेत असतो म्हणून किंवा उन्मळून पडतो म्हणून. या पुस्तकात अशा वादळी माणसांवर मी लिहिलेले लेख-अग्रलेख संग्रहित केले आहेत. ते ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये मी संपादक असताना लिहिलेले आहेत. काही अग्रलेख मी ‘लोकमत’चा संपादक असताना लिहिलेले आहेत. वृत्तपत्रीय लेखनाला दोन मर्यादा असतात. पहिली जागेची आणि दुसरी वेळेची. दीड-दोन तासांत आणि मर्यादित शब्दांत त्या माणसांची ओळख वाचकाला करून द्यायची असते. ती ओळख अर्थातच पूर्ण नसते. आपण पूर्णपणे तसे कुणालाच ओळखत नाही आणि तरीही अशी माणसे आपल्या मनाचा व जीवनाचा ठाव घेतात. तो ठाव वाचकांपर्यंत नेण्याचा हा एक प्रयत्न.
-
Vithobha Missing In Pandhurpar (विठोबा मिसिंग इन पंढरपूर)
विनायक होगाडे हा आधुनिक जाणिवेतून परंपरेचा नवा अन्वयार्थ लावत आजचा खारवटलेला काळ पकडू पाहणारा तरुण लेखक आहे, याचा प्रत्यय ‘विठोबा मिसिंग इन पंढरपूर’ या त्याच्या कादंबरीतून येत राहतो. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानला जाणारा विठ्ठल एके दिवशी अनपेक्षितपणे गायब होतो आणि सर्वत्र एकच गहजब उडतो, या भन्नाट कल्पनेचं बोट पकडून विनायक होगाडेने या फॅन्टसीसदृश कादंबरीची रचना केली आहे. काळाची सरमिसळ करत एकाच वेळी केलेले ऐतिहासिक आणि आधुनिक काळातील व्यक्तिरेखांचे कल्पक उपयोजन, तसेच ओघवत्या शैलीत सहजपणे येणारा विठ्ठल, पंढरपूर यांसह वारकरी संतांचा इतिहास, त्यांविषयी लोकमानसात रुजलेली मिथके, कहाण्या, ही या कादंबरीचे एक अनोखे वैशिष्ट्य म्हणता येईल. या अद्भुत कथनाच्या माध्यमातून त्याने मराठी समाज आणि संस्कृतीच्या लाजिरवाण्या भूतकाळाची आणि त्याचबरोबर सडत चाललेल्या वर्तमानाची सालपटं काढून आपल्यासमोर मांडली आहेत. हे जितकं धाडसाचं आहे, तितकंच ते समकालाची चिकित्सा करण्याच्या दृष्टीने आवश्यकही आहे. संत विचारांचा आजच्या काळाने केलेला पराभव, त्यातून जाणवणारे नैतिक मूल्यांचे स्खलन आणि संवेदना जिवंत असलेल्या एखाद्या विठोबाची यामुळे होणारी घुसमट, हे सगळे वाचकाला विलक्षण अस्वस्थ करते. आपल्या लेखकत्वाचे भान असलेल्या आणि संत परंपरेतून गवसलेल्या शब्दांचे व मूल्यांचे सामर्थ्य जाणून असलेल्या या लेखकाची ही कादंबरी मराठी कादंबरीच्या वाटचालीत एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, हे निश्चित. - प्रवीण दशरथ बांदेकर.
-
Andharyug Bhartatil British Rajvat (अंधारयुग भारतातील ब्रिटिश राजवट)
लोकप्रिय लेखक शशी थरूर यांनी या स्फोटक पुस्तकामध्ये ब्रिटिश राजवट भारताकरिता किती विनाशकारी होती हे तीक्ष्ण युक्तिवाद, अचूक संशोधन, आणि ते ज्याकरिता प्रसिद्ध आहेत ते बुद्धिचातुर्य यांच्या साहाय्याने उलगडून दाखवले आहे. देशातील साधनसंपत्ती ब्रिटनमध्ये नेण्यापासून ते भारतीय वस्त्रोद्योग, लोखंड उद्योग आणि जहाजबांधणी उद्योगाचा विनाश, आणि कृषी उद्योगातील नकारात्मक परिवर्तनापर्यंत, वसाहतकारांनी जितक्या विविध मार्गांनी भारताचे शोषण केले त्याची तपासणी करण्याबरोबरच, त्यांनी ब्रिटिश राजवट भारतासाठी कशी चांगली होती हे मांडणाऱ्या ब्रिटिश साम्राज्याच्या समर्थकांचे युक्तिवादही हाणून पाडले आहेत. ब्रिटिश राजवटीने भारताला लोकशाही आणि राजकीय स्वातंत्र्य, कायद्याचे राज्य आणि रेल्वे या गोष्टी दिल्या आणि म्हणून ती भारतासाठी फायदेशीर होती, या मुद्द्यांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला आहे. जे थोडे खरोखरच फायदे म्हणता येतील इंग्रजी भाषा, चहा आणि क्रिकेट त्यांचा प्रत्यक्षात भारतीयांना फायदा होणे अभिप्रेतच नव्हते, तर ते मुख्यतः वसाहतकारांच्या हितासाठीच होते, हे सांगायला ते विसरत नाहीत. अत्यंत प्रभावीपणे केलेली मांडणी आणि उत्कटतेने केलेला युक्तिवाद यामुळे ‘अॅन एरा ऑफ डार्कनेस’ हे पुस्तक भारतीय इतिहासाच्या सर्वांत वादग्रस्त कालखंडापैकी एक असलेल्या ब्रिटिश कालखंडाबद्दलचे अनेक चुकीचे समज दूर करेल यात शंका नाही.
-
House Of Chhatrapati Shivaji (हाऊस ऑफ छत्रपती शिवाजी)
छत्रपती शिवाजी महाराज फक्त धार्मिक किंवा निव्वळ लुटारू अगर हल्लेखोरही नव्हते, कारण कोणताही धार्मिक, लुटारू किंवा हल्लेखोर एका सार्वभौम राज्याची स्थापना करू शकत नाही. हे फक्त एक मुरब्बी आणि मुत्सद्दी राजकारणीच करू शकतो. त्यांनी केलेल्या लढाया आणि डावपेच यांचा परिणाम म्हणून त्यांनी सार्वभौम, स्वतंत्र हिंदू राज्याची स्थापना केली आणि ते स्वतः सार्वभौम राजा झाले- ते छत्रपती झाले. म्हणूनच प्राचीन ग्रीक लोक ज्याला ‘पुरुषांमधील राजा’ म्हणजे अलौकिक बुद्धिमत्तेची दैवी देणगी लाभलेला पुरुषोत्तम राजा म्हणत, तसे शिवाजी महाराज होते, याविषयी शंका घेण्यास मुळीच जागा नाही.
-
Mumbai : Ek Dantkatha (मुंबई : एक दंतकथा)
प्रदर्शनीयता आणि भग्नावशेष यांना सामावून घेणारी मुंबई, ही खऱ्या अर्थाने बहुसांस्कृतिक महानगरी आहे. भारताच्या कानाकोपऱ्यांतून आणि विविध देशांतून आलेले, वेगवेगळ्या वांशिक, भाषिक आणि धार्मिक पार्श्वभूमीचे लाखो लोक, त्यांच्या इच्छा आणि महत्त्वाकांक्षा घेऊन या शहराच्या किनाऱ्यावर येऊन विसावले आहेत. ‘मुंबई : एक दंतकथा’ हे पुस्तक येथील रहिवाशांच्या, पत्रकारांच्या, नगररचनाकारांच्या, लेखकांच्या, कलाकारांच्या, चित्रपट-निर्मात्यांच्या आणि राजकीय कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनांतून या दंतकथा बनलेल्या शहरातील पुराणकथेसमान भासणाऱ्या जीवनाचा शोध घेते.