-
Attitude Manovrutti Mhanjech Sarvakahi (ॲटिट्यूड मनोवृत्ती म्हणजेच सर्वकाही)
Discover the power of mindset transformation with this compelling Marathi translation of 'Attitude' by Adam Ashton and Adam Jones, thoughtfully translated by Seema Bhanu. This comprehensive guide delves deep into understanding and reshaping one's perspective through five crucial aspects: suffering, change, learning, fear, and patience. The book serves as a practical manual for those seeking personal growth and mental resilience. Written in accessible Marathi language, it brings universal principles of attitude management to Marathi readers. The green cover design reflects the book's focus on growth and transformation. Perfect for self-help enthusiasts, professionals, students, and anyone looking to develop a more constructive mindset. This edition makes profound psychological insights available to Marathi-speaking readers while maintaining the essence of the original work.
-
Numbers (नंबर्स)
नंबर्स हे पुस्तक गणितात स्वारस्य असणाऱ्याांशिवाय सर्वसामान्य वाचकांनाही रोचक वाटेल. गणितप्रासादाच्या विटा संख्या’ना मानलं गेलं तर नवल नाही। प्रस्तुत पुस्तक सर्वच वाचकांचे गणितरंजन करेल ह्यात शंका नाही! – डॉ. रोहित दिलीप होळकर सहयोगी प्राध्यापक, गावित विभाग, आपत्तर भोपाल सदर पुस्तक हे मराठी भाषेतील दर्जेदार पुस्तक आहे. शास्त्रीय विचार मराठी भाषेत चागल्या पद्धतीने मांडता येतात, याचकांपर्यंत पोहोचवता येतात हे या पुस्तकावरून लक्षात येतं. – डॉ. दिलीप नारायणदास शेठ (निवृत्त) प्राचार्य, सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे ‘नंबर्स हे पुस्तक गणिताविषयी कुतूहल असणाऱ्या सर्व मराठी वाचकांनी वाचावं, संग्रही ठेवावं, आणि आपल्या मुलांना, नातवंडांना या पुस्तकाचा परिचय करून द्यावा असं मला मनापासून वाटतं. – डॉ. शैलजा देशमुख संख्याविभामुख (निवृत्त), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
-
Narayan Rao Peshwayanchi Hatya (नारायणराव पेशव्यांची हत्या)
पुण्याच्या शनिवार वाड्यात दिवसाढवळ्या घडलेली शोकांतिका सत्य घटनांमधून स्फूर्ती घेऊन शनिवारवाड्यात एकाच दिवशी पेशव्यांसह इतरांच्याही झालेल्या सनसनाटी हत्यांची मांडलेली थरारक सत्य कहाणी आणि तत्कालीन राजकीय परिस्थितीला अभूतपूर्व कलाटणी देणारा मुख्य न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणेंनी चालवलेला खटल
-
Nexus (नेक्सस)
कथांनी आपल्याला जवळ आणलं, बांधून ठेवलं. पुस्तकांनी आपल्या कल्पनांचा आणि मिथकांचा प्रसार केला. इंटरनेटने आपल्याला अमर्याद ज्ञानाची कवाडं खुली करून दिली. अल्गोरिदमला आपली गुपितं समजली आणि आता ते आपल्याला एकमेकांशी झुंजवत आहे. एआय काय करेल ? नेक्सस म्हणजे आपण या क्षणापर्यंत कसे पोचलो याबद्दलचं थरारक कथन… हे पुस्तक येत्या काळात टिकून राहण्यासाठी आणि आपला विकास साधण्यासाठी आपण कोणते निर्णय घेतले पाहिजेत आणि कोणत्या निवडी आत्ताच केल्या पाहिजेत, याचा जाहीरनामा आहे.
-
Shivrayancha Chhava (शिवरायांचा छावा)
कट-कारस्थानांना ऊत आलेला असताना आणि तलवारींचा खणखणाट सुरू असताना स्वराज्याचे भवितव्य पणाला लागले होते. छत्रपती संभाजी महाराजांनी मान तुकवणे किंवा मोडून पडणेही नाकारून जमिनीवर आणि समुद्रातही अटीतटीची युद्धे केली. प्रत्येक युद्ध, प्रत्येक बलिदान हे त्यांच्या पित्याने म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वप्न पाहिलेल्या स्वराज्यासाठीच केले जात होते. परंतु इतिहासाच्या भरतीच्या लाटांच्या विरोधात एकटे पडलेले छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याला अखंड ठेवू शकणार होता का? की, त्यांच्या जाज्वल्य तेजामुळे, देदिप्यमान चैतन्यामुळे कधीही न विझणारी क्रांतीज्योत पेटणार होती? शिवरायांचा छावा म्हणूनच मोठ्या प्रमाणात छत्रपती संभाजी महाराजांना ओळखले जाते. त्यांचे जीवन हे धाडस, शौर्य, त्याग, बलिदान आणि स्वातंत्र्यासाठीचा अमर लढा यांची शौर्यगाथा आहे.
-
Market Wizards (मार्केट विझार्ड्स)
ब्रूस कोव्हनेर, रिचर्ड डेनिस, पॉल ट्यूडर जोन्स, मायकेल स्टाईनहार्थ, एड सिकोटा, मार्टी श्वार्ट्स अशा मार्केटवर मात करणाऱ्या एकूण सतरा महान ट्रेडर्सच्या मुलाखती असलेल्या ह्या पुस्तकात ट्रेडिंग विश्वामध्ये त्यांनी जगलेले व भोगलेले अनेक किस्से व कहाण्या आहेत. ह्यातील एका एमआयटीच्या विद्युत अभियंत्याने संगणीकृत ट्रेडिंगच्या साहाय्याने सोळा वर्षात आपल्या गुंतवणूकीवर अविश्वसनीय असा २,५०,००० टक्के परतावा मिळवला तर अनेकवेळा बाजारात भांडवल गमावलेल्या एका ट्रेडरने अखेर ३०,००० डॉलर्सच्या गुंतवणूकीतून ८० दशलक्ष डॉलर्सची कमाई केली. ह्या सर्व जादूगारांच्या ट्रेडिंगची वैशिष्ठ्ये श्वागरने अतिशय नेमकेपणाने या पुस्तकात मांडली आहेत.
-
Aivaj Ek Smrutibandh (ऐवज एक स्मृतिबंध)
अमोल पालेकर यांच्या कला कारकिर्दीचा ‘ऐवज’ वाचकांच्या हाती! हे पुस्तक केवळ एका कलाकाराचा प्रवास नाही; हे एका माणसाचं आत्मचिंतन आहे. यातून आपण जीवनातील साधेपणाचं सौंदर्य आणि स्वाभिमानाची ताकद अनुभवतो." "कलावंत म्हणून ते केवळ भूमिका साकारत नव्हते, तर समाजाला विचार करायला लावणारी कला निर्माण करत होते." सिद्ध चित्रकार, अभिनेता-दिग्दर्शक अमोल पालेकर यांच्या ऐंशीव्या वाढदिवसाचे औचित्य साधून ऐवज’ या आत्मकथनपर मराठी पुस्तकाचे प्रकाशन! यानिमित्ताने स्वत:चा वेगळा चेहरा निर्माण केलेल्या एका मनस्वी मराठी कलाकाराची नवी ओळख वाचकांना होणार असून पालेकर यांच्या कलात्मक प्रवासाला आकार देणाऱ्या अनुभवांचा तपशील वाचकांना समृद्ध करणारा ठरेल.पालेकर यांच्या आत्मकथनातून भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगातील काही मौल्यवान क्षणचित्रे गवसतात. व्यक्तिगत आठवणी, दुर्मीळ छायाचित्रे आणि सत्यदेव दुबे, बादल सरकार, हृषिकेश मुखर्जी, बासू चटर्जी, जयदेव वर्मा अशा नाट्य-चित्रपट जगतातील दिग्गजांना पालेकर यांनी अर्पण केलेले श्रद्धांजलीपर मनोगत समाविष्ट करण्यात आले आहे. पुस्तकामध्ये दिलेल्या ‘क्यूआर कोडमुळे पालेकर यांच्या कलाकृती बघण्याची संधी वाचकांना लाभणार आहे...!! माझा इथवरचा प्रवास न्याहाळताना, कला क्षेत्रातील परिवर्तनाचा आवाका, व्याप्ती आणि खोली लक्षात येईल. पडद्यावर दिसणाऱ्या भोळसट नायकापलीकडच्या माणसाची जडणघडण समजून घेता येईल
-
Arthshastracha Sankshipt Itihas (अर्थशास्त्राचा सं
हे छोटेसे पुस्तक आपल्याला खूप मोठी कहाणी सांगते. प्राचीन काळापासून ते आधुनिक जगापर्यंत अर्थशास्त्राच्या लघुतम इतिहासाचे हे पुस्तक म्हणजे युद्धांच्या मागे प्रच्छन्न आर्थिक शक्ती कशी काम करत असते, नवनवीन शोध कसे लागत असतात आणि सामाजिक बदल कसे होत असतात या गोष्टी मुळापासून उकरून काढते. भांडवलशाही आणि मार्केटच्या पद्धती यांचा उगम कसा होतो आणि अर्थशास्त्राच्या या विद्याशाखेला महत्त्वाच्या कल्पना प्रदान करणारे लोक कसा आकार देतात याचा मागोवा हे पुस्तक घेतं. कृषिक्रांतीपासून ते आपला ग्रह दिवसेंदिवस आणखी आणखीच कसा उष्ण होत जातोय, या गोष्टीपर्यंत अँड्य्रू ली हे आपल्याला अर्थशास्त्राविषयीची ही कहाणी सांगतात. या कहाणीत शतकानुशतकांपासून आणि वेगवेगळ्या खंडांचा विचार करत अर्थशास्त्र या विद्याशाखेमध्ये अंतर्भूत असलेली विविधता अधोरेखित होत राहते. मक्तेदारीच्या खेळाच्या मुळापर्यंत ते जातात आणि नांगराच्या शोधामुळे लैंगिक भेदाभेद कसे वाढले ते उलगडून दाखवतात. काही रोगांमुळे वसाहतवादाच्या काही प्रकारांना कसा आकार प्राप्त झाला तेही सांगतात. अमेरिकी शहरांमध्ये गगनचुंबी इमारती निर्माण होण्याची कारणे विशद करतात आणि बरेच काही सांगून जातात. या सगळ्या विचारमंथनाचा परिणाम म्हणजे आपल्या विवाला आकार देणारे असे अर्थशास्त्रीय कल्पनांवर आणि शक्तिस्त्रोतांवर प्रकाश टाकणारे हे रंजक पुस्तक.
-
Mossad...
Mossad Israeli Gupther Sansthela Baladhya Banvnarya Atyant Gupt Mahatvpurn Thararak Mohima ( Marathi Edition ) मोसाद इस्त्रायली गुप्तहेर संस्थेला बलाढ्य बनवणाऱ्या अत्यंत गुप्त, महत्त्वपूर्ण थरारक मोहिमा ! मोसाद या पुस्तकात मोसादने पार पाडलेल्या गोपनीय मोहिमांचे वर्णन केले आहे. या मोहिमा मोसादच्या विकासामध्ये त्याचे स्वरूप निश्चित करणाऱ्या महत्त्वपूर्ण घटना ठरल्या आहेत. १९७२च्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या इस्रायली खेळाडूंची 'ब्लॅक सप्टेंबर' संघटनेच्या अतिरेक्यांनी हत्या केली. या अतिरेक्यांचा माग काढत त्यांना एकेक करून संपवण्याची मोहीम, इस्रायलच्या गुप्तपणे राबवण्यात येणाऱ्या अण्वस्त्र कार्यक्रमासाठी 'येलोकेक' युरेनियमचा साठा हस्तगत करण्याची मोहीम आणि नाझी युद्ध गुन्हेगार अॅडॉल्फ आईकमन याचे अपहरण करत त्याचा जाहीर न्यायनिवाडा घडवून आणण्याची मोहीम अशा महत्त्वपूर्ण मोहिमांचे वर्णन या पुस्तकात केले आहे. मोसादच्या काही मोहिमा वादग्रस्तही ठरल्या. यात इराकच्या अणुऊर्जा कार्यक्रमाशी संबंधित असलेल्या एका शास्त्रज्ञाची हत्या घडवून आणण्याची मोहीम आणि एडवर्ड स्नोडेनप्रमाणे एक प्रमुख जागत्या (विसलब्लोअर) असलेला -इस्रायली नागरिक मोर्डेकाई वानुनु याचे अपहरण या मोहिमांचा समावेश होतो मोर्डेकाई वानुनु यांना इस्राईलने बेइमान, गद्दार ठरवले. या मोहिमांवर जगभरातून नैतिक प्रश्नचिन्हे उठली. एकूणच या पुस्तकात वर्णन केलेल्या मोसादच्या मोहिमा त्याची वैशिष्ट्ये, कल्पकता आणि धाडस यांचे अचूक वर्णन करतात. त्याच वेळी त्या मोहिमांमध्ये अंतर्भूत असलेल्या वादग्रस्त नैतिक पैलूंनाही वाचकांसमोर मांडतात.
-
Goat Days (गोट डेज)
आखाती देशांत जायचे, भरपूर पैसे कमवायचे आणि मायदेशातल्या कुटुंबियांना सुखात ठेवायचे या आकांक्षेने तिथे जाणाऱ्या लाखो लोकांपैकी एक म्हणजे केरळात मजुरी करणारा नजीब. त्याची आखाती आकांक्षा सफल झाली की स्वप्नरूपातच राहिली ? त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागला. कधी निसर्गाने तर कधी मानवाने, प्राणच पणाला लावले. त्यातूनही तो निभावून गेला, कसा? कोणत्या श्रद्धांमुळे? जसा होता तसा राहिला की ? मानवी आयुष्याची संभवनीय परिवर्तने आणि मूलभूत मूल्ये, यांचे चित्तवेधक दर्शन या कादंबरीत घडते. ‘गोट डेज’ मल्ल्याळी भाषेत प्रकाशित झाली आणि अल्पावधीत बेस्ट सेलर या वर्गात मोडली जाऊ लागली. मल्ल्याळी साहित्यातील एक अत्यंत तेजस्वी असे व्यक्तिमत्व म्हणजे बेन्यामिन. त्यांची उपरोधीक आणि प्रसंगी हळुवार होणारी शैली नजीबच्या आयुष्याची वाळवंटी वंचना, बघता बघता, एकाकीपणा आणि परकेपणा, यांचे वैश्विक परिणाम कसे बनते ते समर्थ रीतीने उभे करते. या पुस्तकाच्या मल्याळम आवृत्तीच्या तीन लाखाहुन अधिक प्रतींची विक्री झालेली आहे.
-
Scienstoriya Katha Tantradnyanachya(सायन्स्टोरीया
बॅडेडचा शोध पत्नीवरच्या प्रेमापोटी लागला. कॉफी भारतात तस्करीद्वारे आली. पेसमेकर एका अभियंत्याची कारागिरी आहे. रेफ्रिजरेटर एका डॉक्टरनं शोधलं. या काही कपोलकल्पित कथा नाहीत तर आख्खं मानवी आयुष्य बदलवून टाकणाऱ्या शोधगाथा आहेत. अत्यंत रंजक, प्रेरक आणि उद्बोधक अश्या 'सायन्स्टोरी या'
-
Scienstoriya Katha Shodhanchya(सायन्स्टोरीया कथा श
लुई पाश्चरनं 'रेबिज'वर लस शोधली ही गोष्ट नाही.. ती त्याला नेमकी का शोधावी वाटली? त्यासाठी त्यानं काय काय केलं? कुठल्या पातळीवरचे धोके पत्करले? यापाठचं नेमकं निरिक्षण कसं गवसलं? या आणि अश्या एक ना अनेक प्रश्नांच्या शोधामागं दडलीये खरी गोष्ट.. बरं लस अशीच येत नाही.. सुई असते तेव्हा इंजेक्शन येतं आणि इंजेक्शन येतं तेव्हा कुठं लस येते.. मानवी संस्कृती ही रिले रेस प्रमाणं आहे एकानं दिलेली बॅटन पुढं सरकते तेव्हा कुठं ही शर्यत चालू रहाते.. अश्याच नानाविध बॅटन्सच्या गोष्टी रंजक, प्रेरक आणि उद्बोधक 'सायन्स्टोरी या
-
Maharana Pratap Ajey Yodha (महाराणा प्रताप अजेय यो
ऐतिहासिक दस्तऐवजांच्या आणि त्याबरोबरच मेवाडी दंतकथा, नोककथा यांच्या आधारावर लिहिण्यात आलेलं, एका अत्यंत महान भारतीय नायकाचं चरित्र. हे सुबोध, सुगम लेखन वाचकांना मंत्रमुग्ध करतं आणि खिळवून ठेवतं. 'सन १५७६ च्या हळदीघाटीच्या प्रसिद्ध लढाईचं वर्णन करताना कुठेही सहानुभूतीनं ओथंबलेलं किंवा पूर्वग्रहदूषित लेखन न करता, राणा प्रतापशी निगडीत असलेल्या अनेक परीकथा दूर सारून अत्यंत प्रामाणिकपणे वस्तुस्थिती मांडण्यात आली आहे.' - फ्रंटलाईन 'एका व्यापक ऐतिहासिक चौकटीच्या सादरीकरणातून, महाराणा आणि अकबर या कट्टर शत्रूच्या मनात परस्परांविषयी कितीही शत्रुत्व असलं तरी त्यांना एकमेकांविषयी आदरही होता, हे दाखवून देण्यात आलं आहे.' - स्टेट्समन
-
Plague (प्लेग)
आजाराची साथ ही युद्धासारखी खवीस नाही. अशा परिस्थितीत चांगलं म्हणजे काय ? दैव म्हणजे काय ? मानव कुणाला म्हणायचं ? जेव्हा मृत्यू अनपेक्षित असतो तेव्हा त्याला सामोरं जाणं म्हणजे का वीरगती ? मृत्यूची वाट पाहणं म्हणजे का वीरगती? मृत्यूची वाट पाहणं हा विचार करत राहाणं, किंवा मृत्युमुखी पडणाऱ्या कुणाला मदत करणं, ही वीरगति ? मृत्यू हा अटळ आहे. पण जेव्हा सगळ्यांचं जीवनच धोक्यात आहे तेव्हा ह्या अटळपणाचं काय करायचं ? साथीच्या काळात नैसर्गिक मृत्यू येणं म्हणजे काय? आपण आज वाचलो ह्याची बढाई मारायची की ती आपल्याला काही करायची संधी मिळाली आहे असं मानायचं आणि काही करायचं ? ज्या साथीनं मानवी जीवनालाच धोक्यात टाकलंय ती साथच मानवी निष्काळजीपणाने येत असेल तर? म्हणजे ती कधी परत येईल ते सांगता येणार नाही. मग काय करायचं ? मानवाचे मानवाशी संबंध, मानवाचे देवाबरोबरचे संबंध, मानवाचे स्वतःबरोबरचे संबंध ! मृत्यू अटळ आहे हे एक सार्वत्रिक सत्य आहे. आणि ते तितकंच कठोर, आपल्या समोर उभं ठाकलेलं आहे. ते अदृश्य नाही. ते अटळ नाही. आपण अगोदरच मेलो नाही ह्याबद्दल हर्षोल्हास मानायचा की आपल्याला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग करायचा. हा काम्यूचा संदेश अत्यत सोप्या शब्दात, सर्वांना समजेल इतक्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा काम्यूची हातखंडा कादंबरी, मराठीत थेट फ्रेंचमधून.