Murarbaji Deshpande (मुरारबाजी देशपांडे)
जावळीच्या मोऱ्यांशी लढताना शत्रूसेनेतील मुरारबाजी देशपांड्यांची आवेशपूर्ण लढत पाहून महाराज इतके प्रभावित झाले की, जणू त्यांना हिराच गवसला! पुढे पुरंदरच्या लढाईत मुरारबाजींनी गाजवलेले शौर्य पाहून दिलेरखानही थक्क झाला. या लढाईत त्यांनी प्रचंड पराक्रम गाजवला आणि अखेर ते धारातीर्थी पडले. खेडेबारेतील नऱ्हेकर देशपांड्यांच्या तीन पिढ्यांनी स्वराज्यासाठी आपले प्राण वेचले. बापूजी देशपांडे यांनी दोन वेळा सिंहगड स्वराज्यात आणून मोलाची कामगिरी केली. त्यांचे पुत्र चिमणाजी आणि बाळाजी यांनी लालमहालावरील हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. याच परंपरेतील नारो देशपांडे यांचा मुलगा केसो नारायण आणि नातू नारायण देशपांडे हे आजोबा, पुत्र आणि नातू हिंदवी स्वराज्यासाठी वेगवेगळ्या लढायांत धारातीर्थी पडले.