Firangoji Narsala Hiroji Indulkar Balaji Aavaji (फिरंगोजी नरसाळा हिरोजी इंदुलकर बाळाजी आवजी)
फिरंगोजी नरसाळा हे एक चाकणचे अतिशय शूर किल्लेदार होते. त्यांनी शाहिस्तेखानाच्या वीस हजार सैन्याला अवघ्या तीनशे मावळ्यांनिशी तब्बल छप्पन दिवस झुंजवले! त्यांच्या पराक्रमाची दखल घेऊन शिवरायांनी त्यांचा यथोचित सन्मान केला. वास्तूविशारद हिरोजी इंदुलकर यांनी आरमारी राजधानी सिंधुदुर्ग व रायगड यांची केलेली रचना म्हणजे वास्तूकलेचा उत्तम नमुना होय. एवढे मोठे कार्य करुनही 'सेवेचे ठायी तत्पर ' एवढे जगदीश्वराच्या मंदिरावर लिहून आपली स्वामीनिष्ठा व उदारपणा त्यांनी दाखवला. शिवरायांना राजापुरात गवसलेले सर्वात अनमोल रत्न म्हणजे बाळाजी आवजी चिटणीस होय. त्यांनी स्वराज्याची सेवा अतिशय निष्ठेने केली. त्यांचे मोत्यासारखे अक्षर व पत्राचा मायना यामुळे राज्यातील व परराज्यातील अनेक नाजुक प्रश्न त्यांनी सोडवले होते. शिवरायांनी त्यांना चिटणीसी व पालखीचा मान दिला होता.