-
Backstage (बॅकस्टेज)
"सिकंदराबादमधील साध्या सुरुवातीपासून नवी दिल्लीतील सत्ताकेंद्रांपर्यंत अहलुवालिया यांच्या आयुष्याचा विलक्षण प्रवास मांडणारे हे पुस्तक भारताच्या घडणाऱ्या कथेमागील आतल्या गोटातील नोंद आहे. राज्यनियंत्रित अर्थव्यवस्थेतून बाजारआधारित अर्थव्यवस्थेकडे भारताच्या परिवर्तनात अहलुवालिया यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि तब्बल तीन दशकांपर्यंत ते भारताच्या आर्थिक धोरणनिर्मितीच्या सर्वोच्च पातळीवर कायम प्रभावी राहिले. हे पुस्तक भारताच्या अलीकडच्या इतिहासातील राजकारण, व्यक्तिमत्त्वे, घटना आणि संकटांचा मागोवा घेते. आकड्यांच्या पलीकडे जाऊन ते सुधारणा प्रक्रियेतील राजकारण उलगडते आणि धोरणात्मक बदल कसे पुढे नेले गेले हे स्पष्ट करते—सुरुवातीला पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात हळूहळू, आणि नंतर १९९१ मध्ये गंभीर देयक तुटीच्या (बॅलन्स ऑफ पेमेंट्स) संकटाचा लाभ घेत व्यापक सुधारणांसाठी धाडसी पावले उचलली गेली. या निर्णायक काळात वाणिज्य सचिव आणि वित्त सचिव म्हणून काम पाहणाऱ्या अहलुवालिया यांनी त्या वेळी करण्यात आलेल्या आरोपांना छेद देत ठामपणे मांडले आहे की १९९१ मधील आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कार्यक्रमाच्या अटींमध्ये समाविष्ट असलेल्या सुधारणा या भारतावर लादलेल्या नव्हत्या, तर त्या देशांतर्गत विचारमंथनातून जन्मलेल्या होत्या. युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स (यूपीए) सरकारच्या काळात नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष (कॅबिनेट दर्जा) म्हणून कार्यरत असताना, त्यांनी त्या कालखंडातील यश-अपयशाचा सविस्तर आढावा घेतला आहे. यूपीएच्या पहिल्या कार्यकाळातील भारताच्या उल्लेखनीय आर्थिक वाढीची कहाणी तसेच दारिद्र्यनिर्मूलनातील ऐतिहासिक कामगिरी ते मांडतात. त्याचबरोबर यूपीए-२ च्या अखेरच्या काही वर्षांत दिसून आलेली धोरणात्मक अडचण (पॉलिसी पॅरॅलिसिस) आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबतही ते स्पष्ट व प्रांजळ चर्चा करतात. विनोदबुद्धी, हलका-फुलका शैली आणि विलक्षण बौद्धिक सामर्थ्य यांच्या संगमातून कथन केलेले ‘बॅकस्टेज’ हे पुस्तक भारताच्या आर्थिक आणि राजकीय इतिहासातील एक महत्त्वपूर्ण आणि अधिकृत योगदान मानले जाते—अशा व्यक्तीकडून, ज्यांना ही कथा सांगण्याची अनन्यसाधारण संधी आणि स्थान लाभले."
-
1946 Swatantryach Antim Yuddha (१९४६ स्वातंत्र्याचं अंतिम युद्ध)
फेब्रुवारी १९४६ मध्ये रॉयल इंडियन नेव्हीचे सुमारे २०,००० नौसैनिक ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठावाला उभे राहिले. खराब सेवा अटी, वांशिक भेदभाव आणि ब्रिटीशांच्या वागणुकीविरोधात त्यांनी उठाव केला. बंडाची सुरुवात मुंबईत झाली आणि नंतर कराची, कलकत्ता, मद्राससारख्या बंदरांमध्ये झपाट्याने पसरली. नौसैनिकांनी ब्रिटीश झेंड्याऐवजी काँग्रेस, मुस्लिम लीग आणि कम्युनिस्ट पक्षाचे झेंडे फडकावून राजकीय ऐक्य दाखवले. हे बंड केवळ आठवड्याभरात दडपण्यात आले, परंतु यामुळे ब्रिटीश साम्राज्याच्या पायाखालची जमीन हादरली आणि भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रक्रियेला गती मिळाली. १९४६ : लास्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स हे प्रमोद कपूर लिखित पुस्तक या दुर्लक्षित पण अत्यंत महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनाक्रमावर प्रकाश टाकते. सखोल संशोधन व ओघवत्या लेखनशैलीतून लेखकाने या नौसैनिक उठावाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. हे पुस्तक त्या तरुण नौसैनिकांना मानवंदना आहे, ज्यांनी साम्राज्यशाहीविरुद्ध उठून उभं राहण्याचं धाडस केलं.
-
Maharudra (महारूद्र)
पहिल्या प्रयत्नातच कुशल खेळाडूप्रमाणे कुठल्याही खेळाची लय भीमरावांना साधत असे. या दैवी देणगीला कठोर कष्टांची जोड देऊन भीमरावांनी फुटबॉल बहरवला. या खेळाचा स्थायीभाव आहे, त्या खेळाची विलक्षण गती. भीमरावांना सहजसाध्य असलेले अनेक खेळ होते, परंतु फुटबॉलकडे लक्ष द्यायचं असं न ठरवताही भीमराव फुटबॉलमध्येच रमले. कारण या खेळाची नैसर्गिक गती आणि भीमरावांच्या व्यक्तिमत्त्वातील असामान्य वेग यातील ताळमेळ सहज होता. फुटबॉलमध्ये नावारूपास येणं हे त्यांच्या अंतर्बाह्य व्यक्तिमत्त्वाचं सहजसुंदर प्रकटीकरण होतं. फुटबॉलशी त्यांचं नातं ही सर्वात नैसर्गिक गोष्ट होती.
-
Kulamamachya Deshat( कुलामामाच्या देशात)
कोरकु भाषेत ‘कुला’ म्हणजे वाघोबा. मेळघाटच्या जंगलातला हा कुलामामा जेवढा काळजात धडकी भरवणारा, तितकीच त्याच्याबद्दलची उत्सुकताही अधिक. रानवाटा तुडवत कुलामामाचं दर्शन घेताना इथं वनअधिकाऱ्यांनाही जद्दोजहद करावी लागते...पण त्यातूनच काही खुसखुशीत प्रसंग, पेचप्रसंग निर्माण होतात. असेच हे ‘कुलामामाच्या देशातले’ रंगतदात प्रसंग. वनाधिकारी रवींद्र वानखडे यांच्या सुरस जंगलकथा आणि जी.बी. देशमुख यांच्या खुमासदार लेखनशैलीचा हा अद्भुत मिलाफ.