-
Sanvaadatun Vyaktimattvakade (संवादातून व्यक्तिमत्
अथ संवादकौशल्यम् संवादाने मते मांडावीत संवादातून मने सांधावीत संवादाने आश्वस्त करावे संवादातून विकल्प मिटवावे संवाद सकारात्मक, हेच यशाचे गमक संवादकौशल्य, उत्तम व्यक्तिमत्त्वाचे सूचक हेच सारे सविस्तर मांडणारे पुस्तक. भाषण, संभाषण, वाद, संवाद, नॅरेशन, प्रेझेंटेशन अशा सर्व ठिकाणी खात्रीने उपयोगी पडणारे. संवाद मार्गदर्शकच जणू !
-
Bakhar Sambhaji (बखर संभाजीची)
महाराष्ट्राच्या पावन भूमीवरील एक अनोखे तीर्थक्षेत्र म्हणजे श्री क्षेत्र तुळापूर. भामा ,भीमा आणि इंद्रायणी या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेल्या या क्षेत्राने महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वपूर्ण घटना पाहिल्या आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासावर उमटलेली लखलखती, देदी प्यमान विद्युतरेखा म्हणजे छत्रपती संभाजीमहाराज. आपल्या अल्प कारकिर्दीतही सं भाजी महाराजांनी बजावलेल्या चतुरस्त्र कामगिरीला तोड नाही. मुघलांपासून ते पोर्तुगिजांपर्यंत स्वराज्याच्या सर्व शत्रूंना आपल्या समशेरीची जरब बसणारे शंभूराजे कवी प्रतिभेच, संवेदनशील राज्यकर्ते होते. या तेजस्वी पुरुषाची ओजस्वी गाथा सांगणारया या पुस्तकात जिथे संभाजी महाराजांनी वीरमरण पत्करले त्या तुळापूर परिसराचा इतिहास, भूगोल, संस्कृती यांचा वेधही घेतलेला आहे.
-
Ek Asto Builder
ही आहे, एका बिल्डरची रोमहर्षक कहाणी. ह्यामध्ये उत्तुंग इमारतींमागची यशोगाथा आहे. त्याबरोबरच खंडणी, धमक्या आणि फसवणुकीची भयकथाही आहे. जीवनावर भरभरुन प्रेम करणारा हा बिल्डर, प्रत्यक्षात एक शेतकरी आहे. शेतातली उत्पादनं एक्स्पोर्ट करणारा एक व्यापारी आहे. तो कलांचा चाहता आहे आणि एका अखंड दानयज्ञाचा यजमानही आहे. ह्या बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्त्वाचं नाव आहे, डॉ. सुधीर ग. निरगुडकर ! ‘मी कोणी असामान्य कर्तृत्त्वाचा माणूस आहे’ असा त्यांचा अजिबात दावा नाही. उलट त्यांचं असं म्हणणं आहे की ‘एक सामान्य माणूसही काहीतरी बरं काम करू शकतो. हे सांगण्यासाठीच हा लेखनप्रपंच.’