-
Shree Swami Raja(श्री स्वामी राजा)
श्री अक्कलकोट स्वामी म्हणजे प्रत्यक्ष अवतारी विभुती. त्यांच्या कृपाप्रसादाचा अनुभव आजही कित्येकांना येतो. मनःशांती लाभणे हा फार दुर्मिळ लाभ. श्री स्वामींच्या नुसत्या स्मरणानेही दुर्मिळ मनःशांती प्राप्त होते, असे सांगणारी सर्व थरातील माणसे जेव्हा भेटतात, तेव्हा वाटते की ही नुसती अंधश्रद्धा नाही तर प्रत्यक्ष अनुभव आहे. आणि मग अवतारी पुरुषाच्या जीवनात डोकावण्याचा मोह होतो. ते जीवन पहिले की मन थक्क होते. ही अशी लेखनसेवा त्यामुळेच घडते. 'श्री स्वामी राजा' ही कादंबरी म्हणजे स्वामींच्या भव्यदिव्य साक्षात्कारी स्वरूपाला अर्पण केलेली भक्तिसेवाच आहे.
-
Navi Pidhi Navya Vata (नवी पिढी नव्या वाटा )
प्रकाशवाटा' या पुस्तकात आमच्या पिढीने भामरागडच्या जंगलात अंधाराकडून प्रकाशाकडे कशी वाटचाल केली याची गोष्ट मी सांगितली होती. 'नवी पिढी, नव्या वाटा'मध्ये गोष्ट आहे त्यानंतरच्या भरारीची. आदिवासींना सजग, सक्षम आणि सुदृढ बनवण्याचं बाबा आमटेंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी उचललेल्या पुढच्या पावलांची. दिगंत-अनघा, अनिकेत - समीक्षा यांनी सोबतीला नवे कार्यकर्ते घेऊन हेमलकशातल्या 'लोकबिरादरी' प्रकल्पाचं काम वेगळ्याच उंचीवर नेलं आहे. या सर्वांना एकदिलाने काम करताना बघून आम्हा जुन्या कार्यकर्त्यांचं मन समाधानाने भरून येतं. प्रकल्पाच्या भवितव्याची आता तीळमात्रही काळजी नाही. - डॉ. प्रकाश आमटे
-
Divas Alapalli Che (दिवस आलापल्लीचे)
लेखिकेच्या लहानपणीच्या (वय वर्षे 8 ते 11) आठवणींचा अतिशय तरल, उत्कंठावर्धक आणि तितकाच भावविभोर पट म्हणजे हा कथासंग्रह आहे. सदर पुस्तकास महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारासह सहा पुरस्कार प्राप्त आहेत. एकाच पुस्तकाला एकाच वर्षात सहा पुरस्कार मिळण्यात लेखिकेचे अतिशय प्रामाणिक प्रसंगवर्णन, घटना वाचकाच्या डोळ्यासमोर जिवंत करण्याचे कसब हेच महत्वाचे शक्तिस्थळ आहेत. प्रत्येकाने जरूर वाचावे असे एक उत्कृष्ट पुस्तक...
-
TV Malika Ani Barach Kaahi (टीव्ही, मालिका आणि
टीव्हीविषयी माझ्या मनात प्रचंड कृतज्ञता आहे. ह्या क्षेत्रानं असंख्य कलावंत मित्रमैत्रिणींना सन्मान आणि सुबत्ता मिळवून दिलीय. अहोरात्र चालणारी ही करमणुकीची यंत्रणा मुग्धा या पुस्तकातून आपल्याला समजावून सांगते. ती आरोपीचा वकील अजिबात होत नाही. ह्या क्षेत्राला कमी लेखणाऱ्यांना ती दूषणं देत नाही. प्रत्येक लेखातून उलगडत जाते मालिका - खिंड लढवणाऱ्या कित्येकांच्या मेहनतीची गोष्ट. मुग्धाच्या पुस्तकाची सफर अत्यावश्यक आहे. कारण ९०% घरांमध्ये टीव्ही आहे. कॉलेजमध्ये असताना एकांकिका विश्वात कुतुहलानं वावरत असल्यापासून मी मुग्धाला ओळखते. तिचं मोहक व्यक्तिमत्त्व बघता ती अभिनयक्षेत्रात रमणार, ही अटकळ मनाशी बांधणं सोपं होतं. पण पुढे मुंबईत स्थिरावताना तिनं मालिकांचं लेखन सुरू केलं आणि आज ती त्यातही यशस्वी आहे. मुग्धा तिच्या प्रवासात सजगपणे चालत राहिली. स्वत:च्या प्रवासाकडे ती प्रांजळपणे पाहू शकतेय. आता त्यातले बारकावे ती आपल्यासाठी खुले करतेय. अभ्यासू तरी रंजक अशी ही शोधकथा मनोरंजनासाठी आसुसलेल्या असंख्य प्रेक्षकांसाठी मोलाची ठरणार आहे. -- सोनाली कुलकर्णी
-
Gudghyache Fecial (गुडघ्याचे फेशियल)
विनोदी कथांचा हा माझा पहिलाच कथासंग्रह. एकूण सोळा कथा या संग्रहात आहेत. या कथा विविध मासिकातून प्रकाशित झाल्या आहेत. “गुडघ्याचे फेशियल” ही कथा पहिल्या ऑनलाइन विश्व मराठी संमेलनात निवडली गेली होती. रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. जीवनात घडलेल्या तसेच न घडलेल्या प्रसंगांनाही कलात्मक रूप देत निखळ विनोदासाठी हे लेखन केले आहे. रसिकांनी त्याचा आस्वाद मोकळ्या मनाने घ्यावा ही अपेक्षा.
-
Shivpatni Maharani Saibai.. (शिवपत्नी महाराणी सईबा
महाराणी सईबाई' म्हणजे सकल महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजे यांच्या ज्येष्ठ पत्नी वा महाराणी या एकाच भूमिकेतून चरित्र नायिकेचा आढावा घेणे हाच केवळ या चरित्रग्रंथकाराचा हेतू नसून नाईक निंबाळकर राजघराण्याची सुकन्या, भोसले घराण्याची स्नुषा, राजमाता जिजाऊ माँसाहेबांची सून आणि भोसले घराण्याच्या तीन सुकन्या व एकमेव छावा छत्रपती संभाजीराजे यांच्या मातोश्री अशा विविध अंगाने अत्यंत प्रभावीपणे सईबाईच्या व्यक्तित्वाचा आढावा घेण्याचा प्रयत्न येथे झालेला दिसून येतो. महाराणी सईबाईची 'सय' अवघा महाराष्ट्र सदैव उरात जपेल आणि या ग्रंथाच्या वाचनातून वाचकांच्या मनात सईबाईच्या कार्याचा ओलावा सदैव राहील अशीच अपेक्षा आहे 'Maharani Saibai' means the eldest wife of Maharashtra's idol Chhatrapati Shivajiraje. In this biography, the personality of Maharani Saibai is reviewed in accordance with many roles. It can be seen here that an attempt has been made to review the personality of Saibai in a very effective way through various aspects such as daughter in law of Bhosle family & mother of Chhatrapati Sambhajiraje. Maharani Saibai's memories will always be cherished by Maharashtra and it is hoped that reading this book will keep the moisture of Saibai's work in the minds of the readers.
-
SMILE PLEASE (स्माईल प्लीज)
आजूबाजूची माणसं, परिस्थिती, काळाच्या ओघात घडलेले बदल इ. बाबींवर खुसखुशीतपणे भाष्य करणारे लेख या लेखसंग्रहात आहेत. काही माणसं अशी असतात की त्यांनी काही वाचलं नाही, ऐकलं नाही. असं नसतंच मुळी. सगळंच माहीत असतं त्यांना. तर अशा व्यक्तीचं प्रातिनिधिक चित्र ‘सव्यसाची’ या लेखातून साकारलंय त्यांनी. तर काही विशिष्ट हेतूसाठी गळेपडूपणा करणार्या व्यक्तीचं प्रातिनिधिक चित्र रेखाटलंय ‘तुझ्या गळा...माझ्या गळा’ या लेखातून. पहाटे फिरायला गेलेल्या असताना एका कुत्र्याने रस्त्यात घातलेल्या गोंधळाचं रंगतदार चित्रण केलंय ‘दुम मचा ले...’ या लेखात. जाहिरातींच्या विश्वातल्या सदैव तरतरीत असणार्या बायकांचा खास शैलीत वेध घेतला आहे ‘नाहीतर आम्ही आहोतच’ या लेखात. तसेच खड्डेमय रस्ते, मेमरी ड्रॉइंग, मालिका व चित्रपटांमधील आजारपणं इ. विविध विषयांवरचे, अगदी साध्यासुध्या विषयांवरचे खुसखुशीत लेख आपल्या चेहर्यावर ‘स्माइल’ आणतात. People around us, circumstances, changes over time etc. This collection contains articles that comment on the subject in a crisp manner. Some people are such that they claim to have never read or heard anything. However, on the contrary, they know everything. The author has created a character sketch of such a person in the article 'Savyasachi'. The story “Tuzya Gala, Mazya Gala” portrays a person who develops friendship with people only to achieve his goal and then ignore them.The article 'Dhum Macha Le...' vividly depicts the chaos caused by a stray dog during the author’s early morning walk. The vibrant women in the world of advertising are captured in a special style in the article 'Nahitar Amhi Ahotach'. Supriya Mam has covered issues such as potholed roads, memory drawing, illness in serials and movies etc. and various routine topics through her interesting articles, that bring a 'smile' to your face.
-
THRILLS (थ्रिल्स)
महादेव मोरे लिखित ‘थ्रिल्स’ या कथासंग्रहातील ‘चिंधी’, ‘पुतळी’,‘दाऊ’, ‘वासना’,‘माधोसिंह’,‘एक हास्य आणि एक खून’ या कथांतील पात्रे मानवतेला हरताळ फासतात आणि मग समाजातील माणसेच पेटून उठतात. त्यांतील काही दु:ख-अन्याय सहन करतात, तर काही स्वत: हत्यारं उचलतात.‘पुतळी’ ही गरीब नर्तकी हाती बंदूक घेऊन खून-लूटमार करत संघर्षमय आयुष्य जगते. ‘रहस्य मधील वकिलाला त्याची अशिल-मिसेस नीला देशपांडे अजब कोड्यातच टाकते. तिचा गुंता सोडवण्याऐवजी वकीलमहाशय स्वत:च त्यात गुरफटत जाऊन फसतात. ‘सूड’मधील लाखनसिंह, रघुवीरसिंह, सुबासिंह यांच्यातल्या आपापसांतील वितुष्टांमुळे-सूड भावनेने त्यांची आयुष्ये उद्ध्वस्त होतात. ‘नियती आणि न्याय’ मधून पंजाबी कुटुंबातील जसपालसिंहचा मृत्यू होतो. जसपालच्या पत्नीचा चुलतभाऊ-महेंद्रसिंग,हा खून करतो का,की- पलविंदरकौर? हे गूढ सतावत राहते. ‘आणीबाणीतील गोष्ट’ ही तोतया प्रेमशंकरची.