-
Jee Van Tyanna Kalale Ho (जी वन त्यांना कळले हो)
पुस्तकाविषयी जंगल, निसर्ग आणि जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी अनेक संशोधक, निसर्गशास्त्रज्ञ आणि संवर्धनकर्त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले. त्यांनी केवळ संशोधनच केले नाही, तर आपल्या जीवाची बाजी लावून जंगल आणि प्राण्यांचे रक्षण केले. अशा थोर व्यक्तिमत्त्वांचा सखोल अभ्यास करून त्यांची ग्रंथसंपदा, उत्क्रांतीमध्ये झालेले बदल, त्यांची सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक माहिती एकत्र करून, ती अगदी अर्थपूर्ण भाषाशैलीत लेखकाने या पुस्तकातून मांडली आहे. हे पुस्तक म्हणजे आपण आपले जीवन कसे जगावे, हे सांगणारे प्रेरणास्रोत आहे
-
Tata Pravas Mulyadhishthit Jaganyacha (टाटा प्रवास मूल्याधिष्ठित जगण्याचा)
जे. एन. टाटा स्कॉलर आणि सुवर्णपदक विजेते टी. आर. डुंगाजी, 'डॉन' या नावाने प्रसिद्ध आहेत. राज्यशास्त्रातील दोन मास्टर्स पदव्या मिळवणारे डॉन जबलपूर आणि बर्कल विद्यापीठांचे माजी विद्यार्थी असून, डिसेंबर १९६६ मध्ये ते टाटा स्टील कंपनीत रुजू झाले. तिथे त्यांनी व्यवस्थापकीय संचालक पदापर्यंत वाटचाल केली. टाटा स्टीलशी संबधित दोन कंपन्यांच्या कामकाजातील महत्त्वपूर्ण बदलाच्या काळात त्यांच्याकडे नेतृत्व होते. त्याशिवाय कॉनकॉर आणि फोर्ब्स अँड कंपनी लि. या कंपन्यांचे स्वतंत्र संचालक (Independent Director) म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. २०११ मध्ये, डॉन यांनी 'क्रेडिबिलिटी कन्सल्टिंग' ही स्वतःची सल्लागार कंपनी सुरू केली. तसेच दोन मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्स मध्ये त्यांनी 'बिझनेस एक्सलन्स डीन' म्हणूनही काम केले आहे. सोबतच मुंबईतील प्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयाचे (पूर्वीचे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम) विश्वस्त म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले. सध्या ते फोर्ब्स चॅरिटेबल ट्रस्टवरही विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. टाटा कुटुंबातील दिग्गजांच्या कार्यशैलीने प्रभावित झालेले डॉन, व्यवस्थापन हे मूलतः एक आध्यात्मिक कार्य (spiritual pursuit) आहे असे मानतात. त्यातूनच क्रेडिबिलिटी ( Credibility), कल्चर ( Culture) आणि कम्युनिकेशन (Communication) या तीन मूल्यांवर त्यांनी कायम भर दिला आहे. सन १९९२ मध्ये त्यांना युवा रत्न पुरस्कार मिळाला. ब्रसेल्स येथील 'इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्यूज' चा 'एथिक्स इन बिझनेस अवॉर्ड, २००६' हा सन्मान मिळवणारे पहिले मानकरी आहेत. "डॉन डुंगाजी यानी 'टाटा मूल्ये' म्हणजे काय याचा पुरेपूर अनुभव तब्बल चार दशकांच्या कार्यकाळात घेतला आहे. टाटांच्या या तत्त्वज्ञान आणि संस्कृतीने त्यांना कसे सामावून घेतले आणि त्याच 'टाटा मार्गा' ने परिवर्तन घडवून आणताना समाधान कसे लाभले, याविषयी त्यांनी या पुस्तकात सविस्तर लिहिले आहे. हे पुस्तक म्हणजे टाटा समूहाच्या सेवेत वाहून घेतलेल्या एका ध्येयवादी सहकाऱ्याने त्या समूहाला वाहिलेली आदरांजली आहे. " रतन टाटा (मानद अध्यक्ष, टाटा सन्स लि.) “पाच दशकांपूर्वी, टाटा समूहात मी आणि डॉन डुंगाजी एकाच वेळी, एकाच ठिकाणी टाटा स्टिलच्या कार्यालयात रुजू झालो. आमचे कार्यालय समूहाचे अध्यक्ष जेआरडी टाटा यांच्या कार्यालयालगत होते. आम्ही दोघांनीही आमच्या पहिल्या नोकरीत, 'टाटा मार्ग' आणि 'टाटा मूल्ये' शिकत कामाला सुरूवात केली. पंचवीस वर्षे मी त्यात आकंठ बुडालेलो होता. व्यवसायाच्या सगळ्या संकल्पना, नीतिमत्ता यांना तेथेच आकार मिळाला. त्यानंतर मी दुसरीकडे गेलो. डॉन मात्र शेवटपर्यंत समूहाबरोबच राहिला. तिथे तो जे शिकला आणि ज्या पद्धतीने त्याने ते सारे आत्मसात केले तो सगळा प्रवास हाच चांगुलपणा, मूल्याधारित, व्यवसाय व्यवस्थापनाचा 'टाटा मार्ग' आहे. ' अरुण मायरा (माजी सदस्य, नियोजित आयोग, भारत सरकार )
-
Sarkari Davakhana (सरकारी दवाखाना)
जेव्हा रुग्णासाठी पैसा संपतो, सोनं गहाण ठेवलं जातं, कधीकधी जमीन विकावी लागते तेव्हा सरकारी दवाखान्याची पायरी दिसू लागते आणि एक प्रवास सुरू होतो... मृत्यूची वाट बघण्याचा! अपघात विभागात घडणाऱ्या घटना, आयसीयूमधील आपल्या व्यक्तीचा मृत्यू, शेवटच्या क्षणी होणारी नातेवाईकांची घालमेल, पोस्टमार्टम करणाऱ्या व्यक्तीचं आयुष्य, डॉक्टर लोकांचं व्यवसायिक आणि खाजगी जीवन, डिलिव्हरी वार्ड! खूप वर्षांनंतर बाळाच्या जन्माचा आनंद... सगळंच वाईट नाही, काही चांगल्याही गोष्टी! सरकारी दवाखान्यातील लावारिस लोक, गर्दी, तिथला वास, कचराकुंडीत नाळेसहीत सापडलेलं बाळ, छातीवर 'मृत्यू' अशा नावाचा टॅटू काढणारा कर्मचारी, म्हाताऱ्यांची प्रेम कहानी, स्वतःच्या हाताने आपल्या मुलाचं व्हेंटिलेटर बंद करणारा बाप... काय नाही या कादंबरीत! हे सगळं सुरू असतानाच घडणारा वेगवान घटनाक्रम आणि दवाखान्याच्या चार भिंतींच्या नकळत घडणारे एक युद्ध! सस्पेन्स थ्रिलरने भरलेला एक फार मोठा गुन्हा... आणि त्याची उकल! एकीकडं माणूस वाचवा म्हणून प्रयत्न करणारी माणसं आणि दुसरीकडं मढ्यावरचं लोणी खाणारी माणसं! ही कादंबरी तुम्हाला जगण्याची आशा देईल, नात्यांचं महत्त्व देईल, माणसाची किंमत देईल... हसणं देईल, रडणं देईल! ही कादंबरी तुम्हाला सोडून गेलेल्या तुमच्या एकातरी माणसाची आठवण करून देईल.
-
Mi Alladiyakhan (मी अल्लादियाखां)
मरहूम उस्ताद अल्लादिया खांसाहेब जयपूर-अत्रौली घराण्याच्या विद्यमान गायकीचे उद्गाते जणू ‘गायनाचे गौरीशंकर' ! त्यांच्या गायकीच्या आजच्या घडीला कार्यरत वारसदारांपैकी डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे सांगत आहेत त्यांची चरितकहाणी. ख्यालगायनाच्या पद्धतीनुसार ‘रागबढत' किंवा ‘उपज' या अंगाने विस्तारत साकारलेली खांसाहेबांची ही जीवनकथा. त्यातून वाचकापुढे उलगडत जातं कधी सौंदर्यपूर्ण, प्रमाणबध्द स्थापत्यासारखं खांसाहेबांचं व्यक्तिमत्त्व, कधी त्यांच्या पारिवारिक आणि गुरुशिष्य नातेसंबंधांचं नाजूक, जरतारी विणकाम. विविध प्रसंगांतून उजागर होतात खांसाहेबांच्या व्यक्तिमत्त्वातल्या मनोहारी रंगछटा. एखाद्या कादंबरीसारख्या सुरस, रोचक घटनांनी भरलेलं हे खांसाहेबांचं ‘ललित चरित्र' म्हणजे रसिक वाचकांना तसेच अभिजात संगीताच्या साधकांना लाभलेली शब्दमैफिलीची पर्वणी.
-
Bibliophile (बिब्लिओफाइल)
एकोणिसाव्या शतकातले प्रख्यात विचारवंत लोकहितवादी यांनी लिहून ठेवलंय, की "सध्या समाजात नुसती पुस्तकं जमा करून संग्रही ठेवणाऱ्या माणसाला विद्वान समजलं जातं, पण विद्वत्ता येण्यासाठी ती वाचावीही लागतात ही गोष्ट ते विसरलेले दिसतात." "बिब्लिओफाइल' या पुस्तकाचा लेखक हा पुस्तकांचा संग्रह तर करतोच, पण ती वाचतोही, आणि त्यांच्याविषयी वाचकांशी संवादही साधतो. गणेश मतकरी हे समकालीन मराठी साहित्यातलं महत्त्वाचं नाव आहे. 'बिब्लिओफाइल' या पुस्तकात त्याचा एक वेगळा पैलू आपल्यासमोर येतो. हे लेखन म्हणजे वाचनसंस्कृतीबद्दल आपल्याला माहीत नसलेल्या गोष्टींचं एक अचंबित करणारं कोलाज आहे. आजवर आपण वाचलेल्या, अनुभवलेल्या गोष्टींची देवाणघेवाण गणेश या लेखांमधून करतो ती अगदी सहजपणे, गप्पा मारल्यासारख्या शैलीत, पण त्यामागे असणारी त्याची साहित्याकडे पाहण्याची अभ्यासू वृत्ती आपल्याला सतत जाणवत राहते. असंख्य वाचनीय पुस्तकांशी आपली ओळख करून देणाऱ्या पुस्तकाच्या निर्मितीचं मूळ या वृत्तीमध्येच आहे. 'बिब्लिओफाइल' ही एका प्रचंड ग्रंथसंग्रहातून फिरवून आणणारी राइड आहे, एकाच वेळी आनंद देणारी आणि विचारही करायला लावणारी.
-
Manaswini (मनस्विनी)
वास्तविक पाहता शून्याचं अस्तित्वही नगण्यच ! माझ्या सावली सारखंच ! जेव्हा ते कोणाबरोबर तरी असतं तेव्हा त्याची किंमत वधारते. जशी सावली माझ्या बरोबर असते तेव्हा ती ओळखली जाते. कोणत्याही आकड्याच्या पुढे आलेलं शून्य त्या आकड्याची किंमत वधारतं. शून्याला देखील किंमत असते हेही मला समजलं ते आजच्याच दिवशी.... माणसानं ही शून्यासारखं जगावं. आपण कुठं कोणा सोबत उभ्या आहोत याचं भान ठेवावं. त्यावर आपली किंमत ठरते. Tell me your friends I will tell you what you are.... हे ते आणखीन एक तत्त्वज्ञान ! शून्यामुळं असण्याला अर्थ आहे. शून्यातून जग निर्माण करता येतं या त्रिकालाबाधित सत्यावरून शून्याची किंमत माझ्या ठायी वधारली. माझी सावळी सावली मोठ्या गुणाची! मला हळुवार मोठं तत्वज्ञान सांगून गेली.
-
Rahile Dur Desh-Ghar Mage (राहिले दूर देश-घर मागे)
सध्या काळ सहजगत्या परदेशगमनाचा आणि जमल्यास तेथेच वास्तव्य करण्याचा आहे. खूप आर्थिक लाभ, उच्च दर्जाचे राहणीमान, उत्तम सुखसोयी आणि व्यावसायिक बढती या कारणांनी चालू पिढी परदेशात जावून तेथे वास्तव्य करायला उत्सुक असते. याचा परिणाम असा हातो की परदेशात गेलेली पिढी भारतात मागे राहिलेल्या देशा विषयी आणि त्यांच्या घरातील माणसांबद्दल थोडी काळजी आणि बराच दुरावा बाळगून परदेशात राहत असते. इकडे मागे भारतात त्यांचे आईवडील एकटेपणाचे दुःख भोगत असतात आणि देश त्याचे प्रश्न सोडवत असतो. परदेशी गेलेले लोक त्यांचे ज्ञान आणि कौशल्य वापरून परदेशात खूप पैसा मिळवू शकतात, पण त्यांचे ज्ञान आणि कौशल्य स्वदेशाला उपयोगी पडत नाही. यातून Brain Drain चा प्रश्न निर्माण होतो. परदेशी स्थलांतर करणारे आणि त्यांच्या मागे राहिलेला त्यांचा देश व त्यांचे घर अशा या प्रश्नाला दोन बाजू आहेत. या दोन्ही बाजू या पुस्तकात मनोरंजक कादंबरी रूपात विचारात घेतल्या आहेत.
-
Chatroom (चॅटरूम)
नवीन शैक्षणिक धोरणानुसार आंतर विद्या शाखेत अर्थशास्त्र या विषयाचे वाढते महत्व तसेच बदलते प्रवाह याचा ओघ लक्षात घेता संपूर्ण अर्थव्यवस्थेतील राबविण्यात येणाऱ्या विविध धोरणाचा अभ्यास अर्थशास्त्र करते. त्या अनुषंगाने केंद्र व राज्य सरकार यांच्या मार्फत राबविण्यात येणारे राजकोषीय धोरण, करप्रणाली, सार्वजनिक खर्च, सार्वजनिक कर्ज, उत्पन्न, तसेच अंदाजपत्रक इ. घटकांचा अभ्यास या पुस्तकात करण्यात आलेला आहे. विविध विद्या शाखेतील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि पीएचडी चे संशोधन व लेखन करणाऱ्या अभ्यासकाना हे पुस्तक उपयुक्त ठरेल हि अपेक्षा.
-
Wireless (वायरलेस)
'वायरलेस' हा माझा आणखी एक कथासंग्रह प्रसिद्ध होत आहे. वास्तविक प्रकाशकांना माझे एकूण तीन कथासंग्रह प्रसिद्ध करायचे होते. परंतु माझ्याकडून थोडा आळस झाला, खेरीज इतर महत्त्वाच्या कामांमध्ये गुंतल्यामुळे ही गोष्ट शक्य झाली नाही. हा कथासंग्रहात 'पापी वासनेची बळी' या शीर्षकाची एक कथा देण्यात आली आहे. वर्तमानपत्रात खोट्या जाहिराती देऊन आणि नोकरीचे आमिष दाखवून किंवा अत्यंत सभ्यतेची वागणूक दर्शवून एखाद्या तरुण मुलीला पाशवी जाळ्यात कसे अडकवले जातं, याचे चित्रण या कथेमध्ये केलेले आहे. ही कथा जरी तपासकथा असली, आणि ती तशी आहेच, तरीही या शहरात तरुण मुलीच्या संदर्भात हे धोके काही कमी नाहीत. नोकरीच्या शोधात असलेल्या किंवा एखाद्या ठिकाणी नोकरी करीत असलेल्या तरुणींना सावध करण्याचा उद्देश या कथेमागे आहे.