-
Rigeta (रिगेटा)
या कथासंग्रहातील ‘घाणेरीचं फूल’ कथेतील सवर्ण चित्रकार दलित मुलीशी प्रतारणा करून परदेशी मुलीशी लग्न करतो आणि ती दलित मुलगी आत्महत्या करते. ‘तोडगा’ मधील सुमार रूपाच्या सुनंदाचं लग्न लागत असताना मांडवातच तिचा नवरा मरण पावतो आणि त्यानंतर लग्नाआधी तिच्यावर मोहित झालेल्या बापूंनी तिला लिहिलेलं पत्र ती वाचते आणि तिच्या उजाड जीवनात ते पत्र ‘ओअॅसिस’ आणतं. ‘जखम’ कथेतील चाळिशी उलटलेल्या, संसार उत्तम तर्हेने मार्गी लागलेल्या सुमतीचा कॉलेजमधील मित्र प्रभाकर तिच्या घरी येतो. सुमतीने आणि त्याने एकत्र घालवलेल्या उत्कट प्रेमाच्या क्षणांचं स्मरण तो तिला देऊ पाहतो. ‘देणं’ या कथेत ईव्हा या स्वैर परदेशी तरुणीच्या माध्यमातून भारतीय संस्कृती (विशेषत: स्त्री-पुरुष संबंधांच्या बाबतीत) आणि पाश्चात्त्य संस्कृतीची तुलना भारतीय लेखकाच्या मनात येते. मानवी जीवनातील योगायोग, नियती, मानवी मन, स्त्री-पुरुष, कला आणि जीवन या कोलाजमधून साकारलेल्या वाचनीय कथांचा संग्रह.
-
Padchaya (पडछाया)
‘सौभाग्य’ या कथेतून डॉ.सोहनी गिनीपिग प्रयोग करतात. ‘विद्या विनयेन शोभते’ मधून ‘मेकॅनिकल ट्यूटर’– कॉम्प्युटरच्या साह्याने मेंदूत ज्ञान भरण्याचा शोध लावतात. ज्ञानग्रहण करणार्या पेशी उत्तेजित करून मेंदूपेशीत टेपरेकॉर्डरप्रमाणे ज्ञान रेकॉर्ड होते.या भोवती हे कथानक फिरते. ‘ऐलमा पैलमा’ या कथेतून दत्तक घेतलेल्या ईशाच्या मानेला गाठ असल्याचे समजते... ही फसवणूकच असते, नीताला याचा त्रास होतो. प्रभाकर यंत्रमानव नंदिनीला घरी आणतो. ती सर्वांना शेकहॅण्ड करते. यावेळी सर्वांना ईशाची खूप आठवण येते.मग पुन्हा ईशाला दत्तक म्हणून सांभाळण्याचा निर्णय होतो. ‘एका यंत्र मानवाची डायरी’ या कथेत स्वार्थी रमेश संपत्तीसाठी मोठ्या भावाचा खून करतो,हे रोबो पाहतो व स्वत;शीच म्हणतो,‘यंत्रमानवाला नाती नाहीत ते किती बरं आहे.मानवाची निरपेक्ष सेवा करणे,हेच यंत्रमानवाचे व्रत आहे.’ ‘तो मी नव्हेच!’ या कथेतील अभिनेता- हनुमंत बाप्या कोरेगावकर ‘बहारकुमार’ नावाने फिल्मी दुनियेत प्रवेश करतो. एके दिवशी त्याची प्रामाणिक, हुशार व शास्त्रज्ञ मित्र संजयशी भेट होते. हनुमंत आजारी असतो. पण तो संजयला माझ्याऐवजी माझा क्लोन इंडस्ट्रीत पाठव,असं सांगतो. संजयला या खोट्या प्रकाराची कल्पनाच नसते. हा क्लोन ‘बहारकुमार’ म्हणून वावरतो. सर्वांनाच फसवून माणुसकीला काळिमा फासून,‘तो मी नव्हेच!’ म्हणून तो जगतो. ‘पडछाया’, ‘मृत्यू,’ ‘सत्य आणि मिथ्य’ या व इतर वैज्ञानिक कथा वाचकांना आधुनिक विज्ञानाची ज्ञानसमृद्धतेची वाट दाखविणार्या.
-
The Secret Friend (द सीक्रेट फ्रेन्ड)
बोस्टन बंदरात एक मृतदेह सापडतो. डार्बी मॅकार्मिक करत असलेल्या दोन खुनांच्या तपासाशी याचा संबंध असतो. या गुन्ह्यात एक चक्रावणारी गोष्ट असते, ती म्हणजे मृतदेहांसोबत आढळलेली व्हर्जिन मेरीची छोटी मूर्ती. आणखी एका मुलीच्या अपहरणानं हे रहस्य आणखी भयावह होतं. सगळे धागे आधीच्या खुनांशी जुळतात. आणि डार्बीचा शोध आणखी गुंतागुंतीचा होतो. ख्रिस मुनी यांचं हे सायकोथिलर पुस्तक पानागणिक शहारे आणतं. आणि डार्बीसोबत वाचणाराही पुस्तकाच्या अखेरपर्यंत खुन्याच्या शोधात गुंतून राहतो.
-
Junglee Kulguruchi Jangi Katha (जंगली कुलगुरूची जं
कोप्पळ जिल्ह्यातल्या अळवंडी या कुग्रामातील यंकप्पा रामोशी यांचा तेजस्वी हा मुलगा. गदगच्या हॉस्टेलमध्ये प्रवेश न मिळाल्याने, तिथे चोरून वर्षभर रहाणारा, आठवी पास होईपर्यंत म्हशी राखत फिरणारा, शेण गोळा करत, शेंगा चोरत फिरणारा, हा मुलगा इंदिरा गांधी राष्ट्रीय अदिवासी विश्वविद्यालयाचा कुलगुरू होतो, उत्तम बांधणी करत विद्यापीठ प्रगतीपथावर नेतो आणि विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील कीर्ती व सन्मान मिळवून देतो. त्या मुलाची आत्मकथा म्हणजेच हे पुस्तक. डॉ. कट्टीमनी यांचं जीवन म्हणजे शून्यातून सिंहासन निर्माण करणाऱ्याच्या कथेचं रूपक आहे. जातीयवादाची बजबजपुरी आणि मुलभूत सुविधांचा अभाव अशा कात्रीत अडकलेल्या इंदिरा गांधी राष्ट्रीय अदिवासी विश्वविद्यापीठाला डॉ.कट्टीमनींच्या रुपाने एक भाग्यविधाता लाभला. पदभार स्वीकारताच त्यांनी विद्यापीठातील रुळलेल्या उदासीन वाटा नाकारत कायापालट सुरू केला. आणि अवघ्या काही काळात आपल्या साध्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. त्यांचा हा विलक्षण प्रवास देशातील शिक्षण व्यवस्थेच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. हा प्रवास या पुस्तकाच्या पानापानातून वाचकांसमोर उलगडत जातो.
-
Bhartachya Las Nirmititil Pragatichi Goshta (भारता
"पाश्चिमात्य लोकांनी १७९६ साली लसींचा शोध लावला, त्याच्याही आधीच्या काही शतकांपासून भारतीय लोक ‘लस` टोचण्यात तरबेज होते. ‘भारताच्या लस-निर्मितीतील प्रगतीची गोष्ट’ हे पुस्तक एडवर्ड जेन्नर यांच्या काळापासून ते कोविड-१९ साथीपर्यंतच्या लसींच्या प्रवासाचा आलेख उलगडून दाखवते; ज्यात लसींच्या बाबतीतल्या भारतीय दृष्टिकोनापासून ते जागतिक दृष्टिकोनापर्यंत, लसींचे अनेक पैलू समाविष्ट आहेत. लस नेतृत्व, लसींच्या बाबतीतला राष्ट्रवाद, लस घेण्याबाबतची अनिश्चितता, उत्सुकता आणि नि:पक्षपात, तसेच अगदी अलीकडची ‘राजनैतिक चलन` ठरलेली ‘लस-मैत्री`, या सगळ्या गोष्टींचा उहापोह तर या पुस्तकात केलेला आहेच, पण त्याचबरोबर, जगातली सर्वांत मोठी व्यापक अशी लसीकरण मोहीम राबवताना भारताने जे अगदी बारकाईने विचार करून काळजीपूर्वक आणि काटेकोर असे लक्षवेधक नियोजन केले होते, त्यांची संपूर्ण माहिती हे पुस्तक वाचकांना करून देते."
-
The Golden Age (द गोल्डन एज)
या कादंबरीचे नायक-नायिका आहेत फ्रॅंक आणि एल्सा. ‘द गोल्डन एज’ या पोलिओग्रस्त मुलांवर उपचार करणार्या ऑस्ट्रेलियातील संस्थेत या दोघांची भेट होते आणि ते परस्परांच्या प्रेमात पडतात. मेयेर आणि इडा हे फ्रॅंकचे आई-वडील. जॅक आणि मार्गारेट हे एल्साचे आई-वडील, यांच्यासह या संस्थेतील परिचारिका लिद्जा, ऑलिव्ह, तसेच या संस्थेत राहणारी मुलं इ. यांचंही जीवन त्यांच्या व्यक्तिरेखांसह या कादंबरीतून उलगडतं. पोलिओग्रस्त मुलांना उपचारांबरोबर सकारात्मकता देणारी ही संस्था आहे. एका परिचारिकेला एकदा फ्रॅंक आणि एल्सा एका अंथरुणात नको त्या अवस्थेत सापडतात. मग त्या दोघांना संस्थेतून काढून टाकल्यामुळे ते आपापल्या घरी परत येतात; पण एकमेकांसाठी झुरत राहतात. इडा मार्गारेटशी संपर्क साधून फ्रॅंक आणि मेअरसह एल्साच्या घरी जाते. एल्सा आणि फ्रॅंकची भेट होते. अतिशय साध्या कथानकातून उच्च भावनिक स्तरावरचा आनंद देणारी कादंबरी.
-
An Incomplete Life By Vijaypat Singhaniya (अन इनकॉ
विजयपत सिंघानिया म्हणजे भारतीय उद्योगसमूहातलं अग्रगण्य नाव. पण त्यांची ओळख फक्त रेमंड उद्योग समूहापुरती मर्यादित नाही. हा उद्योगपती ओळखला जातो त्याच्या अगम्य जिद्दीसाठी. मग ते हॉट एअर बलुनमधून ६९ हजार फुटांवरून उड्डाण घेणं असो वा छोट्या विमानातून केलेला विमान प्रवासाचा विक्रम असो. विजयपत आपल्या जीवनप्रवासातून नवा आदर्श घालून देतात. तर त्याच वेळी कौटुंबिक पातळीवर एका हतबल पित्याची कहाणीही ते सांगतात. आपल्या जीवनानुभवांवर कोणताही पडदा न टाकता अभिनिवेषहीन पद्धतीने मांडलेलं त्यांचं हे आत्मकथन म्हणूनच वाचकांवर मोहिनी टाकणारं ठरतं.
-
Adharmakand (अधर्मकांड)
या कादंबरीचे कथानक आहे सोळाव्या शतकातले. जेव्हा गोव्यातील काही भागावर पोर्तुगीजांची सत्ता होती. राय गावातील जमीनदार पिएदाद (मूळचा वासू पै) पोर्तुगिजांच्या पूर्णपणे गुप्त असलेल्या तुरुंगात (मोठं घर) एका ओढूनताणून लावलेल्या आरोपाची सजा भोगतोय. इंक्विझिटरसमोर न केलेल्या गुन्ह्याची कबुली तो देत नाहीये. पाशवी वागणूक मिळते त्याला तिथे. त्याची पत्नी पिएदाद (गोमती) धर्मांतराच्या धक्क्याने आणि मुलांच्या वियोगाने भ्रमिष्ट होते आणि त्यातच तिचा अंत होतो. एकतर धर्मांतर करा, नाहीतर गाव सोडून जा, या पोर्तुगीजांच्या कुटिल नीतीला बळी पडलेलं पिएदादचं कुटुंब हे एक प्रातिनिधिक उदाहरण. धर्मांतरामुळे लोकांच्या मनाची होणारी घुसमट, हिंदूंना लग्नसोहळे साजरे करण्यास बंदी, मोठ्या घरातील वैÂद्यांचं जीवन, त्यातील काहींना जाहीरपणे जिवंत जाळण्याची शिक्षा (कायतानलाही शेवटी तीच शिक्षा मिळते), अशा जुलमी वातावरणाचं आणि त्यात होरपळणार्या माणसांचं ज्वलंत चित्रण करणारी, अंतर्बाह्य हलवून टाकणारी कादंबरी.
-
Coronanatarche Udyogvishwa (कोरोनानंतरचे उद्योगविश
डॉ. गिरीश वालावलकर यांनी लिहिलेले `कोरोना नंतरचे उद्योग विश्व ` हे पुस्तक येत्या काळात आवश्यक असलेल्या उद्योजकीय मानसिकतेचा, कष्टाचा, जिद्दीचा आणि संधींचा संदर्भग्रंथ आहे. त्याच बरोबर उद्योजक बनण्याची प्रेरणा नवोदितांना यामधून नक्कीच मिळेल. गोष्टीरूप उद्योग कथा नेहमीच जास्त परिणामकारक होतात हेच नेमके ह्या पुस्तकाने साधले आहे. उद्योग यशस्वी होण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात त्याचा धांडोळा हे लिखाण अप्रत्यक्षपणे घेते. भांडवल, ग्राहकसेवा, वस्तू किंवा सेवेचा दर्जा, जाहिरात तंत्र, वितरणाचे आयोजन अशा उद्योगावश्यक गोष्टी अनेक संदर्भातून समोर येतात. कोरोनानंतरचे जग नोकरी मागणाऱ्याऐवजी नोकरी देणाऱ्यांचे असेल यावर भर देणारे हे लेखन आहे.
-
Anuwadatun Anusarjanakade (अनुवादातून अनुसर्जनाकडे
लीना सोहोनी यांनी त्यांचा अनुवाद क्षेत्रातील प्रवास या पुस्तकातून मांडला आहे. तो सांगताना त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, अनुवादाच्या क्षेत्रातील पदार्पण आणि जीवनाला मिळालेली कलाटणी, अनुवादासाठी पुस्तकं कशी निवडावीत, इ. बाबींकडे त्यांनी या पुस्तकाच्या पहिल्या भागातून लक्ष वेधलं आहे. दुसर्या भागात त्यांनी सुनील मेहता, अनिल मेहता, सुधा मूर्ती, किरण बेदी, जेफ्री आर्चर या व्यक्तिमत्त्वांबद्दल लिहिलं आहे. तिसर्या भागात अनुवाद कलेची पार्श्वभूमी, अनुवाद आणि भाषांतर, अनुवादाची तंत्रे, अनुवादाचे स्वरूप, अनुवादाचे वर्गीकरण, साहित्यिक अनुवाद आणि त्याच्याशी संबंधित समस्या इ. मुद्द्यांचं सविस्तर विवेचन केलं आहे. पुस्तकाच्या चौथ्या भागात ‘भाषा आणि व्याकरण’ आणि ‘अनुवादात हरवलेल्या गोष्टी’ हे मुद्दे स्पष्ट केले आहेत. या पुस्तकात आवश्यक तिथे सुयोग्य उदाहरणांचा वापर त्यांनी केला आहे. स्वत:चे अनुभव व्यक्त करतानाच अनुवादासंबंधीचं सखोल मार्गदर्शन त्यांनी केलं आहे. सर्वसामान्य वाचकांना हे पुस्तक आवडेलच; पण अनुवादाच्या क्षेत्रात पदार्पण करू इच्छिणार्या आणि या क्षेत्रात नवोदित असलेल्यांना हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल.
-
Sophie's World (सोफीज् वर्ल्ड)
सोफीचे जग: तत्त्वज्ञानाच्या इतिहासाबद्दल एक कादंबरी जेव्हा चौदा वर्षीय सोफी एका गूढ मार्गदर्शकाला भेटते, जो तिला 'तत्त्वज्ञाना'ची ओळख करून देतो, तेव्हा तिच्या जीवनात गूढ घटना घडत जातात. दुसऱ्या एका अनोळखी मुलीच्या पत्त्यावर आलेली पोस्टकार्ड्स तिला का मिळत राहतात ? ही मुलगी कोण आहे? आणि, तसं म्हटलं तर सोफी स्वतः कोण आहे ? हे कोडं उलगडायला ती आपलं नव्याने प्राप्त झालेलं तत्त्वज्ञान उपयोगात आणते, पण सत्य मात्र तिच्या कल्पनाशक्तीच्या पार पलीकडचं असतं. रहस्य, तत्त्वज्ञान आणि कल्पना विलास यांचं एक नाद लावणारं मिश्रण सोफीज् वर्ल्ड ही एक 'आंतरराष्ट्रीय' कलाकृती आहे, ती साठ भाषांमध्ये भाषांतरित केली गेली आहे. तिच्या चार कोटी प्रती खपल्या आहेत.