-
Tough Mind
माणसाच्या मनात, जगणं आणि जगत राहणं या स्वाभाविक आणि उपजत प्रेरणा असतात. त्यालाच जीवनेच्छा असं म्हणतात. होकारात्मक विचार, भावना आणि क्रिया-प्रतिक्रिया या सर्व गोष्टी आपल्याला जगायला समर्थ करतात. जीवनेच्छा म्हणजे अखेर मानववंशाच्या यशस्वी जागण्याच रहस्य! म्हणूनच होकारात्मक विचारांची किमया अनुभवायची असेल तर टफ बनणं गरजेच आहे. एकदा का तुम्ही तुमच माइण्ड टफ केलंत, की मनाची एकाग्र झालेली अमोघ शक्ती काय चमत्कार घडवते बघा. चला तर मग, आपण टफ बनू. पॉझिटिव्ह राहू!
-
The Secret Rahasya (द सिक्रेट रहस्य)
या क्षणी तुमच्या हाती आहे एक महान रहस्य ... युगा न युगे चालत आलेलं हे महान रहस्य ! हे सर्वांना हवं होतं. हे गुप्त ठेवलं गेलं. लपविलं गेलं. हे चोरून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, प्रचंड किंमत देऊन मिळवण्याचाही यत्न केला गेला. शेकडो वर्ष जुनं पुराणं असं हे रहस्य इतिहासातील फक्त काही मोजक्या विख्यात लोकांना समजलेलं होतं: प्लेटो, गॅलिलिओ, बीथोवन, एडिसन, कार्नेगी, आईनस्टाईन तसेच इतर महान संशोधक, शास्त्रज्ञ, तत्वचिंतक, संतमहात्मे इत्यादी. आता मात्र हे रहस्य पुऱ्या दुनियेसमोर उलगडलं आहे. " एकदा का हे रहस्य तुम्ही शिकून घेतलंत की तुम्हाला जे हवं ते तुम्ही मिळवू शकता, करू शकता किंवा बनू शकता. मग तुम्हाला कळेल की तुम्ही खरोखरच कोण आहात, तुमच्या अस्तित्वाचा खरा अर्थ ! तुमच्या व्यापकतेची, विशालतेची, खऱ्या शक्तीची जाणिव तुम्हाला होईल आणि त्या वैभवाचीही जे तुमची वाट पहातं आहे."
-
Jinnah
1906 ते 1947 या कालखंडातील भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील फारच थोडा भाग आपल्या समोर ठेवला गेला होता. टिळक, गांधी, सत्याग्रह, चलेजाव चळवळ, क्रांतिकारकांचे प्रयत्न... बस्स. एवढेच आपल्याला ठाऊक आहे. परंतु याखेरीज असलेला 90टक्के इतिहास हा श्री. जसवंतसिंग यांनी संशोधन करून बाहेर काढला. जिनांचे चरित्र अभ्यासताना हे सारे त्यांच्या हातात येत गेले. पाच वर्षे 30 माणसांची तुकडी हे काम करत होती. सुमारे 5000 संदर्भ गोळा केले गेले. त्यातील सार या पुस्तकात एकवटले आहे. ""खादीने कुठे स्वातंत्र्य मिळते?'' नेहरूंचा महात्मा गांधींना सवाल. जिनांनी ठरवून कोलकात्यात दंगल करवली व 6000 हिंदूंची कत्तल घडवली. "हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दूत' असे प्रमाणपत्र गोपाळ कृष्ण गोखले यांच्याकडून घेणारे जिना शेवटी हिंदूंचे कर्दनकाळ बनले. आपल्या कौशल्याने, काँग्रेसच्या नेत्यांना भोंगळपणाचा फायदा उठवत, धमकी देत जिनांनी पाकिस्तान निर्माण केले. पुन्हा एकदा दाहीर राजाचा पराभव 800 वषा|नी जिना नावाच्या महंमद कासिम याने केला. अत्यंत खळबळजनक माहितीने भरलेले पुस्तक.