-
Maranottar (मरणोत्तर)
रहस्यकथा आणि विस्मयकथा ह्यांच्यातील फरक तसा अंधूकसाच .....कुठलीही रहस्यकथा विस्मयकथा होऊ शकेल , पण कुठलीही विस्मयकथा , रहस्यकथा असेलच असे नाही ....... इथं कथेच्या अगदी शेवट मिळणारं वळण - कलाटणी पाहून नकळत उदगार येतात सही....... आणि हीच सु. शीं. ची खासियत .....त्यांच्या विस्मयकथा वाचकांना हि अनुभूती मिळवून देण्यात नेहमीच यशस्वी ठरल्यात , त्यापैकीच हि एक मरणोत्तर ..................
-
Gulmohar
गुलमोहराचं झाड केव्हाही छान दिसतं. निळ्या निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर ते जेवढ्या डौलानं शेंडे वर करून डुलतं, तेवढ्याच श्रीमंतीनं - काळ्याभोर पावसाळी ढगांवरसुद्धा वैभवशाली दिसतं, भव्य वाटतं. पण दिवाकरपंतांना गुलमोहराचं झाड आता बघवेना. तो त्यांचा पराभव होता, भंग पावलेलं स्वप्न होतं. लाकूडतोड्या झाडावर सरड्याप्रमाणे चढला. वरच्या फांदीवर पहिली कुर्हाड बसली आणि त्या पहिल्या घावानं दिवाकरपंतांच्या आख्ख्या भूतकाळातील आठवणींवर तडाखा हाणला. दुसर्या घावासरशी त्यांचा भविष्यकाळ नष्ट केला. तिसरा घाव बसला आणि दिवाकरपंतांना प्लॉटचा वर्ष वाढदिवस आठवला. घावाघावागणिक आठवणींचा मोहर झोडपला जात होता. खाली पडणार्या फांद्या चुकवीत चुकवीत दिवाकरपंत तांबडी फुलं भराभर वेचत होते. घावावर घाव बसत होते. झाडाची उंची कमी होत होती, दिवाकरपंतांचं स्वप्नही लहान लहान होत होतं.
-
Me Manus Shodhtoy
वपुंच्या ह्या कथासंग्रहाचे नावच 'मी माणूस शोधतोय' असे आहे आणि ते त्यांच्या लेखनाशी व वृत्तीशीही सुसंगत नाही. वपु जी माणसे शोधतात ती इकडे तिकडे सर्वांनाच दिसणारी असतात पण वपु ज्या नजरेने त्यांच्याकडे बघतात व त्यांना 'टिपतात' ते चकित करणारे असते. आपल्या लक्षात हे कसे आले नाही असे जरी ते वाचल्यावर वाटले तरी आपल्या लक्षात येऊनही आपल्याला ते असे टिपता नसते आले हेही लक्षात येते न् मग ह्या लेखणीद्वारे कौतुक सप्तर्षी, दुर्वास, इत्यादी माणसाचा शोध वाचकांना खुलवून जातो. म्हणूनच ह्या शोधकथांचया संग्रहाच्या पंचवीस वर्षात चार आवृत्त्या निघाल्या आहेत.
-
Kahi Khar kahi Khota
"कथा वपुंची-तुमची आमची सगळ्यांची- जीवनाचे पुस्तक उघडल्याची" असे ह्या कथासंग्रहाबद्दल म्हटले गेले आहे ते खरे आहे- ह्या संग्रहातील 'जे.के.’, 'भदे’, यासारख्या वपुंच्या गाजलेल्या कथा ह्याची साक्ष आहे. ही व्यक्तिमत्त्वे आपल्यासारखेच दैनंदिन जीवन जगत असतात तरीही त्यांच्या वागण्या-बोलण्यात, जीवनाकडे बघण्याच्या दृष्टीकोनात फरक असतो. या फरकामुळे हे जीवन अधिकच 'जिवंत’ झालेले असते. वपु नेमके तेच हेरतात आणि ते इतक्या सहज शैलीत वाचकांना विश्वासात घेत वाचकांपुढे ठेवतात की त्यांनाही वाटते, जगावे तर हे असे. वपुंच्या सर्व ज्ञात वैशिष्ट्यांबरोबरच जीवन चेतना देणे हेही त्यांचे एक वैशिष्ट्य !
-
Nimith
ललितगद्य हा तसा वाचकांना आवडणारा साहित्यप्रकार. याचा आवाकाही मोठा. लेखकाच्या मनातले विचार, भावना स्वप्नमयी कल्पना विविध मोहमयी शब्दरूप घेऊन ललितरूपात अवतरली की त्याचं ताजं टवटवीत रूप अधिकच मोहवणारं छोट्या छोट्या प्रसंगांचं ललित शब्दरूप जणू समूहात येतं. वाचनानंदाचं दान अलगद वाचकांच्या हाती पडतं. लोकप्रिय लेखक व. पु. काळे यांच्या या आगळ्या वेगळ्या लेखनाचा हा संग्रह लेखकाच्या मनोविश्वात अनंत अनुभव खदखदत असतात. स्वत:ला शब्दरूप घेण्यासाठी आसुसलेले असतात. काही 'निमित्तानं’ त्यांनावा वाचा फुटते. अशा अनुभवांचा हा एक गुच्छ निमित्ता रूढार्थाने असो, नसो वपु काळ्यांची स्वत:ची ठसठशीत नाममुद्रा उमटलेले हे खास ढंगदार ललितबंध.
-
Premmayi
ओशो यांच्या 'बिलव्हेड’ या ग्रंथाच्या आधारे वपुंनी केलेलं हे स्वैर लेखन आहे. ओशोंना अभिप्रेत असलेल्या आधुनिक मानवाचं दर्शन वपुंच्या लेखनातून घडतं. कुठल्याही जाती, धर्म, पंथ, विचारसरणीच्या वैचारिक, भावनिक दबावापासून मुक्त होऊन खर्या अर्थानं मुक्त तत्वज्ञान जगणार्या माणसाचं अनोखं चित्रण येथे वपुंनी केले आहे. हा माणूस कसा असतो ? त्याचं कोणतंही प्रार्थनास्थळ नाही. निसर्ग, झाडं, झरे, नद्या यातला आणि स्वत:मधला परमेश्वर हा त्यांचा देव. प्रेम, प्रेम आणि प्रेम हाच त्यांचा स्थायीभाव. जगाला बदलणार्या फंदात न पडता स्वत:ला अभिप्रेत असलेलं विश्व स्वत:तच निर्माण करण्याची वेगळी वाट ते चोखाळत असतात. त्यांचा प्रवास अंतर्मनाकडे असतो. त्यामुळं प्रत्येकाचा देव स्वतंत्र स्वयंभू असतो. हा माणूस म्हणजे बाऊल. हा माणूस उत्कटतेनं, उत्स्फूर्तपणे जगतो. अधिक नैसर्गिक बनतो. तो शांत असतो. आपल्या जीवनात विरघळून गेलेला असतो. परमेश्वरानं दरवाजा वाजवला म्हणजे दार उघडण्याकरीता तो सज्ज असतो. 'बाऊल’ माणसाच्या विविध विषयातील आगळ्या दृष्टीकोनावर वपुंनी येथे प्रकाशझोत टाकला आहे. प्रेमाचा खरा अर्थ, विविध अंगांनी येथे बहरला आहे. त्यात गहनता आहे, गूढता आहे आणि वैचारिक सधनताही आहे. तत्त्वज्ञानाच्या पातळीवरील हे प्रेमाचे अनोखे दर्शन वाचकाला चाकोरीबद्ध वैचारिकेतून बाहेर काढते. मुक्त मानवाच्या उच्च वैचारिक पातळीचे दर्शन घडवते.
-
Tapthpadi ( तप्तपदी )
लग्न विधीतल्या सप्तपदीबरोबर सुखाच्या सहस्त्र्पदांची स्वप्ने पाहत स्त्री प्रपंचात पाऊल टाकते. त्यावेळी अनेक संमिश्र भावनांनी तिचे मन वेढलेले असते. नव्या नवलाईचं अप्रुप, नवीन वातावरणं, नवीन माणसं याचं अनामिक दडपण आणि सार्या आयुष्याचाच ट्रॅक बदलणारी महत्वाची घडामोड - नव्यानवलाईत डोळ्यासमोरच्या सहजीवनाबद्दलच्या स्वप्नांच्या धुंदीत पावलांखालची जमीन कशी आहे हे कित्येकदा समजत नाही. सुखाच्या अनुभवातला आभास हळूहळू जाणवू लागतो जीवनाचे संसाराचे बोचणारे जखमा करणारे रूप उलगडू लागते. संसारातील अशा तप्तमुद्रांच्या कथा या संग्रहात वपुंनी रेखाटल्या आहेत. अनेकजणी या तप्तपदीवरून अखंडपणे चालत आहेत. संसारात सर्वार्थानं सूर जुळणे अशक्यच. पण नवरा जर 'सखा’ असेल तर पाऊलवाट फुलांच्या पायघड्यांची बनते. तसे नसेल तर जखमा करणारा काटेरी रस्ता. अवघड वाट अशीच शक्यता निर्माण झालेल्या संसाराच्या कथा खास वपु शैलीत.
-
Valay
कथा म्हणजे गोष्ट- घटनेतून फुलत जाणारं नाटय. या नाटयातून मानवी स्वभावाचे विविध नमुने दृीस पडतात.वपुंच्या कथांमधून माणसांच दु:ख आनंद,धुंदी यांचं तरल दर्शन घडतं. वेगवेगळ्या व्यक्तींची वेगवेगळी ओळख असते. 'वलय’ मधील प्रत्येक कथेतून एक वेगळीच ओळख असलेली माणसे भेटतात. 'अर्थ’मधील अप्पा. व्यवहारी जगात पैशाने फसवले जाण्याचं कोणतंच दु:ख न बाळगणारे. तर मिळणार्या अपार आनंदापुढे कामातून मिळणार्या आनंदाच्या धुंदीतच जगणारे- त्यांच जगण्याचं तत्वज्ञान और. 'स्वप्नवेडी' मधली मृणालिनी-एका स्वप्नात जगणारी. त्या स्वप्नामागचं करुण सत्य वाचकाला हलवून सोडतं. 'विश्वास’ मधील विश्वास पंडितची कैफियत मनाला सुन्न करते. या आणि अशा मनात दीर्घकाळ रेंगाळणार्या कथांचा हा संग्रह.