-
Devgandharv (देवगंधर्व)
भास्कररावांच्या ऐन उमेदीत, निरनिराळ्या प्रसिध्द घराण्यातील अनेक गवई उत्तरेकडून दक्षिणेस आले होते. त्या प्रत्येकामध्ये काही विशेष गुण होते यात संशय नाही. कोणामध्ये तानेची, कल्पनातीत तयारी, कोणामध्ये गळ्याची मनस्वी माधुरी, कोणामध्ये आलापाचे सौंदर्य, तर कोणामध्ये तालाचा अजस्त्र खटाटोप दिसून येई. परंतु स्वराचा जिवंतपणा, रागाचा सच्चेपणा व तालाचे लालित्य हे तिन्ही गुण सारख्या उत्कर्षाला पोहोचलेले गुरूवर्य भास्कररावांप्रमाणे क्वचित् कोणा गायकाच्या अंगी दिसून येत असत. सबंध शतकात असा एकच पुरूष निर्माण होतो असे त्यांच्याविषयी कोणाही म्हणावे एवढी त्यांची थोरवी होती. गोविंदराव टेंबे पंजाबात अजूनही ऐकायला मिळतं की, “ भास्करबुवांचं गाणं झालं की असं वाटायचं की, दुसरं गाणं ऐकू नये, हेच ऐकावं.” हे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटण्यासारखं आहे.... त्यांनी रंगभूमीच्या माध्यामातून शास्त्रोक्त संगीताचा खूप प्रचार केला. अजूनही पुष्कळ लोकांना यमन राग ओळखता येत नाही. पण यमन म्हटलं की हे ‘नाथ हा माझा’ सारखं आहे, हे त्यांना ओळखता येतं. पं.भीमसेन जोशी अशी ही देवगंधर्वांची चरित्र मैफल.
-
Sattechya Paareeghatatun (सत्तेच्या परिघातून)
'Through the Corridors of Power' या पी.सी.अलेक्झांडर यांच्या मुळ पुस्तकाचा अनुवाद ..
-
Antaralatil Netradipak Mahila (अंतराळातील नेत्रदीप
जगाच्या अंतराळ संशोधनातील कामगिरीचा मागोवा घेताना मानवी इतिहासातील या महत्त्वाच्या क्षेत्रांत आपल्यालाही सहभाग नोंदवता यावा यासाठी प्रदीर्घ लढा दिलेल्या महिलांच्या चरित्रात्मक कथांच्या माध्यमातून आपण जणू अवकाशाचीच सफर करणार आहोत. या पुस्तकातील दहा चरित्रकथांची सुरुवात झाली कित्येक वर्षांपूर्वी. आकाशातील तारकापुंजांचा नकाशा तयार करण्याच्या कामात सहभाग घेणार्या, अवकाशातील परिस्थितीचा मानवी शरीरावर काय परिणाम होऊ शकतो हे तपासणार्या सुरुवातीच्या प्रयोगांमध्ये सहभाग नोंदवणार्या आणि अवकाशात पाऊल ठेवत इतिहास घडवणार्या अशा अनेक अवकाशनायिकांना तुम्ही या पुस्तकात भेटाल. या महिलांनी तारकांपर्यंत पोहोचण्याचं जे झगमगतं स्वप्न पाहिलं, ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी कशा चित्तथरारक मोहिमा हाती घेतल्या, त्यात त्यांना कोणती आव्हानं पेलावी लागली, यामधून त्यांच्या अंतराळविषयक ज्ञानात कशी भर पडत गेली, अवकाशातील गमतीजमती त्यांना कशा अनुभवता आल्या याची वेधक माहिती या पुस्तकात वाचायला मिळेल.
-
Santashreshtha Dnyanadev-Jeevan Ani Karya (संतश्रे
भारतीय इतिहास, संस्कृती व परंपराविषयक संदर्भ-साधनांचे ज्येष्ठ संकलक वा. ल. मंजूळ यांनी चितारलेल्या ‘संतश्रेष्ठ ज्ञानदेव जीवन आणि कार्य’ या चरित्राने संतसाहित्याच्या अभ्यासामध्ये नव्याने भर पडली आहे. संत ज्ञानदेवांच्या आयुष्यातील चमत्कारिक घटना-प्रसंग यांचा सश्रद्ध चिकित्सेद्वारे अभ्यास करण्याची गरज लेखकाने यातून सूचित केली आहे. ‘ज्ञानेश्वरी’, ‘अमृतानुभव’, ‘चांगदेवपासष्टी’, ‘हरिपाठ’ आणि संकीर्ण अभंग या ज्ञानदेवांच्या सर्वपरिचित साहित्यसंपदेबरोबर ‘ज्ञानदेव’ अशी नाममुद्रा असलेल्या अन्य ४५ रचनांचा तपशील यामध्ये सादर केला आहे. ज्ञानदेवांच्या चरित्रावरील सोळा इंग्रजी ग्रंथ उपलब्ध आहेत. याशिवाय त्यांच्या साहित्याचा काही विदेशी अभ्यासकांनी अभ्यास केला आहे. त्यांचा परिचय स्वतंत्र प्रकरणाद्वारे पुस्तकात दिला आहे. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी शैव-वैष्णव संप्रदायाचा संगम जुळवून आणला. त्यातून कोणती स्थित्यंतरे झाली, याचे आणि पालखी सोहळ्याचे यथार्थ वर्णन यामध्ये आहे. ज्ञानदेवांच्या चरित्रविषयक प्रकाशित-अप्रकाशित, तसेच मराठी, संस्कृतबरोबरच देशी-विदेशी भाषांतील संदर्भसाहित्याचे दालन वा. ल. मंजूळ यांनी याद्वारे आपल्या पुढे खुले केले आहे.
-
Pandavapuram (पांडवपूर)
एक दिवस ती अचानक भडकली. आपल्या पाचही पुरुषांना समोर एका रांगेत उभे करून ती ओरडली - मी तुमच्या सर्वांचा एकसारखाच तिरस्कार करते. किड्या-मुंग्या व कुजलेल्या. अन्नपदार्था सारखी मला तुमच्या सर्वांची किळस येते. ते ऐकून पाचही पुरुष हादरून एकमेकांकडे बघत स्तब्ध उभे राहिले. आईने मात्र थकलेल्या आवाजात तिला विचारले 'सुनबाई, तू विचार करूनच बोलतेस ना ?' 'हो !' ती कठोर शब्दात म्हणाली.... 'मला एक गोष्ट सांगायची आहे.... तुम्हीच तुमच्या या वीर पुत्रांना नपुंसक करून टाकले आहे, आता हे पुरुष पण नाहीत आणि स्त्री पण...' एक विलक्षण कादंबरी....
-
Bedhadak- Maza Aatala Avaj (बेधडक-माझा आतला आवाज)
नमस्कार, माझं हे तिसरं पुस्तक ! खरंतर मी लेखक नाही पण तरीही तीन पुस्तकं लिहीण्यापर्यंत मजल मारलीच, ती केवळ तुम्हा वाचक व रसिकांच्या जोरावर! आसपास घडणाऱ्या घटना पाहून मन ढवळून निघतं माझं ! ती अस्वस्थता ह्या पुस्तकात बाहेर आलीये वेगवेगळ्या लेखातून ! आपल्याला नक्कीच हे पुस्तक वाचतांना तुमचा आतला आवाज बोलतोय असं वाटेल. म्हणून हे पुस्तक खास तुमच्यासाठी ! - आपलाच शरद पोंक्षे
-
Mich Evadha Shahana Kasa (मीच एवढा शहाणा कसा)
चेहऱ्यावर गांभीर्य ठेवून आयुष्याकडे मिश्किलपणे पाहता आलं पाहिजे. रोजच्या जगण्यात जेवढ्या कटकटी, समस्या असतात तेवढीच गंमतही असते. 'खाली डोके वर पाय' करुन पाहिलं तर त्या गमतीची मजा घेता येते. विनोद आणि हास्य आपल्या आजूबाजूलाच असते. आपल्याला ते अनुभवायचे असेल, त्याचा आनंद घ्यायचा असेल तर स्वतःमधील विसंगतीही टिपता आली पाहिजे, म्हणजे इतरांवर हसण्याचा अधिकार आपोआप प्राप्त होतो. अशाच निरीक्षणातून जन्माला आलेले हे लेख आहेत.