-
Krondhe Utpatila Bale (क्रोधें उत्पाटिला बळें)
प्रदीप कर्णिक यांची क्रोधें उत्पाटिला बळें ही कादंबरी रूढार्थाने मराठी कादंबरी वाङ्मयातल्या कुठल्याच संप्रदायात बसत नाही.मनोविश्लेषणात्मक, संज्ञाप्रवाही, अस्तित्ववादी असल्या चौकटीत मावणारीही कादंबरी नाही. या कादंबरीला म्हणावे असे कथानक नाही, नायक-खल नायक नाही, या नायकाच्याच नव्हे तर येथील प्रत्येक पात्रांत एक शून्यावस्था, एक पोकळी भरलेली आहे. ह्या शून्यावस्थेला छेदून बाहेर कसे पडायचे, या ध्यासाने मृत्यूच्या विहिरीत गरगरणाऱ्या नायकाने कादंबरी लेखनाचा गळ पकडून, स्वत:ला त्या विहिरीतून बाहेर पडता येईल याची धडपड चालवली आहे. ही कादंबरी वाचताना मानवी असतेपणाचे, मानुषतेच्या मूल्यांचे, प्रश्नांचे मोहोळ पानोपानी उठलेले दिसेल. माणसं इतकी क्रूर कां होतात असा प्रश्न उपस्थित झाला की, त्याचा मूळ स्वभावच रानटी आहे का? असा उपप्रश्न पुढे येतो, पाठोपाठ क्रोध शमवण्याचे मार्ग कोणते ? हिंसा हा क्रोध शमवण्याचा मार्ग असू शकतो का ? हिंसा मनातून जाऊन शांती कशी निर्माण होईल? मग महात्मा गांधींचा अहिंसा विचार येणार, बुद्धाची शांती येणार, तेंडुलकरांचे हिंसा आणि क्रौर्याचे चिंतन येणार. अशा संदर्भसंपृक्ततेतून प्रश्नांचे मोहोळ बाजूला सारून, उत्तराचा शोध घेण्यासाठी तडफडणाऱ्या मनाची कालवाकालव हा या कादंबरीचा विषय आहे. पराभव चालेल, पण पक्षी मरता कामा नये ही भूमिका असल्यामुळे निष्कर्षाप्रत येताना कथानिवेदकाची दमछाक होते. निवेदकाची सर्व बाजूंनी होणारी दमछाक हेच या अनुभवाचे संघटन-तत्त्व आहे आणि कलाद्रव्यही आहे. अशा या प्रायोगिक वळणाने जाण्याचे धाडस केल्याबद्दल प्रदीप कर्णिक यांचे मन:पूर्वक अभिनंदन!
-
Tatvadnyani Dr.Babasaheb Ambedkar (तत्वज्ञानी डॉ .
यशवंत मनोहर यांनी 'तत्त्वज्ञानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या पुस्तकात बाबासाहेबांचे विश्वपुनर्रचनेचे तत्त्वज्ञान अधोरेखित केले आहे.
-
Swapnamohini (स्वप्नमोहिनी)
ॲस्ट्रोपायलट दिक्पाल आर्य .….. धाडसी, हरहुन्नरी, हजरजबाबी, प्रसंगावधानी अशा दिक्पालची मंगळावर जाण्यासाठी निवड झाली . पृथ्वीवरील मानवांचा प्रतिनिधी म्हणून मंगळावर जाण्याचा प्रथम मान मिळणं, ही भूषणावह गोष्ट होती . दिक्पाल मंगळावर उतरला …यानातून बाहेर पडून चालत जाताना त्याच्या सहकाऱ्यांना तो दिसलाही … पण तेवीस दिवसांनी परत येणं अपेक्षित असणारा दिक्पाल तब्बल २५ ९ दिवसांनी परतला. एवढे दिवस कुठे होता तो? विश्वातल्या अज्ञात, अकल्पित आणि अनपेक्षित घडामोडींची आणि मानवाच्या राक्षसी महत्वाकांक्षेची थरारक कथा.. स्वप्नमोहिनी! विख्यात भयकथा, गूढकथा आणि विज्ञानकथा लेखक नारायण धारप यांची सर्वच वयाच्या वाचकवर्गाला गुंगवून टाकणारी कादंबरी
-
Aathavani Mamanchya (आठवणी मामांच्या)
काही नाती ही जन्मत:च मुरलेल्या स्वरूपात जुळली जातात. अगदी मुरांब्यासारखी! ही नाती ऊब, प्रेम किंवा मायेचा ओलावा अंगा-खांद्यावर घेऊनच आलेली असतात. विश्वासाचा भक्कम पाया असतो या नात्यांना! म्हणूनच कधी राग आणि गैरसमजुतीचं एखादं वादळ आलं आणि नात्यांचे धागे थोडे हेलकावले, तरी ते उसवत नाहीत किंवा तुटत नाहीत. कधी गोंजारून तर कधी फटकारुन ही नाती आयुष्य घडवणारे धडेही देत असतात. या नात्यांतून भरारी घ्यायला ऊर्जा मिळत असते आणि नंतर भरभरून कौतुकही मिळत असतं. आजोळची नाती ही अशी असतात, मग ती आईकडची असोत किंवा वडलांकडची! ‘आजोळचे दिवस’ या मालिकेत विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांनी याच नात्यांचे विविध पदर उलगडले आहेत. मालिकेतील हे पुस्तक आहे मामासोबतच्या मैत्रीचं… नात्याचं ! मामा-भाचरांच्या नात्यांत एक वडिलकी आणि मैत्र याचं मिश्रण असतं. म्हणूनच हे नातं नेहमी तरूण राहतं. मामांच्या बहुपेडी आठवणी सांगत आहेत… बाळासाहेब थोरात, अमृता सुभाष, प्रदीप चंपानेरकर, किशोर मेढे, राजेंद्र मलोसे, प्राची रेगे, सुचिता घोरपडे आणि अश्विनी देसाई !
-
Aathavani Aajobanchya (आठवणी आजोबांच्या)
काही नाती ही जन्मत:च मुरलेल्या स्वरूपात जुळली जातात. अगदी मुरांब्यासारखी! ही नाती ऊब, प्रेम किंवा मायेचा ओलावा अंगा-खांद्यावर घेऊनच आलेली असतात. विश्वासाचा भक्कम पाया असतो या नात्यांना! म्हणूनच कधी राग आणि गैरसमजुतीचं एखादं वादळ आलं आणि नात्यांचे धागे थोडे हेलकावले, तरी ते उसवत नाहीत किंवा तुटत नाहीत. कधी गोंजारून तर कधी फटकारुन ही नाती आयुष्य घडवणारे धडेही देत असतात. या नात्यांतून भरारी घ्यायला ऊर्जा मिळत असते आणि नंतर भरभरून कौतुकही मिळत असतं. आजोळची नाती ही अशी असतात, मग ती आईकडची असोत किंवा वडलांकडची! ‘आजोळचे दिवस’ या मालिकेत विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांनी याच नात्यांचे विविध पदर उलगडले आहेत. मालिकेतील हे पुस्तक आहे, आजोबांच्या आठवणीचं । आजोबा म्हणजे घरातल्या प्रत्येकाचं विसंबून राहण्याचं हक्काचं ठिकाण! आजोबांचे अनुभवाचे चार बोल, त्यांची पाठीवर पडलेली थाप आत्मविश्वास देत असते. आजोबांच्या आठवणींचे पदर उलगडत आहेत… विश्वास पाटील, विजयराज बोधनकर, अन्वर हुसेन, सुनील मेहता, उदय निरगुडकर, लक्ष्मण खेडकर ।
-
Aathavani Aajichya (आठवणी आजीच्या)
काही नाती ही जन्मत:च मुरलेल्या स्वरूपात जुळली जातात. अगदी मुरांब्यासारखी! ही नाती ऊब, प्रेम किंवा मायेचा ओलावा अंगा-खांद्यावर घेऊनच आलेली असतात. विश्वासाचा भक्कम पाया असतो या नात्यांना! म्हणूनच कधी राग आणि गैरसमजुतीचं एखादं वादळ आलं आणि नात्यांचे धागे थोडे हेलकावले, तरी ते उसवत नाहीत किंवा तुटत नाहीत. कधी गोंजारून तर कधी फटकारुन ही नाती आयुष्य घडवणारे धडेही देत असतात. या नात्यांतून भरारी घ्यायला ऊर्जा मिळत असते आणि नंतर भरभरून कौतुकही मिळत असतं. आजोळची नाती ही अशी असतात, मग ती आईकडची असोत किंवा वडलांकडची! ‘आजोळचे दिवस’ या मालिकेत विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांनी याच नात्यांचे विविध पदर उलगडले आहेत. मालिकेतील हे पुस्तक आहे, आजीच्या आठवणींचं । आजीच्या तलम प्रेमाची सर कशालाच येत नाही. मऊ दुलईची ऊब देणाऱ्या पण प्रसंगी कणखरही होणाऱ्या आजीच्या बटव्यात बराच काही खजिना असतो. त्याच विषयीचे अनुभव सांगत आहेत…. मोनिका गजेंद्रगडकर, शुभदा चौकर, राधिका आपटे, शाहू पाटोळे, नितीन आरेकर, अनिल साबळे व राजीव खांडेकर।