-
The Private Papers Of Eastern Jewel
पेकिंग १९१४.प्रिन्स सू यांच्या सगळ्यात लहान उपस्त्रीची आठ वर्षाची मुलगी ईस्टर्न ज्यूवेल तिच्या वडिलांची त्यांच्या एका नोकरानिशी चाललेली रतिक्रीडा एका कोरीव अडोशामागून चोरून बघितली. त्यानंतर भविष्याच्या कृष्णछायेच मळभच जणू दाटून आलं आणि ईस्टर्न ज्यूवेलच्या वादळी आयुष्याचा प्रवास सुरु झाला. ईस्टर्न ज्यूवेलचा शरीरसंबंधांमधला चौकसपणा लक्षात आल्यामुळे तिला टोक्योला त्यांच्याच एका दूरच्या नातेवाईकाकडे पाठवून देण्यात आलं. त्यानंतर वैरण आणि बर्फाळ अशा मंगोलीयातल्या राजकुमाराशी तिचा तिच्या इच्छेविरुद्ध विवाह करून देण्यात आला. वारंवार एकटेपणामुळे तिला अस्वस्थ करणारे चमत्कारिक आभास आणि तशीच दु: स्वप्न पडू लागली; पण ती स्वभावात:च धीट, बंडखोर आणि कोणाच्याही, कमीत कमी पुरुषांच्या तरी वर्चस्वाखाली राहण्याची तयारी नसलेली अशी होती. द प्रायव्हेट पेपर्स ऑफ ईस्टर्न ज्यूवेल ही अतिशय वादळी ,बहुरंगी,दुसरे महायुद्ध आणि तीन देशांच्या पार्श्वभूमीवर घडलेली सत्यकथा आहे.
-
Belonging
सामीम सात वर्षाची होईपर्यंत इंग्लंडमधील एका अनाथालयात पूर्णपणे ब्रिटीश संस्कारात वाढली.आईवडिलांनी तिला घरी नेण्याचे ठरविल्यावर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला.परंतु समीम ज्या वातावरणात मोठी झाली,त्यापेक्षा तिचे कुटुंब,त्यांची भाषा,रितीरिवाज पूर्ण वेगळे होते.नऊ वर्षाची होईपर्यंत तिची खात्री झाली होती की,त्या कुटुंबात तिला एका गुलामाइतकीसुद्धा किंमत नव्हती.समीम तेरा वर्षाची झाली तेव्हा तिच्या आईने तिला अचानक पाकिस्तानात घेऊन जाण्याचे ठरवले आणि समीम सुट्टीची स्वप्ने रंगवू लागली.
-
Anandacha Passbook
दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर माणूस अनेक क्षेत्रात यश प्राप्त करू शकतो.श्याम बुर्के यांनी बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये यशाची अनेक शिखरे गाठली.साहित्य व कला क्षेत्रात भरारी मारली .वि.स. खांडेकर,आचर्य अत्रे,पु.ल. देशपांडे,रणजित देसाई अशा अनेक नामवंतसंबधीच्या आठवणी आनंददायी आहेत.ज्याला आयुष्यात मोठ व्हावंसं वाटत,यशस्वी व्हावंसं,आनंदी राव वाटत त्याला हे पुस्तक प्रेरणा देईल.
-
Ashru
या विसाव्या शतकानं जगाला बर्यावाईट अनेक गोष्टी दिल्या असतील; पण त्याची सर्वश्रेष्ठ देणगी म्हणजे त्याने सामान्य मनुष्याला दिलेलं महत्त्व, जे कोणत्या ना कोणत्या दृष्टीने असामान्य आहे. ज्याला आपण जीवन म्हणतो, त्यात अधिक भाग कुणाचा असतो ? मूठभर असामान्यांचा की शेकडो नव्वद किंबहुना शेकडो नव्व्याण्णव असलेल्या सामान्यांचा ? आजपर्यंत राजांनी, वीरांनी, संतांनी, तत्त्वज्ञानींनी, कवींनी आणि शास्त्रज्ञांनी या सामान्य मनुष्याला गोड गोड अशी वचने देऊन त्याची प्रत्येक क्षेत्रात कत्तल केली. पण तरीही माणुसकीचा आधार एकच होता; तो म्हणजे संस्कृतीची सारी मूल्ये सांभाळण्याकरिता धडपडणारा, तडफडणारा सामान्य माणूस. ज्याला विशेष चांगले असे काही करता येत नाही; पण वाईट करताना ज्याचा हात कचरल्याशिवाय राहत नाही. हाच सामान्य माणूस या कादंबरीचा नायक आहे. वि. स. खांडेकर यांच्या असामान्य लेखणीतून उतरलेली ही कादंबरी आजच्या सामान्य माणसाची वेदना बोलकी करणारी आहे.
-
Don Mane
माणसाला दोन मनं असतात बाळासाहेब ! एक पशूचं आणि एक देवाचं. पहिलं मन उपभोगात रमून जातं, दुसरं त्यागात आनंद मानतं ! पहिल्याला शरीराच्या सुखापलीकडे काहीच दिसत नाही. दुसऱ्याला त्याच्यापलीकडे असणा-या उदात्ततेचा साक्षात्कार होतो. या दोन मनांतल्या पहिल्याला निसर्गानं आपलं सारं सामर्थ्य दिलं आहे. दुसरं त्या मानानं फार दुबळं असतं. या दुस-या मनाचं बळ वाढवण, दोन्ही मनांचं बळ सारखं करून जीवन सुखानं जगणं आणि जगता जगता त्याचा विकास करणं, हे यशस्वी आयुष्याचं खरं लक्षण आहे. पण मनुष्याच्या आयुष्यात या दोन्ही मनांचा झगडा नेहमीच सुरु असतो. या झगड्यात ज्यांचं दुसरं मन विजयी होतं, ते कुठल्याही संकटाला हसत तोंड देतात. पण पहिल्या मनाच्या आहारी गेलेला माणूस दुबळा होत जातो, मोहांना बळी पडतो, जिवलग माणसांशीही प्रतारणा कृ लागतो, आणि मग...
-
Hirva Chafa
विसाव्या शतकाच्या पहिल्या दोन-तीन दशकांमध्ये समाजवाद, साम्यवाद, गांधीवाद यांसारख्या तत्त्वज्ञानांमुळे तसेच स्त्री-शिक्षणाचा प्रसार, सामाजिक जागृती अशा घटनांमुळे भारतीय जीवनात मोठे स्थित्यंतर घडून आले. व्यक्तिजीवनावरील बंधने सैल झाली. रूढसमजुतींना व नातिकल्पनांना तडे गेले; समाजातील सर्वच क्षेत्रात स्त्रियांचा वावर होऊ लागला. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वाढली. समाजातील काहींनी या नव्या जीवनपद्धतीचा सहज स्वीकार केला, काहींनी आपल्याला सोयीच्या गोष्टी स्वीकारल्या, तर उरलेले जुन्यालाच धरून राहिले. 'हिरवा चाफा' ही कादंबरी प्रथम १९३८ साली प्रकाशित झाली. यामध्ये या नव्या काळातील आरंभीच्या बदलांचे चित्रण आहे. यातील क्रांतिकारी विचारांनी भारलेला मुकुंद किंवा ध्येयाने प्रेरित झालेली सुलभा हे नव्या पिढीचे, तात्यासाहेब जुने ते सोने मानणार्या पिढीचे, तर विजय पूर्णपणे नवे न स्वीकारलेल्या लोकांचे प्रतिनिधी आहेत.
-
Sugraniche Vidnyan (सुगरणीचं विज्ञान)
माणूस आपलं अन्न शिजवायला लागला तेव्हापासून त्याच्या उत्क्रांतीतील वाटचालीनं एक महत्त्वाचं वळण घेतलं. किंबहुना माणूस आपलं अन्न शिजवायला लागला तेव्हाच ङहन्टर गवररछ हे स्वरूप सोडून त्यानं आपल्या सुसंस्कृत आधुनिक मानव बनण्याच्या वाटचालीला सुरुवात केली. अन्न शिजवून खायला लागल्यामुळे पचनसंस्थेत जसे उत्क्रांतिनुरूप बदल होत गेले तसा माणसाचा सांस्कृतिक विकास होत गेला. आयुर्वेदात शिजवणं या प्रक्रियेला अन्नावर संस्कार करणं असंच म्हटलं आहे. म्हणजेच शिजवण्याची प्रक्रिया हीही एक वेगळ्या अर्थानं संस्कृतीजन्य प्रक्रिया ठरते. खाण्याजोगं अन्न तयार करणं यासाठी उष्णता देण्याआधीही काही प्रक्रिया कराव्या लागतात. पूर्वतयारी करावी लागते. प्रमाण नेमकं किती असावं याचं व्यवधान राखावं लागतं. ही सगळी अवधानं पार पाडताना आपण एक वौज्ञानिक प्रक्रियाच पार पाडत असतो याची जाणीव सुगरणींना असतेच असं नाही. त्या प्रक्रियेपाठी विज्ञानाची जी संकल्पना अनुस्यूत आहे असं मी मानलं ते कितपत बरोबर आहे? आणि सवा|त महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांची विज्ञानाशी फारशी जवळीक नाही अशा सुगरणींना हे विज्ञान कितपत रुचेल? की तो घास गळ्याखाली उतरणारच नाही? अशा प्रश्नांची उकल करणारे हे पुस्तक.
-
I lost My Love In Bagdad (आय लॉस्ट माय लव्ह इन बगद
आय लॉस्ट माय लव्ह इन बगदाद लहानपणापासून लष्कर, शस्त्रास्त्रं, युद्ध याबद्दल खूप कुतूहल आणि आकर्षण असलेला मायकेल हेस्टिंग्ज मोठा झाल्यावर ङन्यूजवीकछचा वार्ताहर होतो आणि इस्राइल, व्हिएतनाम इत्यादी ठिकाणी अनुभव घेतल्यावर त्याची नेमणूक इराकमधील वार्ताहर म्हणून होते. ते काम त्याला आवडतं; परंतु त्याच सुमारास अॅन्डी या अतिशय हुशार, सुरेख आणि आदर्शवादी तरुणीच्या तो प्रेमात पडतो आणि एकमेकांपासून दूर राहणं दाघांना खूप जड जातं. आदर्शवादी अॅन्डी सद्दामच्याधील राजकीय पक्षांना लोकशाही मूल्यं प्रस्थापित करण्यास मदत करण्याच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि मायकेल आहे त्या देशात राहायला मिळेल म्हणून इराकमध्ये नॅशनल डेमोक्रॅटिक इन्स्टिट््यूटमध्ये नोकरी मिळवून बगदादला येते, उत्साहानं कामाला लागते. परंतु इराकमध्ये परिस्थिती अत्यंत वाईट असते. जी हिंसा चालू असते, ती विश्वास बसणार नाही, कल्पना करता येणार नाही, समजणार नाही अशी असते. अमेरिकन सौनिकांच्या मनातही कडवटपणा असतो, कठोर उपहास असतो. किती अमेरिकन कुटुंबांचा सत्यानाश करीत असतं हे युद्ध हे त्यांच्या सरकारला समजत नसतं? 2006 साल संपतं तेव्हा छत्तीस हजार इराकी मेलेले असतात, आठशेहून जास्त अमेरिकन्स मेलेले असतात, पन्नास कोटी डॉलर्स खर्च झालेले असतात. शिया आणि सुन्नी एकमेकांना तर मारत असतातच; परंतु अमेरिकन लष्कर आणि अमेरिकन माणसं तर तेथे कोणालाच नको असतात म्हणून तेही मारले जात असतात. अशा भयानक वातावरणात उत्साह आणि चिकाटी टिकवून धरून काम करूपाहणार्या मायकेल आणि अॅन्डीच्या प्रेमकथेचा जो अत्यंत दुर्दैवी आणि भयानक अंत होतो, त्याबद्दल प्रत्यक्षच वाचा.