-
Ghar Haravleli Manasa
मुंबईसारख्या शहरात राहून आपल रोजचं आयुष्य जगणार्या मध्यमवर्गीय माणसांची होणारी कुचंबणा या कथातून मांडलेली आहे. चाळीतलं वास्तव्य, लहान जागा याबरोबरच विसंवादाचे उठणारे सूर यानं माणसाचं जीवन अवघड करून टाकलं आहे. आयुष्याचं संगीत तीन स्वरात विभागलेल बालपण, तारूण्य आणि वार्धक्य. सर्वाधिक उमलण्याचा, फुलण्याचा, उत्कटतेचा काळ तो तारूण्याचा शरीराचे, मनाचे, भावनांचे, संवेदनांचे, कर्तृत्वाचे सगळे उत्सव बहराला येण्याचा काळ. पण तारूण्यातच अनेक प्रकारच्या कुंचंबणेनं माणसाचं आयुष्य बांधून टाकलेलं. अनेक संसारातून यामुळं उठलेले विसंवादाचे सूर, हे अस्वस्थ करणारे जखम करणारे. पाचशे स्क्वेअर फूटच्या घरात 10-10 माणसं राहतात. त्यांच्यातले नाते संबंध, पतीपत्नीला हवा असेलेला एकांत, स्वस्थपणा. ही अप्राप्य गोष्ट. आणि त्यासाठी असे क्षण खेचून घेणं म्हणजे सगळीच विटंबना. तीस माणसासाठी एकच संडास आणि रोजच्या नित्यकर्मासाठी करावी लागणारी रोजची धडपड हे सर्व कीव आणणारं आहे. अनंत प्रश्न उभे करणारं आहे. माणसं घरात राहतात. कधी कधी एकमेकांत कधीत न कोसळणार्या भक्कम भिंती उभारून अशा अनेक प्रश्नांच्या या कथा. प्रत्येकला आपल्या वाटणार्या ...
-
Aapan Sare Arjun
आपल्या कथाकथनाने हजारो रसिकांना हास्यअश्रूंच्या लाटेवर लीलया लोटून देणारे कथाकार वसंत पुरुषोत्तम काळे यांना ब्रेन ट्युमरने मृत्यू पावलेल्या आपल्या प्रिय पत्नीच्या दुराव्यानंतर अंतर्बाह्य उन्मळत असल्याचा प्रत्यय आला. आपण सुपर संभ्रमात विषादावस्थेत सापडलो आहोत असे वाटले. त्या मन:स्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांना एका मित्राने ओशो रजनीश यांच्या गीतेवरील प्रवचनांच्या कॅसेट्स भेट देऊन, त्या ऐकण्यास सांगितले. आणि आश्चर्य हे की त्या कॅसेटस ऐकून वपुंना जगण्याचे नवे बळ मिळाले. भगवद्गीता हा धार्मिक ग्रंथ नसून तो मानसशास्त्रावरचा पहिला जागतिक ग्रंथ आहे हे त्यांना उमगले. आपण स्वत:च अर्जुन आहोत, आणि स्वत:च नव्हे तर प्रत्येक माणूस हा अर्जुन आहे, आणि त्याला अर्जुनाप्रमाणेच आपण पदोपदी कोंडीत सापडल्याची, गोंधळल्याची, संभ्रमाची जाणीव होते, असेही त्यांना कळून चुकले. महाभारताला शेवट नाही, फक्त सुरुवात आहे अशीही एक कल्पना वपु भारावून मांडतात. ओशो रजनीशांच्या कॅसेट्सनी आपल्याला श्रीकृष्ण उलगडून दाखवला, महाभारताचा वेगळा अर्थ सांगितला. माणूस कळायला एक नवा डोळा दिला असे म्हणून वपु 'आपण सारे अर्जुन’ या लेखमालेच्या रूपाने स्वैर व स्वच्छंद चिंतन मांडण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यातील पहिल्या 19 लेखांचा (किंवा प्रवचनांचा) हा संग्रह. वपुंच्या कथाशैलीवर मराठी माणूस फिदा आहे. वपुंच्या गोष्टीवेल्हाळ प्रकृतीला असा स्वैर मुक्त चिंतनाचा फॉर्म साजेसा आहे.
-
Vapurvai
श्रेष्ठ कथाकथनकार’ म्हणून वपुंची असलेली ओळख ही त्यांची अनेक मनोरम वैशिष्ठ्ये सिध्द करते. मनाची पकड घेणारी कथा लिहणारे लेखक, कथेतील पात्रे जीवंत करणारे, श्रोत्यांना गुंतवून ठेवणारे कथनकार आणि या सर्वांमागे सूप्तपणे उभे असलेले डोळस रसिक तत्वचिंतक! प्रत्येक कथेतून वपु वाचकांना भेटत असतात. एकाच वेळी अनेकांना अंतर्मुख करणारी, बहिर्मुखातून अंतर्मुखता देणारी; लोकरंजनातून वैचारिकतेकडे झुकणारी अशी वपुंची कथा असते. ज्यांच्या कथेतून अनोख्या प्रतिमांमधून सतत माणूसपणाचा उद्घोष असतो. वेगवेगळ्या परिस्थितीत सापडलेली, संघर्ष करणारी, हसणारी, रडणारी, कुढणारी सर्वसामान्य माणसं आणि त्यांच्यातली असामान्यत्वाची झलक वपुंनी नेमकी पकडलेली असते. आपल्या प्रसन्न, खुमासदार, मिश्किल शैलीतील -- आविष्कार कथा वाचनीय आणि श्रवणीयही करतो. वपुंच्या खास कथांची ही वपुर्वाई वाचकांना अपुर्वाईची ठरेल.
-
One For The Road
पुरुषालाही स्वत:च्या पत्नीव्यतिरिक्त अन्य स्त्रीच्या सहवासाचे सौख्य रोमांचित करणारे वाटते असे आपण धरून चालतो. 'वन फॉर द रोड’चा नायक आगगाडीत भेटलेल्या मोहिनीच्या सहवासात रममाण होण्याऐवजी स्वप्नात बघतो ते काहीतरी भलतेच. त्याच्या सत्प्रवृत्त, पापभीरू मनाला त्या अनैतिक सुखाचा आनंद मात्र तीळमात्रही लुटता येत नाही आपले मनच असले भलतेच सुख अंगी लावून घेत नाही- हे सारे एखादा गांभीर्याने वा विशिष्ट तत्त्वाचा आव आणून सांगेन. वपु अर्थातच तसे करत नाहीत तरीही सांगायचे ते सांगतातच. ह्याचप्रमाणे वपु प्रादशिकेतही शिरलेले नाहीत. त्यांच्या ह्या कथांचे वातावरण शहरी मध्यमवर्गीय आहे न् त्यांच्या ह्या कथांचे विषयही तसेच आहेत शहरी मध्यमवर्गीय !
-
Tu Bramath Aahasi Vaya
वपुंच्या कथांनी वाचकांच्या संवेदनांना हलकेच जागे केले, हलवले आणि प्रगल्भतेच्या प्रवासाला प्रवृत्त केले. पूर्णपणे अनलंकृत आणि सहजगर्भ शैलीतल्या वपुंच्या कथांनी मध्यमवर्गीय आयुष्यातील सुखदु:खे, मानापमानाचे अवघड प्रसंग, भावभावना आणि विकारविचारांची आंदोलने व्यक्त करणारी दुखरी नस पकडली शुद्ध जीवनातून विचारांतून, आपल्या आकलनाच्या खोलवरच्या चिंतनातून व्यक्त होणारे अनुभव आपल्या स्वप्रतिभेनं कथांमधून झळाळू लागले. सहस्त्रदल कमल सूर्य किरणांनी अलगद उमलावे तसे विविध प्रसंग कलाकृतींतून उमलावे लागतात. या कादंबरीत हे कमळ संपूर्ण उमलले आहे. ऐहिक जीवनाचारातून मनप्रवृत्तीला उंच नेणारी अलगदपणे प्रशांत शांततेकडे नेणारी प्रकाशवाट उजळणारी नायिका हे या कादंबरीचे बलस्थान आणि आकर्षण केंद्र संपूर्णपणे ऐहिक यशात जीवनाची परिपूर्णता मानणार्या आजच्या मानवाचं प्रतिक म्हणजे ओंकारनाथ- या यशामागून येणारं निस्तत्व, रसहीन, आवेगहीन आयुष्य भोगणारा परंतु त्याचीही जाणीव नसणारा अशा मानवाला खर्या चैतन्याकडं, संपूर्ण आनंदाकडं बोटं धरून नेणारी ही कादंबरी वाचकालाही उत्कट प्रेमाचे आणि त्यागाचे असीम अविनाशी आनंदाचे दान देते. ज्ञानेश्वर, कबीर, येशू, बुद्ध या सर्वांचा वैचारिक अंगीकार केलेली उत्तुंग नायिका- सायरा आस्वादापलिकडचा आनंद देऊन जाते हे निश्चित.
-
Duniya Tula Visrel
वावां'ची शायरी दाद द्यावी अशी तर होतीच, तशीच समरसून दाद द्यावी असे हे 'वपुं'नी केलेले त्या शायरीचे तितकेच शैलीदार, तितकेच ओघवते, मनधुंद करणारे रसग्रहण. "उर्दू ढंगाची शायरी मराठीत करताच येणार नाही" ह्या ठाम विधानाला तोच ढंग घेऊन पण त्या ढंगाच्या नियमावलीत न अडकता भाऊसाहेब (वा.वा.) पाटणकरांनी ढोल उत्तर दिले होते आणि त्यांच्या ह्या ठोस उत्तराला सार्या मराठी रसिकांनी उचलूनही धरले होते. ह्या शायरीला विदर्भाच्या चौकशी पडल्या नव्हत्या - मुळातच समजले समजले वाटावेसे हे काव्य वपुंनी तोच ढंग अचूक पकडून खुलविले असल्याने त्याची खुमारी वाढली आहे- सुरेशचंद्र नाडकर्णी ह्यांनी केलेल्या ह्या रसग्रहणाच्या रसग्रहणासह !
-
Vapurza
व. पु.काळे ह्यांचे हे पुस्तक. कथा-कादंबरी वगैरे कोणत्याही प्रचलित साहित्यप्रकारात बदलता येणारे नसले तरी वपुस्पर्श झालेला हा वैविध्यपूर्ण लेखनगुच्छ असा आहे की वाचकांनी भरभरून दाद दिल्याने गेल्या बावीस वर्षांत त्यांचे सतरा वेळा पुन:पुन्हा मुद्रण करावे लागले आहे. एकाचा दुसर्याशी संबंध नसलेल्या तरीही त्यांच्यात एक धागा असलेल्या अनेक ढंगी परिच्छेदांची सुरेख गुंफण ह्या पुस्तकात गुंफण्यात आली आहे. त्यामुळेच आपल्या इच्छेनुसार हाताला लागेल ते पान उघडावे आणि त्या पानावरील लिखाणात मग ती एखादी छोटीशी गोष्ट असो वा मोजक्या शब्दात सांगितलेला तो एक विचार असो रंगून जावे असे हे पुस्तक आहे. हा एक मुक्त आनंद आहे म्हणूनच त्याला शीर्षक-क्रमांक-संदर्भ वगैरेचे बंधन नाही.
-
Me Saayuri
एक कोळ्याची पोर अंगभूत सौंदर्य, हुशारीने बनली सुप्रसिद्ध जपानी गेशा! तिची ही आगळी वेगळी मोहमयी दुनिया! समुद्राकाठच्या खेड्यात स्वच्छ - बागडणारी कोळ्याची पोर चियोचान.... दुर्दैवाला शरण गेलेला तिचा बाप तिला नवव्या वर्षी विकतो आणि ती येऊन पडते गेशा बाजारात. जिथे मुलींच्या मनाचं, शरीराचं शेवटच्या कणापर्यंत शोषण करून त्याची किंमत वसूल केली जाते. तिथे अतोनात कष्ट, अवहेलना, छळ, उपासमार यांचा सामना करता करता अंगभूत सौंदर्य, हुशारी आणि नशिबाची साथ यांच्या जोरावर वयाच्या तिशीपर्यंत ती प्रसिद्ध गेशा सायूरी म्हणून थेट न्यूयॉर्कमधल्या एका टी-हाऊसची मालकीण कशी बनते, याची ही कथा. सांगण्याच्या ओघात इतरही अनेकजणां च्या कहाण्या सायूरी सांगत राहते.हे सगळं घडत असताना आपल्या बहिणीबद्दलची आंतरिक ओढ, निसर्गप्रेम, स्वत:पेक्षा ३१ वर्षांनी मोठ्या असलेल्या चेअरमनबद्दलची उत्कट प्रीतिभावना अशी तिच्या भावनांची आंदोलने व त्यातून स्वत:चा शोध घ्यायचा प्रयत्न हे सगळं एखाद्या कवितेसारखं वाचकांवर गारूड करतं. जपानमधलं सांस्कृतिक जीवन, -दददुसर्या महायुद्धाचे भीषण परिणाम, पिढ्यान पिढ्या चपखल योजनाबद्ध, तरीही गुप्तपणे चालू राहिलेली रात्रीच्या फुलपाखरांची ही मोहमयी दुनिया; हे अनोळखी विश्व आपल्याला थक्क करून सोडतं!
-
Vaastu Ajit
चार वेद, अठरा पुराणे, कुराण, बायबल इ. ग्रंथांचा वास्तुशास्त्रीय अर्क या ग्रंथात आहे. आधुनिक वास्तु बांधताना येणार्या समस्यांचे निराकरण, समाधान या ग्रंथात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तिथी, वार, नक्षत्र, करण, योग या पंचअंगांचा, आयाचा तौलनिक अभ्यास करून या ग्रंथानुसार सर्व सोयींनी युक्त आदर्श वास्तु निर्माण करता येतात. स्वतंत्र बंगले, संपूर्ण प्रोजेक्ट स्कीम, रो हाऊसेस, अपार्टमेंटस् यांच्या सचित्र रंगीत परस्पेक्टीव्ह ड्रॉइग्जनी युक्त हा ग्रंथ आहे. महानगरपालिका मंजूर नकाशा प्लॅन, एस्टीमेट, बारचार्ट ते आर.सी.सी. स्ट्रक्चरल ड्रॉईग्ज इ.चा अंतर्भाव असलेल्या या ग्रंथानुसार कमीत कमी पैशात, कमीत कमी वेळेत वास्तु, स्वतंत्र बंगले, अपार्टमेंटस्, रो हाऊसेस बांधता येतात. औद्योगिक कारखाने, दुकानगाळे, बेसमेंट कशी असावीत? याची शास्त्रीय, सचित्र, परिपूर्ण माहिती या ग्रंथात आहे. सर्वसामान्य व्यक्तीला कोणत्याही विदिशा, कट, वाढलेले कोपरे असलेल्या प्लॉटवर आपल्या ऐपतीनुसार, बजेटनुसार वौदिक व आधुनिक वास्तु बांधण्याचा आनंद मिळविता येतो. शेतक-यांना योग्य प्रकारे शेती करून अधिकाधिक उत्पन्न मिळविता येते. पाकगृह, शौचालय, स्नानगृह, निद्रागृह, बौठकगृह अशासारख्या उपयुक्त वास्तु प्रकरणात वास्तुविभागांचे व तेथील कर्माचे सूक्ष्म बारकावे, त्याची शास्त्रीय मिमांसा, साधक बाधक तत्त्वे यांची सविस्तर व नाविन्यपूर्ण सचित्र माहिती मिळते. हा ग्रंथ धार्मिक विधीविधान, वेदोपनिषदे, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र व सायन्स टेक्नॉलॉजी तसेच बांधकामातील विविध टप्पे या सर्व गोष्टींवर प्रकाश टाकणारा आहे. स्वर्णपॉलिशयुक्त वौदिक वास्तुदोष निवारक यंत्रे, रत्ने, दुर्लभ ज्योतिषीय सामग्रीची रंगीत छायाचित्रेही या ग्रंथात आहेत. ग्रंथातील सर्व प्रकरणे प्रत्येक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींकडून, तज्ज्ञांकडून तपासून घेतलेली आहेत. शेती, कारखाना, दुकाने, भाड्याचे घर यामध्ये वास्तुशास्त्रानुसार योग्य ते बदल करून कुटुंबाला ऐश्वर्यसंपन्नता, यश, सन्मान, कीर्ती, मानसिक शांती व निरोगी प्रकृती लाभावी. भारत पुन्हा एकदा सुजलाम् सुफलाम् सस्यशामलाम् सामथ्र्यशाली व समृद्ध व्हावा. हीच श्री लक्ष्मी नारायणाच्या चरणी प्रार्थना.
-
Yayaati (ययाति)
कै. विष्णु सखाराम तथा भाऊसाहेब खांडेकर यांच्या एकूण साहित्यकृतींच्या रत्नमाळेतील 'ययाति'चे स्थान मेरुमण्यासारखे आहे.या कादंबरीचा पुराणाशी केवळ नावापुरता संबंध नाही. एका प्रसिद्ध पौराणिक उपाख्यानाचे धागेदोरे घेऊन ते त्यांनी या कादंबरीत स्वतंत्र रीतीने गुंफले आहेत.आपल्या प्रतिभेची जात, तिची शक्ती आणि तिच्या मर्यादा यांची योग्य जाणीव झालेल्या खांडेकरांनी आत्माविष्काराला योग्य अशीच कथा निवडली. ती ज्या माध्यमातून त्यांना प्रगट व्हावीशी वाटली, त्याच्यावर त्यांचे प्रभुत्व होतेच. पुराणकथांत जे भव्य-भीषण संघर्ष आढळतात, त्यांचे मंथन करण्याची अंगभूत शक्तीही त्यांच्या चिंतनात होती. जीवन जसे एका दृष्टीने क्षणभंगुर आहे, तसेच ते दुसर्या दृष्टीने चिरंतन आहे; ते जितके भौतिक आहे, तितकेच आत्मिक आहे, या कठोर सत्याचे आकलनही त्यांना पूर्णत्वाने झालेले होते.त्यामुळेच एका पौराणिक कथेच्या आधाराने एक सर्वोत्तम ललितकृती कशी निर्माण करता येते, याचा आदर्श वस्तुपाठच 'ययाति'च्या रूपाने श्री. खांडेकरांनी वाचकांपुढे ठेवला आहे.कामुक, लंपट, सप्नातही ज्याला संयम ठाऊक नाही, असा ययाति; अहंकारी, महत्त्वाकांक्षी; मनात दंश धरणारी आणि प्रेमभंगाने अंतरंगात द्विधा झालेली देवयानी; स्वत:च्या सुखाच्यापलीकडे सहज पाहणारी आणि ययातिवर शरीरसुखाच्या, वासनातृप्तीच्या पलीकडच्या प्रेमाचा वर्षाव करणारी शर्मिष्ठा आणि निरपेक्ष प्रेम हाच ज्याचा स्वभावधर्म होऊन बसला आहे, असा विचारी, संयमी व ध्येयवादी कच या चार प्रमुख पात्रांमधील परस्परप्रेमाची विविध स्वरूपे या कादंबरीत समर्थपणे चित्रित झाली आहेत. "ही कादंबरी ययातीची कामकथा आहे, देवयानीची संसारकथा आहे. शर्मिष्ठेची प्रेमकथा आहे आणि कचाची भक्तिगाथा आहे, हे लक्षात घेऊन वाचकांनी ती वाचावी," अशी अपेक्षा स्वत: खांडेकरांनीच प्रकटपणे व्यक्त केली आहे.
-
Chaugheejani (चौघीजणी)
लुइसा मे अल्कॉट या ख्यातनाम अमेरिकन लेखिकेची 'लिटल् वुईमेन’ ही कादंबरी १८६८ साली प्रथम प्रकाशित झाली. प्रसिद्धीबरोबरच तिला अभूतपूर्व लोकप्रियता लाभली. अनेक भाषांमधून ती अनुवादित झाली आहे. हॉलिवुडने तिच्यावर दोन वेळा चित्रपटही काढले आहेत. 'लिटल् वुईमेन’ ही अमेरिकेतल्या 'मार्च’ कुटुंबाची - विशेषत: त्यातल्या मेग, ज्यो, बेथ आणि ऍमी या चार बहिणींची कहाणी आहे. या व्यक्तिरेखा लेखिकेने आपण व आपल्या बहिणी यांच्यावरूनच बहुतांशी रंगवल्या आहेत. शेजारचे वृद्ध लॉरेन्स आजोबा आणि त्यांचा देखणा प्रेमळ नातू लॉरी यांनी या कथेत आणखी अनोखे रंग भरले आहेत. हे एक अतिशय हृद्य आणि विलोभनीय असे कुटुंबचित्र आहे. एकमेकींपासून स्वभावाने अगदी वेगळ्या असलेल्या मार्च बहिणींचे परस्परांवरील उत्कट प्रेम, त्यांच्या आशा-आकांक्षा, कोवळी सुखदु:खे, भविष्याची स्वप्ने यांचे हे कधी विनोदी, तर कधी हृदयस्पर्शी असे चित्रण आपल्या साध्या सच्चेपणामुळे वाचकाला थेट अखेरपर्यंत गुंतवून ठेवते..."
-
Sahajtechya Traasachi Suruvaat
मला बघणा-याला मी थिजल्यासारखा दिसेनही कदाचित. बायका आणि सिगारेट... त्यात पुन्हा माझीच बायको !... पुन्हा शिव्याच... पुढं काय करू ! शिव्या किती वेळ घालणार ? मी तसाच बसतो. बायको माझ्याकडं बघून सिगारेट विझवते आणि स्वयंपाकघरात निघून जाते... मी शिव्या थांबवतो आणि थिजलेल्या अवस्थेतून बाहेर येऊन आरामखुर्चीत नीट बसून स्वत:लाच विचारतो, की एवढं मनाला का लावून घ्यायचं ? माझी बायको गॅसवर कुकर ठेवताना बघून मला प्रेम दाटून आलं, कारण नकळतपणे तिनं माझं मनातलं ठामपण गोंजारलं... तीच बायको सिगारेट ओढते... आणि... मला माझ्या मनातल्या ठामपणाला प्रश्न विचारायला लावते. आता आला ना त्रास ! आता जमलं बघा त्रासाचं बरोबर आणि सहजपणे !
-
Aaplya Purvjanche Vidnyan
आजच्या विज्ञानयुगाची किमया केवळ अफाट आणि पावलोपावली अचंबित करणारी... या सा-यांची मुळं जरा खणून पाहिली, हजारो-शेकडो वर्षांच्या इतिहासाची पानं खोलवर चाळून पाहिली आणि भूतकाळातल्या शृंखलांना एक-एक जोडून पाहिलं तर समजून येतं की, पूर्वजांच्या ज्ञानार्जनाचं आणि सखोल संशोधनाचंच फलित मिरवतोय आपण... एकंदरीतच, आजच्या विज्ञानयुगाची अलौकिक बीजं पूर्वजांनीच खोलवर रुजवलीत. याच अद्भुत शोधांचा कालौघात लुप्त झालेल्या सांस्कृतिक मूल्यांचा माहितीपूर्ण खजिना!
-
Aandhala Nyaay
काही वेळेला अचानक झालेले गुन्हे तर काही वेळेला निव्वळ पैशासाठी, बाईसाठी नियोजन करून केलेले गुन्हे; पण गुन्हेगाराने कितीही शिताफीने गुन्हा लपविण्याचा प्रयत्न केला तरी काही ना काही खूण मागे उरतेच, जी त्याला पकडून देऊ शकते. पण पोलीस जर निरलस आणि कर्तव्यबुद्धीने तपास करतील तर समाजासाठी ती प्रगतीशील गोष्ट होईल. ए.सी.पी. निखील साने आणि त्यांचे सहकारी ज्या तडफदारपणे आणि चिकाटीने गुन्ह्याच्या आणि गुन्हेगारांच्या मुळाशी पोहोचतात, ते वाचताना वाचक रंगून जाईल. अशाच काही गुन्ह्यांच्या व गुन्हेगारांच्या तपासाच्या या मनोवेधक कथा.
-
State Of Fear
वाढत्या औद्योगिकीकरणामुळे वातावरणात कार्बन डायआॅक्साइड वायू वाढून पृथ्वीचं तापमान वाढतंय. त्यामुळे बर्फ वितळून सागरांची पातळी वाढणार. पृथ्वीचं तापमान वाढल्यामुळे महापूर, चक्रीवादळं, दुष्काळ, ढगफुटी अशी संकटं वाढू लागली आहेत. हे सारं जगाला पटवण्यासाठी NERF या पर्यावरणवादी स्वयंसेवी संस्थेनं कॅलिफोर्नियात एक जागतिक परिषद आयोजित केलेली आहे. NERF कडे निधीची कमतरता आहे. संकटांचा धोका किती मोठा आहे हे पटवण्यासाठी पर्यावरणवादाचे दहशतवादी समर्थक पॅसिफिक महासागरात पाण्याखाली स्फोट घडवून आणतात. तिथे निर्माण झालेली सुनामीची लाट ताशी आठशे किलोमीटर वेगानं कॅलिफोर्नियाच्या दिशेनं सरकू लागली आहे...
-
Aasud
या कथासंग्रहातून अशोक कोळी यांनी खानदेशाच्या शेतकी जीवनाची सर्वांगीण व्यथा आणि कथा महात्मा फुलेंच्या वास्तवशैलीचा वारसा स्वीकारुन अत्यंत उत्कटपणे चित्रित केली आहे. शेतीच्या वर्तमान अवस्थेचे व शेतक-यांच्या भीषण जगण्याचे सशक्तपणे चित्रण करणारी त्यांची कथा तिच्या आविष्कारशील बोली भाषेमुळे ग्रामीण कथेचे नवे वळण किती समृद्ध आहे, त्याचे दर्शन घडविणारी आहे. एकविसाव्या शतकातील पहिल्या दशकाच्या मराठी ग्रामीण कथेतील 'शेती' आणि 'बळीराजा' यांच्या प्रश्नांकडे पाहण्याची वेगळी दृष्टी असलेल्या अशोक कोळी यांचा हा कथासंग्रह. यातील कथा शेतीच्या प्रश्नांची उकल करताना संघर्षाला आंदोलनाचे नवे परिमाण देतात. शोषणव्यवस्थेवर 'आसूड' फटकारतात. आजच्या खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाच्या छायेतून आलेल्या शोषणाच्या नवनव्या रूपांना छेद देत कथाकाराची लेखणी सामाजिक वास्तवाचा जळजळीत आविष्कार करते आणि व्यवस्थेचा बळी ठरलेल्या कष्टकरी माणसाला अंतर्बाह्य हलवून सोडते. शेतकर्याच्या दुबळ्या मनोवृत्तीला आत्मशोधातून संघर्षाचे आत्मभान देण्याचे सामर्थ्य या लेखणीत आहे. शेतकर्याला स्वत:चे प्रश्न स्वत: सोडविता आले पाहिजेत, याची ओढ या कथाकाराला आहे. या कथांची शीर्षके, व्यक्तिरेखा, त्यांचा नैसर्गिक रांगडेपणा, अंतरंगाची प्रांजळता हे सर्व विविध वृत्ती-प्रवृत्तींनी प्रकट होणारे आहे. कथाकाराने ते मुद्दाम जीवनानुभूतीतून जसेच्या तसे ठसकेबाजपणे टिपलेले आहे. कथेला वास्तव रूप देण्याची हातोटी, बोलीतील रांगडे संवाद, शब्द व त्याचे अर्थवैभव, मातीशी नातं सांगणारी भाषाशैली ! हा सारा आविष्कार लेखकाच्या स्वतंत्र प्रतिभेची साक्ष देणारा आहे.
-
The Hungry Spirit
एकीकडे जगातील एकतृतीयांश कामगार बेकार आहेत, तर त्याच वेळी दुसरीकडे जगाच्या एकूण व्यापाराच्या दोनतृतीयांश व्यापार फक्त 500 कंपन्यांच्या हातांत आहे आणि या कंपन्या केवळ त्यांच्या गुंतवणूकदारांनाच उत्तरं देण्यास बांधील आहेत. या विषमता आणि अनिश्चिततेच्या पाश्र्वभूमीवर, बाजारपेठेला अभिमुख भांडवलशाहीच्या मूल्यांपेक्षा अधिक चिरंतन आणि समृद्ध मूल्यं असणारं भविष्य निर्माण करण्याची गरज चार्ल्स हॅन्डी अतिशय कळकळीनं मांडतात. 'द हंग्री स्पिरिट' हे एक प्रेरणादायी पुस्तक आहे. या पुस्तकात लेखकाच्या व्यक्तिगत विचारांची तीव्रता तर जाणवतेच, पण काही वेळा ते आपल्याही विचारांना चालना देतं आणि मुख्यत: त्यात आशावाद ठासून भरलेला आहे. हे पुस्तक जिथे कुठे वाचलं जाईल, तिथे मतभेद आणि वादविवाद नक्कीच उफाळून येतील. "पुन्हा एकदा चार्ल्स हॅन्डी - द हंग्री स्पिरिट म्हणजे आयुष्यभराच्या अनुभवांचं सार आहे. भांडवलशाही समाजामध्ये कशी तग धरायची, याची ही एक व्यक्तिगत पद्धत आहे. हॅन्डी यांची शैली गोष्टीरूपानं विचार मांडण्याची असल्यामुळे पुस्तक खूपच वाचनीय झालं आहे आणि त्यांची विद्वत्ता प्रत्येक पानावर दिसून येते. हे एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे.'" - पीपल मॅनेजमेंट. "द हंग्री स्पिरिट हा उद्योग-व्यापार संबंधित तसेच सामाजिक समस्यांचा एक विस्तृत शोध आहे. या समस्यांचं हे एक चतुर, विद्वत्तापूर्ण आणि विवेकी विश्लेषण आहे." - मॉडर्न मॅनेजमेंट "चार्ल्स हॅन्डी हे ब्रिटनचे एकमेव जागतिक दर्जाचे व्यवस्थापन गुरू आहेत." - डायरेक्टर मासिक. चार्ल्स हॅन्डी हे एक लेखक आणि नभोवाणी तसेच दूरचित्रवाणीवरचे नामांकित वक्ते आहेत. जगभर त्यांच्या पुस्तकांच्या दहा लाखांहून जास्त प्रती खपल्या आहेत.