-
Jyacha Tyacha Everest (ज्याचं त्यांचं एव्हरेस्ट )
ज्याचं त्यांचं एव्हरेस्ट हिमालय अनेकांना वेड लावतो . का? कसं ? एव्हरेस्ट सारखं अत्युच्च शिखर सर केल्यानंतरही गिर्यारोहकांची पावलं पुनःपुन्हा हिमालयाकडे का वळतात ? सत्य घटनेवर आधारित कादंबरी!
-
Savashna(सवाष्ण)
लाकडी नक्षीकामानं सजलेल्या, पण आता जीर्ण झालेल्या ऐसपैस दरवाजात, त्या वाड्याच्या उंबऱ्यात पाऊल घोटाळतंय. इथल्या घरधनिणीनं सालंकृत पावलांनी इथेच माप ओलांडलं असेल का? अंगणानं ओंजळीत रांगोळीची नक्षी घेऊन वाट पाहिली असेल का त्या मंगल क्षणाची...? आता तो सगळा दिमाख ओसरलाय... कोनाड्यातलं देवघर... आत डोकावलं तर मिणमिणत्या उजेडात आश्वस्त करणारी पितळी मूर्त कुणाची? अंधाऱ्या जिन्यातून जाताना वाटलं, कितीतरी पैंजण आपल्या स्वारींची वाट पाहत अगतिक थांबले असतील का? मोठ्ठा चौक. त्यात एक तोंडापर्यंत पुरलेला रांजण. त्यातल्या अंधाराच्या पोटात हरवलेत का या वाड्यातले चैतन्यस्वर? का? काय घडलं असं? मनाला साखळदंडासारखे लोंबकळत असलेले अनुत्तरित प्रश्न. त्यांचं ओझं घेऊन मला निघावं लागतंय. कधी होईल का या रहस्यांचा उलगडा? माझ्या प्रश्नांची कालकुपीत दडलेली उत्तरं, इतिहासपुरुषा, तुला माहीत असतील का रे?
-
Made In China(मेड इन चायना)
आपला शेजार आपल्याला बदलता येत नाही. गेली अनेक शतकं आपला शेजारी असलेल्या चीनबरोबरचे आपले संबंध विलक्षण गुंतागुंतीचे. विशेषत: माओंच्या कारकिर्दीत झालेल्या १९६२ च्या युद्धानंतर हे संबंध चांगलेच ताणले गेले. वास्तविक आजचा चीन आणि माओंचा चीन यात जमीन - अस्मानाचा फरक. साम्यवादाचं नाव लावणाऱ्या चीनमध्ये आज प्रत्यक्षात प्रारूप आहे ‘नियंत्रित-भांडवलशाही’चं. चीन जितका आधुनिक, तितकाच ऐतिहासिकही. आधुनिकतेच्या महामार्गावर वेगाने पुढे जाताना एखाद्या वळणावर आपली प्राचीनता सोडून द्यावी, असं चीनच्या कोणत्याही सत्ताधीशाला वाटलेलं नाही, मग ते माओ असोत, डेंग असोत वा आजचे क्षी जिनपिंग. हे असे विसंवाद वागवत वागवत पुढे जाणं हे चीनच्या रक्तातच असावं. आजही भारताबरोबरचा संघर्ष असेल वा अमेरिकेशी स्पर्धा- चिनी सत्ताधीश आपली धोरणं ठरवताना इतिहासात दडलेल्या सूत्रांचा आधार घेत असतात. हे चकित करणारं विलक्षण चिनी प्रारूप समजावून देणारं
-
Inka Chi Devdari (इंका ची देवदरी)
इंका संस्कृती : गूढ, रहस्यमय, अनाकलनीय.दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठे पाचशे वर्षांचे साम्राज्य. स्वत:ला सूर्यपुत्र समजणारी, निसर्गाला देव मानणारी, सोन्याचांदीच्या ढिगामध्ये लोळणारी, दोNयाच्या गाठी मारून संदेश पाठवणारी,शेकडो टनांचे पाषाणखंड कापून अगम्य, अवाढव्य बांधकामे करणारी.पंधराव्या शतकात स्पॅनिश आक्रमकांनी इंका साम्राज्य धुळीस मिळवले, नंतरच्या चारशे वषांत इंका संस्कृती हळूहळू नष्ट झाली.पण एके दिवशी स्पॅनिशांच्या तावडीतून वाचलेले इंकांचे ‘गुप्त’ शहर सापडले –‘माचूपिच्चू’ !अवघे विश्व चकित झाले, पाषाणखंड हळूहळू बोलके झाले,‘इंका’चा सप्तरंगी झेंडा गौरवाने आकाशात फडकायला लागला,सोने लुटून संपले होते, पण अजस्र पाषाणखंडांना सोन्याचे मोल आले,त्याचीच ही कहाणी
-
New Zealand Sathi Bharat Sodtana (न्यूझीलंडसाठी भा
न्यूझीलंड या देशाची लोकसंख्या खूपच कमी असल्यामुळे न्यूझीलंड सरकारने परदेशी नागरिकांना स्थलांतरासाठी त्यांचे दरवाजे खुले केले. त्यामुळे गेल्या ५/६ वर्षांत भारतीयांचा ओघ अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, पश्चिम आशियामधल्या देशांऐवजी न्यूझीलंडकडे वळला. न्यूझीलंडला स्थलांतर करण्याचा विचार करणा-यांना त्यांच्या निर्णयप्रक्रियेत मदत म्हणून व ज्यांचा हा निर्णय पक्का झाला आहे, त्यांना प्रस्थानापूर्वीची पूर्वतयारी म्हणून, हे पुस्तक खचितच उपयुक्त ठरेल.
-
Aale Vartan Aapla Mendu(आपले वर्तन आपला मेंदू )
आपल्या मेंदूवर अवलंबून असते आपले वर्तन आणि आपल्या वर्तनाने आपला मेंदूही बदलू शकतो. मानवी वर्तन अनेक चलपदांवर (variables) आधारित असते. त्यातील सर्वांत महत्त्वाची चलपदे म्हणजे भावभावना. या अमूर्त भावभावना कोट्यवधी वर्षे उत्क्रांत झाल्या आहेत. अशा अमूर्त गोष्टींचा शोधविचार तत्त्वज्ञान, धर्म, ईश्वरशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, साहित्य, कला या सर्वांनी केला आहे आणि करतही आहेत. अलीकडच्या काळात प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करून मानवी वर्तनावर प्रकाश टाकण्याचे काम विज्ञानानेही अंगावर घेतले आहे. विज्ञानाच्या या शाखेला वर्तनविज्ञान (Ethology) म्हणतात. जसजसा मेंदूविज्ञानाचा आणि त्याला पूरक व पोषक जैवतंत्रज्ञानाचा विकास होत गेला, तसतसा संशोधनाचा दिशाकोन बदलत गेला. मानवी भावभावनांची आणि पर्यायाने मानवी वर्तनाची पाळेमुळे मेंदूत असली पाहिजेत, या विज्ञानाच्या विचारधारेला बळकटी आली. मेंदूविज्ञानाबद्दल कुतूहल जागृत करणारे आपले वर्तन आपला मेंदू
-
Priy Palak (प्रिय पालक)
मुलांचं अडनिडं वय, हा पालकांचा परीक्षेचा काळ! मुलांना स्वत:ची मतं पुâटतात, आणि ती समजून घेताना, पालकांना घाम पुâटतो. पालकांना वाटणारी आस्था, ही मुलांच्या दृष्टीनं लुडबूड! पालकांनी केलेल्या सूचना, ही मुलांच्या नजरेत हुकुमशाही! संवादासाठी सुरु केलेलं बोलणं, हमखास विसंवादाचं वळण घेतं. हा तिढा सोडवायचा कसा? प्रक्रिया सोपी नाहीच, पण प्रयत्नसाध्य नक्की आहे. त्यासाठी सादर आहे, प्रिय पालक एका बालरोगतज्ज्ञ समुपदेशिकेचे अनुभवाचे बोल...
-
Bandivan (बंदिवान)
नजरवैâदेत जन्म. बिनखिडकीच्या छोट्याशा खोलीत वावर. छतावरच्या काचेच्या कौलातून दिसणारा आकाशाचा तुकडा - एवढेच बाह्यजगताचे दर्शन. पळवून, अज्ञातवासात ठेवलेली तरुण आई - एवढीच काय ती साथ-संगत. टी.व्ही.वर दिसणाNया वस्तू, झाडे, प्राणी, पक्षी ह्या केवळ पडद्यावरच्या काल्पनिक गोष्टी - हीच दृढ समजूत. ...पण एक दिवस अचानक, आपल्या वापरातल्या वस्तू टी.व्ही.वरपण दिसतात, हे या पाच वर्षांच्या बंदिवानाला कळते आणि... त्याचे भावविश्व उलटे-पालटे होते. त्याची बंदिवान आई हादरते आणि निर्धार करते... आता काहीही करून येथून निसटायचेच... त्यांच्या नजरवैâदेची व्यथा आणि सुटकेची वास्तवकथा म्हणजे बंदिवान पण पाच वर्षांच्या मुलाच्या नजरेतून उलगडणारी!
-
Kahur Eka Vadalache (काहूर एका वादळाचे)
ही कादंबरी वर्तमान राजकारणाच्या वास्तवाला सोलून काढते. स्वातंत्र्योत्तर राजकारण स्वप्नाळू होते, पण विषाक्त नव्हते. विद्यमान राजकारण हे जातीजातींत, धर्माधर्मांत तंटे-बखेडे निर्माण करणारे आणि अराजकतेच्या दिशेने वेगाने जाणारे आहे. त्यामुळे देश अन् समाजाच्या एकसंधतेला तडे जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. असे राजकारण भयावह होण्याची शक्यता बळावते. अभिव्यक्ती अन् मतस्वातंत्र्य नाकारले जाणे, ही हुकूमशाहीच्या पावलांची नांदी असू शकते. राजकुमार बडोले यांनी विद्यमान राजकीय पट सिद्धहस्त लेखकाच्या प्रज्ञेने मांडला आहे. प्रज्ञावंत हा जुलमी व्यवस्थेचा कधीही बटीक नसतो. मानवाच्या मुक्तीचे हुंकार त्याच्या अभिव्यक्तीत असतात. मानवी प्रतिष्ठेची जोपासना ही त्याची अभिलाषा असते. मनुष्याचे स्वयंभूत्व ही त्याची प्रार्थना असते. ही कादंबरी मानवमुक्तीचा गजर करते. राजकुमार बडोले यांनी प्रत्यक्षपणे अनुभवलेले सत्ताकारण आणि सामान्य माणसाला जाणवणारी भारतीय व महाराष्ट्रीय राजकारणाविषयीची संवेदनशून्यता ठसठशीतपणे या कादंबरीतून व्यक्त होते. डॉ. ऋषीकेश कांबळे
-
So Cool Tek 2 (सो कूल टेक २)
सोनाली कुलकर्णी एक गुणी अभिनेत्री आहे.. या विधानानंतर स्वल्पविराम येत नाही, अर्धविराम किंवा पूर्णविरामही नाही.. येतात ती दोन टिंबं.. दोन टिंबं ही सोनालीची नुसती लेखनशैली नाही, तर ओळख आहे ! तिच्या लिखाणाला पूर्णविराम फारसे मंजूर नसावेत.. म्हणूनच पाठोपाठ दुसरं टिंब येत असावं.. पुढे नेणारं ! दोन टिंबांमधूनही तिला काहीतरी सांगायचं असतं.. सोनाली उघड्या डोळ्यांनी जग पाहताना माणसांना वाचते आणि शब्दांतून त्यांची व्यक्तिचित्रं रेखाटते. तिची अक्षरं वाचकांशी बोलतात.. त्या अक्षरांना लेन्स असते आणि वाचाही ! अशा संवेदनशील आणि संवादोत्सुक अभिनेत्रीला रंगभूमीवर आणि पडद्यावर पाहण्या-ऐकण्याएवढंच ‘वाचणं'ही किती लोभस असू शकतं, याचं उदाहरण म्हणजे सो कुल टेक 2
-
Seeta (सीता)
सीतामाते, एक खचलेली, दीनवाणी अबला भेटेल, अशा भ्रमात मी होतो. मला भेटली एक कणखर करारी स्त्री!' ही हनुमंताला दिसलेली सीता... आणि लक्ष्मण र्मूिच्छत पडल्यावर - या साNया महायुद्धाला आपला सुवर्णमृगाचा मोह कारणीभूत ठरला, असं वाटून ‘पार्वतीमाते, एक वेळ मला श्रीरामाच्या आयुष्यातून वजा कर, पण लक्ष्मणाचे प्राण वाचव...' असा विलाप करणारी सीता... खरंच, कशी होती सीता? विचारी आणि खंबीर? की हतबल आणि भावुक? नियतीची बळी ही सीतेबद्दलची धारणा खरी, की रामरक्षेतलं तिचं ‘सीताशक्ति:' हे रूप खरं? महर्षी वाल्मिकींनी चितारलेल्या सीतेच्या विविध प्रतिमांचा समृद्ध वेध घेणारी अभिराम भडकमकर यांची कादंबरी
-
Kalokhatun Ujedakade (काळोखातून उजेडाकडे)
इंजिनीयर होण्याची महत्त्वाकांक्षा पुरी करण्याची जिद्द. तत्त्वांशी तडजोड न करण्याची सचोटी. मिंधेपणा अव्हेरणारा स्वाभिमान. या बळावरच त्यांनी लढा दिला व्यवस्थेतील भ्रष्ट मानसिकतेविरुद्ध. आजही ही लढाई सुरूच आहे. आपल्या सहप्रवाशांच्या सहकार्याने ही भ्रष्ट मानसिकता कधी ना कधी नष्ट होईल, असा आशावाद जागवणारे आत्मकथन.
-
Fakiri Ek Anghad Pravas (फकिरी एक अनघड प्रवास)
पडल्या - झडलेल्या आणि तुटक्या फाटक्या माणसाला अडचणीतून मार्ग दाखवण्यासाठी दिशाहीन वा नाउमेद झालेल्या तरुणाईला पुढे चालावेसे वाटेल, मार्ग निघत जाईल, जीवन बदलत जाईल असा पुढील पिढ्यांना दिलासा मिळेल या विश्वासातून केलेला अनघड प्रवास.
-
Tantra Mukti (तंत्र मुक्ती)
माणूस प्राचीन काळापासून साधी-सोपी-हलकी-श्रमाधारित अशी अनेक तंत्रं जीवनाच्या सर्व क्षेत्रांत वापरत आहे. पण अठराव्या शतकातल्या ‘औद्योगिक क्रांती’मुळे ऊर्जांचं अन् त्यामुळे तंत्रांचंही स्वरूप पूर्णपणे पालटलं. त्यांची क्षमता, वेग, आवाका, सफाई, अवजडपणा, गुंतागुंत हे सर्व वाढतच गेलं. केवळ ‘यांत्रिक’ न राहता ती चहू अंगांनी विस्तारली : इतकी की, आज आपल्याभोवती एक ‘तंत्रावरण’ तयार झालेलं आहे. अशा आधुनिक तंत्रांचे अनेकानेक लाभ आपण पावलोपावली आणि क्षणोक्षणी उपभोगतो आहोत. पण, या साNया तांत्रिक प्रगतीची आपण किती भयंकर किंमत मोजतो आहोत ! वास्तव असं आहे की, आधुनिक तंत्रांच्या लाभांपेक्षा, विविध स्तरांवर त्यांच्या बदल्यात मोजाव्या लागणाऱ्या थेट वा अप्रत्यक्ष किमती खूप खूप अधिक आहेत. Homo technicus बनल्यामुळे आपलं त्यांच्याकडे दुर्लक्ष होतंय. अशा आधुनिक तंत्रांचं विविध निकषांवर कठोर परीक्षण करून त्यांची घातकता दाखवून देणारं हे पुस्तक : ‘समुचित’ तंत्रांच्या संयमित वापराकडे जाण्याची आवश्यकता प्रतिपादन करणारं. तंत्र : मुक्ती
-
Kashmiriyat (काश्मिरीयत)
काश्मीरमधील भारत-पाकिस्तान सीमा म्हणजे जगातील सर्वात अशांत आंतरराष्ट्रीय सीमारेषांपैकी एक. या सीमारेषेवरील प्रत्यक्ष परिस्थिती आणि जनजीवन जाणून घेण्यासाठी एक मध्यमवर्गीय स्त्री एकटीने प्रवास करण्याचा निर्णय घेते. इतकेच नाही तर या प्रवासात अत्यंत गरजेपुरतेच सामान आणि पैसे जवळ ठेवते. तिचा भरवसा आहे सामान्य काश्मिरी माणसाच्या चांगुलपणावर आणि मानवतेच्या मूल्यांवर. कसा घडला तिचा हा प्रवास? या प्रवासात तिला आलेल्या अनुभवांनी तिचा भरवसा भंगला की मजबूत झाला? ‘पृथ्वीवरील स्वर्ग’ असे सार्थ वर्णन असलेल्या काश्मीरमधील निसर्गसौंदर्य, आलेल्या पाहुण्याची घरच्यासारखी ‘मेहमाननवाजी’ करणारी काश्मिरी कुटुंबे, सीमारेषेच्या अलिकडे काय किंवा पलिकडे काय, सारख्याच जीवनाला सामोरे जाणारे जनसामान्य यांचे प्रत्ययकारी दर्शन घडवणारी सीमेवरच्या एकल प्रवासाची सत्यकथा –
-
Kafkacha Metamorphosis (काफ्काचं 'मेटॅमॉर्फोसिस')
फ्रांझ काफ्का हा विसाव्या शतकातील एक महत्त्वाचा लेखक. त्याच्या ‘मेटॅमॉर्फोसिस’चे भाषांतर उपलब्ध करून द्यावे, याकरता डॉ. सुहास भास्कर जोशी हे अभिनंदनास पात्र आहेत. त्यांनी केलेले भाषांतर सुबोध आहे. मूळ कथेची आकृती आणि प्रकृती भाषांतरात उत्तम रीतीने आली आहे. प्रस्तुत भाषांतर मराठी वाचकांना एका अपूर्व व महान साहित्यकृतीच्या वाचनाचे समाधान देणारे आहे. याशिवाय या ग्रंथात काफ्काचा जीवनपट आणि त्याचे लेखन, ‘मेटॅमॉर्फोसिस’चे आस्वादक विश्लेषण, त्याच्याशी नाते सांगणाNया साहित्यकृतींचा परामर्श यांचा समावेश केलेला आहे. थोडक्यात, या ग्रंथाचा पैस मोठा आहे. ग्रंथाच्या शेवटी सुहास भास्कर जोशी म्हणतात, ‘काफ्का आणि आणि ‘मेटॅमॉर्फोसिस’ला मरण नाही, किंबहुना ‘मेटॅमॉर्फोसिस’चे गारूड अजूनही कमी झालेले नाही. सुहास जोशींनी अत्यंत परिश्रम घेऊन हे गारूड मराठी वाचकांसमोर उभे केले
-
Mi Sakha Meghdoot (मी सखा मेघदूत)
कविकुलगुरू कालिदासाचे ‘मेघदूत’ हे खंडकाव्य म्हणजे अभिजात गीर्वाणभाषेचा एक अनुपम अलंकार! पत्नीच्या विरहाने व्याकुळलेल्या यक्षाने आपला संदेश घेऊन एका मेघालाच रामगिरीहून अलकानगरीकडे जाण्याची विनवणी केली. यक्षाने या आपल्या दूताला त्याच्या प्रस्तावित प्रवासपथाचे वाटेतल्या सार्याा खाणाखुणांसकट मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे हा मेघदूत अलकानगरीला पोहोचला का? त्याला ती यक्षपत्नी भेटली का? तिने या दूताकडे आपल्या पतीसाठी-यक्षासाठी काही सांगावा धाडला का? या सार्यांवची उत्तरे सांगत आहेत हर्षदा पंडित. कालिदासाच्या ‘मेघदूता’चा जणू ‘सिक्वेल’ म्हणजे – मी सखा मेघदूत
-
Ek Zunj Gongatashi (एक झुंज गोंगाटाशी)
हा गोंगाट म्हणजे केवळ ध्वनिप्रदूषण नाही. ही झुंज केवळ ध्वनिप्रदूषणाशी नाही. अतिक्रमणं करणार्याप आणि जमिनी बळकावणार्या लँडमाफिया, राजकारणी, उद्योजक अन् नोकरशहा यांच्या अभद्र युतीशीही समांतरपणे द्यावा लागलेला लढा म्हणजे ही झुंज. ध्वनिप्रदूषणाविरोधात न्यायालयीन लढे देणार्याो वैद्यकीय व्यावसायिकाचं रूपांतर सजग, कृतिशील लढवय्यात कसं झालं, हा प्रवास उलगडणारी –
-
Aarthik Gunhegariche Antarang (आर्थिक गुन्हेगारीचे
दुनिया झुकती है, बस झुकानेवाला चाहिये! या म्हणीचा तंतोतंत अनुभव आपल्याला दिला नीरव मोदी, मेहुल चोक्सी, हर्षद मेहता, केतन पारेख अशा वैâक महाठगांनी आणि एन्रॉन, व्हिडिओकॉन, आयएल अँड एफएस अशा लबाड कंपन्यांनी. सत्यम कॉम्प्युटर्सचा रामलिंग राजू : एकेकाळचा ‘सिकंदराबादचा बिल गेट्स' अन् तेलगू अस्मितेचं प्रतीक, स्वत:च्याच कंपनीत फ्रॉड करून तुरुंगात गेला! कसे घडतात हे आर्थिक घोटाळे? कसे सापडतात त्यांचे सूत्रधार? आर्थिक गुन्ह्यांचं गुंतागुंतीचं विश्व सोप्या भाषेत उलगडून दाखवलंय, शोधक वृत्तीच्या नि भेदक नजरेच्या एका तरुण फोरेन्सिक ऑडिटरनं...