-
Peshavai Maharashtrachya Itihasatil Ek Suvarnpan ( पेशवाई महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपान)
महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सोनेरी पान असलेल्या पेशवाईचा प्रवास कौस्तुभ कस्तुरे यांनी या पुस्तकात मांडला आहे. 'पेशवाईतले अत्यंत गौरवाचे, अभिमानाचे आणि राष्ट्राला अत्यंत उपयोगी असे घडले, ते अभ्यासपूर्ण पद्धतीने इतिहासपंडितांनी सविस्तर सांगयला हवे,' अशी गरज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली आहे. हाच धागा कस्तुरे यांच्या या पुस्तकात दिसतो. पेशवाईतील पराक्रम, मुत्सद्देगिरी त्यातून दिसते. पेशव्यांच्या लढाया, व्यूहरचना अद्वितीय अश्या होत्या. त्याचे वर्णन पुस्तकात आले आहे. बाळाजी विश्वनाथ भट यांच्यापासून सूरु झालेला हा प्रवास पेशवाईच्या अस्तापर्यंत येऊन पोहोचतो. या पुस्तकामुळे पेशवाईसंबंधात पसरलेले अनेक गैरसमज दूर होण्यास मदत होते. पुस्तकात मोडी लिपीत उपलब्ध कागदपत्रे, छत्रपती व पेशवे यांच्या मुद्रा आदींचाही समावेश आहे.
-
Saiyyad Haidar Raza Eka Pratibhavant Chitrakaracha Pravas (सैय्यद हैदर रझा एका प्रतिभावंत चित्रकाराचा प्रवास)
आधुनिक चित्रकलेला आपल्या 'बिंदू'तून एक नवा आयाम देणारे आणि त्याद्वारे कलाविचारांमधली स्वतःची स्वाभाविक आणि उपजत भारतीयता आंतरराष्ट्रीय स्तरावर साकार करणारे ज्येष्ठ चित्रकार सय्यद हैदर रझा यांचे यशोधरा डालमिया यांनी इंग्रजीतून चरित्रलेखन केले. दीपक घारे यांनी रझा यांच्या या चरित्राचा मराठी अनुवाद केला असून तो पॉप्युलर प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे.
-
Aambedkari Aai (आंबेडकरी आई)
'आंबेडकरी आई' या संपादित ग्रंथातून आंबेडकरी विचार व आचार याचा उद्बोधक सांधा जोडण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या मुलींना व मुलांना शिकविण्यासाठी केलेला संघर्ष व त्याग याचा लेखाजोखा या ग्रंथात रेखाटला आहे. आंबेडकरी विचारात सर्वच आयांना प्रेरित करण्याचे वैचारिक व नैतिक सामर्थ्य आहे हे दिग्दर्शित केले आहे. डॉ. गोपाळ गुरू निसर्गाला देव मानणाऱ्या लोकसंस्कृतीला, स्त्रीला सन्मान देणाऱ्या मातृसत्ताक सिंधुसंस्कृतीला गाडून या देशात देव-दैवाला केंद्रीभूत मानणारी विषमतावादी पितृसत्ताक धर्मसंस्कृती रुजवली गेली, त्याला पहिला विरोध तथागत गौतम बुद्धानी केला आणि सांस्कृतिक परिवर्तनाचा पाया रचला. त्यानंतर ही देवकेंद्री नवससंस्कृती नाकारणारी एक परंपराच या देशात हजारो वर्षांपासून सुरू राहिली. बुद्ध-कबीर-शाहू-फुले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत ही परंपरा सांगता येते. म्हणूनच या संपूर्ण परंपरेला घेऊन उभ्या राहिलेल्या समतावादी-विज्ञानवादी तत्त्वज्ञानाची 'आंबेडकरी तत्त्वज्ञान' या नावाने ओळख देता येते. तर या अर्थाने हे तत्त्वज्ञान स्वीकारणारी आणि आपल्या मुलांना त्या मार्गावरून चालण्याची शिकवण देणारी आई ही 'आंबेडकरी आई' होय. ही आई कुठल्याही जाती-धर्माच्या समूहातील असू शकते. पहिल्या पिढीत हे आंबेडकरी तत्त्वज्ञान स्वीकारणारी पूर्वाश्रमीच्या महार सोडून इतर कुठल्याही जातीतील स्त्री सहसा दिसत नव्हती, तरी दुसऱ्या तिसऱ्या आणि आताच्या चौथ्या पिढीत हे तत्त्वज्ञान स्वीकारणाऱ्या इतर जाती-धर्मातील अनेक स्त्रिया दिसताहेत. याही ग्रंथामध्ये बौद्ध समुदायाबरोबरच चर्मकार, मराठा आणि ओबीसी समूहातील स्त्रिया आहेत, ज्यांना आईने किंवा आईसमान सासूने आंबेडकरी संस्कार देऊन घडविलेले आहे. - प्रा. आशालता कांबळे पूर्वश्रमीच्या अस्पृश्य मानल्या गेलेल्या स्त्रीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धम्मदीक्षेनंतर, हजारो शतकांच्या वेदनेतून मुक्त होत देव-देव्हारे, रूढी-परंपरा या साऱ्याला नकार देवून बुद्धांचा मार्ग निष्ठेने स्वीकारला आणि ती संविधानसंस्कृतीची पांथःस्थ झाली. डॉ. बाबासाहेबानी दिलेल्या 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' या मूलमंत्राला काळजाशी घट्ट धरत तिने प्रचंड दारिद्र्यात आणि कष्टातही आपल्या लेकरांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. हीच बहुसंख्य आंबेडकरी स्त्री सभा, संमेलने, मोर्चे, आंदोलने आणि उपोषणात गर्दीचा चेहरा होऊन चळवळीच्या समष्टीत पार मिसळून गेली होती. या आंबेडकरी चळवळीच्या पायाभरणीशी उभ्या असलेल्या, पण पडद्यामागे राहिलेल्या ४२ आयांच्या लेकींनी लिहिलेला हा सामाजिक-सांस्कृतिक-चरित्रात्मक दस्तावेज म्हणजेच 'आंबेडकरी आई' हे संपादन होय. डॉ. श्यामल गरुड
-
Sakha Nagjhira (सखा नागझिरा)
सखा नागझिरा हे एक प्रकारे किरण पुरंदरे यांचं जंगलात घालवलेल्या ४०० दिवसाचं आत्मचरित्रच आहे पण त्यात निसर्गातील सगळेच पात्र आहेत. एक निसर्गप्रेमी म्हणून प्रत्येकाने हे पुस्तक वाचायला हवे. हे आपल्याला निसर्गातील चालीरीती आणि एक प्रकारे आपण कोणत्याही जंगलात गेल्यावर कशा प्रकारचं आचरण केलं पाहिजे याचा बोध नक्की आपल्याला होतो.तसेच जंगलात आणि सभोवताली राहणाऱ्या लोकांचं आयुष्य कस असत याची सुद्धा मांडणी खूप चांगल्या प्रकारे लेखकाने या पुस्तकात केली आहे. पुस्तक वाचताना आपण त्या जंगलात फिरत असल्याचा भास आपल्याला होतो आणि एखादा शिकारी पक्षी किंवा शिकारी प्राणी बघितल्यावर त्यांना जेवढा आनंद होतो तेवढाच आपल्यालाही होतो.पुस्तकाबद्दल लिहायला खूप आहे पण पुरंदरेंनी पुस्तकात आपल्या काही भावना व्यक्त केल्या आहेत त्या प्रत्येक निसर्गप्रेमींच्या असतात किंवा असायला पाहिजे.
-
Marathi Rajyatale Marathiche Vartman (मराठी राज्यातले मराठीचे वर्तमान)
मराठी राज्यातले मराठीचे वर्तमान
-
Chatrapati Shivaji Maharaj - Smrutigranth (छत्रपती शिवाजीमहाराज - स्मृतिग्रंथ)
छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या बद्दल समग्र माहिती
-
Sange geeta (सांगे गीता)
* या पुस्तकात प्रत्येक अध्यायाचा गद्यात आणि पद्यात आशय मांडण्याचा, तोही प्रभावीपणे मांडण्याचा उपक्रम आशा भिडे यांनी 'सांगे गीता' या आपल्या पुस्तकात केला आहे. गीतेच्या जीवनोपयोगी तत्त्वज्ञानाचा तळागाळापर्यंत प्रचार नि प्रसार व्हायला हवा, या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी हा ग्रंथ लिहिला आणि त्याचबरोबर गीता प्रवचनाचा उपक्रमही आरंभला आहे. - लोकसत्ता * घरातल्या सर्वांसाठी 'गीता' तीही साध्या सरळ भाषेत सहज सुलभपद्यात व गद्यात लिहिण्याचे मोलाचे कार्य आशा भिडे यांनी केले आहे. मूळ गीतेशी प्रामाणिकपणा राखून पद्याची शब्द रचना करणे कठीण असते. परंतु आशा भिडे यांना ते सहज जमून गेल्याचे दिसते. गीता आधीचे पूर्वसूत्र व निवेदनही रसपरिपोषक व गीता इतकेच समर्पक आहे. गीता नंतर गीतेवर केलेले भाष्यही वाचनीय आणि मार्गदर्शक आहे. - तरुण भारत * 'सांगे गीता' या पुस्तकात लेखिका आशा भिडे यांनी अध्यायामधला मुख्य आशय गीतरुपाने मांडला असून नंतर सूरस विवेचन केले आहे. इतर देशात भगवंतांचे प्रेषित येतात पण आपल्या भारत देशात भगवंतच अवतरतात या सूत्राला अनुसरून संपूर्ण महाभारतातील श्रीकृष्णाचे गीतापर्व उलगडून दाखवले आहे. व यात नवसंजीवनी देणारे गीता तत्त्वज्ञान हे गीतासूक्त आपल्या अंतविश्वात चैतन्य निर्माण करणारे आहे. नवशक्ती ★ गीतेवर आजपर्यंत अनेक लेखकांनी लिहिले आहे. आशा भिडे यांचे सदर लेखन ही या गीता साहित्यातील महत्त्वाची भर म्हणावी लागेल. विनोबांनी गीताईतून समश्लोकी भाषांतर केले. त्यानंतरही इतरांनी असे भाषांतर केले परंतु अध्यायाचे सार सांगणाऱ्या कविता आजवर वाचनात नव्हत्या. म्हणूनच या कविता हा या ग्रंथाचा विशेष आहे. प्रत्येक गीता प्रेमी वाचकांच्या संग्रहात व शैक्षणिक ग्रंथालयात हा ग्रंथ असायलाच हवा. सन्मित्र * 'सर्व घराघरांसाठी, घरातील सर्वांसाठी' असे एखाद्या जाहिरातीत यावे तसे, परंतु अत्यंत सार्थपणे तसेच असणारे पुस्तक ही आजच्या काळाची गरज आहे. या लेखनाची आधीच्या कोणत्याही लेखनाशी तुलना करू नये. ज्ञानेश्वरी, गीताई यांचे मोठेपण मान्य असले तरी, म्हणूनच 'सांगे गीता'चे यथार्थ प्रकाशन झाले. सामाजिक प्रबोधनाचा योग्य मार्ग चोखाळला गेलाय, त्याबद्दल लेखिका आणि प्रकाशकांचे अभिनंदन - ललित
-
Unbroken (अनब्रोकन)
संदर्भातल्या ठळक बातम्या तुम्ही बाचल्या आहेत, अफवा ऐकल्या आहेत. या साऱ्यांच्या केंद्रस्थानी असलेल्या श्रीकडून आता ही कथा ऐका. दि. २५ ऑगस्ट २०१५. इंद्राणी मुखर्जीसाठी आनंदाचा दिवस होता. घरात वाढदिवसाची जय्यत तयारी झाली होती. त्या दिवशी 'आनंद आश्रम' इथून त्या बाहेर पडल्या, तेव्हा मुंबई पोलीस अधिकाऱ्यांच्या साध्या कपड्यांतल्या एका समूहाने त्यांना हटकलं आणि सारं चित्र बदललं. त्यांची मुलगी शीना बोरा हिच्या खुनाचा त्यांच्यावर आरोप होता. बातमी पसरून त्याबद्दलची अधिकाधिक माहिती उपलब्ध होऊ लागली. एका खळबळजनक खून खटल्याच्या तपासात इंद्राणी अडकल्या. संशयितांची यादी झपाट्याने वाढू लागली. एका भयंकर कारस्थानाची ती सुरुवात होती. बातमी सनसनाटी ठरणार होती प्रसारमाध्यमांना रक्ताचा वास आला होता. पाहता पाहता पत्रकार आणि टी. व्ही. अँकर यांच्या निष्ठठुर पकडीत इंद्राणी आल्या. त्यांचं नाव घराघरांत पोहोचलं. पोटच्या पोरीला ठार केल्याचा आरोप, मोडलेले विवाह, शक्तिशाली व्यावसायिक साम्राज्य, श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्तींचं हेवा करावंसं वाटणारं आयुष्य, सामर्थ्यशाली राजकारणी आणि गुंतागुंतीचं कुटुंब - सारंच होतं. खटला सुरू झाला. त्या संदर्भातल्या बातम्या आणि फोटो टी. व्ही. च्या पडद्यावरून देशाच्या कानाकोपऱ्यांत पोहोचले. उलटसुलट बातम्यांच्या आणि चक्रावून टाकणाऱ्या कथेच्या केंद्रस्थानी असणाऱ्या या स्त्रीबद्दल लोकांचं कुतूहल दिवसागणिक वाढू लागलं. 'अनब्रोकन' या स्मृतिप्रवासात इंद्राणीने हातचं काहीही राखलं नाही. त्यांचं बालपण गुवाहाटी इथे गेलं, १९९०च्या दशकात त्या कोलकात्यात राहिल्या. पुढे स्वप्ननगरी मुंबईत मीडियाने त्यांना उच्चासनावर बसवलं. त्यानंतर भायखळाच्या तुरुंगात 'कैदी नंबर १४६८' म्हणून त्यांनी २४६० दिवस व्यतीत केले. त्यांचा हा संपूर्ण प्रवास त्यांच्याच शब्दांत, अगदी पहिल्यांदा समोर येत आहे. अत्यंत प्रामाणिकपणे कथन केलेल्या या स्मृतिप्रवासात इंद्राणी मानवी नातेसंबंधांच्या नाजूकपणाबद्दल, फसवणूक आणि शोक यांमुळे वाट्याला येणाऱ्या उद्ध्वस्त झालेल्या जीवनाबद्दल आणि माणसाच्या एकंदरीत काटक लवचीकतेबद्दल बोलतात. इतकं सारं घडूनही त्यांच्यातली स्त्री आजही मोडून पडलेली नाही, आजही ती आहे अभंग अनब्रोकन !