-
Unbroken (अनब्रोकन)
संदर्भातल्या ठळक बातम्या तुम्ही बाचल्या आहेत, अफवा ऐकल्या आहेत. या साऱ्यांच्या केंद्रस्थानी असलेल्या श्रीकडून आता ही कथा ऐका. दि. २५ ऑगस्ट २०१५. इंद्राणी मुखर्जीसाठी आनंदाचा दिवस होता. घरात वाढदिवसाची जय्यत तयारी झाली होती. त्या दिवशी 'आनंद आश्रम' इथून त्या बाहेर पडल्या, तेव्हा मुंबई पोलीस अधिकाऱ्यांच्या साध्या कपड्यांतल्या एका समूहाने त्यांना हटकलं आणि सारं चित्र बदललं. त्यांची मुलगी शीना बोरा हिच्या खुनाचा त्यांच्यावर आरोप होता. बातमी पसरून त्याबद्दलची अधिकाधिक माहिती उपलब्ध होऊ लागली. एका खळबळजनक खून खटल्याच्या तपासात इंद्राणी अडकल्या. संशयितांची यादी झपाट्याने वाढू लागली. एका भयंकर कारस्थानाची ती सुरुवात होती. बातमी सनसनाटी ठरणार होती प्रसारमाध्यमांना रक्ताचा वास आला होता. पाहता पाहता पत्रकार आणि टी. व्ही. अँकर यांच्या निष्ठठुर पकडीत इंद्राणी आल्या. त्यांचं नाव घराघरांत पोहोचलं. पोटच्या पोरीला ठार केल्याचा आरोप, मोडलेले विवाह, शक्तिशाली व्यावसायिक साम्राज्य, श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्तींचं हेवा करावंसं वाटणारं आयुष्य, सामर्थ्यशाली राजकारणी आणि गुंतागुंतीचं कुटुंब - सारंच होतं. खटला सुरू झाला. त्या संदर्भातल्या बातम्या आणि फोटो टी. व्ही. च्या पडद्यावरून देशाच्या कानाकोपऱ्यांत पोहोचले. उलटसुलट बातम्यांच्या आणि चक्रावून टाकणाऱ्या कथेच्या केंद्रस्थानी असणाऱ्या या स्त्रीबद्दल लोकांचं कुतूहल दिवसागणिक वाढू लागलं. 'अनब्रोकन' या स्मृतिप्रवासात इंद्राणीने हातचं काहीही राखलं नाही. त्यांचं बालपण गुवाहाटी इथे गेलं, १९९०च्या दशकात त्या कोलकात्यात राहिल्या. पुढे स्वप्ननगरी मुंबईत मीडियाने त्यांना उच्चासनावर बसवलं. त्यानंतर भायखळाच्या तुरुंगात 'कैदी नंबर १४६८' म्हणून त्यांनी २४६० दिवस व्यतीत केले. त्यांचा हा संपूर्ण प्रवास त्यांच्याच शब्दांत, अगदी पहिल्यांदा समोर येत आहे. अत्यंत प्रामाणिकपणे कथन केलेल्या या स्मृतिप्रवासात इंद्राणी मानवी नातेसंबंधांच्या नाजूकपणाबद्दल, फसवणूक आणि शोक यांमुळे वाट्याला येणाऱ्या उद्ध्वस्त झालेल्या जीवनाबद्दल आणि माणसाच्या एकंदरीत काटक लवचीकतेबद्दल बोलतात. इतकं सारं घडूनही त्यांच्यातली स्त्री आजही मोडून पडलेली नाही, आजही ती आहे अभंग अनब्रोकन !
-
Pratyaksha Tatvamasi (प्रत्यक्ष तत्वमसि)
२०१५ मध्ये जेव्हा आय.एस.आय.एस. या अतिरेकी संघटनेने मोसूल शहरातल्या सरकारी ग्रंथालयातील अनेक दुर्मिळ आणि ऐतिहासिक हस्तलिखितांचा लिलाव केला. तेव्हा जगभरातील सरकारी संस्था, गुप्तचर संस्था, संग्रहालये आणि खाजगी संग्राहक रोमांचित झाले. लिलाव झालेल्या हस्तलिखितांमध्ये १८व्या शतकातल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्याच्या नोंदी होत्या. त्यात अब्जावधी डॉलर्स किमतीच्या ऐतिहासिक कलाकृतीचे आणि युद्धाची निर्णायक स्थिती बदलू शकणाऱ्या घातक शस्त्राचे वर्णन होते. तसेच जनुकीय अभियांत्रिकीच्या सूत्रांचे वर्णन करणारे सुद्धा एक हस्तलिखित होते. जगातील अनेक संस्थांना माहीत होते की ह्या हस्तलिखितातली कलाकृती अस्तित्वात आहे. त्या सर्व संस्थांना वेगवेगळ्या वेळी 'इम्रीस ओल्डमन' नावाच्या एका व्यक्तीने मदत केलेली असते. आणि तिथून सुरू होतो इम्रीस ओल्डमन या व्यक्तीचा शोध. हा इम्रीस ओल्डमन नक्की कोण ? पृथ्वीराज चौहान, समुद्रगुप्त, महाराजा रणजित सिंग यांच्यासारख्या महान राजांनी आणि बाबर, औरंगजेब, नादीर शाह, अहमद शाह अब्दाली यांच्यासारख्या आक्रमणकर्त्यांनी आणि अगदी ब्रिटिशांनीही पाठलाग केलेली ती ऐतिहासिक वस्तू कोणती ? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधणारी ही कथा म्हणजे 'प्रत्यक्षं तत्त्वमसि'.
-
American Savidhan British Prerana Aani American Navinya (अमेरिकन संविधान ब्रिटिश प्रेरणा आणि अमेरिकन नावीन्य)
अमेरिकेचे संविधान हे पहिले लिखित संविधान आहे. अमेरिकेच्या संविधान संकल्पनेचा विकास कसा होत गेला? भारतीय संविधान संकल्पनेशी त्याचा काय संबंध आहे, हे या पुस्तकातून संविधाननाचे अभ्यासक रमेश पतंगे यांनी अगदी सध्या आणि सोप्या भाषेत मांडण्यात आले आहे.
-
Aadvatechi Pustak (आडवाटेची पुस्तके)
Aadwatechi Pustak । आडवाटेची पुस्तकं,Nikhilesh Chitre | निखिलेश चित्रे,Marathi Book
-
Baki Kahi Nahi (बाकी काही नाही)
मुक्तछंद, वृत्तबंध आणि गझल या विविध प्रकारच्या कविता ‘बाकी काही नाही’ या काव्यसंग्रहात कवी किरण वेताळ यांनी अगदी सहजपणे, ओघवत्या शैलीत मांडल्या आहेत. मुक्त कविता, गणवृत्त कविता, मात्रावृत्त कविता, अभंग, अष्टाक्षरी, षडाक्षरी, ओळकाव्य, साखळी काव्य, सुनीत, लावणी, घनाक्षरी काव्य, फटका, गीत, गझल अशी विविध सुगंधी फुले या काव्यसंग्रहात कवीने उत्स्फूर्तपणे मांडली आहेत. इतके सारे विविध काव्यप्रकार एकाच पुस्तकात असणे हे या काव्यसंग्रहाचे वैशिष्ठ्य आहे. या संग्रहात दोन विभाग केले आहेत. ‘किरणोत्सव’ या विभागात ५१ छंदोमय कविता आहेत. दुसऱ्या ‘इर्षाद’ विभागात ५० गझल रचना आहेत. अशी एकूण १०१ कवितांची अद्भुत भेट कवी किरण वेताळ यांनी रसिक वाचकांना दिली आहे. कवीविषयी : कवी किरण ज्ञानदेव वेताळ हे सध्या पुण्यात राहत असून, त्यांनी बीई सिव्हिल केले आहे. ‘बासरी’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह असून ‘बाकी काही नाही’ हा दुसरा काव्यसंग्रह आहे. काव्यलेखन, वाचन, भटकंती, सायकलिंग ही त्यांचे छंद आहेत. त्यांना अनेक काव्यलेखन स्पर्धेत पारितोषिके मिळाली आहेत. तसेच विविध साहित्यिक कार्यक्रमांना त्यांनी स्वतःच्या कविता, गझल सादर केल्या आहेत.
-
Raktatuni Vahe (रक्तातुनी वाहे)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध, कबीर, फुले यांना गुरुस्थानी मानल्यामुळे त्यांच्या जीवनात आलेल्या असंख्य अडथळ्यांवर त्यांना यशस्वीपणे मात करता आली. मुळातच डॉ. आंबेडकर हे अलौकिक बुद्धिमत्तेचे धनी होते. बुद्धिमत्तेच्या जोडीला या तिन्ही गुरुजनांचे मनस्वी आशीर्वाद लाभल्याने त्यांना आपल्या बुद्धिमत्तेचा वापर समस्त गोरगरिबांच्या कल्याणासाठी व राष्ट्रहितासाठी नेमका करता आला. त्यांचे तेजस्वी कार्य आज जगभरात गौरविले जात आहे. जुन्या पिढीतील लोकांचे ते आदर्श तर होतेच, पण नवीन पिढीसाठी आदर्शासोबतच ते मुख्य प्रेरणास्रोतही बनले आहेत. ही नवीन पिढी त्यांना आपला गुरू मानून उज्ज्वल भवितव्याकडे वाटचाल करताना दिसत आहे. आंबेडकरी विचारांचा हा समर्थ वारसा असाच एका पिढीतून दुसऱ्या पिढीत व दुसऱ्या पिढीतून तिसऱ्या पिढीत झिरपत रहावा यासाठी किशोर मेढे 'रक्तातुनी वाहे' या पुस्तकातील लेखांमधून बाबासाहेबांच्या जीवन- कार्यांच्या काही महत्त्वाच्या पैलूंचा आणि एकूणच आंबेडकरी विचारधारेशी संबंधित असणाऱ्या अनेक विषयांचा सव्यसाची धांडोळा घेतात. या लेखांबरोबरच सुप्रसिद्ध गीतकार गुलजारांच्या त्यांनी मराठीत अनुवादित केलेल्या काही कविता, अमृता प्रितम आणि इमरोज यांचे त्यांनी अनुवादित केलेले काही लेख देखील या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहेत. अशा वैविध्याने नटलेले हे पुस्तक वाचकांना भुरळ घातल्याशिवाय राहणार नाही.
-
Sad Sagarachi Ratnagiri Ganpatipule Pawas (साद सागराची – रत्नागिरी गणपतीपुळे पावस)
साद सागराची – रत्नागिरी,गणपतीपुळे,पावस
-
Sad Sagarachi – Dapoli Murud Harne Dabhol (साद सागराची-दापोली,मुरुड)
दापोली/मुरुड/कर्दे /हर्णे /आंजर्ले /केळशी /लाडघर /कोळथरे /दाभोळ
-
Yuddha Nakaranare Jag (युद्ध नाकारणारे जग)
युद्धाला द्यायला हवा ठाम नकार... जगाला संघर्षांनी वेढलेले असताना युद्ध आणि शांतता यांचा सम्यक विचार करणार्या या पुस्तकाचे महत्त्व अजोड आहे. संदीप वासलेकर हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विचारवंत, ऑक्सफर्डचे स्कॉलर आणि ‘एका दिशेचा शोध' या १३ वर्षांत २५ आवृत्त्या निघालेल्या राजहंसी पुस्तकाचे लेखक आहेत. युद्धांमागील राजकारण, प्राणघातक शस्त्रास्त्रांच्या शर्यती, अतिरेकी राष्ट्रवादाचे दुष्परिणाम यांचा उदाहरणांसह परखड उहापोह या पुस्तकात वाचायला मिळेल. मानवी संस्कृती व सभ्यता यांच्या विनाशाची शक्यता संहारक युद्धांमुळे वाढत चालली आहे, हे सत्य सुस्पष्टपणे मांडले आहे. सर्वनाश टाळायचा तर मानवी समाजाने एकत्र येऊन आणि राजकीय नेत्यांना बाजूला ठेवून ठामपणे युद्धांना नकार दिला पाहिजे, असा लेखकांचा निष्कर्ष आहे. त्यासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी, तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान आणि इतिहास यांचा योग्य परामर्श घेतला आहे. युद्ध हा मानवजातीचा नैसर्गिक गुणधर्म नाही. शांतता व युद्ध यातून शांततेची निवड करण्याची मुभा आपल्याला आहे, असे हे पुस्तक ठामपणे बजावते. एकीकडे धोक्याचा इशारा आणि दुसरीकडे विचारांना चालना हे त्याचे वैशिष्ट्य.
-
Patrapatri (पत्रापत्री)
आपल्या आजूबाजूच्या घटनांचा तिरकस लेखणीतून घेतलेला वेध... हे या पत्रापत्रीचं स्वरूप. तात्यासाहेब आणि माधवराव या जोडगोळीच्या साहाय्याने दिलीप प्रभावळकर हा पत्रप्रपंच मांडतात. यात कधी या दोघांचा रशियावारीतला पराक्रम हसवतो; तर कधी आफ्रिकावारीतले 'उद्योग' हसू आणतात. याच पत्रांतून कधी आयपीएलवरचं भाष्य समोर येतं, तर कधी होर्डिंग्जच्या सुळसुळाटासंबंधीचं तिरकस मत.. तात्कालिक घटनांकडे पाहण्याचा प्रभावळकरांचा मिस्कीलपणा आणि या जोडगोळीची धम्माल यासाठी वाचावं असं ...