-
Kanya Zali Ho (कन्या झाली हो)
भारतीय समाजाने स्त्रियांवर हजारो वर्षे अनन्वित अत्याचार केले. याविरूद्ध राजाराम मोहनरॉय, महात्मा फुले वगैरेंनी आवाज उठवला आणि स्त्रियांच्या प्रगतीचा मार्ग हळूहळू मोकळा होत गेला. मात्र विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात असं लक्षात आलं की स्त्रियांवर अन्याय फक्त भारतातच होतात असं नाही, युरोप/अमेरिकासारखे प्रगत देशसुद्धा याला अपवाद नाहीत. ही वस्तुस्थिती लक्षात घेत संयुक्त राष्ट्रसंघाने १९७५-१९८५ हे 'स्त्रीमुक्तीचे दशक' म्हणून घोषित केले. यामुळे स्त्रीमुक्तीला जागतिक आयाम प्राप्त झाला. याचे जगभर परिणाम झाले तसेच पडसाद उमटले. असेच पडसाद मुंबईच्या उपनगरात राहणाऱ्या, एका विवाहित, मध्यमवयीन, लेकुरवाळ्या, ब्राह्मणेतर, प्राथमिक शाळेत शिकवत असलेल्या स्त्रीच्या जीवनात उमटले. स्त्रीमुक्तीच्या या जागतिक वाऱ्यांनी तिच्या आयुष्याची दिशाच बदलली. त्याची ही कहाणी.
-
Bharat Pakistan yudha -1965(भारत पाकिस्तान युद्ध -१९६५ )
1965 साली झालेलं भारत पाकिस्तान युद्ध इस्लामिक स्टेट ऑफ पाकिस्तानने भारतीयांवर लागलेल्या अनेक युद्धांपैकी एक युद्ध होतं. या युद्धात आपल्या सेना दलाने अत्यंत पराक्रम आणि सर्वोच्च बलिदान करून लष्करी विजय मिळवला. भारतीयांचं मनोबलही काही पटीने उंचावण्यास हातभार लागला हे त्रिवार सत्य आहे. त्यावेळी पंतप्रधान असलेल्या आदरणीय लाल बहादूर शास्त्रीजी आणि संरक्षण मंत्री असलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी पाकिस्तानी इस्लामिक स्टेट च्या सशस्त्र आक्रमणाला सशस्त्र प्रतिकाराने उत्तर देण्याचा निर्णय घेतला हेही उत्तमच झाले. त्याच 1965 च्या युद्धाची तोंड ओळख करून देण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे. सर्वांच्या संग्रही असावे असे हे ५७६ पानी पुस्तक.
-
Jungle Lor Aani Tree Tops (जंगल लोर आणि ट्री टॉप्स)
आता माझ्यापासून वीस यार्डांवर एक वाघ उभा होता. त्याच्या त्या सुंदर, चमकदार त्वचेवर हिवाळ्यातलं ऊन पडून ती आणखी चमकत होती. असं छायाचित्र मिळवण्यासाठी मी एरवी कुठेही गेलो असतो आणि काहीही दिलं असतं. मी अनेकदा तासन्तास किंवा दिवसच्या दिवस वाघाच्या मागावर राहिलो आहे आणि तो दिसल्यावर रायफल उंचावून, काळजीपूर्वक नेम धरून ती तशीच खाली घेतली आहे. नंतर त्या वाघाचं लक्ष वेधून घेऊन, डोक्यावरची टोपी उचलून त्याला अभिवादन केलं आहे. मला त्याला पाहण्याचा मिळालेला आनंद मी या पद्धतीने व्यक्त केला आहे. रूढार्थाने ‘शिकारी’ असणार्या या माणसाचा प्रवास म्हणूनच शूटिंगपासून शूटिंगपर्यंत (शिकारीपासून चित्रीकरणापर्यंत) पोहोचल्याचं लक्षात येतं. शिकार करण्याने त्याला सावध, अभ्यासू आणि चिकित्सक केलं असलं, तरी हे सजगपण त्याला केवळ निसर्गाचा उपभोग घ्यायला शिकवत नाही... उलट ही त्याच्या निसर्गात विरघळत जाण्यासाठीची नांदी ठरते.
-
Buddhimatehun Adhik Mahatvachi Bhavnik Buddhimatta (बुद्धिमतेहून अधिक महत्वाची भावनिक बुद्धिमत्ता)
भावना जाणण्याची, मूल्यांकन करण्याची, व्यक्त करण्याची आणि नियंत्रित करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता (इक्यू). केवळ बौद्धिक क्षमता (आयक्यू) आयुष्यात यश मिळवण्यासाठी पुरेशी नाही. आयक्यू आणि इक्यू एकमेकांना पूरक ठरतात, तेव्हाच ते प्रभावी असतात. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे, भावनांना प्रभावीपणे समजून घेण्याची आणि त्यांचं व्यवस्थापन करण्याची क्षमता. कामाच्या ठिकाणी भावनिक बुद्धिमत्ता महत्त्वपूर्ण फायदे मिळवून देऊ शकते आणि अधिक चांगले संबंध निर्माण करण्यासाठी, तसंच सकारात्मक वातावरण-निर्मितीसाठी मदत करू शकते. भावनिक बुद्धिमत्ता महत्त्वाची आहे, कारण ती वैयक्तिक आणि व्यावसायिक असे दोन्ही प्रकारचे संबंध सुधारण्यासाठी मदत करू करते. सामाजिक गुंतागुंतीतून मार्ग काढण्यासाठी, नेतृत्व करण्यासाठी, करिअरमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी उच्च भावनिक बुद्धिमत्ता मदत करू शकते. सदर पुस्तकात लेखकाने मेंदूचं कार्य आणि त्यामागची भावनिक आणि तार्किक प्रक्रिया सोप्या शब्दांत मांडलेली आहे. तसंच भावनिक बुद्धिमत्तेचं संगोपन कसं करता येऊ शकतं आणि ती कशी वृद्धिगंत करता येऊ शकते, हे दाखवून दिलं आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात हमखास यश मिळवण्यासाठी सदर पुस्तक वाचकांना निश्चितच उपयुक्त ठरेल.
-
Manus Navacha Sundar Shilpa (माणूस नावाचं सुंदर शिल्प)
एक मानव जन्माला येतो. जसजशी त्याच्या शरीराची वाढ होते, तसतशी त्याच्या मनाची, बुद्धीची, भावनांची खोली आणि रुंदी वाढत जाते. त्याच्या वाढीला दिशा, रूप-रंग येत राहातात. पण त्या बुद्धी-भावनांच्या खोलीला, रुंदीला, रंगारूपाला, आणि त्याच्या कर्तृत्त्वाला सार्थकी लावण्यासाठी त्या मानवाला योग्य दिशेनं घडवण्याची आवश्यकता असते. तरच तो मानव या जगासाठी आणि स्वतःसाठी उपयुक्त होऊ शकतो. ही घडवण्याची क्रिया म्हणजे एखाद्या शिल्पकारानं घडवलेल्या एका सुंदर शिल्पाची प्रक्रियाच असते. आणि, मानवाच्या घडणीचे शिल्पकार म्हणजे त्याचे जन्मदाते आईवडील, शिक्षक (गुरू), समाज आणि तो मानव स्वतः. एक नवजात बालक कच्च्या मातीच्या खंडाप्रमाणे असतो, ज्यावर अनेक कलाकार वेगवेगळ्या प्रक्रिया करत असतात. त्या प्रक्रिया अखंड चालू असतात. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. ते मानवी शिल्प किती सुंदर घडतंय, यावर त्या मानवी जीवाचं सार्थक ठरतं. या घडणावळीचे पैलू अत्यंत गुंतागुंतीचे असतात. कधी एकमेकांना पूरक तर कधी परस्परविरोधी. या सगळ्या पैलूंचं विश्लेषण करणं गरजेचं आहे. तरच आपला समाज, मानवी क्षमता, संस्कृती आणि हे विश्व संतुलित राहू शकतील. हाच या पुस्तकाचा गाभा आहे.
-
Bhartiy Samaj Va Sanskruti (भारतीय समाज आणि संस्कृती)
भारतीय समाज आणि संस्कृती या ग्रंथात भारतीय समाजातील विविधता लक्षात घेऊन अनेक मुलभूत मुद्यांचा समावेश केला आहे. या ग्रंथात भारतीय समाजव्यवस्था व त्यातील विविध मुलभूत तत्वे, भारतीय संस्कृती, चार आश्रमव्यवस्था, पुरूषार्थ, कर्म सिद्धांत, जातीय संरचना व जातीच्या उत्पतीचे सिद्धांत, विवाहसंस्था व कुटुंबसंस्था या विश्लेषनाबरोबर भारतीय स्त्रिया आणि भारतीय सामाजिक जीवनावर इस्लाम आणि पाश्चात्य संस्कृतीचा पडलेल्या प्रभावाची विश्लेषनात्मक मांडणी करण्यात आली आहे. या ग्रंथात भारतीय समाजाचे सर्वागिंण दर्शन होईल. भारतीय समाजातील अनेक मुद्याचा समावेश करून विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक अशा सर्वाना उपयोगी सिद्ध होणारा हा महत्वपूर्ण ग्रंथ होय. समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थ्यांना हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल असा आम्हाला विश्वास वाटतो.
-
Bhartiy Lokshahi Arth Aani Vyavahar (भारतीय लोकशाही अर्थ आणि व्यवहार)
भारताने १९५० मध्ये लोकशाही संविधान स्वीकारले. मात्र भारताच्या एकूण राजकीय विचारविश्वात अजूनही एक शासनप्रकार म्हणून आणि राजकारण करण्याचा मार्ग म्हणून लोकशाहीविषयीचे वाद अस्तित्वात आहेतच. या वादांमधूनच लोकशाहीबद्दल विविध दावे-प्रतिदावे उभे राहिलेले दिसतात. या वादांचा आढावा घेणारा हा लेखसंग्रह आहे. इतर अनेक देशांमध्ये ज्या आव्हानांमुळे लोकशाही व्यवस्था कोलमडल्या त्याच आव्हानांना तोंड देत भारतात लोकशाही टिकून राहिली. हे कसे शक्य झाले याचा आढावा या लेखसंग्रहातील लेख घेतात. लोकशाही व्यवस्था लादली जाण्यापेक्षा संथपणे उत्क्रांत झाल्यामुळे काय फायदा होतो ते भारताच्या उदाहरणावरून दिसून येते. मात्र, काळाच्या ओघात टिकून राहतानाच, भारतीय लोकशाही आशयघन स्वरूप प्राप्त करू शकली का हा प्रश्न उरतोच. या प्रश्नांची चिकित्सा या पुस्तकात केलेली आहे. १९८० च्या दशकापासून सुरू झालेले आर्थिक बदल जनविरोधी आहेत, अशी टीका केली जाते. जातीयवाद, जमातवाद, भ्रष्टाचार, गुंडगिरी यांचा लोकशाही व्यवहारांवर दुष्परिणाम; परद्वेषावर आधारित जनसंघटनंामुळे लोकशाहीला नव-फॅसिस्ट स्वरूप येते, या सर्वांवर लक्ष वेधलेले आहे; आणि या सर्वांमुळे लोकशाही आशयघन बनवून खरोखर प्रातिनिधिक व सहभागप्रधान बनवण्याचे उद्दिष्ट दूर जाते असे म्हटले जाते. या पार्श्वभूमीवर या पुस्तकात राज्यशास्त्राचे भारतातील आघाडीचे अभ्यासक हे या संदर्भातल्या प्रश्नांकडे कसे पाहता येईल याविषयी मांडणी करतात. पहिल्या भागातील निबंध लोकशाहीच्या बहुविध अर्थांच्या संदर्भात ही चिकित्सा करतात तर दुसर्या भागात धर्मनिरपेक्षता, मागास जातींचे राजकारण, पक्षीय राजकारणातील अस्थिरता आणि सामाजिक चळवळींचा र्हास या चार संदर्भांत लोकशाही व्यवहारांची चिकित्सा केली आहे. सैद्धान्तिक मांडणी आणि अनुभवनिष्ठ संशोधने एकत्र आणून हा ग्रंथ भारतीय राजकारणाच्या अभ्यासकांना अभ्यासाची पुढील दिशा ठरविण्यासाठी साहाय्य करतो. तसेच विद्यार्थी, पत्रकार, कार्यकर्ते यांना भारतीय लोकशाहीचे अर्थ व व्यवहार यांच्याविषयी चिकित्सक परिचय करून देतो.
-
Ashtapailu Vyaktimatvasathi Samarth Ramadasanchi Shikavan (अष्टपैलू व्यक्तिमत्वाठी समर्थ रामदासांची शिकवण)
समर्थ रामदासांचा ‘दासबोध’ हा ग्रंथ अभ्यासून आत्ताच्या काळात उपयुक्त ठरतील अशा काही ओव्या निवडल्या आहेत आणि सदर पुस्तकात त्यांचे साध्यासोप्या भाषेत विवरण केले आहे. समकालीन उदाहरणे देऊन दासबोधात सांगितलेला विचार अधिक स्पष्ट केला आहे. मराठीमध्ये अनेक संतांचे उत्तमोत्तम ग्रंथ आहेत, परंतु रामदासांच्या साहित्याचे स्थान वेगळे आहे. रामदास केवळ ज्ञान सांगत नाहीत, तर सृष्टीतील ज्ञान आत्मसात कसे करावे, त्यासाठीची साधने कोणती, उत्तम ग्रंथांचा अभ्यास कसा करावा याही विषयी मार्गदर्शन करतात. विद्याभ्यासाला त्यांनी अनन्य महत्त्व दिले आहे. व्यावसायिक जीवनात उपयुक्त असणार्या वेळचे व्यवस्थापन, नेतृत्वकला, ताण-तणावांचे व्यवस्थापन, सकारात्मक दृष्टीकोन अशा अनेक विषयांवर दासबोधामध्ये विवेचन आहे. समर्थ रामदासांना आळस, निष्क्रियता, निराशा यांचा अगदी तिटकारा होता. प्रयत्नवाद, चतुराई, सारासार विचार यांवर त्यांचा भर होता. दासबोधामध्ये राजकारण, समाजकारण, चातुर्यलक्षण, लोकसंग्रह या महत्त्वाच्या विषयांवर तर विस्ताराने सांगितले आहेच, पण बोलावे कसे (कम्युनिकेशन स्कील्स), अक्षर कसे काढावे, वैयक्तिक स्वच्छता कशी राखावी इथपासून ते ज्ञानोपासना करणार्या व्यक्तीचा दिनक्रम कसा असावा इथपर्यंत विवेचन केले आहे. व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करून एक कार्यक्षम आणि यशस्वी आयुष्य जगण्यासाठी सदर पुस्तक वाचकांना निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास वाटतो.
-
Aajchya Divshi Itihasachya Pananmadhun (आजच्या दिवशी इतिहासाच्या पानांमधून)
"मानवी इतिहासाचे अवलोकन केल्यास सामान्य माणसांनी आंतरिक ऊर्मीतून केलेल्या कृतींमधून बहुतांश इतिहास रचला गेल्याचे लक्षात येते. शास्त्रज्ञांचे शोध, कलाकारांच्या कलाकृती, समाज सुधारणा, विविध खाद्यपदार्थांच्या निर्मितीमागील कथा अशाच आंतरिक ऊर्मीचे दर्शन घडवतात. ठरवून केलेले विक्षिप्त प्रवास आणि जीवावर बेततील अशी साहसे करणार्या व्यक्तीही आंतरिक ऊर्मीने पछाडलेल्या दिसतात आणि इतिहास घडत जातो. या सत्यकथांमधून माणसातील सहृदयतेचे दर्शन होत रहाते तर कधीकधी हिंस्त्र प्रवृत्तीही जाणवते. हजारो वर्षांच्या इतिहासातील ३६५ अनोख्या आणि वैविध्यपूर्ण सत्यकथांना आणि त्यांच्याशी निगडित असलेल्या इतिहास घडवणार्या व्यक्तिमत्वांना या पुस्तकातून लेखक र. कृ. कुलकर्णी यांनी प्रस्तुत केले आहे. या कथा वाचकांसाठी मनोरंजक आणि विचारप्रवर्तक ठरतील याविषयी खात्री वाटते."