-
Children Are From Heaven (चिल्ड्रेन आर फ्रॉम हेवन)
जच्या काळात पालक आणि मुलं यांच्या नात्यांमध्ये सतत येणारा दुरावा कमी करण्यासाठी आणि पालकांनी कसं स्वत:ला बदलावं - मुलांशी संवाद साधत कसं त्यांना सक्षम करावं याबद्दल मार्गदर्शन करणारं हे पुस्तक आहे. मुलांशी संवाद साधताना ‘करू शकशील का?’ ऐवजी ‘करशील का?’ असा उल्लेख करावा; पण त्याने नेमका काय बदल होतो ते विस्तृतपणे मांडताना लेखक सांगतात की, ‘करू शकशील का?’ यात कुठेतरी शंका दडलेली आहे; तर ‘करशील का?’ यात पाल्यापोटी विश्वास दिसून येतो. परंतु, इथेही पालकांनी स्वत:वरचा आत्मविश्वास ढळू न देणे - प्रत्येक क्षणी नमतं न घेणे - मुलांना सतत स्पष्टीकरण न देणे हे करावे. मुलांना काही परिपूर्ण पालकांची गरज नसते; पण त्यांना नक्की असे पालक हवे असतात जे प्रयत्नांची पराकाष्ठा करतील आणि आपल्या चुकांचे खापर दुसर्याच्या माथी न मारता त्यांची जबाबदारी स्वत:च घेतील. जेणेकरून पालकांचं अनुकरण करताना मुलं स्वत:च्या चुकांची जबाबदारी स्वत:च घेण्यास सक्षम होतील. हेच पुस्तक सांगते.
-
Bhishma Nirwan (भीष्म निर्वाण)
खोल अभ्यासपूर्ण , आधुनिक खगोलशास्त्राच्या ज्ञानाच्या पार्श्वभूमीवर महाभारत संहितेतील भीष्म निर्वाणाच्या संदर्भातील कालक्रम आणि खगोल शास्त्रीय पुरावे यांचे तपशीलवार विवेचन. भारतीय संस्कृती विषयी आस्था असणाऱ्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचावे आणि संग्रही ठेवावे. #परम #मित्र, #भारतीय संस्कृती #खगोलशास्त्र,#महाभारत, #श्रीकृष्ण #भीष्म, #इतिहास,#अभिजातभाषा,# मराठी,#पुस्तक,#वाचन पाने १७२, आकार ९"* ६"
-
Ajitdada Pawar Vichar Netrutva Aani Maharashtra (अजितदादा पवार विचार नेतृत्व आणि महाराष्ट्र)
अजित पवार साहेबांचे अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व आणि त्यांच्या शिस्तबद्ध कामाचा आढावा म्हणजेच हे पुस्तक,युवा पिढीला अजित दादांविषयी समजून घेण्यासाठी हे पुस्तक अत्यंत मार्गदर्शक आहे. नेतृत्व म्हणजे केवळ पद नाही, घोषणा नाही किंवा लोकप्रियतेचा क्षणही नाही. नेतृत्व म्हणजे निर्णय घेण्याचं धैर्य, त्या निर्णयांची किंमत स्वीकारण्याची तयारी आणि परिणामांशी प्रामाणिक राहण्याची शिस्त. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात अजितदादा पवार यांचं नेतृत्व या अर्थाने वेगळं ठरतं. गोंगाट न करता काम करणं, सत्ता साधन मानून प्रशासनाला दिशा देणं, आणि निर्णयांना वेग व परिणामांची जोड देणंही त्यांच्या कार्यशैलीची ओळख आहे. हे पुस्तक त्यांच्या प्रवासाकडे चरित्र म्हणून नव्हे, तर नेतृत्व आणि प्रशासनाचा अभ्यासग्रंथ म्हणून पाहतं. या ग्रंथाची आणखी एक महत्त्वाची बाजू म्हणजे शरद पवार साहेब आणि अजित दादा पवार यांच्यातील नेतृत्वपरंपरेचा सखोल वेध. दृष्टी आणि अंमलबजावणी, संयम आणि वेग, परंपरा आणि परिवर्तनया दोन वेगवेगळ्या शैली एकमेकांना विरोधी नाहीत, तर पूरक कशा ठरतात, हे पुस्तक स्पष्ट करतं. वाद, आरोप आणि तात्कालिक राजकीय गदारोळ बाजूला ठेवून, हे पुस्तक निर्णयप्रक्रिया, प्रशासनिक शिस्त, संकटातील भूमिका आणि विकासाच्या सातत्याचा अभ्यास मांडतं. सत्ता कशी प्रशासनात रूपांतरित होते, आणि प्रशासन कसं लोकांच्या आयुष्यात बदल घडवतेयाचं सखोल विश्लेषण या ग्रंथात आढळतं. राजकारणात रस असणाऱ्या वाचकांसाठीच नव्हे, तर प्रशासन, नेतृत्व, सार्वजनिक धोरण आणि व्यवस्थापन यांचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक महत्त्वाचं ठरतं. हे पुस्तक कुणाला पटवण्यासाठी नाही; ते विचार करायला लावण्यासाठी आहे.
-
Pakistan ka matlab kya? (पाकिस्तान का मतलब क्या?)
इस्लामी चेहऱ्याच्या पेचात आणि भारताविरोधात फसलेला देश. अस्मितेच्या वावटळीत फसलेल्या या देशाच्या आजवरच्या प्रवासाचा वेध.
-
Aalashipanach Manasshastra (आळशीपणाचं मानसशास्त्र)
वैमानिक व्हायचं असेल तर विमान कसं चालतं, हे आधी समजायला हवं. तसंच जगातील सगळ्यात शक्तिशाली गोष्ट म्हणजेच तुमचं मन. ते नियंत्रित करायचं असेल, तर त्याचं शास्त्र माहिती असायला हवं. • जगातील बहुतांश यशस्वी व्यक्तींसारखं तुम्हीही आठवड्याला १०० तास काम करू इच्छिता का ? • तुम्हाला सतत ऊर्जावान राहण्याची इच्छा आहे का? • कामात परिपूर्णता येण्याची तुम्ही वाट बघताय का? • तुम्ही कामात चालढकल करता का ? • तुम्ही नेहमीच आळस करता का ? • तुम्ही अजूनही ज्यावर काम करायला सुरुवात केली नाही अशी काही तुमची स्वप्नं आणि ध्येयं आहेत का ? असं असेल तर, हे पुस्तक तुमच्यासाठी जादूसारखं काम करेल. आधी लिहिल्या गेलेल्या गोष्टींवर लिहायला मला अजिबात आवडत नाही. हे पुस्तक तुम्हाला स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवण्याचं नवं सूत्र देईलच, आणि कामात चालढकल करणाऱ्यांसाठी तर हे पुस्तक वरदानच ठरेल!
-
Shuddha Buddha Kaya Tukobarayaa (शुद्ध बुद्ध काया तुकोबाराया)
कलावंतांनी शक्यतो भूमिका घ्यायचीच नाही, चुकून घेतलीच तर ‘हाही छान, तोही छान’ असा आशाळभूत बोटचेपेपणाच करायचा, असा लाचार काळ बोकाळला आहे. त्यात सुस्पष्ट आणि खणखणीत भूमिका घेऊन प्रसंगी सत्तेच्या विरोधात बेडरपणे उभा ठाकणारा, त्यासाठी पडेल ती किंमत मोजणारा, मेंदूगहाण ट्रोल्सच्या झुंडी अंगावर घेऊन साता समुद्रापार भिरकावून देणारा मराठीतला खराखुरा ‘अँग्री यंग मॅन’ म्हणजे किरण माने. नुसताच अभिनेता नाही, तर चौफेर टोलंदाजी करणारा फर्डा वक्ता आणि फेसबुकवरच्या एकेका पोस्टमधून लोकांना एकीकडे शब्दांच्या तालावर डोलवत दुसरीकडे त्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारा एक प्रखर सामाजिक भान बाळगणारा लेखक. आपल्या धडावर आपलंच डोकं बाळगणाऱ्या किरण मानेंची वैचारिक नाळ जुळली आहे ती आपल्या काळातील ‘अँग्री यंग मॅन’च असलेल्या, दांभिक व्यवस्थेवर शब्दांचे आसूड ओढणाऱ्या तुकोबारायांशी. म्हणूनच तुकोबांच्या एरवी सर्वपरिचित असलेल्या अभंगांचीही ओळख माने वेगळ्याच प्रकारे करून देतात. टाळकुटे, परमार्थी संत अशी सगळ्याच वारकरी संतांची मतलबी मांडणी करणाऱ्या पोटार्थी परंपरेला धुडकावून, या अभंगांवर झळझळीत प्रकाश टाकतात. ही तुकोबांची ‘शुद्ध बुद्ध काया’ रूप महाप्रतिमा उभी करणारी मांडणी तुकोबांच्या विद्रोही परंपरेचाच वारसा अभिमानाने पुढे चालवते आणि वाचकांना तुकोबाराया नव्याने भेटवते.
-
Steal Like An Artist (स्टील लाइक ॲन आर्टिस्ट)
सर्जनशीलतेला मुक्त करा. १) कलाकारासारखी चोरी करा. २) तुम्ही कोण आहात है समजेपर्यंत सुरुवात करायला थांबू नका. ३) तुम्हाला वाचायला आवडेल असं पुस्तक लिहा. ४) तुमच्या हातांचा वापर करा. ५) दुय्यम प्रकल्प आणि छंद अत्यंत महत्त्वाचे असतात. ६) महत्त्वाचं गुपित : चांगलं काम करा आणि लौकांना ते सांगा. ७) आता भूगोल तुमच्यावर नियंत्रण गाजवू शकत नाही. ८) चांगले वागा. (जग है एक लहानसं गाव आहे.) ९) कंटाळवाणे व्हा. (काम पूर्ण करण्याचा हाच एक मार्ग आहे. १०) सर्जनशीलता म्हणजे वजाबाकी.
-
Show Your Work (शो युअर वर्क)
कलाकाराप्रमाणे शेअर करा. १) तुम्ही ‘जीनियस’ असण्याची गरज नसते. २) उत्पादनापेक्षा प्रक्रियेचा विचार करा. ३) रोज काहीतरी थोडंसं शेअर करा. ४) कुतूहलांचं कपाट खुलं करा. ५) चांगल्या गोष्टी सांगा. ६) तुम्हाला जे माहीत आहे ते शिकवा. ७) मानवी स्पॅम होऊ नका. ८) एखादा ठीसा खायला शिका. ९) सेलआउट – ‘विकला गेलेला’. १०) चिकाटीने टिकून रहा.
-
Swatashi Khote Bolane Thambava (स्वतःशी खोटे बोलणे थांबवा)
ही अशी कठोर सत्ये आहेत जी कोणीच तुम्हाला सांगणार नाही, पण ती ऐकण्याची, समजून घेण्याची नितांत गरज आहे. तुमच्या जीवनाच्या जोडीदाराच्या वर्तनाबद्दल स्पष्टीकरणे देणे, त्याच्या समर्थनार्थ सबबी सांगणे बंद करा. तुमच्या एखाद्या मित्राने तुमचा अपेक्षाभंग केला असेल, तुम्हाला निराश केले असेल, तर त्याकडे मित्र म्हणून दुर्लक्ष करू नका. कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या उत्तम कामाविषयी उगीचच विनम्रता दाखवू नका, त्याविषयी चारचौघांत अभिमानाने बोलायला अजिबात कचरू नका, मागे-पुढे पाहू नका.
-
Keep Going (कीप गोइंग)
आता थांबू नका ! १) प्रत्येक दिवस नकारात्मक पुनरावृत्तीचा असतो. २) निर्भेळ आनंदाचं केंद्र बांधा. ३) नाम विसरून जा, क्रियापद करा. ४) भेटवस्तू बनवा. ५) ऑर्डिनरी + एक्स्ट्रा लक्ष -एक्स्ट्राऑर्डिनरी अर्थात असाधारण ६) कला राक्षसांचं शिरकाण करा. ७) तुम्ही तुमचं मत बदलू शकता. ८) जेव्हा शंका वाटेल, तेव्हा नीटनेटकं आवरा. ९ ) सैतानांना ताजी हवा आवडत नाही. १०) तुमची बाग तुम्ही फुलवा.
-
What You Are Looking For Is In The Library (व्हॉट यू आर लुकिंग फॉर इज इन द लायब्ररी)
‘काय हवं आहे?’ टोकियोच्या समंजस ग्रंथपाल हा प्रश्न विचारतात. ग्रंथालयात येणारी प्रत्येक व्यक्ती कशाचा शोध घेत आहे, तिला नेमकं काय हवं आहे, हे सायूरी कोमाचीना न सांगता समजतं. आणि तिचा शोध सफल व्हावा, ह्यासाठी त्या योग्य पुस्तकाची शिफारस करतात. अस्वस्थ विक्रेता साहाय्यकाला नवी कौशल्यं शिकायची आहेत. बाळंतपणाच्या रजेनंतर कामावर रुजू झालेली आई पदावनतीमुळं आलेल्या नैराश्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करत आहे. प्रामाणिक लेखापालाला पुरातन वस्तूंचं दुकान उघडायची तळमळ आहे. अलीकडेच निवृत्त झालेला कर्मचारी आयुष्याचा नवा अर्थ शोधत आहे. ह्या प्रत्येकाला कोमाचींनी सुचवलेल्या विलक्षण पुस्तकामध्ये आपली स्वप्नं साकार करण्याचे मार्ग सापडतात. ‘तुम्ही जे शोधत आहात, ते ग्रंथालयात मिळेल’ हे पुस्तक ग्रंथालयांची अद्भुत दुनिया आणि परस्परसंबंधांची जाणीव ह्याविषयी आहे. हृदयाची धडधड काय सांगते हे लक्षपूर्वक ऐकलं, समोरून आलेली संधी सोडली नाही आणि मनमोकळेपणानं बोललात, तर तुम्ही दीर्घकाळ पाहिलेली स्वप्नं साकार होतील असं सांगणाऱ्या प्रेरणादायी कहाण्या ह्या पुस्तकात वाचायला मिळतील.
-
Ravan (रावण)
आपल्या भावांप्रति असलेल्या प्रेमाबाबत राम आणि रावण यांच्यात काय फरक होता ? शूर्पणखेने रावणाविरुद्ध कशा प्रकारे षड्यंत्र रचलं ? कोण होती रावणाची बहीण कुंभिनी ? बौद्ध परंपरेत रावणाविषयी कोणती समजूत आहे ? रामायणातील खलनायक लंकाधिपती रावण याच्याविषयी असे अनेक प्रश्न भारतीय जनमानसात उपस्थित होत राहतात. हे पुस्तक भारतातील सर्वांत विख्यात महाकाव्य रामायण आणि रावण यांचं विस्तृत विश्लेषण करत, रावणास सविस्तरपणे जाणून घेण्याची वाट मोकळी करतं. या ज्ञानी आणि महान राजाच्या कर्मांमुळे त्याचं राज्य आणि परिवार यांवर आपत्ती कोसळली. आधुनिक काळात पौराणिक गाथांच्या प्रासंगिकतेविषयी तर्कपूर्ण रीतीने लेखन करणारे देवदत्त पट्टनायक यांचं हे पुस्तक रावणाच्या पतनाची कारणं समजावून सांगण्याचा प्रयत्न करतं. इथे रावण एक मनोवैज्ञानिक अवस्थेचं रूपकही आहे. रावणाला समजून घेताना आपण स्वतःला आणि आपल्या व इतर लोकांच्या आत दडलेल्या रावणाला समजून घेऊ शकतो.
-
Shambhudnya (शंभूज्ञा)
"शंभुज्ञा म्हणजे स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याची प्रतिज्ञा" यामध्ये अटळ धैर्य आहे, बलिदानाची प्रेरणा आहे, अन्यायाची चीड आहे अन् स्वराज्याप्रति अखंड निष्ठा आहे. संकटाशी लढण्याची वृत्ती, अपयशासमोर न झुकता उभे राहण्याची ताकद, संकटाशी दोन हात करण्याचे सामर्थ्य. "शंभुज्ञा म्हणजे जीवनयुद्धात विजय मिळविण्यासाठी लागणारी आतली ज्वाला - एक शौर्यगाथा."
-
Mahanayak Karna (महानायक कर्ण)
महाभारतातील एक महानायक म्हणजे कर्ण. त्याचं नाव घेताच मनामध्ये अनेक परस्पर विरोधी प्रतिमा उभ्या राहतात – इंद्राला आपली कवचकुंडलंही दान करणारा कर्ण कधी दानशूरतेच्या सर्वोच्च शिखरावर असतो, तर कधी तो दुर्योधनाच्या दरबारामध्ये द्रौपदी वस्त्रहरणाच्या घृणास्पद कृत्यात सहभागी होतो. या कादंबरीचा निवेदक कर्णाचा बालपणीचा मित्र आणि हितचिंतक आहे. सूतपुत्र असल्याने कर्णाला भोगावे लागलेले अपमान तसंच सर्वोत्तम धनुर्धर म्हणून झालेला त्याचा विकास यांचा तो साक्षीदार आहे. तो केवळ त्याच्या वीरत्वाचे, दानशूरतेचे प्रसंग कथन करत नाही, तर तो कर्णाचं पतन झाल्यामुळे मित्र म्हणून त्याला होणाऱ्या यातनाही झेलतो. पाप-पुण्य यांच्यात दुभंगलेलं जीवन कर्ण बेधडकपणे जगतो खरा, परंतु अंतिमतः तो मृत्युशय्येवर असताना पाप-पुण्याच्या पारड्यांतील कोणतं पारडं जास्त जड आहे हे ठरवण्याची जबाबदारी श्रीकृष्णावर येते. तेव्हा तो जे उत्तर देतो, ते चिंतनीय तर आहेच, परंतु कर्णाच्या जीवनाच्या कहाणीचा सर्वोच्च शिखरबिंदूही आहे.
-
Vivahsanstha,Kutumbsanstha Aani Streemukti (विवाहसंस्था, कुटुंबसंस्था आणि स्त्रीमुक्ती)
दिवाकर मोहनी ह्यांनी १९९२ ते २००१ या काळात ‘आजचा सुधारक’ ह्या मासिकात लिहिलेल्या लेखांचे हे संपादित संकलन आहे. ह्यात मोहनींनी विवाहसंस्था, कुटुंबसंस्था आणि स्त्रीमुक्ती ह्यांसंदर्भात अभिनव मांडणी केली आहे. विवाहसंस्था, कुटुंबसंस्था आणि स्त्रीमुक्ती ह्यांना परस्परांपासून वेगळे करताच येत नाही. किंबहुना, विवाहसंस्था आणि कुटुंबसंस्था ह्यांच्यातील जे नाते आतापर्यंत विविध विचारप्रणालींनी गृहीत धरले आहे, त्यालाच हे पुस्तक छेद देते. स्त्रियांच्या लैंगिक स्वातंत्र्यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या व तेवढ्याच नाजूक-निषिद्ध विषयाला ह्या पुस्तकातून मोहनींनी हात घातला आहे. ह्या विचारांवर जी साधकबाधक चर्चा घडली, तिचाही ह्या पुस्तकात समावेश केलेला आहे. मोहनींची मांडणी रूढ विचारांना धक्का देणारी असली, तरी त्यावर विचारविमर्श करण्यास अजूनही जागा आहे. त्यामुळे सुजाण वाचकांनी आपापले पूर्वग्रह दूर ठेवून समाजहिताच्या दृष्टिकोनातून ह्या पुस्तकाचे वाचन, त्यावर चिंतन व मुक्त चर्चा करावी, असे आमचे त्यांना नम्र आवाहन आहे.
-
The Big Bull Of Dalal Street (द बिग बुल ऑफ दलाल स्ट्रीट)
बाजाराचा आदर करा. मोकळे मन ठेवा. काय भाग घ्यायचा हे जाणून घ्या. तोटा कधी घ्यायचा हे जाणून घ्या. जबाबदार रहा,' असे भारतातील प्रतिष्ठित शेअर बाजार गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला अनेकदा म्हणत असत. 'बिग बुल' म्हणून विख्यात असलेल्या राकेश झुनझुनवाला यांच्यावर माणूस आणि गुंतवणूकदार अशा दोन्ही बाबतींबाबत हे पुस्तक प्रकाश टाकतं. हे पुस्तक म्हणजे, त्यांचं चरित्र नसून त्यांना लखलाभ ठरणाऱ्या गुंतवणुकीचं ते विस्तारानं विवेचन करतं. दीर्घकालीन गुंतवणुकीचे फायदे, शेअर बाजारातल्या टाळता येण्याजोग्या चुका, कर्ज घेऊन केलेली गुंतवणूक अशा आणि इतरही मुद्द्यांचा समावेश आहे.
-
Raja Harishchandra (राजा हरिशचंद्र)
भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील पहिला मूक चित्रपट हा ‘राजा हरिश्चंद्र’ होय! चित्रपट, नाटके, गीते, कथा, कविता, अभंग, पोवाडे, भारूडे, आख्याने अशा अनेक कलाकृतींतून वर्षानुवर्षे ‘सत्यवादी राजा हरिश्चंद्र’ या व्यक्तिरेखेने मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. मराठी साहित्याला समृद्ध केले. तर रसिक वाचकांच्या भेटीसाठी घेऊन येत आहोत, पौराणिक कथेतील फॅन्टसी (कल्पनाविलास) टाळून ऋषी विश्वामित्र, तारामती आणि हरिश्चंद्र यांच्या स्वगतातून साकारलेली, ‘राजा हरिश्चंद्र’ या विषयावरील पहिली मराठी कादंबरी ! राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज साहित्य सेवा पुरस्काराने सन्मानित कादंबरी
-
Ammachya Dayaritil Kahi Pane (अम्माच्या डायरीतील काही पाने)
तेलुगू भाषेत प्रकाशित झाल्यानंतर अतिशय अल्पावधीत ही कादंबरी बेस्टसेलर ठरली , एवढंच नाही तर ही कादंबरी आजही बेस्ट सेलर च्या श्रेणीत आहे. आता ही कादंबरी तुमच्यासमोर मराठीत उपलब्ध आहे. ज्या प्रकारे दक्षिणेतील लोकांनी मूळ तेलुगू कादंबरीला आणि तिच्या कथेला प्रतिसाद दिला आहे, त्याचप्रमाणे मराठी वाचकही या कादंबरीला भरभरून प्रतिसाद आणि प्रेम देतील अशी आम्हाला खात्री आहे. ही एक अशी प्रेमकथा आहे, जी प्रत्येकाला स्वतःमध्ये डोकावून पाहण्यासाठी प्रेरित करेल. पुस्तकातील काही ओळी मला एक सांगा... तुम्हाला कधी कुणी पत्र लिहिलं आहे का? प्रेमपत्र किंवा अगदी साधं पत्र? बरं, ते जाऊ दे... तुम्ही कधी कुणाला पत्र लिहिलं आहे का? मला वाटतं, आपण रोज एकमेकांशी जे बोलत असतो, तेच जर शब्दांत मांडून कागदावर लिहिलं, तर ते पत्र होतं, असं समजणारा मी एक सरळसाधा माणूस आहे. माहीत नाही का, पण आज मला तुम्हाला एक प्रेमकथा सांगाविशी वाटतेय, अर्थात तुम्हाला पत्र वाचायची सवय आहे की नाही, हे मला माहीत नाही, पण तरीसुध्दा मी लिहितोय अम्माची प्रेमकहाणी. जेव्हा मला वाटलं की एका आईचीही प्रेमकथा असू शकते, तेव्हापासूनच ही यात्रा सुरु झाली. ही एका आईच्या डायरीमधील काही पानं आहेत. चांदण्या रात्री, लाटा पाहताना, आपल्या स्वप्नांना लपवून ठेवत मी लिहिलेलं हे एक प्रेमपत्रच आहे
-
Dhoka (धोका)
सध्या जगात आणि भारतातही नवउदारमतवादाचे युग अवतरले आहे. याचे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण असेही वर्णन केले जाते. माझ्या मताने हे शब्दप्रयोग फसवे आहेत. ‘उदारीकरण’ म्हटले की, त्यात काही तरी चांगले आहे, असा भास निर्माण होतो. या नव्या जागतिक प्रवाहामध्ये चांगले काहीही नाही. हे निव्वळ भांडवलाने आणलेल्या निर्लज्ज नफेखोर नशेचे युग आहे. कुठल्याही मार्गाने नफा मिळवला; तर तो योग्यच आहे, अशी शिकवण अप्रत्यक्षपणे मिळत आहे. परिणाम म्हणून जगभर खोट्या, बनावट, आरोग्याला हानिकारक अशा पदार्थांची निर्मिती आणि विक्रीचं प्रमाण वाढते आहे. एका अंदाजानुसार जगात एकूण बनावट, खोटा, आरोग्याला हानिकारक माल बनवण्याचा काळा धंदा हा आता १.५ ट्रिलिअन डॉलर इतका व्यापक झाला आहे आणि इतर कुठल्याही उद्योगाच्या तुलनेत तो जास्त वेगाने वाढतो आहे.
-
Mithakanpasun Vidnyanaparyant (मिथकांपासून विज्ञानापर्यंत)
विज्ञान आणि धर्माच्या मध्ये ‘वास्तविकतेची’ सीमारेषा विज्ञान आणि धर्म हे एकमेकांचे विरोधक आहेत की एकमेकांना पूरक ? एक अत्यंत धार्मिक व्यक्ती, चांगली वैज्ञानिक असू शकते का? विज्ञान हे लोकांना धर्मभ्रष्ट करतं का? एखाद्या अत्यंत धार्मिक समाजात, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढू शकतो का ? आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वैज्ञानिक असलेल्या, कवीमनाच्या गौहर रझा ह्यांच्यासमोरसुद्धा हे प्रश्न अनेकदा उपस्थित झाले. कधी कुंभमेळ्याच्या गर्दीत, तर कधी विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारताना. ह्यांपैकी काही प्रश्न आपल्याला विज्ञानाकडे आणि काही धर्माकडे घेऊन जातात. ह्या प्रश्नांची उत्तरं एका कवीमनाच्या वैज्ञानिकाने शोधायला सुरुवात केली, तेव्हा मिथकं आणि कहाण्यांबरोबरच धर्म, तत्त्वज्ञान, अध्यात्म आणि विज्ञानाचे अनेक पैलू पुढे आले. हे पुस्तक ब्रह्मांडाच्या आणि जीवसृष्टीच्या विकासाची बदलती कहाणी सांगताना ‘विज्ञाना’ची व्याख्या करण्याचा एक प्रयत्न आहे. इतिहासाची पानं उलटत-उलटत यात सांगितलं गेलंय, की विज्ञान आणि धर्म ह्यांच्यामध्ये ‘वास्तविकते’ची सीमारेषा आखणं आवश्यक आहे. ही गोष्टसुद्धा पावला-पावलांवर स्पष्ट होत जाते, की तार्किक दृष्टी, वैज्ञानिक पद्धती आणि मानवी संवेदना या परस्परपूरकच आहेत.
-
Ramrao Kahani Bhartachya Sheti Sankatachi (रामराव कहाणी भारताच्या शेती संकटाची)
शेतकरी आत्महत्यांसाठी ओळखल्या जाणार्या महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील कापूस उत्पादक रामराव पंचलेनीवार यांनी २०१४ मधील एका सकाळी दोन बाटल्या कीटकनाशक प्राशन केले. जर आत्मघाताचा त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला असता तर शेतकरी आत्महत्येच्या आकड्यांमधील ( आता अप्रकाशित ) इतरांसारख्या एक आकडा बनून राहिले असते. कारण भारतात प्रत्येक तीस मिनिटाला एक शेतकरी आपले प्राण गमावतो. केवळ महाराष्ट्रातच गेल्या दोन दशकांत अशा ६० हजार आत्महत्या झालेल्या आहेत. पण चमत्कार व्हावा तसे रामराव यातून बचावले. रामरावांच्या माध्यमातून त्यांनी शेती संकट सोप्या शब्दांत मांडले आहे. या माध्यमातून त्यांनी भारतीय शेतकर्याचे दैनंदिन आयुष्य आणि त्यातील आव्हाने जशीच्या तशी वाचकांसमोर उलगडली आहेत. त्यांचा संघर्ष आणि अनेक बाबतींत येणारे अपयश, दलदलित फसावे अशा समस्यांना त्याचे तोंड देणे आणि या सगळ्याचा शेवट करण्यासाठी त्याला टोकाचा निर्णय घ्यावा लागणे हा सगळा पटच वाचकांसमोर उभा राहतो.
-
Osarlele Vadal (ओसरलेले वादळ)
आपल्या मनोविश्वात अशी गर्दी करणाऱ्या सगळ्याच माणसांच्या स्मरणखुणा राहत नाहीत. काहींची मिथकेच असतात. काहींचे फक्त गूढ, तर काहींचा शतकानुशतके प्रभाव. ज्यांनी ‘ज्ञानेश्वरी’ वाचलेली नाही त्यांच्यावरही ज्ञानेश्वरांचा अप्रत्यक्ष संस्कार होतो. ज्यांनी शेक्सपिअरची नाटके वाचलेली नाहीत, त्यांनाही शेक्सपिअरबद्दल कुतूहल असते. ज्यांनी कार्ल मार्क्स किंवा सिग्मंड फ्रॉइड यांच्या विचारांचा अभ्यास केलेला नाही, त्यांनाही त्यांचा प्रभाव असल्याचे भासत राहते. ज्यांना आपण प्रत्यक्ष पाहतो वा ज्यांच्या प्रभावाखाली थेट येतो त्यांचे अनेक कंगोरे आपल्याला कळतात. काहींच्या मर्यादा लक्षात येतात, तर काहींचे अथांगपण जाणवते. पत्रकारांवर एक सांस्कृतिक जबाबदारी असते. समाजावर प्रभाव टाकणाऱ्या अशा काही माणसांची भेट वाचकांबरोबर घडवून आणणे हे त्यांचे एक कर्तव्य असते. ही भेट कधी मृत्युलेखाद्वारे घडवायची असते, तर कधी जन्मशताब्दीच्या निमित्ताने. कधी एखादा पुरस्कार मिळाला म्हणून तर कधी त्यांच्या साहित्यकृतीचा गौरव होतो म्हणून. या माणसांनी आपल्या मनात वादळे उत्पन्न केलेली असतात. त्या वादळांनी आपल्या मनात झालेली उलथापालथ आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देते. कधी आपल्या मनात नाही, पण समाजात त्यांनी घडवून आणलेली उलथापालथ इतिहास घडवून जाते. ती वादळे ओसरल्यानंतर आपल्याला त्यांचा प्रभाव वेगळ्या प्रकारे जाणवू लागतो. आपल्या मनात वा समाजात ते झंझावात चालू असतात, तेव्हा त्यांचा वेग व व्याप्ती लक्षात येत नाही. आपण स्वतःला सावरून घेत असतो म्हणून किंवा उन्मळून पडतो म्हणून. या पुस्तकात अशा वादळी माणसांवर मी लिहिलेले लेख-अग्रलेख संग्रहित केले आहेत. ते ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये मी संपादक असताना लिहिलेले आहेत. काही अग्रलेख मी ‘लोकमत’चा संपादक असताना लिहिलेले आहेत. वृत्तपत्रीय लेखनाला दोन मर्यादा असतात. पहिली जागेची आणि दुसरी वेळेची. दीड-दोन तासांत आणि मर्यादित शब्दांत त्या माणसांची ओळख वाचकाला करून द्यायची असते. ती ओळख अर्थातच पूर्ण नसते. आपण पूर्णपणे तसे कुणालाच ओळखत नाही आणि तरीही अशी माणसे आपल्या मनाचा व जीवनाचा ठाव घेतात. तो ठाव वाचकांपर्यंत नेण्याचा हा एक प्रयत्न.